सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

एमडीआर रचनेमुळे 'यूपीआय'ची शाश्वतता, नवोन्मेष आणि सुरक्षेला बळ मिळेल: असोचॅम

मुंबई। असोचॅमचे  अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन यूपीआय फ्रेमवर्कचे स्वागत केले आहे. हे नवीन धोरण यूपीआयची शाश्वतता मजबूत करेल, नवोन्मेषाला पाठबळ देईल, फसवणूक रोखेल आणि त्याची स्वीकारार्हता वाढवेल. ही रचना पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वीकृती नेटवर्कला सक्षम करेल, ज्यामुळे यूपीआयचा विस्तार होऊन देशभरातील ग्राहक आणि व्यावसायिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. असोचॅमने सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, ज्याअंतर्गत सर्व व्यक्ती-ते-व्यक्ती यूपीआय व्यवहार, रक्कमेची मर्यादा न ठेवता, पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहेत. तसेच २,००० रुपयांपर्यंतची व्यापारी देयके देखील एमडीआर मुक्त राहतील. ही नवी रचना पात्र लहान व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यक्ती-ते-व्यक्ती श्रेणीअंतर्गत यूपीआय क्यूआर कोडद्वारे दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना शून्य-एमडीआरचा लाभ देत राहील. यामुळे सूक्ष्म आणि लहान व्यावसायिकांना अतिरिक्त देयक खर्चापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. भारता...
हाल की पोस्ट

लखोटिया रियॅलिटीने पनवेलमध्ये ५ आठवड्यांत रु.२५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली

लखोटिया रियॅलिटीने पनवेलमध्ये ५ आठवड्यांत रु.२५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली; देशातील परवडणाऱ्या घरांच्या बाजारात मंदीला छेद परवडणाऱ्या घरांच्या बाजारात राष्ट्रीय घसरणीच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय विक्री मुंबई।  लखोटिया रियॅलिटीने सांगितले की, केवळ ५ आठवड्यांत त्यांच्या केवाळे येथील GPS (ग्रेटर पनवेल सुपरझोन) प्रकल्पातील प्रत्येकी सुमारे रु. २५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली गेली आहेत. देशभरातील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत मोठी घट होत असताना ही विक्री राष्ट्रीय कलाला छेद देणारी ठरली आहे. रु. २५ लाखांच्या घराच्या किमतीनुसार रु.२० लाखांच्या गृहकर्जावर अंदाजे रु. १७,००० मासिक ईएमआय येतो. त्यामुळे एकत्रित मासिक उत्पन्न रु. ५०,०००–६०,००० असलेल्या कुटुंबांसाठी घरमालकीची संधी अधिक सुलभ होते. याउलट, मुंबईच्या मध्यवर्ती भागात किंमत-उत्पन्न गुणोत्तर १०:१ पेक्षा अधिक असल्याने, एवढी रक्कम सरासरी सदनिकेच्या खरेदीसाठीच्या आगाऊ रकमेचा क्वचितच पुरेशी ठरते. नाईट फ्रँकच्या माहितीनुसार, भारतातील आघाडीच्या आठ निवासी बाजारपेठांमध्ये रु. ५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री ...

बजाज इलेक्ट्रिकल्स 'बिग बॉस हिंदी सीझन २०' चे सह-प्रायोजक

टीव्ही आणि डिजिटल माध्यमांवरील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी, ब्रँडचे गीझर, मिक्सर आणि वायर्स बिग बॉसच्या घराचा एक भाग बनतील. शोमध्ये या उत्पादनांशी संबंधित विशेष टास्क असतील, तसेच उत्पादनांचा वापर देखील दाखवला जाईल. मुंबई। बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने भारतातील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक असलेल्या ' बिग बॉस हिंदी सीझन २० ' चे सह-प्रायोजकत्व स्वीकारले आहे. या ब्रँडची तीन अत्यावश्यक घरगुती उत्पादने—गीझर, मिक्सर ग्राइंडर आणि वायर्स—बिग बॉसच्या घरात आणली जातील. गेल्या आठ दशकांपासून भारतीय घरांचा एक भाग असलेल्या या ब्रँडसाठी ही भागीदारी अगदी स्वाभाविक आहे. बिग बॉसच्या घरातील स्वयंपाकघर आणि स्नानगृह—जिथे दररोज मिक्सर आणि गीझर वापरले जातात—आता बजाज इलेक्ट्रिकल्सचा प्लॅटफॉर्म बनतील. संपूर्ण सीझनभर या जागांवर ब्रँडची उपस्थिती दिसून येईल आणि टीव्ही स्क्रीनवरील महत्त्वाच्या प्रसंगी ब्रँडचा लोगो दाखवला जाईल. शोमध्ये दाखवण्यात येणारी तीन उत्पादने त्यांची खास वैशिष्ट्ये प्रदर्शित करतील: मिक्सर ग्राइंडर त्यांचा बहुपयोगीपणा आणि दैनंदिन वापरासाठी; गीझरच्या उत्कृष्ट डिझाइन, आधुनिकता...

लोणावळ्यातील कैवल्यधाम येथे जगातील पहिल्या योग महाविद्यालयाच्या प्लॅटिनम ज्युबिलीचे उपराष्ट्रपती करणार उद्घाटन

लोणावळा: शतकभराचा वारसा असलेली योग संशोधन संस्था कैवल्यधाम येथे भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 18 सप्टेंबर 2026 रोजी उपस्थित राहणार असून, ते गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम कैवल्यधामच्या लोनावळा कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. 1951 मध्ये स्थापन झालेले गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस हे योग शिक्षणासाठी समर्पित जगातील पहिले महाविद्यालय होते. 1962 मध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने या संस्थेला अखिल भारतीय उच्च शिक्षण संस्था (All India Institute of Higher Education) म्हणून मान्यता दिली. अशी मान्यता मिळवणारी ही देशातील पहिली योग संस्था ठरली. गेल्या 75 वर्षांत या महाविद्यालयाने शिक्षक आणि संशोधकांच्या अनेक पिढ्यांना प्रशिक्षण दिले असून, त्यांच्या माध्यमातून कैवल्यधामच्या पद्धती 65 हून अधिक देशांमध्ये पोहोचल्या आहेत. कार्यक्रमापूर्वी बोलताना कैवल्यधामचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), सुबोध तिवारी म्हणाले, “पंचाहत्तर वर्षांपूर्वी या महाविद्यालयाने...

लोकमान्य टिळकांच्या शैक्षणिक आणि संस्कारांच्या वारशाला गणेशोत्सवातून उजाळा

मुंबई। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाळेने शिक्षणासोबतच संस्कारांचा वारसा पुढे नेला. याच वारशाला गणेशोत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीशी जोडण्याची वेगळी संकल्पना विलेपार्ले पूर्व येथील रोहित तोस्कर आणि त्यांच्या परिवाराने साकारली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ उत्सव साजरा न करता, लोकमान्य टिळकांच्या विचारांची, शाळेच्या आठवणींची आणि त्या काळातील संस्कारांची पुढच्या पिढीला ओळख करून देण्याचा प्रयत्न या संकल्पनेतून करण्यात आला आहे. जुन्या आठवणी, संस्कार आणि आजची नवी पिढी यांना एका धाग्यात जोडण्याची कल्पना या संकल्पनेतून मांडण्यात आली आहे. उत्सवाच्या निमित्ताने आपल्या इतिहासाशी आणि परंपरेशी असलेले नाते नव्याने जपता यावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी सजावटीची जबाबदारी गणेश जोशी, मयुरी ठोंबरे, चंचल ठोंबरे, सुचित्रा ठोंबरे, देवांग हिंगू आणि सिद्धेश मटकर यांनी सांभाळली आहे. त्यांच्या कल्पक सजावटीतून लोकमान्य टिळकांच्या विचारांचा आणि जुन्या संस्कारांचा वारसा प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आजच्या क...

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती मुंबई। ज्येष्ठ पत्रकार आणि 'मुंबई तरंग' (गुजराती आणि हिंदी वृत्तपत्र) तसेच 'वेस्टर्न इंडिया टाइम्स' (इंग्रजी दैनिक) चे मुख्य संपादक, दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वश्रुत आहे की, दिलीप पटेल हे पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांच्या निःपक्षपाती आणि निर्भीड लेखनासाठी ओळखले जातात. ते मुंबईत, तसेच दिल्लीसह संपूर्ण गुजरातमध्ये आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनता, सरकार आणि प्रशासनाशी सक्रियपणे संवाद साधतात. कामगार, शेतकरी आणि सैनिकांचा आवाज नेहमीच उठवणाऱ्या, तसेच सरदार साहेबांच्या 'सामर्थ्यवान भारताचा पाया, सरदारांचे विचार' आणि 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वांचे पालन करणाऱ्या व्यक्तीची पक्षाच्या या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने गुजरातमध्ये पक्षाला आणखी बळकटी मिळेल.

विकसित भारतासाठी प्रतिभा निर्मिती’ विषयावर मुंबईत परिषद

मुंबई। “ विकसित भारतासाठी प्रतिभा निर्मिती: उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील अधिक मजबूत सहकार्याद्वारे भविष्यासाठी सक्षम कौशल्यनिर्मिती ” या विषयावर टीमलीज एडटेक तर्फे मुंबईत उद्योग क्षेत्रातील गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली. दोन तास चाललेल्या या परिषदेत सुमारे २५ सीएचआरओ, एचआर प्रमुख, सीएसआर प्रमुख आणि विविध उद्योगांतील वरिष्ठ नेते सहभागी झाले. आयआयटी भिलाईचे संचालक प्रा. राजीव प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, डिजिटलायझेशन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे उद्योग आणि रोजगाराच्या स्वरूपात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर भारताला भविष्यात कोणत्या प्रकारच्या कौशल्यसंपन्न मनुष्यबळाची गरज भासेल, यावर चर्चा करण्यात आली. उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील संबंध केवळ भरतीपुरते मर्यादित न राहता प्रतिभा निर्मितीच्या प्रक्रियेत उद्योगांचा अधिक सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल, यावर परिषदेत भर देण्यात आला. अभ्यासक्रम निर्मितीत उद्योगांचा सहभाग, प्रत्यक्ष उद्योगाधारित प्रकल्प, इंटर्नशिप, मार्गदर्शन, अनुप्रयुक्त संशोधन आणि विद्यार्थ्यांना कामाच्या...