सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मसाइ एआय आणि एमएल प्रशिक्षण ‘प्रादेशिक भारता’पर्यंत घेऊन जाणार

मुंबई। मसाइ या भारतातील आघाडीच्या निष्पत्तीकेंद्री एडटेक प्लॅटफॉर्मने अप्लाइड एआय आणि एमएल इसेन्शिअल्समधील नवीन ४ महिन्यांचा ऑनलाइन प्रमाणन अभ्यासक्रम आयआयटी पटनातील आय हबच्या सहयोगाने सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम हिंदी, तेलुगू, मराठी आणि तमिळ भाषांमध्ये देऊ केला जाणार आहे, भारतभरात प्रादेशिक भाषांमध्ये दिला जाणारा हा पहिला आयआयटी पुरस्कृत अभ्यासक्रम आहे.

एआय आणि एमएल यांच्याशी निगडित कौशल्यांना असलेली मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे. नोकरीवर रुजू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून उमेदवाराला एआयवर आधारित साधने वापरता आली पाहिजे आणि व्यवसायाशी निगडित समस्या सोडवता आल्या पाहिजेत, अशी आज कंपन्यांची अपेक्षा असते. स्पर्धात्मक लाभ मिळवण्यासाठी एआय आणि एमएल महत्त्वपूर्ण असल्याचे ७० टक्के कंपन्यांचे मत आहे. निर्णय प्रक्रिया आणि व्यवसायाची निष्पत्ती यांत सुधारणा घडवून आणण्यासाठी एआय व एमएल यांमध्ये सुधारणा करण्याची ७५ टक्के कंपन्यांची योजना आहे. या स्थित्यंतरामुळे उपलब्ध नोकऱ्या आणि या नोकऱ्यांच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले गेलेले प्रतिभावंत यांच्यात स्पष्टपणे तफावत निर्माण झाली आहे. 

श्रेणी-२ आणि श्रेणी-३ शहरांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार तंत्रज्ञानात्मक शिक्षण उपलब्ध करून देऊन ही तफावत भरून काढण्याचे उद्दिष्ट मसाइपुढे आहे. विद्यार्थ्यांना जटिल संकल्पना आपल्या भाषेत समजून घेण्याची तसेच सध्याच्या नोकऱ्यांच्या बाजारपेठेत आवश्यक असलेली व्यवहार्य कौशल्ये आत्मसात करण्याची संधी हा नवीन अभ्यासक्रम देतो.

मसाइचे सीईओ व सहसंस्थापक प्रतीक शुक्ला म्हणाले, “भारताच्या बऱ्याच मोठ्या भागात उत्तम प्रतिभा आहे पण रचनाबद्ध तंत्रज्ञान शिक्षणाची उपलब्धता मर्यादित आहे. प्रमुख महानगरांच्या बाहेर राहणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यापूर्वीच भाषेचा अडथळा येतो. हा अभ्यासक्रम हिंदी, तेलुगू, मराठी आणि तमिळ माध्यमात उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटी पटनासोबत काम केल्यानंतर आता आम्ही एआय आणि एमएलचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या अधिक व्यापक गटांसाठी खुले करत आहोत. नोकरीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरील कर्मचाऱ्याला माहीत असणे अपेक्षित असलेल्या व्यवहार्य उपयोजनांवर अभ्यासक्रमात भर दिला गेला आहे आणि यामुळे अशा कौशल्यांची मागणी जलद गतीने वाढत असलेल्या नोकरीच्या बाजारपेठेत नोकरीसाठी सज्ज व्यावसायिकांचा पुरवठा भक्कम करण्यात मदत होईल, असे आम्हाला वाटते.”

भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी पटनामधील तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्र विश्लेषण आय-हब फाउंदेशनचे सीईओ डॉ. साईकिरण ओरुगंटी म्हणाले, “सर्व क्षेत्रांतील कंपन्या एआय आणि एमएलमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि पहिल्या दिवसापासून या तंत्रज्ञानांमध्ये कुशल असतील अशा प्रशिक्षित व्यावसायिकांची गरज स्पष्टपणे भासत आहे. अनेक सक्षम विद्यार्थ्यांना प्रगत अभ्यासक्रम शिकण्याचा आत्मविश्वास वाटत नाही, कारण साहित्य समजून घेण्यासाठी आवश्यक भाषेचे ज्ञान त्यांच्याकडे नसते. हा अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिला गेल्यामुळे ही तफावत भरून काढण्यात आणि एआय प्रतिभेचे अधिक समावेशक भंडार तयार करण्यात मदत होणार आहे. उद्योगक्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करणे तसेच देशातील तंत्रज्ञान मनुष्यबळ अधिक सक्षम व सज्ज करण्यात योगदान देणे हे मसाइसोबतच्या आमच्या सहयोगापुढील लक्ष्य आहे.

या अभ्यासक्रमाची सुरुवात पायथन प्रोग्रामिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशनने होते. मग यामध्ये रिग्रेशन, क्लासिफिकेशन, क्लस्टरिंग आणि मॉडेल इव्हॅल्युएशन आदी विषय घेतले जातात. विद्यार्थी पुढे डीप लर्निंग, न्युरल नेटवर्क्स, सीएनएन्स, आरएनएन्स, ट्रान्सफॉर्मर्स, रिएन्फोर्समेंट लर्निंग आणि कम्प्युटर व्हिजन या विषयांचाही अभ्यास करतात. या अभ्यासक्रमात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, जनरेटिव मॉडेल्स, ऑटोएमएल, एमएलओपीज आणि क्लाउड डिप्लॉयमेंट या विषयांचाही समावेश आहे. एआयची नीतीमत्तापूर्ण वापर हा विषय सर्व मोड्यूल्समध्ये आहे.

कस्टमर सेगमेंटेशन, इमेज क्लासिफिकेशन आणि टेक्स्ट बेस्ट अॅप्लिकेशन्स यांसारख्या प्रकल्पांवर विद्यार्थी काम करणार आहेत. एआय आणि एमएल तंत्रांचा उपयोग व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी करण्याची आपली क्षमता दाखवून देणारा पोर्टफोलिओही ते विकसित करणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तसेच मूल्यमापन पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना विश्लेषण आय हब आयआयटी पटनातर्फे प्रमाणपत्रेही दिली जाणार आहेत.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रीपाद नाईक यांनी ECAMEX 2026 चे उद्घाटन केले; अक्षय ऊर्जेचा वाढता वाटा, सौर ऊर्जेचा प्रसार आणि मेक इन इंडिया संधींवर भर

मुंबई। भारत सरकारचे नवीन व अक्षय ऊर्जा तसेच वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोरेगाव येथील BEC येथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ECAM) च्या 101 वर्षपूर्ती निमित्त आयोजित भारतातील मेगा इलेक्ट्रिकल व ऊर्जा प्रदर्शन ECAMEX 2026 चे उद्घाटन केले. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की भारताच्या वाढत्या ऊर्जा मागणीची शाश्वत पूर्तता करण्यासाठी अक्षय ऊर्जेतून होणाऱ्या वीज निर्मितीचा टक्का लक्षणीयरीत्या वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की अक्षय ऊर्जा क्षेत्र उद्योग, नवोन्मेष आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देत असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळकटी देते. मंत्र्यांनी पुढे सांगितले की मेक इन इंडिया उपक्रमामुळे सौर उपकरणे, इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत उत्पादनासाठी मजबूत संधी निर्माण होत आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी उद्योगांनी स्वदेशी उत्पादन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासात गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केल...

दादर जैन ज्ञान मंदिरात श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला

मुंबई। राजा सिद्धार्थ यांचे वंशज आणि माता त्रिशला यांचे पुत्र, परम कृपाळू भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जयंतीनिमित्त या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, श्री आत्म कमल लब्धी सुरीश्वरजी जैन ज्ञान मंदिर आणि जिन रक्षा इंटरनॅशनल ग्रुप यांनी केले होते. शासन प्रदीप परम पूज्य आचार्य भगवंत श्री विजय प्रदीप चंद्र सुरीश्वरजी महाराज साहिब यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली, भगवान महावीर स्वामींच्या जन्म कल्याणकाचे एक सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन सादर करण्यात आले. आज जागतिक तापमानवाढ असो वा दहशतवाद, भगवान महावीरांची केवळ दोन तत्त्वे जगाला वाचवू शकतात: • अपरिग्रह: निसर्गाचे शोषण थांबवा, केवळ गरजेपुरतेच वापरा. शाळेतील सर्व पंडित, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संजयभाई शाह, अशोकभाई चरला, महिला विभागाच्या उपाध्यक्षा अल्पाबेन संजय शाह आणि संदीप दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी, ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त सा...

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा – खऱ्या फळांचा स्वाद, कोणतीही अतिरिक्त साखर नाही आणि कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत • साखरयुक्त पेये आणि कोल्ड ड्रिंक्सला एक आरोग्यदायी पर्याय – नाश्ता, मधल्या वेळचा स्नॅक आणि इतर वेळांसाठी योग्य • नैसर्गिक पोषण, हायड्रेशन आणि अतिरिक्त साखर टाळू इच्छिणाऱ्या आरोग्य-जागरूक ग्राहकांसाठी उत्तम पेय मुंबई। भारताची अग्रगण्य नैसर्गिक आरोग्य व आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडचा लोकप्रिय पॅकेज्ड फळ रस ब्रँड ‘रियल’ आपल्या सजग पोषणाच्या बांधिलकीला अधिक बळकट करत ‘रियल अ‍ॅक्टिव्ह’ फळ रस सादर करत आहे — कोणतीही अतिरिक्त साखर नसलेला, चविष्ट आणि ताजेतवाने फळ रसांचा हा विशेष श्रेणी आहे. आजच्या काळात ग्राहक अधिक आरोग्यदायी जीवनशैलीच्या पर्यायांकडे वळत असताना, रियल अ‍ॅक्टिव्ह भारतात हायड्रेशनची नवी व्याख्या करत आहे. अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हशिवाय, रियल अ‍ॅक्टिव्ह खऱ्या फळांचे नैसर्गिक गुणधर्म देतो. त्यामुळे हा उन्हाळ्यात दिवसभरासाठी एक उत्तम साथीदार ठरतो — पौष्टिक नाश्त्यापासून ते मधल्या वेळच्या स्नॅकपर्यंत. “उन्हाळ्य...