सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अपोलोने महाराष्ट्रात पुणे येथे तिसरे रुग्णालय सुरु केले

४०० बेड्सची क्षमता असलेले हे रुग्णालय क्वाटर्नरी देखभाल सेवासुविधा प्रदान करेल

पुणे: आशियातील आघाडीची एकात्मिक आरोग्य सेवा प्रदान करणारी संस्था, अपोलो हॉस्पिटल्सने पुण्यातील स्वारगेट येथे आपले नवे हॉस्पिटल सुरु केले. या हॉस्पिटलची सुरुवात टप्प्याटप्प्याने होईल, सध्या २५० बेड्स उपलब्ध आहेत. राज्यातील या भागात आरोग्य देखभाल गरजांना ध्यानात ठेवून त्या पूर्ण करण्यासाठी आरोग्य सेवा क्षमता अजून जास्त वाढवण्याची अपोलो हॉस्पिटल्सची योजना आहे.

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी रेड्डी यांनी सांगितले,"अपोलोमध्ये आमचे मिशन आहे, भारताच्या बरोबरीने संपूर्ण जगासाठी आरोग्य सेवांमध्ये परिवर्तन घडवून आणणे. 'हील इन इंडिया - हील बाय इंडिया' व्हिजनने प्रेरित होऊन आम्ही असे स्थान निर्माण करत आहोत जिथे जगभरातील लोकांना करुणा आणि सामर्थ्य यांच्या बरोबरीनेच क्लिनिकल उत्कृष्टतेचे लाभ मिळत आहेत. आमची इच्छा आहे की पुणे आणि भारतातील प्रत्येक घराघरात आरोग्य आणि आनंद यांचा निवास सदैव राहो."

अपोलो हॉस्पिटल्सने आपल्या पुढील विस्तारासाठी पुण्याची निवड केली कारण त्यांनी ओळखले की या क्षेत्रातील लोकांच्या आरोग्यसंबंधी गरजा बदलत आहेत. त्यांनी आपल्या विस्तार योजना अशा पद्धतीने बनवल्या आहेत की नवीन, प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहरातील विविध लोक, समुदाय आणि संबंधित हितधारकांची ते अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू शकतील.

अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. प्रीता रेड्डी यांनी सांगितले,"अपोलो हॉस्पिटल्स पुणेमध्ये आम्ही क्लिनिकल उत्कृष्टता, करुणामय देखभाल आणि अथक नावीन्य यांच्या बळावर निर्माण केलेला, चार दशकांहून अधिक काळापासून चालत आलेला वारसा पुढे नेत आहोत. हे नवे हॉस्पिटल आरोग्य सेवांपर्यंत पोहोच आणि गुणवत्ता यांना पुढे नेण्याच्या आमच्या अचल बांधिलकीचे प्रतीक आहे, हे हॉस्पिटल सुरु करून आम्ही रुग्णांनी गेल्या अनेक पिढ्यांपासून आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान करत आहोत."

अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती सुनीता रेड्डी यांनी सांगितले,"आमचे पुणे हॉस्पिटल अपोलोच्या वाढत्या राष्ट्रीय विस्तारामध्ये उचलण्यात आलेले एक धोरणात्मक पाऊल आहे, जे भारतातील एका सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या आरोग्य सेवा बाजारपेठांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त लोकांना उच्च स्तरीय क्वाटर्नरी देखभालीचे लाभ देण्यासाठी आमची एकात्मिक आरोग्य इकोसिस्टिम शहरात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्रात आरोग्य देखभालीचे  मजबूत आणि भविष्यासाठी सज्ज नेटवर्क तयार करण्यासाठी पुण्यातील क्लिनिकल टॅलेंटसोबत सहयोग करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."

अपोलो हॉस्पिटल्सचे समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डॉ. मधू ससिधर यांनी सांगितले,"आमचे पुणे हॉस्पिटल सुरक्षा विज्ञान, पुराव्यांवर आधारित प्रॅक्टिस आणि एका अशा संस्कृतीच्या पायावर उभारण्यात आले आहे, ज्यामध्ये सर्व निर्णय रुग्णांना डोळ्यासमोर ठेवून घेतले जातात. जसजसे आम्ही पुढे जाऊ, रुग्णांच्या देखभालीप्रती आमची बांधिलकी मजबूत होत जाईल, जी उच्च दर्जा, पारदर्शक परिणाम, करुणा आणि क्लिनिकल दृढतेच्या माध्यमातून प्रदान केली जाईल."

अपोलो हॉस्पिटल्स पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा कर्माकर यांनी सांगितले,"पुणे शहरामध्ये आमचे नवे हॉस्पिटल क्लिनिकल उत्कृष्टतेप्रती अपोलोची बांधिलकी दर्शवते, इतकेच नव्हे तर एका अशा शहराच्या विकास आणि कल्याणमध्ये योगदान देत आहे जे तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनचे केंद्र म्हणून भारताच्या भविष्याला आकार देत आहे."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एहसान खान, नाफे खान अभिनीत आणि रझूल आलम दिग्दर्शित "गरम माहौल" चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर लाँच

मुंबई। बॉलीवूड दिग्दर्शक रझूल आलम यांच्या हिंदी चित्रपट "गरम माहौल" चे पोस्टर आणि ट्रेलर मुंबईतील इम्पा थिएटरमध्ये एहसान खान, गायिका दीपा नारायण झा, अभिनेते नाफे खान आणि शब्बीर शेख यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. पोस्टर लाँचनंतर, चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी देखील दाखवण्यात आली. लिटिल स्टेप आर्ट्स (एलएसए) निर्मित, या चित्रपटाची सह-निर्मिती विक्रांत वाधवा आणि राहुल जाटव यांनी केली आहे. "गरम माहौल" च्या कलाकारांमध्ये एहसान खान, नाफे खान, बबिता चौधरी, पूजा दत्ता, विक्रांत वाधवा, नरेंद्र, अमित श्रीवास्तव आणि राहुल जाटव यांचा समावेश आहे. लिटिल स्टेप आर्ट्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लाइन प्रोड्यूसर रवी प्रकाश भारद्वाज हे संगीत दिग्दर्शक आहेत. संगीत राज सेन आणि इक्बाल सरगम ​​यांनी दिले आहे. गायकांमध्ये अलका याज्ञिक, दीपा नारायण झा, रितू पाठक आणि पी.के. यांचा समावेश आहे. चित्रपटाचे डीओपी विजय मिश्रा आहेत, लेखक राकेश कुमार आहेत आणि कार्यकारी निर्माता सतीश कुमार आहेत. एहसान खान म्हणाला, "मी राजुल आलमसोबत याआधी खूप काम केले आहे. या चित...

आकाश इन्स्टिट्यूट मुंबईने जेईई मेन २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली; साहिल प्रधानने ९९.९९ टक्के गुण मिळवले

उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीमुळे मुंबई आणि आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ला अभिमान आहे   मुंबई: आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) मुंबईतील विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२६ (सत्र १) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पुन्हा एकदा या प्रदेशाची सतत शैक्षणिक उत्कृष्टता दाखवून दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने १६ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या निकालांनुसार, बोरिवली शाखेतील साहिल प्रधान या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के गुणांसह मुंबईत अव्वल स्थान पटकावले. उत्कृष्ट कामगिरीच्या या मालिकेत, बोरिवली शाखेतील जीत व्होराने १ वर्षाच्या क्लासरूम प्रोग्राममध्ये ९९.८७ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. ध्वज जैन यांनी ९९.७९ टक्के आणि शिव तिवारी यांनी ९९.४५ टक्के गुण मिळवून शाखेच्या प्रभावी शैक्षणिक निकालांना आणखी बळकटी दिली. विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल भाष्य करताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख डॉ. एच.आर. राव म्हणाले, "मुंबईतील आमच्या विद्यार्थ्यांचे अपवादात्मक निकाल त्यांच्या शैक्षणिक वचनबद्धतेचे आणि आकाश येथी...

राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 पुण्यात यशस्वीरीत्या संपन्न

पुणे। देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी भोसरी, पुणे येथे अत्यंत दिमाखदार व गौरवपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन देविदास ग्रुप बिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट तर्फे करण्यात आले होते. आपल्या व्यवसायातून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय आणि प्रभावी भूमिका बजावणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये Le-Vanshi Group Of Company चे Founder, Business Tycoon Author Kuntal Arora, Mrs. Simran Kuntal Arora, तसेच Riyansh Solar Power Plus Pvt. Ltd. चे Founder Mr. Umesh Bhardwaj यांचे विशेष सहकार्य व भक्कम समर्थन लाभले. त्यांच्या दूरदृष्टी, सकारात्मक नेतृत्व आणि सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य व प्रभावी ठरला. या विशेष प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उल्लाल तसेच प्रख्यात अभिनेते शहबाज खान प्रमुख पाहुणे म्...