सीधे मुख्य सामग्री पर जाएं

कोलोरेक्टल कॅन्सर साठी अपोलोने सुरु केला सर्वसमावेशक स्क्रीनिंग कार्यक्रम

बदललेल्या जीवनशैलीमुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ

नवी मुंबई। भारतामध्ये कोलोरेक्टल कॅन्सरच्या केसेस सतत वाढत आहेत. कोलोरेक्टल कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखू यावा आणि त्याला प्रतिबंध घातला जावा यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर्सने एक सर्वसमावेशक स्क्रीनिंग कार्यक्रम 'कोलफिट' सुरु केला आहे. रुग्णांच्या जिवंत राहण्याच्या दरामध्ये सुधारणा व्हावी, उपचारांच्या खर्चात घट व्हावी आणि निदान करण्यात विलंब यासारख्या चिंताजनक समस्या दूर करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 'कोलफिट' मध्ये वृद्ध आणि युवक दोघांसाठी देखील सीआरसी स्क्रीनिंग वाढवण्यावर ध्यान केंद्रित करण्यात आले आहे, आजार लवकरात लवकर लक्षात यावा यावर भर देण्यात आला आहे. भारतात सीआरसीचा वय दर दर १,००,००० पुरुषांमागे ७.२ आणि दर १,००,००० महिलांमागे ५.१ आहे, जो खूपच कमी आहे. देशाची लोकसंख्या १ अरबपेक्षा जास्त आहे, त्यामानाने केसेसची संख्या खूप जास्त आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे भारतात गेल्या पाच वर्षांमध्ये या आजाराच्या रुग्णांचा जिवंत राहण्याचा दर ४०% पेक्षा कमी आहे.

धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात बदललेली जीवनशैली व आहारातील बदल, व्यायामाचा अभाव, तंबाखू आणि मद्य सेवन, अनियमित झोप, लठ्ठपणा आणि मधुमेह, या सर्व कारणामुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ होत आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर हे प्रमाण अजून वाढत जाईल असे वास्तव समोर आले आहे. फायबर कमी आणि प्रोसेस्ड फूड, रेड मीट, जंक फूड यांचे प्रमाण वाढले असल्याने व आहारात भाज्या, फळे, आणि तंतुमय पदार्थ नसल्यामुळे पचनसंस्था कमकुवत होते आहे. त्यामुळे आतड्यांवर ताण येतो. नियमित शारीरिक हालचाल नसल्याने स्थूलता आणि शारीरिक निष्क्रियता आल्याने आतड्यांमध्ये घाण साचून आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढत आहे.

दिनचर्या व आपली आधुनिक जीवनशैली सुधारत, आहारात भरपूर फायबर, फळे, भाज्या, आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करावा. व्यायामाची सवय लावावी आणि लठ्ठपणा नियंत्रित ठेवावा. तंबाखू, मद्य आणि जंक फूड टाळावे. वेळच्या वेळी तपासणी करावी. असे डॉ. पुरुषोत्तम  वशिष्ठ यांनी  ‘कर्करोग आतड्याचा’ या अपोलो हॉस्पिटल ने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी सांगितले.यावेळी डॉ अरूणेश पुनेथा, डॉ अनिल डिक्रुझ, डॉ. दीपक कुमार गुप्ता, राजेश शिंदे उपस्थित होते.

अपोलो कॅन्सर सेंटर्सच्या 'कोलफिट' कार्यक्रमामध्ये फेकल इम्युनोकेमिकल टेस्टचा समावेश आहे. सीआरसी समजून येण्यासाठी या अभूतपूर्व दृष्टिकोनाचा वापर करण्यात आला आहे. हे एक नॉन-इन्वेसिव, अतिशय अचूक स्क्रीनिंग टूल आहे, ज्यामध्ये मलातील रक्त समजून येते, जे सीआरसीचे संभाव्य प्रारंभिक संकेतक आहे. FIT साठी फक्त एकाच नमुन्याची आवश्यकता असते. FIT उच्च संवेदनशीलता प्रदान करते आणि आहारावर प्रतिबंध घालण्याची गरज नसते. हा एक सुविधाजनक आणि रुग्णांसाठी अनुकूल पर्याय आहे.

डॉ पुरुषोत्तम वशिष्ठ, सिनियर कन्सल्टन्ट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,"आपल्याला कोलोरेक्टल कॅन्सरसाठी रीऍक्टिव्ह केयरऐवजी प्रोऍक्टिव्ह स्क्रीनिंगकडे गेले पाहिजे. अयोग्य आहार, बैठी जीवनशैली आणि स्थूलपणा यासारख्या जीवनशैलीमध्ये उद्भवणाऱ्या कारणांमुळे सीआरसीच्या केसेस वाढत आहेत. जास्त फायबर असलेला आहार, नियमित व्यायाम आणि लक्षणांची वाट न पाहता, स्वतःहून तपासण्या करून घेणे या गोष्टी आजार रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कोलफिटसह आम्ही FIT च्या माध्यमातून आजार लवकरात लवकर लक्षात येणे सोपे बनवत आहोत, एक सोपे, नॉन-इन्वेसिव परीक्षण गुंतागुंत कमी करू शकते आणि परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणू शकते."

डॉ राजेश शिंदे, कन्सल्टन्ट एचपीबी, जीआय, थोरॅसिक ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरी, अपोलो कॅन्सर सेंटर्स मुंबई यांनी सांगितले,"कोलोरेक्टल कॅन्सर भारतामध्ये युवक आणि वयस्क दोघांमध्ये देखील वेगाने पसरत आहे, तरी देखील उशिरा निदान करण्यात येत असल्याने या रुग्णांचा जिवंत राहण्याचा दर खूप कमी आहे ही चिंतेची बाब आहे. जिथे स्क्रीनिंग कार्यक्रम चालवले जातात अशा देशांमध्ये अधिक चांगले परिणाम दिसून आले आहेत, जवळपास ५०% सीआरसी केसेस खूप पुढच्या टप्प्यांमध्ये लक्षात येतात, अजून २०% केसेस मेटास्टेसिससह समोर येतात. (लिंक) हा ट्रेंड उलटवण्यासाठी लवकरात लवकर परीक्षण आणि जागरूकता महत्त्वाची आहे. अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये आम्ही रुग्णांना मिळणारे परिणाम अधिक चांगले व्हावेत आणि भारतभर सीआरसीचे ओझे कमी करण्यासाठी कोलफिट, अचूक उपचार आणि सर्वसमावेशक देखभालीच्या माध्यमातून आजार लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एहसान खान, नाफे खान अभिनीत आणि रझूल आलम दिग्दर्शित "गरम माहौल" चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर लाँच

मुंबई। बॉलीवूड दिग्दर्शक रझूल आलम यांच्या हिंदी चित्रपट "गरम माहौल" चे पोस्टर आणि ट्रेलर मुंबईतील इम्पा थिएटरमध्ये एहसान खान, गायिका दीपा नारायण झा, अभिनेते नाफे खान आणि शब्बीर शेख यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. पोस्टर लाँचनंतर, चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी देखील दाखवण्यात आली. लिटिल स्टेप आर्ट्स (एलएसए) निर्मित, या चित्रपटाची सह-निर्मिती विक्रांत वाधवा आणि राहुल जाटव यांनी केली आहे. "गरम माहौल" च्या कलाकारांमध्ये एहसान खान, नाफे खान, बबिता चौधरी, पूजा दत्ता, विक्रांत वाधवा, नरेंद्र, अमित श्रीवास्तव आणि राहुल जाटव यांचा समावेश आहे. लिटिल स्टेप आर्ट्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लाइन प्रोड्यूसर रवी प्रकाश भारद्वाज हे संगीत दिग्दर्शक आहेत. संगीत राज सेन आणि इक्बाल सरगम ​​यांनी दिले आहे. गायकांमध्ये अलका याज्ञिक, दीपा नारायण झा, रितू पाठक आणि पी.के. यांचा समावेश आहे. चित्रपटाचे डीओपी विजय मिश्रा आहेत, लेखक राकेश कुमार आहेत आणि कार्यकारी निर्माता सतीश कुमार आहेत. एहसान खान म्हणाला, "मी राजुल आलमसोबत याआधी खूप काम केले आहे. या चित...

आकाश इन्स्टिट्यूट मुंबईने जेईई मेन २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली; साहिल प्रधानने ९९.९९ टक्के गुण मिळवले

उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीमुळे मुंबई आणि आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ला अभिमान आहे   मुंबई: आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) मुंबईतील विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२६ (सत्र १) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पुन्हा एकदा या प्रदेशाची सतत शैक्षणिक उत्कृष्टता दाखवून दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने १६ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या निकालांनुसार, बोरिवली शाखेतील साहिल प्रधान या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के गुणांसह मुंबईत अव्वल स्थान पटकावले. उत्कृष्ट कामगिरीच्या या मालिकेत, बोरिवली शाखेतील जीत व्होराने १ वर्षाच्या क्लासरूम प्रोग्राममध्ये ९९.८७ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. ध्वज जैन यांनी ९९.७९ टक्के आणि शिव तिवारी यांनी ९९.४५ टक्के गुण मिळवून शाखेच्या प्रभावी शैक्षणिक निकालांना आणखी बळकटी दिली. विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल भाष्य करताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख डॉ. एच.आर. राव म्हणाले, "मुंबईतील आमच्या विद्यार्थ्यांचे अपवादात्मक निकाल त्यांच्या शैक्षणिक वचनबद्धतेचे आणि आकाश येथी...

राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 पुण्यात यशस्वीरीत्या संपन्न

पुणे। देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी भोसरी, पुणे येथे अत्यंत दिमाखदार व गौरवपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन देविदास ग्रुप बिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट तर्फे करण्यात आले होते. आपल्या व्यवसायातून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय आणि प्रभावी भूमिका बजावणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये Le-Vanshi Group Of Company चे Founder, Business Tycoon Author Kuntal Arora, Mrs. Simran Kuntal Arora, तसेच Riyansh Solar Power Plus Pvt. Ltd. चे Founder Mr. Umesh Bhardwaj यांचे विशेष सहकार्य व भक्कम समर्थन लाभले. त्यांच्या दूरदृष्टी, सकारात्मक नेतृत्व आणि सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य व प्रभावी ठरला. या विशेष प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उल्लाल तसेच प्रख्यात अभिनेते शहबाज खान प्रमुख पाहुणे म्...