सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

१० हजारांखाली आयटेल सर्वाधिक टिकाऊ व विश्वासार्ह ब्रँड: सीएमआर

मुंबई। आयटेल या आपल्‍या नवनवीन स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सच्या माध्यमातून तंत्रज्ञान सहजसाध्य करण्‍यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्या ताज्या अहवालात अव्वल स्थान पटकावले आहे. 'भारतातील डिवाईस मार्केटमध्‍ये टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या किमतीची वाढती भूमिका' या विषयावर हा अहवाल आधारित आहे. विविध श्रेणींमधील टिकाऊपणाची कामगिरी, पोर्टफोलिओची ताकद आणि व्याप्ती या आधारावर आयटेल १० हजार रुपयांखालील श्रेणीत ०.८६ च्या प्रभावी ड्यूरेबिलिटी इंडेक्ससह अव्वल ब्रँड ठरला आहे. यानंतर सॅमसंग (०.७९) आणि विवो (०.७२) यांचा क्रमांक आहे. १५ कोटींहून अधिक ग्राहकवर्ग असलेला आयटेल ब्रँड आज जगभरातील ८० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्‍या इंडस्ट्री रिसर्च ग्रुप (आयआरजी)चे उपाध्यक्ष प्रभू राम म्हणाले की, १०,००० रुपयांखालील सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात मोठा बदल होत असून टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणारी किंमत (डीआरए) हे खरेदीचे प्रमुख घटक बनले आहेत. ग्राहक आता मजबूत बा...
हाल की पोस्ट

सॅमसंग इंडियाचा हायब इंडियासोबत सहयोग

मुंबई। सॅमसंग इंडियाचा 'शो देम हाऊ इट्स डन #विथगॅलॅक्सी' उपक्रम हायब इंडियासोबत सहयोगाने प्रतिभावान मुलींना ऑडिशन्‍सच्‍या माध्‍यमातून त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी देशव्यापी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन सक्षम करत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून, सॅमसंग इंडिया १० शहरांमध्ये गॅलेक्सी ऑडिशन स्टुडिओज लाँच करणार आहे. या अंतर्गत निवडक सॅमसंग एक्सपिरियन्स स्टोअर्सचे रूपांतर ऑडिशन आणि कंटेंट निर्मितीच्या केंद्रांमध्ये केले जाईल. या स्टुडिओंमध्ये प्रत्येक शहरातील ऑडिशनच्या पहिल्या दिवशी नामांकित क्रिएटर्सच्या मार्गदर्शनाखाली मास्टरक्लासेस आयोजित केले जातील, ज्‍यामुळे सहभागी मुलींना सादरीकरण करण्यास, नवनवीन कंटेंट तयार करण्यास आणि त्यांच्या यशोगाथा जगासमोर मांडण्यास प्रेरणा मिळेल. "या उपक्रमाच्या केंद्रस्थानी एक साधा पण महत्त्वाचा विश्वास आहे, तो म्हणजे भारतातील प्रत्येक तरुणीमध्ये मोठी स्वप्ने पाहण्याचा आत्मविश्वास असायला हवा आणि तिला जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळायला पाहिजे. हायब इंडियासोबत आमचा सहयोग प्रगतीसाठी सज्ज असलेल्या पिढीला ...

भारत-न्यूझीलंडमध्ये 'मुक्त व्यापार' कराराने भारतासाठी प्रगतीची नवी दारे उघडली : एस. जयशंकर

मुंबई। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये आज एक सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे. दोन्ही देशांनी ऐतिहासिक 'मुक्त व्यापार करारावर' (एफटीए) स्वाक्षरी केली असून, यामुळे भारताच्या निर्यातीला मोठा वेग मिळणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या कराराचे वर्णन 'ऐतिहासिक मैलाचा दगड' असे केले असून, यामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक विश्वास आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर २७ एप्रिल रोजी हा करार अंतिम करण्यात आला. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे वाणिज्यमंत्री टॉड मॅक्ले यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी वेळेत हा करार पूर्ण झाल्याचेही जयशंकर यांनी नमूद केले. करारानुसार, भारतातून न्यूझीलंडला जाणाऱ्या १०० टक्के निर्यातीवर शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून भारतात येणाऱ्या सुमारे ९५ टक्के वस्तूंवरील शुल्क टप्प्याटप्प्याने कमी किंवा रद्द करण्यात येण...

किया इंडियाने ५०० वर्कशॉप्सचा टप्पा ओलांडला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने अहमदाबादमधील चांदखेडा येथे आपल्या ५००व्या सर्व्हिस वर्कशॉपच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. या टप्‍प्‍यामधून कंपनीची ग्राहकांना प्राधान्‍य देण्‍याप्रती अतूट कटिबद्धता दिसून येते. तसेच, हे पाऊल देशभरातील १.५ दशलक्षहून अधिक ग्राहकांच्या वाढत्या संख्येसाठी मजबूत आणि भविष्यवेधी विक्रीपश्चात्त परिसंस्‍थेला प्रबळ करते. ५००व्‍या वर्कशॉपचा हा टप्पा नेटवर्कचा विस्‍तार दाखवण्‍यासोबत विनासायास, पारदर्शक आणि सोयीस्कर मालकीचा अनुभव देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर अधोरेखित करतो. 'मूव्‍हमेंट दॅट इन्‍स्‍पायर्स' या मूळ तत्त्वावर आधारित कंपनी आपल्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सेवा क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांशी होणारा प्रत्येक संवाद विश्वास, कार्यक्षमता आणि सुलभतेने परिपूर्ण असेल. अहमदाबादमधील चांदखेडा येथे नुकतेच उद्घाटन झालेले वेस्ट कोस्ट वर्कशॉप हे कियाचे भारतातील सर्वात मोठे वर्कशॉप आहे, ज्‍यामधून कंपनीची विस्तार आणि सेवा उत्कृष्टतेप्रती असलेली कटिबद्धता दिसून येत...

वर्षा राणे यांच्या ‘‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ला सन्मान, दादा साहेब फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये होणार स्क्रीनिंग

मुंबई। ऑल प्ले प्रोडक्शन्सची डेब्यू मराठी लघुपट ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ज्याचे लेखन व दिग्दर्शन वर्षा राणे यांनी केले आहे, 16 व्या दादासाहेब फ़िल्म फेस्टिवल 2026 मध्ये अधिकृत निवडीसह सन्मानित झाला आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंगही होणार आहे, जे कोणत्याही नवोदित दिग्दर्शकासाठी महत्त्वाची कामगिरी मानली जाते। हा महोत्सव दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाल्के Dhundiraj Govind Phalke यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो आणि नव्या, अर्थपूर्ण व प्रगतिशील सिनेमाला व्यासपीठ उपलब्ध करून देतो. अशा व्यासपीठावर निवड होणे म्हणजे चित्रपटाच्या विषयवस्तूची आणि मांडणीची गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे। ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ हा सामाजिक आशय असलेला चित्रपट असून अंधश्रद्धा आणि जागरूकता यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडतो. कथानक एका छोट्या मुलीभोवती फिरते, जी आपल्या गावातील प्रचलित समजुतींना आव्हान देते. विशेष म्हणजे या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका स्वतः वर्षा राणे यांनी साकारली आहे, ज्यामुळे कथेला वैयक्तिक आणि वास्तवदर्शी स्पर्श मिळतो। मर्य...

सॅमसंगने बीस्‍पोक एआय विंडफ्री इन्व्हर्टर स्प्लिट एसी श्रेणी लाँच केली

मुंबई। सॅमसंग इंडियाने बीस्‍पोक एआय विंडफ्री इन्व्हर्टर स्प्लिट एसी श्रेणी लाँच केली आहे. यामध्ये विविध विभागांतील २३ मॉडेल्सचा समावेश आहे आणि त्यांची किंमत ३२,९४० रुपयांपासून सुरू होते. हे नवीन एसी एआय फास्ट आणि कंफर्ट कूलिंग तंत्रज्ञानाने सज्ज आहेत, तसेच एआय एनर्जी मोड ३० टक्‍क्‍यांपर्यंत ऊर्जेची बचत करतात. सॅमसंगची एआय फास्ट व कंफर्ट कूलिंग यंत्रणा वापरकर्त्याच्या वापराच्या पद्धतींचे आणि रूममधील परिस्थितीचे आपोआप विश्‍लेषण करते. त्यानंतर त्वरित थंडावा देण्यासाठी फास्ट कूलिंग मोड सक्रिय करते, ज्यामुळे ग्राहकांना कडक उन्हात त्वरित थंडावा आणि आराम मिळतो. रूममधील तापमान इच्छित पातळीपर्यंत खाली आले की, एआय तंत्रज्ञान आपोआप विंडफ्री™️/ड्राय कंफर्ट मोडवर स्विच होते, ज्यामुळे वापरकर्त्याच्या गरजेनुसार थंडावा कायम राखला जातो. हे तंत्रज्ञान हजारो सूक्ष्म छिद्रांमधून अतिशय हलक्या स्‍वरूपात थंड हवा पसरवून खोलीतील हवामान संतुलित राखते, ज्यामुळे अंगावर येणारे थंड हवेचे थेट आणि बोचरे झोत टाळले जातात. संपूर्ण कार्यप्रणाली दरम्यान एआय सतत रूममधील परिस्थिती आणि वापरकर्त्याच्या आवडीनिवडींच...

सोमानी सिरॅमिक्स’कडून नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण

मुंबई। जगातील १२ वी सर्वांत मोठी टाइल्स उत्पादक आणि भारतातील टाइल्स, बाथवेअर; तसेच होम अँड बिल्डिंग सोल्युशन्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘सोमानी सिरॅमिक्स लिमिटेड’ने आपल्या नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण केले आहे. घराच्या आणि इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व गरजा एकाच छताखाली पूर्ण करणारे केंद्र म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही नवीन ओळख ‘सोमानी’चा गेल्या पाच दशकांतील प्रवास अधोरेखित करते. केवळ टाइल्स उत्पादक ते आधुनिक जीवनशैलीला आकार देणारा ब्रँड असा हा वेगवान बदल आहे. कंपनीचा विस्तारत असलेला पोर्टफोलिओ लक्षात घेऊन हा नवीन लोगो तयार करण्यात आला आहे. ‘हा नवीन ब्रँड आमच्या ५५ वर्षांच्या प्रवासातील एक निर्णायक क्षण आहे. हे आमची नावीन्यपूर्ण वृत्ती, शाश्वतता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. आम्ही आजवर कमावलेला विश्वास, ताकद आणि व्याप्ती या नवीन ओळखीमध्ये सामावलेली आहे. याशिवाय पुढच्या पिढीचे नेतृत्व कंपनीला पुढे नेण्यासाठी सज्ज होत असताना, ही नवी ओळख आमची भविष्यातील दिशा अधिक स्पष्ट करते,’ अशी माहिती ‘सोमानी सिरॅ...