सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

भारत-न्यूझीलंडमध्ये 'मुक्त व्यापार' कराराने भारतासाठी प्रगतीची नवी दारे उघडली : एस. जयशंकर

मुंबई। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये आज एक सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे. दोन्ही देशांनी ऐतिहासिक 'मुक्त व्यापार करारावर' (एफटीए) स्वाक्षरी केली असून, यामुळे भारताच्या निर्यातीला मोठा वेग मिळणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या कराराचे वर्णन 'ऐतिहासिक मैलाचा दगड' असे केले असून, यामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक विश्वास आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर २७ एप्रिल रोजी हा करार अंतिम करण्यात आला. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे वाणिज्यमंत्री टॉड मॅक्ले यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी वेळेत हा करार पूर्ण झाल्याचेही जयशंकर यांनी नमूद केले. करारानुसार, भारतातून न्यूझीलंडला जाणाऱ्या १०० टक्के निर्यातीवर शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून भारतात येणाऱ्या सुमारे ९५ टक्के वस्तूंवरील शुल्क टप्प्याटप्प्याने कमी किंवा रद्द करण्यात येण...
हाल की पोस्ट

किया इंडियाने ५०० वर्कशॉप्सचा टप्पा ओलांडला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने अहमदाबादमधील चांदखेडा येथे आपल्या ५००व्या सर्व्हिस वर्कशॉपच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. या टप्‍प्‍यामधून कंपनीची ग्राहकांना प्राधान्‍य देण्‍याप्रती अतूट कटिबद्धता दिसून येते. तसेच, हे पाऊल देशभरातील १.५ दशलक्षहून अधिक ग्राहकांच्या वाढत्या संख्येसाठी मजबूत आणि भविष्यवेधी विक्रीपश्चात्त परिसंस्‍थेला प्रबळ करते. ५००व्‍या वर्कशॉपचा हा टप्पा नेटवर्कचा विस्‍तार दाखवण्‍यासोबत विनासायास, पारदर्शक आणि सोयीस्कर मालकीचा अनुभव देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर अधोरेखित करतो. 'मूव्‍हमेंट दॅट इन्‍स्‍पायर्स' या मूळ तत्त्वावर आधारित कंपनी आपल्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सेवा क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांशी होणारा प्रत्येक संवाद विश्वास, कार्यक्षमता आणि सुलभतेने परिपूर्ण असेल. अहमदाबादमधील चांदखेडा येथे नुकतेच उद्घाटन झालेले वेस्ट कोस्ट वर्कशॉप हे कियाचे भारतातील सर्वात मोठे वर्कशॉप आहे, ज्‍यामधून कंपनीची विस्तार आणि सेवा उत्कृष्टतेप्रती असलेली कटिबद्धता दिसून येत...

वर्षा राणे यांच्या ‘‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ला सन्मान, दादा साहेब फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये होणार स्क्रीनिंग

मुंबई। ऑल प्ले प्रोडक्शन्सची डेब्यू मराठी लघुपट ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ज्याचे लेखन व दिग्दर्शन वर्षा राणे यांनी केले आहे, 16 व्या दादासाहेब फ़िल्म फेस्टिवल 2026 मध्ये अधिकृत निवडीसह सन्मानित झाला आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंगही होणार आहे, जे कोणत्याही नवोदित दिग्दर्शकासाठी महत्त्वाची कामगिरी मानली जाते। हा महोत्सव दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाल्के Dhundiraj Govind Phalke यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो आणि नव्या, अर्थपूर्ण व प्रगतिशील सिनेमाला व्यासपीठ उपलब्ध करून देतो. अशा व्यासपीठावर निवड होणे म्हणजे चित्रपटाच्या विषयवस्तूची आणि मांडणीची गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे। ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ हा सामाजिक आशय असलेला चित्रपट असून अंधश्रद्धा आणि जागरूकता यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडतो. कथानक एका छोट्या मुलीभोवती फिरते, जी आपल्या गावातील प्रचलित समजुतींना आव्हान देते. विशेष म्हणजे या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका स्वतः वर्षा राणे यांनी साकारली आहे, ज्यामुळे कथेला वैयक्तिक आणि वास्तवदर्शी स्पर्श मिळतो। मर्य...

सॅमसंगने बीस्‍पोक एआय विंडफ्री इन्व्हर्टर स्प्लिट एसी श्रेणी लाँच केली

मुंबई। सॅमसंग इंडियाने बीस्‍पोक एआय विंडफ्री इन्व्हर्टर स्प्लिट एसी श्रेणी लाँच केली आहे. यामध्ये विविध विभागांतील २३ मॉडेल्सचा समावेश आहे आणि त्यांची किंमत ३२,९४० रुपयांपासून सुरू होते. हे नवीन एसी एआय फास्ट आणि कंफर्ट कूलिंग तंत्रज्ञानाने सज्ज आहेत, तसेच एआय एनर्जी मोड ३० टक्‍क्‍यांपर्यंत ऊर्जेची बचत करतात. सॅमसंगची एआय फास्ट व कंफर्ट कूलिंग यंत्रणा वापरकर्त्याच्या वापराच्या पद्धतींचे आणि रूममधील परिस्थितीचे आपोआप विश्‍लेषण करते. त्यानंतर त्वरित थंडावा देण्यासाठी फास्ट कूलिंग मोड सक्रिय करते, ज्यामुळे ग्राहकांना कडक उन्हात त्वरित थंडावा आणि आराम मिळतो. रूममधील तापमान इच्छित पातळीपर्यंत खाली आले की, एआय तंत्रज्ञान आपोआप विंडफ्री™️/ड्राय कंफर्ट मोडवर स्विच होते, ज्यामुळे वापरकर्त्याच्या गरजेनुसार थंडावा कायम राखला जातो. हे तंत्रज्ञान हजारो सूक्ष्म छिद्रांमधून अतिशय हलक्या स्‍वरूपात थंड हवा पसरवून खोलीतील हवामान संतुलित राखते, ज्यामुळे अंगावर येणारे थंड हवेचे थेट आणि बोचरे झोत टाळले जातात. संपूर्ण कार्यप्रणाली दरम्यान एआय सतत रूममधील परिस्थिती आणि वापरकर्त्याच्या आवडीनिवडींच...

सोमानी सिरॅमिक्स’कडून नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण

मुंबई। जगातील १२ वी सर्वांत मोठी टाइल्स उत्पादक आणि भारतातील टाइल्स, बाथवेअर; तसेच होम अँड बिल्डिंग सोल्युशन्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘सोमानी सिरॅमिक्स लिमिटेड’ने आपल्या नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण केले आहे. घराच्या आणि इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व गरजा एकाच छताखाली पूर्ण करणारे केंद्र म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही नवीन ओळख ‘सोमानी’चा गेल्या पाच दशकांतील प्रवास अधोरेखित करते. केवळ टाइल्स उत्पादक ते आधुनिक जीवनशैलीला आकार देणारा ब्रँड असा हा वेगवान बदल आहे. कंपनीचा विस्तारत असलेला पोर्टफोलिओ लक्षात घेऊन हा नवीन लोगो तयार करण्यात आला आहे. ‘हा नवीन ब्रँड आमच्या ५५ वर्षांच्या प्रवासातील एक निर्णायक क्षण आहे. हे आमची नावीन्यपूर्ण वृत्ती, शाश्वतता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. आम्ही आजवर कमावलेला विश्वास, ताकद आणि व्याप्ती या नवीन ओळखीमध्ये सामावलेली आहे. याशिवाय पुढच्या पिढीचे नेतृत्व कंपनीला पुढे नेण्यासाठी सज्ज होत असताना, ही नवी ओळख आमची भविष्यातील दिशा अधिक स्पष्ट करते,’ अशी माहिती ‘सोमानी सिरॅ...

होमलेनकडून सीबीडी बेलापूर नवी मुंबईमध्ये नवीन स्टुडिओचे उद्घाटन

नवी मुंबई। होमलेन या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान व एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँडने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे आपला पहिला स्टुडिओ लाँच केला आहे. प्रबळ पायाभूत सुविधा आणि मुंबई महानगर क्षेत्राशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे बेलापूर हे महत्त्वाचे व्यापारी आणि निवासी केंद्र म्हणून ओळखले जाते. या लाँचसह, होमलेनने वेगाने वाढणाऱ्या शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, तसेच तंत्रज्ञानावर आधारित एंड-टू-एंड होम इंटीरियर सोल्यूशन्स आता घरमालकांच्या अधिक जवळ आणले आहेत. हा स्टुडिओ संतोष कुमार जे आणि पार्थिबन सुधमन यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे. त्यांची स्थानिक बाजारपेठेतील सखोल समज आणि होमलेनचा तंत्रज्ञान-आधारित दृष्टिकोन यामुळे नवी मुंबईतील घरमालकांना अधिक पारदर्शक, त्रासमुक्त व विनाव्यत्यय इंटीरियरचा अनुभव मिळण्यास मदत होईल. होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी म्हणाले, “नवी मुंबई आमच्यासाठी नेहमी महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे, विशेषतः सीबीडी बेलापूरसारखी ठिकाणे, जिथे प्रबळ पायाभूत सुविधांमुळे निवासी क्षेत्रात शाश्वत वाढ होत आहे. या...

‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरला अक्षय कुमार, करण जोहर, नागराज मंजुळे, आदित्य सरपोतदार आणि इतर अनेक दिग्गजांची पसंती

मुंबई। 'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलरला २० एप्रिल रोजी प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या रितेश विलासराव देशमुख यांनी साकारलेला हा चित्रपट भारताचे महान योद्धे आणि ‘हिंदवी स्वराज्य'चे  संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आणि वारशावर आधारित आहे. ॲक्शन, भावना आणि भव्य दृश्यांनी सजलेल्या ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरने प्रदर्शित होताच सर्वत्र चर्चांना उधाण आणले आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली असून, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनीही या अनोख्या सिनेमॅटिक अनुभवाचे भरभरून कौतुक केले आहे. अभिनेता अक्षय कुमार, निर्माता करण जोहर, दिग्दर्शक नागराज मंजुळे ते आदित्य सरपोतदार यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्रेलरबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत चित्रपटाच्या भव्यतेचे आणि आशयाचे कौतुक केले आहे. ‘राजा शिवाजी’...