सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मोबाईल आणि भावनिक दूरावा ठरत आहे आधुनिक वैवाहिक जीवनातील मोठे संकट - प्रिया काकडे

विवाहबाह्य संबंधांच्या तपासासाठी खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सींची मागणी वाढली

मुंबई। मालाडमधील एका प्रतिष्ठित डॉक्टर दांपत्याच्या वैवाहिक तणावामागील सत्य उघड करण्याचे काम सुप्रसिद्ध खाजगी गुप्तहेर प्रिया काकडे यांनी कौशल्याने पार पाडले. कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर आणि त्यांची दंतवैद्य पत्नी यांच्यातील छोट्या वादांमुळे वाढलेला संशय अखेर विवाहबाह्य संबंधांपर्यंत पोहोचला.

डॉक्टर परदेशात असताना सुनेच्या वर्तणुकीबद्दलच्यातक्रारींनंतर त्यांनी स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या प्रिया काकडे यांची मदत घेतली. तपासात महिला डॉक्टरचे दोनहून अधिक पुरुषांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे उघड झाले, ज्याचे स्पष्ट पुरावे मिळाले.

सामाजिक प्रतिष्ठा आणि मुलांच्या भविष्यासाठी दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. प्रिया काकडे यांच्या गोपनीय आणि व्यावसायिक तपासामुळे हे कुटुंब सन्मानाने या संकटातून बाहेर पडले, तर या घटनेने वैवाहिक जीवनातील विश्वास आणि पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

पती पत्नीच्या नात्यामध्ये मोबाईल आणि सोशल मीडिया दुरावा निर्माण करत असल्याबरोबर विवाह बाह्य संबंध असल्याचा संशय वाढत आहे. घटस्फोट घेण्यासाठी केवळ संशय घेण्यापेक्षा हाती ठोस पुरावे असावेत असे जोडीदाराला वाटत असल्यामुळे विवाहबाह्य संबंधांचे पुरावे गोळा करण्यासाठी खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सीजची मदत घेण्याकडे कल वाढला असल्याचे स्विफ्ट डिटेक्टीव्ह एजन्सीजच्या संचालिका प्रिया काकडे यांनी सांगितले.

प्रिया काकडे म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यात विवाहबाह्य संबंधांमुळे घटस्फोटापर्यंत पोहचणार्‍यांचे प्रमाण साधारणत: ५० टक्क्यांपर्यंत आहे. लग्न झाल्यावर अवघ्या काही महिन्यांनंतर घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर पुरावे गोळा करण्यासाठी आमची मदत घेतली जाते आहे. काही केसेसचे जर अवलोकन केले तर आयटी क्षेत्र असो कि बँकिंग टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात पती-पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. नोकरीमुळे एकमेकांना वेळ देणे कमी झाल्यामुळे भावनिक गोष्टींमध्ये भागीदार शोधला जातो आणि पुढे हे संबंध वाढतात. जोडीदाराशी बांधिलकी असलीच पाहिजे हा विचार तरुणांमध्ये बदलताना दिसतो. त्याच्यात किंवा तिच्यात आता तितकासा रस नाही, समाधान, आनंद देणारे दुसरे कोणीतरी आहे, हा आता तरुणांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. त्यातच सोशल मीडियाचा अतिवापर आणि इतर ठिकाणी भावनिक गुंतवणूक होऊन विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतात. अशावेळी जोडीदार फक्त एकमेकांवर आरोप करत राहतात. घटस्फोट घेण्यासाठी केवळ संशय असण्यापेक्षा पुरावे गोळा करण्यात जोडीदार खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सीजची मदत घेतात. अशावेळी गोष्टी टोकाला गेल्या की मग घटस्फोटाचा निर्णय घेतात.

एका डॉक्टर दाम्पत्याचा घटस्फोटाचा अनुभव सांगताना प्रिया काकडे म्हणाल्या की, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून पत्नी पतीकडे दुर्लक्ष करीत होती नंतर मुलाचा जन्म झाल्यापासून त्याचे संगोपन करायला टाळाटाळ करायला लागली. रात्री उशिरापर्यंत बायको सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहायची, रात्रभर मेडिकल इमर्जन्सीच्या नावाखाली हॉस्पिटलला जाण्याच्या बहाण्याने बायकोच्या घराबाहेर जाण्याने नवरा हैराण झाला होता. तिला जाब विचारला गेले की मानसिक छळ, शारीरिक छळ, हुंडाबळीची केस टाकेन अशा धमक्या पत्नीकडून सासरच्यांना सारख्या मिळायच्या. त्यामुळे शेवटी तिचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागताच त्यांनी खाजगी डिटेक्टिव्हची मदत घेत पुरावे गोळा केले. त्यानंतर न्यायालयात पुरावे सादर करून घटस्फोट घेतला. तिच्या वागण्याचे विचित्र पुरावे असल्याने तिला पोटगी आणि मुलाचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे उच्च शिक्षित आणि श्रीमंत वर्गामध्ये देखील याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत असल्याचे काकडे म्हणाल्या.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रीपाद नाईक यांनी ECAMEX 2026 चे उद्घाटन केले; अक्षय ऊर्जेचा वाढता वाटा, सौर ऊर्जेचा प्रसार आणि मेक इन इंडिया संधींवर भर

मुंबई। भारत सरकारचे नवीन व अक्षय ऊर्जा तसेच वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोरेगाव येथील BEC येथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ECAM) च्या 101 वर्षपूर्ती निमित्त आयोजित भारतातील मेगा इलेक्ट्रिकल व ऊर्जा प्रदर्शन ECAMEX 2026 चे उद्घाटन केले. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की भारताच्या वाढत्या ऊर्जा मागणीची शाश्वत पूर्तता करण्यासाठी अक्षय ऊर्जेतून होणाऱ्या वीज निर्मितीचा टक्का लक्षणीयरीत्या वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की अक्षय ऊर्जा क्षेत्र उद्योग, नवोन्मेष आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देत असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळकटी देते. मंत्र्यांनी पुढे सांगितले की मेक इन इंडिया उपक्रमामुळे सौर उपकरणे, इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत उत्पादनासाठी मजबूत संधी निर्माण होत आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी उद्योगांनी स्वदेशी उत्पादन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासात गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केल...

दादर जैन ज्ञान मंदिरात श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला

मुंबई। राजा सिद्धार्थ यांचे वंशज आणि माता त्रिशला यांचे पुत्र, परम कृपाळू भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जयंतीनिमित्त या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, श्री आत्म कमल लब्धी सुरीश्वरजी जैन ज्ञान मंदिर आणि जिन रक्षा इंटरनॅशनल ग्रुप यांनी केले होते. शासन प्रदीप परम पूज्य आचार्य भगवंत श्री विजय प्रदीप चंद्र सुरीश्वरजी महाराज साहिब यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली, भगवान महावीर स्वामींच्या जन्म कल्याणकाचे एक सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन सादर करण्यात आले. आज जागतिक तापमानवाढ असो वा दहशतवाद, भगवान महावीरांची केवळ दोन तत्त्वे जगाला वाचवू शकतात: • अपरिग्रह: निसर्गाचे शोषण थांबवा, केवळ गरजेपुरतेच वापरा. शाळेतील सर्व पंडित, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संजयभाई शाह, अशोकभाई चरला, महिला विभागाच्या उपाध्यक्षा अल्पाबेन संजय शाह आणि संदीप दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी, ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त सा...

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा – खऱ्या फळांचा स्वाद, कोणतीही अतिरिक्त साखर नाही आणि कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत • साखरयुक्त पेये आणि कोल्ड ड्रिंक्सला एक आरोग्यदायी पर्याय – नाश्ता, मधल्या वेळचा स्नॅक आणि इतर वेळांसाठी योग्य • नैसर्गिक पोषण, हायड्रेशन आणि अतिरिक्त साखर टाळू इच्छिणाऱ्या आरोग्य-जागरूक ग्राहकांसाठी उत्तम पेय मुंबई। भारताची अग्रगण्य नैसर्गिक आरोग्य व आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडचा लोकप्रिय पॅकेज्ड फळ रस ब्रँड ‘रियल’ आपल्या सजग पोषणाच्या बांधिलकीला अधिक बळकट करत ‘रियल अ‍ॅक्टिव्ह’ फळ रस सादर करत आहे — कोणतीही अतिरिक्त साखर नसलेला, चविष्ट आणि ताजेतवाने फळ रसांचा हा विशेष श्रेणी आहे. आजच्या काळात ग्राहक अधिक आरोग्यदायी जीवनशैलीच्या पर्यायांकडे वळत असताना, रियल अ‍ॅक्टिव्ह भारतात हायड्रेशनची नवी व्याख्या करत आहे. अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हशिवाय, रियल अ‍ॅक्टिव्ह खऱ्या फळांचे नैसर्गिक गुणधर्म देतो. त्यामुळे हा उन्हाळ्यात दिवसभरासाठी एक उत्तम साथीदार ठरतो — पौष्टिक नाश्त्यापासून ते मधल्या वेळच्या स्नॅकपर्यंत. “उन्हाळ्य...