सीधे मुख्य सामग्री पर जाएं

'आर्ट डेको डिझाइन'च्या शताब्दीनिमित्त मुंबईत ट्विन-सिटी फेस्टिव्हल

'आर्ट डेको डिझाइन'च्या शताब्दीनिमित्त मुंबईत ट्विन-सिटी फेस्टिव्हल

७ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात महोत्सव

मुंबई। आर्किटेक्चर आणि डिझाइन क्षेत्रातील 'आर्ट डेको'च्या प्रवासाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने (शताब्दी) मियामी आणि मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्याच ट्विन-सिटी महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री आशीष शेलार आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी 'आर्ट डेको अलाइव्ह'च्या संस्थापक स्मिति कनोडिया आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि संचालक तसनीम मेहता उपस्थित होत्या. ऑक्टोबरमध्ये मियामीत 'आर्ट डेको अलाइव्ह!'चा महोत्सव पार पडला होता. आता यानंतर मुंबईत या महोत्सवाची पहिली आवृत्ती ७ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विविध ठिकाणी पार पडणार आहे. 
राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री आशीष शेलार म्हणाले, ''आर्ट डेको अलाइव्ह! आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाने खरोखरच एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. मुंबई ते मियामीची जोडणी असण्याव्यतिरिक्त, यात तिसरा 'म' आहे जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे 'मराठी माणूस'. मुंबई सर्वच गोष्टींमध्ये जे काही सर्वोत्तम आहे, ते दर्शवते. हे एक असे शहर आहे, ज्याने नेहमीच धैर्य दाखवले आहे आणि जगाला एक मार्ग दाखवला आहे.'' ''जेव्हा समाज त्याने बांधलेल्या वातावरणाशी जोडले जाऊ लागतो, म्हणजे येथील भिंती आणि साहित्य कसे कथा सांगतात? इतिहासाची साक्ष कशी देतात?, हे जेव्हा ते अनुभवतात, तेव्हाच खऱ्या वारशाची प्रशंसा सुरू होते. आज या प्रदर्शनाद्वारे आणि त्याच्याशी संबंधित अनेक कार्यक्रमांद्वारे मुंबई एकप्रकारे साजरी केली जात आहे आणि अशा उपक्रमांचे भविष्यातील पिढ्यांसाठी दस्तऐवजीकरण करणे तितकेच महत्त्वाचे आहे.''

या कार्यक्रमात उपस्थित असलेले मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले, "प्रत्येक शहर पायाभूत सुविधांच्या बाबतीत एका परिवर्तनातून जात आहे, ज्यामुळे त्याला आधुनिक आणि समकालीन स्वरूप प्राप्त झाले आहे. आपल्या शहराचे संवर्धन करणे हे आव्हान नाही तर सामूहिक जबाबदारी आहे. 'आर्ट डेको'चा वारसा नवीन, आधुनिक आणि समकालीन मुंबईचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे. हा एक प्रशंसनीय उपक्रम आहे, जो 'आर्ट डेको अलाइव्ह!' जीवनाचा उत्सव साजरा करतो आणि मुंबईचा उत्साह त्यातून प्रतिबिंबित होतो. बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली अशी संस्था आहे, जिथे एक अतिशय प्रभावी वारसा समिती आहे, जी आपला वारसा जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. आर्ट डेको आणि ती दर्शवत असलेल्या सांस्कृतिक ओळखीसाठी आपण आपल्या परिसरांचे रक्षण केले पाहिजे."

मुंबईस्थित उद्योजिका स्मिता कनोडिया यांनी मियामीस्थित सह-संस्थापिका सलमा मर्चंट रहमथुल्ला आणि गायत्री हिंगोराणी दिवाण यांच्यासह स्थापन केलेले 'आर्ट डेको अलाइव्ह!' हे संवर्धन, शिक्षण आणि सहकार्याच्या कल्पनांना बळकटी देताना महाप्रदेशांमध्ये सर्जनशीलतेच्या भावनेचा उत्सव साजरा करत आहे. तसेच हा महोत्सव विशिष्ट ओळख, स्मृती आणि डिझाइनभोवती जागतिक संवादाला चालना देतो, म्हणजेच एका नवीन युगासाठी 'डेको'च्या अर्थाला पुनरुज्जीवित करतो. वास्तुकला, संस्कृती आणि समुदायाला एकत्र करून, हा उपक्रम प्रेक्षकांना मुंबईच्या सजावटीचा वारसा पुन्हा शोधण्यासाठी आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आमंत्रित करतो, जिथे संवर्धन आणि विकास एकत्रितरित्या मार्गक्रमण करतात.

'जगाच्या विरुद्ध बाजूला असलेली मुंबई आणि मियामी ही दोन शहरे त्यांच्या गतिमान वृत्तीने, स्थापत्य वारशाने आणि सामायिक ओळखीने तथा सांस्कृतिक संगमाने एकत्रित आहेत. दोन्ही शहरांमध्ये खोलवरचे संबंध असल्याने, आम्हाला असे आढळून आले की जसजसे त्यांचे शहरीकरण आणि विकास होत गेला तसतसे उंच इमारती, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाच्या उदयासह या शहरांच्या आकाशरेषा अधिक उंचावत गेल्या. परंतु, शहराचे खरे मूल्य आत्मा, संस्कृती आणि इतिहास यामध्येच आहे. ही अशी ठिकाणे आहेत जिथे लोक रूळतात, म्हणजेच या शहरांना ते प्रत्यक्ष घरच म्हणू इच्छितात,' असे संस्थापिका स्मिती कनोडिया म्हणाल्या.

मुंबईच्या कलात्मक रचनेच्या वारशाचा सन्मान करण्याच्या या प्रयत्नात 'आर्ट डेको अलाईव्ह!' बरोबर डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय भागीदारी करत आहे. 'आर्ट डेको अलाईव्हबरोबर भागीदारी करून डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात हे प्रदर्शन आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. शहरातील सर्वांत जुने संग्रहालय म्हणून, ते शहरात झालेल्या अनेक बदलांचे आणि परिवर्तनांचे साक्षीदार राहिले आहे आणि आज ते या शहराच्या संस्कृती आणि वारशाचे संरक्षक म्हणून उभे आहे. हे प्रदर्शन अभ्यागतांना शहरातील 'आर्ट डेको' इमारतींचे महत्त्व आणि आम्हाला मिळालेल्या या वारशाचे जतन करण्याची सामायिक जबाबदारी यावर विचार करण्यास आमंत्रित करते, असे डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि संचालिकातसनीम झकारिया मेहता या वेळी म्हणाल्या.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रीपाद नाईक यांनी ECAMEX 2026 चे उद्घाटन केले; अक्षय ऊर्जेचा वाढता वाटा, सौर ऊर्जेचा प्रसार आणि मेक इन इंडिया संधींवर भर

मुंबई। भारत सरकारचे नवीन व अक्षय ऊर्जा तसेच वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोरेगाव येथील BEC येथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ECAM) च्या 101 वर्षपूर्ती निमित्त आयोजित भारतातील मेगा इलेक्ट्रिकल व ऊर्जा प्रदर्शन ECAMEX 2026 चे उद्घाटन केले. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की भारताच्या वाढत्या ऊर्जा मागणीची शाश्वत पूर्तता करण्यासाठी अक्षय ऊर्जेतून होणाऱ्या वीज निर्मितीचा टक्का लक्षणीयरीत्या वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की अक्षय ऊर्जा क्षेत्र उद्योग, नवोन्मेष आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देत असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळकटी देते. मंत्र्यांनी पुढे सांगितले की मेक इन इंडिया उपक्रमामुळे सौर उपकरणे, इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत उत्पादनासाठी मजबूत संधी निर्माण होत आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी उद्योगांनी स्वदेशी उत्पादन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासात गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केल...

दादर जैन ज्ञान मंदिरात श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला

मुंबई। राजा सिद्धार्थ यांचे वंशज आणि माता त्रिशला यांचे पुत्र, परम कृपाळू भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जयंतीनिमित्त या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, श्री आत्म कमल लब्धी सुरीश्वरजी जैन ज्ञान मंदिर आणि जिन रक्षा इंटरनॅशनल ग्रुप यांनी केले होते. शासन प्रदीप परम पूज्य आचार्य भगवंत श्री विजय प्रदीप चंद्र सुरीश्वरजी महाराज साहिब यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली, भगवान महावीर स्वामींच्या जन्म कल्याणकाचे एक सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन सादर करण्यात आले. आज जागतिक तापमानवाढ असो वा दहशतवाद, भगवान महावीरांची केवळ दोन तत्त्वे जगाला वाचवू शकतात: • अपरिग्रह: निसर्गाचे शोषण थांबवा, केवळ गरजेपुरतेच वापरा. शाळेतील सर्व पंडित, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संजयभाई शाह, अशोकभाई चरला, महिला विभागाच्या उपाध्यक्षा अल्पाबेन संजय शाह आणि संदीप दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी, ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त सा...

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा – खऱ्या फळांचा स्वाद, कोणतीही अतिरिक्त साखर नाही आणि कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत • साखरयुक्त पेये आणि कोल्ड ड्रिंक्सला एक आरोग्यदायी पर्याय – नाश्ता, मधल्या वेळचा स्नॅक आणि इतर वेळांसाठी योग्य • नैसर्गिक पोषण, हायड्रेशन आणि अतिरिक्त साखर टाळू इच्छिणाऱ्या आरोग्य-जागरूक ग्राहकांसाठी उत्तम पेय मुंबई। भारताची अग्रगण्य नैसर्गिक आरोग्य व आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडचा लोकप्रिय पॅकेज्ड फळ रस ब्रँड ‘रियल’ आपल्या सजग पोषणाच्या बांधिलकीला अधिक बळकट करत ‘रियल अ‍ॅक्टिव्ह’ फळ रस सादर करत आहे — कोणतीही अतिरिक्त साखर नसलेला, चविष्ट आणि ताजेतवाने फळ रसांचा हा विशेष श्रेणी आहे. आजच्या काळात ग्राहक अधिक आरोग्यदायी जीवनशैलीच्या पर्यायांकडे वळत असताना, रियल अ‍ॅक्टिव्ह भारतात हायड्रेशनची नवी व्याख्या करत आहे. अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हशिवाय, रियल अ‍ॅक्टिव्ह खऱ्या फळांचे नैसर्गिक गुणधर्म देतो. त्यामुळे हा उन्हाळ्यात दिवसभरासाठी एक उत्तम साथीदार ठरतो — पौष्टिक नाश्त्यापासून ते मधल्या वेळच्या स्नॅकपर्यंत. “उन्हाळ्य...