आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त खावडा फेज IV-Cचा संदेश — माहितीपूर्ण समुदायच उभारतात विकासाचा मजबूत पाया माहितीच्या बळावर शेतकरी सशक्त; वर्गाबाहेरील साक्षरतेचा नवा अर्थ जमिनीचे कागदपत्र असोत वा नुकसानभरपाईची प्रक्रिया; योग्य माहिती शेतकऱ्यांना अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम करते पालघर: साक्षरता म्हटले की डोळ्यासमोर येते ती शाळा, पुस्तक आणि वाचन-लेखनाची दुनिया. मात्र आजच्या काळात साक्षरतेचा अर्थ त्यापलीकडे गेला आहे. आपल्या हक्कांची माहिती असणे, आवश्यक कागदपत्रे समजून घेणे, सरकारी प्रक्रिया जाणून घेणे आणि अफवा व तथ्य यातील फरक ओळखणे, हीदेखील साक्षरतेचीच एक महत्त्वाची बाजू आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत ही माहिती त्यांच्या जमिनीशी आणि उपजीविकेशी थेट जोडलेली असते. जमिनीच्या नोंदी समजून घेणारा, मालकी हक्काबाबत जागरूक असणारा, नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणारा आणि आपल्या हक्कांची जाणीव असलेला शेतकरी अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो. याच विचारातून खावडा 4C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने समुदाय संवादामध्ये माहिती आणि जागरूकतेला महत्त्व दिले आहे. आंतररा...
महिला सक्षमीकरणासाठी 'युडब्ल्यूएम', 'डब्ल्यूडब्ल्यूबी' आणि 'एचएसबीसी इंडिया'चा पुढाकार मुंबई। ग्रामीण भारतातील महिला सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने, युनायटेड वे मुंबई, विमेंस वर्ल्ड बँकिंग आणि एचएसबीसी इंडिया यांनी महाराष्ट्र, आसाम आणि बिहारमधील ३ लाख महिलांना वेळेवर आणि परवडणारे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एकत्र काम करण्याचे घोषित केले आहे. उद्योग निर्मिती आणि त्याच्या विकासाला गती देण्यासाठी हा उपक्रम स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) आणि संबंधित राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाचे एनआरएलएमचे सहसचिव अमित शुक्ला म्हणाले, "महिलांनी केवळ कर्जावर आधारित उपजीविकेपुरते मर्यादित न राहता स्वतःचे उद्योग स्थापन करावेत, यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. सध्या सुमारे ३८.५ लाख महिला-संचालित उद्योगांना कर्जाची आवश्यकता आहे, जी ५ लाख ते २० लाख रुपयांच्या श्रेणीत तब्बल १२,३८८ कोटी रुपयांची संधी दर्शवते. एचएसबीस...