सीधे मुख्य सामग्री पर जाएं

कोलोरेक्टल कॅन्सर साठी अपोलोने सुरु केला सर्वसमावेशक स्क्रीनिंग कार्यक्रम

बदललेल्या जीवनशैलीमुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ

नवी मुंबई। भारतामध्ये कोलोरेक्टल कॅन्सरच्या केसेस सतत वाढत आहेत. कोलोरेक्टल कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखू यावा आणि त्याला प्रतिबंध घातला जावा यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर्सने एक सर्वसमावेशक स्क्रीनिंग कार्यक्रम 'कोलफिट' सुरु केला आहे. रुग्णांच्या जिवंत राहण्याच्या दरामध्ये सुधारणा व्हावी, उपचारांच्या खर्चात घट व्हावी आणि निदान करण्यात विलंब यासारख्या चिंताजनक समस्या दूर करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 'कोलफिट' मध्ये वृद्ध आणि युवक दोघांसाठी देखील सीआरसी स्क्रीनिंग वाढवण्यावर ध्यान केंद्रित करण्यात आले आहे, आजार लवकरात लवकर लक्षात यावा यावर भर देण्यात आला आहे. भारतात सीआरसीचा वय दर दर १,००,००० पुरुषांमागे ७.२ आणि दर १,००,००० महिलांमागे ५.१ आहे, जो खूपच कमी आहे. देशाची लोकसंख्या १ अरबपेक्षा जास्त आहे, त्यामानाने केसेसची संख्या खूप जास्त आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे भारतात गेल्या पाच वर्षांमध्ये या आजाराच्या रुग्णांचा जिवंत राहण्याचा दर ४०% पेक्षा कमी आहे.

धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात बदललेली जीवनशैली व आहारातील बदल, व्यायामाचा अभाव, तंबाखू आणि मद्य सेवन, अनियमित झोप, लठ्ठपणा आणि मधुमेह, या सर्व कारणामुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ होत आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर हे प्रमाण अजून वाढत जाईल असे वास्तव समोर आले आहे. फायबर कमी आणि प्रोसेस्ड फूड, रेड मीट, जंक फूड यांचे प्रमाण वाढले असल्याने व आहारात भाज्या, फळे, आणि तंतुमय पदार्थ नसल्यामुळे पचनसंस्था कमकुवत होते आहे. त्यामुळे आतड्यांवर ताण येतो. नियमित शारीरिक हालचाल नसल्याने स्थूलता आणि शारीरिक निष्क्रियता आल्याने आतड्यांमध्ये घाण साचून आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढत आहे.

दिनचर्या व आपली आधुनिक जीवनशैली सुधारत, आहारात भरपूर फायबर, फळे, भाज्या, आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करावा. व्यायामाची सवय लावावी आणि लठ्ठपणा नियंत्रित ठेवावा. तंबाखू, मद्य आणि जंक फूड टाळावे. वेळच्या वेळी तपासणी करावी. असे डॉ. पुरुषोत्तम  वशिष्ठ यांनी  ‘कर्करोग आतड्याचा’ या अपोलो हॉस्पिटल ने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी सांगितले.यावेळी डॉ अरूणेश पुनेथा, डॉ अनिल डिक्रुझ, डॉ. दीपक कुमार गुप्ता, राजेश शिंदे उपस्थित होते.

अपोलो कॅन्सर सेंटर्सच्या 'कोलफिट' कार्यक्रमामध्ये फेकल इम्युनोकेमिकल टेस्टचा समावेश आहे. सीआरसी समजून येण्यासाठी या अभूतपूर्व दृष्टिकोनाचा वापर करण्यात आला आहे. हे एक नॉन-इन्वेसिव, अतिशय अचूक स्क्रीनिंग टूल आहे, ज्यामध्ये मलातील रक्त समजून येते, जे सीआरसीचे संभाव्य प्रारंभिक संकेतक आहे. FIT साठी फक्त एकाच नमुन्याची आवश्यकता असते. FIT उच्च संवेदनशीलता प्रदान करते आणि आहारावर प्रतिबंध घालण्याची गरज नसते. हा एक सुविधाजनक आणि रुग्णांसाठी अनुकूल पर्याय आहे.

डॉ पुरुषोत्तम वशिष्ठ, सिनियर कन्सल्टन्ट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,"आपल्याला कोलोरेक्टल कॅन्सरसाठी रीऍक्टिव्ह केयरऐवजी प्रोऍक्टिव्ह स्क्रीनिंगकडे गेले पाहिजे. अयोग्य आहार, बैठी जीवनशैली आणि स्थूलपणा यासारख्या जीवनशैलीमध्ये उद्भवणाऱ्या कारणांमुळे सीआरसीच्या केसेस वाढत आहेत. जास्त फायबर असलेला आहार, नियमित व्यायाम आणि लक्षणांची वाट न पाहता, स्वतःहून तपासण्या करून घेणे या गोष्टी आजार रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कोलफिटसह आम्ही FIT च्या माध्यमातून आजार लवकरात लवकर लक्षात येणे सोपे बनवत आहोत, एक सोपे, नॉन-इन्वेसिव परीक्षण गुंतागुंत कमी करू शकते आणि परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणू शकते."

डॉ राजेश शिंदे, कन्सल्टन्ट एचपीबी, जीआय, थोरॅसिक ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरी, अपोलो कॅन्सर सेंटर्स मुंबई यांनी सांगितले,"कोलोरेक्टल कॅन्सर भारतामध्ये युवक आणि वयस्क दोघांमध्ये देखील वेगाने पसरत आहे, तरी देखील उशिरा निदान करण्यात येत असल्याने या रुग्णांचा जिवंत राहण्याचा दर खूप कमी आहे ही चिंतेची बाब आहे. जिथे स्क्रीनिंग कार्यक्रम चालवले जातात अशा देशांमध्ये अधिक चांगले परिणाम दिसून आले आहेत, जवळपास ५०% सीआरसी केसेस खूप पुढच्या टप्प्यांमध्ये लक्षात येतात, अजून २०% केसेस मेटास्टेसिससह समोर येतात. (लिंक) हा ट्रेंड उलटवण्यासाठी लवकरात लवकर परीक्षण आणि जागरूकता महत्त्वाची आहे. अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये आम्ही रुग्णांना मिळणारे परिणाम अधिक चांगले व्हावेत आणि भारतभर सीआरसीचे ओझे कमी करण्यासाठी कोलफिट, अचूक उपचार आणि सर्वसमावेशक देखभालीच्या माध्यमातून आजार लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रीपाद नाईक यांनी ECAMEX 2026 चे उद्घाटन केले; अक्षय ऊर्जेचा वाढता वाटा, सौर ऊर्जेचा प्रसार आणि मेक इन इंडिया संधींवर भर

मुंबई। भारत सरकारचे नवीन व अक्षय ऊर्जा तसेच वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोरेगाव येथील BEC येथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ECAM) च्या 101 वर्षपूर्ती निमित्त आयोजित भारतातील मेगा इलेक्ट्रिकल व ऊर्जा प्रदर्शन ECAMEX 2026 चे उद्घाटन केले. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की भारताच्या वाढत्या ऊर्जा मागणीची शाश्वत पूर्तता करण्यासाठी अक्षय ऊर्जेतून होणाऱ्या वीज निर्मितीचा टक्का लक्षणीयरीत्या वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की अक्षय ऊर्जा क्षेत्र उद्योग, नवोन्मेष आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देत असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळकटी देते. मंत्र्यांनी पुढे सांगितले की मेक इन इंडिया उपक्रमामुळे सौर उपकरणे, इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत उत्पादनासाठी मजबूत संधी निर्माण होत आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी उद्योगांनी स्वदेशी उत्पादन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासात गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केल...

दादर जैन ज्ञान मंदिरात श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला

मुंबई। राजा सिद्धार्थ यांचे वंशज आणि माता त्रिशला यांचे पुत्र, परम कृपाळू भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जयंतीनिमित्त या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, श्री आत्म कमल लब्धी सुरीश्वरजी जैन ज्ञान मंदिर आणि जिन रक्षा इंटरनॅशनल ग्रुप यांनी केले होते. शासन प्रदीप परम पूज्य आचार्य भगवंत श्री विजय प्रदीप चंद्र सुरीश्वरजी महाराज साहिब यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली, भगवान महावीर स्वामींच्या जन्म कल्याणकाचे एक सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन सादर करण्यात आले. आज जागतिक तापमानवाढ असो वा दहशतवाद, भगवान महावीरांची केवळ दोन तत्त्वे जगाला वाचवू शकतात: • अपरिग्रह: निसर्गाचे शोषण थांबवा, केवळ गरजेपुरतेच वापरा. शाळेतील सर्व पंडित, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संजयभाई शाह, अशोकभाई चरला, महिला विभागाच्या उपाध्यक्षा अल्पाबेन संजय शाह आणि संदीप दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी, ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त सा...

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा – खऱ्या फळांचा स्वाद, कोणतीही अतिरिक्त साखर नाही आणि कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत • साखरयुक्त पेये आणि कोल्ड ड्रिंक्सला एक आरोग्यदायी पर्याय – नाश्ता, मधल्या वेळचा स्नॅक आणि इतर वेळांसाठी योग्य • नैसर्गिक पोषण, हायड्रेशन आणि अतिरिक्त साखर टाळू इच्छिणाऱ्या आरोग्य-जागरूक ग्राहकांसाठी उत्तम पेय मुंबई। भारताची अग्रगण्य नैसर्गिक आरोग्य व आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडचा लोकप्रिय पॅकेज्ड फळ रस ब्रँड ‘रियल’ आपल्या सजग पोषणाच्या बांधिलकीला अधिक बळकट करत ‘रियल अ‍ॅक्टिव्ह’ फळ रस सादर करत आहे — कोणतीही अतिरिक्त साखर नसलेला, चविष्ट आणि ताजेतवाने फळ रसांचा हा विशेष श्रेणी आहे. आजच्या काळात ग्राहक अधिक आरोग्यदायी जीवनशैलीच्या पर्यायांकडे वळत असताना, रियल अ‍ॅक्टिव्ह भारतात हायड्रेशनची नवी व्याख्या करत आहे. अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हशिवाय, रियल अ‍ॅक्टिव्ह खऱ्या फळांचे नैसर्गिक गुणधर्म देतो. त्यामुळे हा उन्हाळ्यात दिवसभरासाठी एक उत्तम साथीदार ठरतो — पौष्टिक नाश्त्यापासून ते मधल्या वेळच्या स्नॅकपर्यंत. “उन्हाळ्य...