सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अपोलोने महाराष्ट्रात पुणे येथे तिसरे रुग्णालय सुरु केले

४०० बेड्सची क्षमता असलेले हे रुग्णालय क्वाटर्नरी देखभाल सेवासुविधा प्रदान करेल

पुणे: आशियातील आघाडीची एकात्मिक आरोग्य सेवा प्रदान करणारी संस्था, अपोलो हॉस्पिटल्सने पुण्यातील स्वारगेट येथे आपले नवे हॉस्पिटल सुरु केले. या हॉस्पिटलची सुरुवात टप्प्याटप्प्याने होईल, सध्या २५० बेड्स उपलब्ध आहेत. राज्यातील या भागात आरोग्य देखभाल गरजांना ध्यानात ठेवून त्या पूर्ण करण्यासाठी आरोग्य सेवा क्षमता अजून जास्त वाढवण्याची अपोलो हॉस्पिटल्सची योजना आहे.

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी रेड्डी यांनी सांगितले,"अपोलोमध्ये आमचे मिशन आहे, भारताच्या बरोबरीने संपूर्ण जगासाठी आरोग्य सेवांमध्ये परिवर्तन घडवून आणणे. 'हील इन इंडिया - हील बाय इंडिया' व्हिजनने प्रेरित होऊन आम्ही असे स्थान निर्माण करत आहोत जिथे जगभरातील लोकांना करुणा आणि सामर्थ्य यांच्या बरोबरीनेच क्लिनिकल उत्कृष्टतेचे लाभ मिळत आहेत. आमची इच्छा आहे की पुणे आणि भारतातील प्रत्येक घराघरात आरोग्य आणि आनंद यांचा निवास सदैव राहो."

अपोलो हॉस्पिटल्सने आपल्या पुढील विस्तारासाठी पुण्याची निवड केली कारण त्यांनी ओळखले की या क्षेत्रातील लोकांच्या आरोग्यसंबंधी गरजा बदलत आहेत. त्यांनी आपल्या विस्तार योजना अशा पद्धतीने बनवल्या आहेत की नवीन, प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहरातील विविध लोक, समुदाय आणि संबंधित हितधारकांची ते अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू शकतील.

अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. प्रीता रेड्डी यांनी सांगितले,"अपोलो हॉस्पिटल्स पुणेमध्ये आम्ही क्लिनिकल उत्कृष्टता, करुणामय देखभाल आणि अथक नावीन्य यांच्या बळावर निर्माण केलेला, चार दशकांहून अधिक काळापासून चालत आलेला वारसा पुढे नेत आहोत. हे नवे हॉस्पिटल आरोग्य सेवांपर्यंत पोहोच आणि गुणवत्ता यांना पुढे नेण्याच्या आमच्या अचल बांधिलकीचे प्रतीक आहे, हे हॉस्पिटल सुरु करून आम्ही रुग्णांनी गेल्या अनेक पिढ्यांपासून आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान करत आहोत."

अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती सुनीता रेड्डी यांनी सांगितले,"आमचे पुणे हॉस्पिटल अपोलोच्या वाढत्या राष्ट्रीय विस्तारामध्ये उचलण्यात आलेले एक धोरणात्मक पाऊल आहे, जे भारतातील एका सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या आरोग्य सेवा बाजारपेठांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त लोकांना उच्च स्तरीय क्वाटर्नरी देखभालीचे लाभ देण्यासाठी आमची एकात्मिक आरोग्य इकोसिस्टिम शहरात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्रात आरोग्य देखभालीचे  मजबूत आणि भविष्यासाठी सज्ज नेटवर्क तयार करण्यासाठी पुण्यातील क्लिनिकल टॅलेंटसोबत सहयोग करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."

अपोलो हॉस्पिटल्सचे समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डॉ. मधू ससिधर यांनी सांगितले,"आमचे पुणे हॉस्पिटल सुरक्षा विज्ञान, पुराव्यांवर आधारित प्रॅक्टिस आणि एका अशा संस्कृतीच्या पायावर उभारण्यात आले आहे, ज्यामध्ये सर्व निर्णय रुग्णांना डोळ्यासमोर ठेवून घेतले जातात. जसजसे आम्ही पुढे जाऊ, रुग्णांच्या देखभालीप्रती आमची बांधिलकी मजबूत होत जाईल, जी उच्च दर्जा, पारदर्शक परिणाम, करुणा आणि क्लिनिकल दृढतेच्या माध्यमातून प्रदान केली जाईल."

अपोलो हॉस्पिटल्स पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा कर्माकर यांनी सांगितले,"पुणे शहरामध्ये आमचे नवे हॉस्पिटल क्लिनिकल उत्कृष्टतेप्रती अपोलोची बांधिलकी दर्शवते, इतकेच नव्हे तर एका अशा शहराच्या विकास आणि कल्याणमध्ये योगदान देत आहे जे तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनचे केंद्र म्हणून भारताच्या भविष्याला आकार देत आहे."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची एआय-आधारित ग्राहक सेवेसाठी भागीदारी

भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक असलेली टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी, सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून 24 तास ग्राहक सेवा आणि रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना उत्तर मिळण्याचा वेळ काहीकाही दिवसांवरून कमी होऊन 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच ईमेल उघडण्याचे प्रमाण 50–60% पर्यंत वाढले आहे. मुंबई। टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (टीआरआयएल) आणि जगातील नंबर 1 एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्सफोर्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. ग्राहकांना उत्तर देण्याचा वेळ काही दिवसांवरून कमी होऊन आता फक्त 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच कंपनी आता एकाच वेळी हजारो ग्राहकांशी सहज संपर्क साधू शकते.  असे गिरीश हड़कर (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड), अरुंधती भट्टाचार्य (प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया – ...

सॅमसंग आणि गुगलने दिली नवीन इंटेलिजेंट आयवेअरची पहिली झलक

मुंबई। सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड आणि गुगलने गुगल आय/ओ २०२६ मध्ये आयवेअर भागीदार जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्कर यांच्या सहयोगाने डिझाइन केलेल्‍या दोन प्रीमियम मॉडेल्सची पहिली झलक दाखवत नवीन इंटेलिजेंट आयवेअरचे अनावरण केले. मोबाइल फोनसाठी सहयोगी डिवाईस म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले हे नवीन आयवेअर वापरकर्त्‍यांना आवाजाच्या संवादाद्वारे मदत मिळवण्यास आणि त्यांच्या फोनशी विनासायासपणे जोडले जाण्यास सक्षम करते, जेथे ही सुविधा नेहमीच्या चष्म्याच्या रचनेत मिळते. आयवेअर भागीदारांसह सह-निर्मित केलेले हे इंटेलिजेंट आयवेअर क्रांतिकारी एआय क्षमतांना आराम आणि शैलीसोबत एकत्र आणते, ज्यामध्ये सॅमसंगचे हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील अग्रस्थान आणि गुगलचे एआय तंत्रज्ञान प्रीमियम आयवेअर डिझाइनशी जोडले गेले आहे. प्रत्येक आयवेअर ब्रँड या डिवाईसला वेगळा डिझाइन दृष्टिकोन देतो. फॅशन आयवेअरमधील आपल्या परंपरेसाठी प्रसिद्ध असलेले जेंटल मॉन्स्टर हे नाविन्यपूर्ण तरीही सुबक शैली सादर करते, तर वॉर्बी पार्कर परिष्कृत आणि चिरंतन डिझाइन्सचे प्रदर्शन करते. वापरकर्त्‍यांच्‍या सोबतीने रिअल टाइममध्ये ...

कर्करोग वगळता इतर शारीरिक व्याधी असलेल्या वृद्ध व्यक्तींना सदभावना वृद्धाश्रममध्ये मोफत प्रवेश मिळेल

मुंबई। जगातील सर्वात मोठे मोफत सदभावना वृद्धाश्रम, विनूभाई बाचूभाई नगरेचा येथील नवीन परिसरात, निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना आयुष्यभर पूर्णपणे मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये ७ टॉवर्समधील प्रत्येक टॉवरमध्ये ११ मजले असतील, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला पुरेशी जागा आणि काळजी मिळेल. तसेच, जैन समाजातील वृद्धांसाठी एक संपूर्ण टॉवर वेगळा बनवण्यात आला आहे, जिथे एक मंदिरही बांधण्यात आले आहे. ‘विनूभाई बाचूभाई नगरेचा परिसर’ येथील सदभावना वृद्धाश्रम २० लाख चौरस फूट बांधकामाचे आहे. ५०० कोटी रुपये खर्च करून, १४०० खोल्यांमध्ये ५००० निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची सोय केली जाईल. वृद्धाश्रम ही केवळ भारतीय संस्कृतीच नाही, तर आजच्या कलियुगाची गरज आहे. दुर्दैवाने, संयुक्त कुटुंब पद्धती मोडीत निघत असल्यामुळे अनेक लोक असहाय्य होत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून राजकोटमध्ये 'विनुभाई बचूभाई नगरेचा परिसर' सदभावना वृद्धाश्रम चालवले जात आहे. या वृद्धाश्रमात जात किंवा धर्माचा कोणताही भेदभाव न करता, गरजू वृद्धांना नियमांनुसार आणि संस्थेच्या प्रवे...