सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि ITDP यांनी ९,००० महिला व विद्यार्थ्यांसाठी साक्षरता व आर्थिक साक्षरता कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले

दहाणु। सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP), डहाणू यांच्या सहकार्याने, ९,००० महिला व विद्यार्थ्यांसाठी साक्षरता व आर्थिक साक्षरता कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

या उपक्रमाचे नेतृत्व प्रकल्प अधिकारी विशाल खत्री (आईएएस) आणि इशा रावत, संचालक – सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन, आदी कर्मयोगी अभियान, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमात सुमारे ३,००० महिला आणि ६,००० विद्यार्थी साक्षरता आणि आर्थिक जागरूकतेच्या पाया घालण्यात सक्रिय सहभागी झाले.

या उपक्रमांतर्गत डहाणू व तलासरी येथील १० आश्रमशाळांमध्ये १० साक्षरता व आर्थिक साक्षरता कार्यक्रम पार पडले, ज्याद्वारे महिलांना व विद्यार्थ्यांना शिक्षण व व्यवहारिक आर्थिक ज्ञानाचा लाभ मिळाला.

कार्यक्रमातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या मातांना स्वतःचे नाव लिहिण्यात मदत केली — अशा अनेक महिलांसाठी हा पहिला शिक्षणाचा टप्पा होता. त्यांच्या सहभागाचा गौरव करण्यासाठी प्रत्येक महिलेला साडी, साखर व चहा भेट देण्यात आला.
विशाल खत्री (आईएएस) – प्रकल्प अधिकारी, आदी कर्मयोगी अभियान, ITDP डहाणू, म्हणाले, "हा उपक्रम सहकार्याचा परिणाम दर्शवतो. साक्षरता आणि आर्थिक जागरूकता हे मजबूत, आत्मनिर्भर समाज उभारण्यासाठी महत्त्वाचे आहेत."
                                                                                  इशा रावत, संचालक – सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन, म्हणाल्या, "विद्यार्थ्यांनी आपल्या मातांना नाव लिहिण्यात मदत करताना पाहणे खूप प्रेरणादायी होते. साक्षरता महिलांना सशक्त बनवते आणि उज्ज्वल भविष्यासाठी आत्मविश्वास निर्माण करते."

हा उपक्रम केवळ महिलांना प्राथमिक साक्षरतेची ओळख करून देत नाही, तर आर्थिक कौशल्यांविषयीही जागरूकता निर्माण करतो, ज्यामुळे सहभागी महिलांना स्वावलंबन आणि सशक्तीकरणाकडे पहिले पाऊल टाकता येईल. हा उपक्रम सकारात्मक बदल, आत्मविश्वास व मजबूत समुदाय निर्माण करण्याचा प्रेरणादायी प्रारंभ आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची एआय-आधारित ग्राहक सेवेसाठी भागीदारी

भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक असलेली टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी, सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून 24 तास ग्राहक सेवा आणि रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना उत्तर मिळण्याचा वेळ काहीकाही दिवसांवरून कमी होऊन 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच ईमेल उघडण्याचे प्रमाण 50–60% पर्यंत वाढले आहे. मुंबई। टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (टीआरआयएल) आणि जगातील नंबर 1 एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्सफोर्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. ग्राहकांना उत्तर देण्याचा वेळ काही दिवसांवरून कमी होऊन आता फक्त 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच कंपनी आता एकाच वेळी हजारो ग्राहकांशी सहज संपर्क साधू शकते.  असे गिरीश हड़कर (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड), अरुंधती भट्टाचार्य (प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया – ...

सॅमसंग आणि गुगलने दिली नवीन इंटेलिजेंट आयवेअरची पहिली झलक

मुंबई। सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड आणि गुगलने गुगल आय/ओ २०२६ मध्ये आयवेअर भागीदार जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्कर यांच्या सहयोगाने डिझाइन केलेल्‍या दोन प्रीमियम मॉडेल्सची पहिली झलक दाखवत नवीन इंटेलिजेंट आयवेअरचे अनावरण केले. मोबाइल फोनसाठी सहयोगी डिवाईस म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले हे नवीन आयवेअर वापरकर्त्‍यांना आवाजाच्या संवादाद्वारे मदत मिळवण्यास आणि त्यांच्या फोनशी विनासायासपणे जोडले जाण्यास सक्षम करते, जेथे ही सुविधा नेहमीच्या चष्म्याच्या रचनेत मिळते. आयवेअर भागीदारांसह सह-निर्मित केलेले हे इंटेलिजेंट आयवेअर क्रांतिकारी एआय क्षमतांना आराम आणि शैलीसोबत एकत्र आणते, ज्यामध्ये सॅमसंगचे हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील अग्रस्थान आणि गुगलचे एआय तंत्रज्ञान प्रीमियम आयवेअर डिझाइनशी जोडले गेले आहे. प्रत्येक आयवेअर ब्रँड या डिवाईसला वेगळा डिझाइन दृष्टिकोन देतो. फॅशन आयवेअरमधील आपल्या परंपरेसाठी प्रसिद्ध असलेले जेंटल मॉन्स्टर हे नाविन्यपूर्ण तरीही सुबक शैली सादर करते, तर वॉर्बी पार्कर परिष्कृत आणि चिरंतन डिझाइन्सचे प्रदर्शन करते. वापरकर्त्‍यांच्‍या सोबतीने रिअल टाइममध्ये ...

कर्करोग वगळता इतर शारीरिक व्याधी असलेल्या वृद्ध व्यक्तींना सदभावना वृद्धाश्रममध्ये मोफत प्रवेश मिळेल

मुंबई। जगातील सर्वात मोठे मोफत सदभावना वृद्धाश्रम, विनूभाई बाचूभाई नगरेचा येथील नवीन परिसरात, निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना आयुष्यभर पूर्णपणे मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये ७ टॉवर्समधील प्रत्येक टॉवरमध्ये ११ मजले असतील, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला पुरेशी जागा आणि काळजी मिळेल. तसेच, जैन समाजातील वृद्धांसाठी एक संपूर्ण टॉवर वेगळा बनवण्यात आला आहे, जिथे एक मंदिरही बांधण्यात आले आहे. ‘विनूभाई बाचूभाई नगरेचा परिसर’ येथील सदभावना वृद्धाश्रम २० लाख चौरस फूट बांधकामाचे आहे. ५०० कोटी रुपये खर्च करून, १४०० खोल्यांमध्ये ५००० निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची सोय केली जाईल. वृद्धाश्रम ही केवळ भारतीय संस्कृतीच नाही, तर आजच्या कलियुगाची गरज आहे. दुर्दैवाने, संयुक्त कुटुंब पद्धती मोडीत निघत असल्यामुळे अनेक लोक असहाय्य होत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून राजकोटमध्ये 'विनुभाई बचूभाई नगरेचा परिसर' सदभावना वृद्धाश्रम चालवले जात आहे. या वृद्धाश्रमात जात किंवा धर्माचा कोणताही भेदभाव न करता, गरजू वृद्धांना नियमांनुसार आणि संस्थेच्या प्रवे...