सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मलबार गोल्ड अँड डायमंड्सचा 'ब्राइड्स ऑफ इंडिया' अभियान

आलिया भट्ट, प्रार्थना बेहेरे, करीना कपूर खान अभियानात सामील

मुंबई: प्रत्येक भारतीय वधू तिच्यासोबत भावनांचे एक जग घेऊन जाते. त्यात तिच्या स्वतःच्या अनेक आठवणी असतात. ती ज्या रीतिरिवाजांना बघत मोठी झाली, ती ज्या संस्कृतीशी संबंधित आहे, ज्या आठवणी तिने हृदयाच्या जवळ जपल्या आहेत आणि तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एकाची ओळख ठरतील असे दागिने, या सगळ्या गोष्टी त्यात असतात. जगातील सर्वात मोठ्या सोने आणि हिऱ्यांच्या रिटेल चेनपैकी एक असलेल्या मलबार गोल्ड अँड डायमंड्सने भारतातील समृद्ध, सांस्कृतिक वारशातील वधूच्या दागिन्यांचे महत्त्व फार पूर्वीपासून समजून घेतले आहे. वधूच्या श्रेणीतील दागिन्यांमध्ये मलबार गोल्ड अँड डायमंड्सने विचारपूर्वक क्युरेट तसेच विकसित केलेले डिझाइन एकत्र आणले आहेत. ज्यामुळे प्रत्येक वधूच्या परंपरांचा आदर करणारे शुद्धता, हेतू आणि कारागिरीने तयार केलेले दागिने सुनिश्चित होतात. वधूच्या कारागिरीतील सखोल कौशल्यासह, ब्रँडने देशभरातील वधूंच्या विशिष्ट परंपरांचा आदर करणारे डिझाइन तयार करण्याचा एक अतुलनीय वारसा निर्माण केला आहे.

एक महत्त्वाचा टप्पा गाठत, मलबार गोल्ड अँड डायमंड्सने आज त्यांच्या प्रमुख ब्राइड्स ऑफ इंडिया अभियानाच्या 15व्या आवृत्तीचे अनावरण केले, जी भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अपेक्षित ब्राइडल प्रॉपर्टींपैकी एक म्हणून ओळखली जाते. या वर्षीच्या आवृत्तीत 22 वधू आणि 10 सेलिब्रिटी एकत्र आले आहेत - प्रार्थना बेहेरे, आलिया भट्ट, करीना कपूर खान, एनटीआर, कार्ती, अनिल कपूर, श्रीनिधी शेट्टी, रुक्मिणी मैत्र, सब्यसाची मिश्रा आणि मानसी पारेख, हे सर्व या मोहिमेचा विस्तार, वैविध्य तसेच भावनिक खोली दर्शवते. शुभजीत मुखर्जी यांनी संगीतबद्ध केलेल्या या जाहिरातीचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले आहे. या जाहिरातीत भारताच्या वेगवेगळ्या भागातील वधू संस्कृतींचे सार टिपणारे तसेच प्रत्येक वधूच्या कथेला आकार देणाऱ्या विधि, भावना तसेच वारसा साजरे करणारे दृश्य आणि संगीतमय कथानक एकत्र आणले आहे.

एम.पी.अहमद (अध्यक्ष, मलबार गोल्ड अँड डायमंड्स) म्हणाले,“दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला ब्राइड्स ऑफ इंडिया उपक्रम म्हणजे या देशातील वधूंप्रति आमची कृतज्ञता आहे. आणि हे 15वे वर्ष तर आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्वतःचे स्वातंत्र्य जपतानाच वधू परंपरेचा देखील कसा आदर करतात हे आम्ही अनेकदा अधोरेखित केले आहे. ही आवृत्ती त्या परंपरांची खोली दर्शवते - आठवणी, विधि आणि नातेसंबंध जे तिची ओळख आहे. पारदर्शकता आणि गुणवत्ता हमीसाठी मलबारची असलेली वचनबद्धता लक्षात घेता, प्रत्येक कुटुंबाला अर्थपूर्ण आणि विश्वासार्ह दागिने निवडण्याचा आत्मविश्वास वाटावा अशी आमची इच्छा आहे.”

महाराष्ट्रीयन वधू शतकानुशतकांच्या जुन्या परंपरेला आधुनिकतेशी जोडते. खेळकर पण शांत, आनंद आणि गांभीर्य यांचे अनोखे मिश्रण त्यात दिसते. तिचा वारसा ती आत्मविश्वासाने पुढे नेत असते. मलबार गोल्ड अँड डायमंडचे दागिने तिच्या याच वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आहेत - तेजस्वी, भावपूर्ण आणि मराठी वधूच्या कालातीत ओळखीचा सन्मान करण्यासाठी डिझाइन केलेले.

प्रार्थना बेहेरे (सिने अभिनेत्री) म्हणाली,"महाराष्ट्रीयन विवाह हे अर्थपूर्ण प्रतीकांनी परिभाषित केले जातात - नथ, मुंडावळ्या, हिरव्या बांगड्या, हे अलंकार आयुष्यातील एका नवीन अध्यायाचे प्रतीक आहेत. या तपशीलांमध्ये सांस्कृतिक अभिमान आहे. हे सगळे तपशील ब्राइड्स ऑफ इंडियामध्ये अगदी बारकाईने उतरतात, आपल्या परंपरांचे सार अधोरेखित करते आणि आजच्या वधूशी नैसर्गिकरित्या जोडले जाऊ शकतील अशा डिझाइन सादर करते."

सिने अभिनेत्री आलिया भट्ट म्हणाली, "लग्नात प्रत्येक वधू स्वतःचे व्यक्तिमत्त्व जपण्याचा प्रयत्न करते, कोणतीही परंपरा तिच्या नजरेतून कशी दिसते, त्या पद्धतीने ती व्यक्त करते. ब्राइड्स ऑफ इंडिया याचेच प्रतिनिधित्व करते. दागिन्यांच्या माध्यमातून मलबार हेच सुंदरपणे टिपते जे अर्थपूर्ण, समकालीन आणि तिच्या स्वतःच्या कथेशी जोडलेले आहे, असे तिला वाटते."

करीना कपूर खान म्हणाली, "प्रत्येक वधू ज्या परंपरांसोबत वाढते त्याच परंपरा जपते आणि लग्नाच्या प्रत्येक विधितून आणि क्षणातून तो वारसा जिवंत करते. ब्राइड्स ऑफ इंडियाबद्दल मला जे आवडते ते म्हणजे, वधूला केंद्रस्थानी ठेवून मलबार या कथांना एका सांस्कृतिक छत्राखाली एकत्र आणते. या मोहिमेचा भाग असणे मला नेहमीच खास वाटले आहे कारण ते आपले मूळ विसरत नाहीत आणि प्रामाणिकपणा तसेच अभिजाततेने ते साजरे करतात."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने भावी डॉक्टरांचा सन्मान करून राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने भावी डॉक्टरांचा सन्मान करून राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला; NEET मधील आपल्या ३७ वर्षांच्या वारशावर प्रकाश टाकला AESL ने MBBS करत असलेल्या माजी आकाशियन आणि तरुण वैद्यकीय व्यावसायिकांचा सत्कार केला, तसेच भारताच्या आरोग्यसेवा कर्मचारी वर्गाला घडवण्याच्या आपल्या ३७ वर्षांच्या वारशावर प्रकाश टाकला मुंबई। राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सोहळ्याचा एक भाग म्हणून, भारतातील सर्वात प्रसिद्ध परीक्षा तयारी संस्था असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने, डॉक्टर म्हणून कारकीर्द घडवलेल्या माजी आकाशियनचा आणि नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये MBBS च्या प्रगत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. हा सत्कार देशाच्या आरोग्यसेवा क्षेत्रावरील संस्थेच्या चिरस्थायी प्रभावाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. हा प्रसंग डॉक्टरांच्या पिढ्यानपिढ्या घडवण्याच्या AESL च्या समृद्ध परंपरेचे प्रतिबिंब होता. AESL जवळपास चार दशकांपासून भारतातील वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीशी संबंधित आहे आणि गेल्या काही वर्षांत ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना कठीण प्रवेश पर...

किया इंडियाकडून ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ चे आयोजन

मुंबई। ग्राहकांना वैविध्‍यपूर्ण आणि फायदेशीर मालकीहक्क अनुभव देण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ कर किया इंडियाने किया ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ ची घोषणा केली आहे. हा कॅम्प ३ जुलै ते १२ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ग्राहकांना जागतिक दर्जाची विक्रीपश्चात सेवा, वेईकलची सर्वसमावेशक केअर आणि विशेष फायदे सहज उपलब्ध करून देण्यावर ब्रँडचा असलेला भर लक्षात घेऊन हा उपक्रम ३६५ शहरांमधील कियाच्या ५२१ अधिकृत सर्व्हिस वर्कशॉप्समध्ये राबवला जाईल. या सर्व्हिस कॅम्पदरम्यान किया इंडिया ग्राहकांसाठी अनेक विशेष फायदे देत आहे. यामध्ये कार केअर सर्व्हिसेसवर २० टक्‍के सूट, एक्सटेंडेड वॉरंटी पॅकेजवर १० टक्‍क्‍यांपर्यंत सूट, रिटेल रोडसाइड असिस्टन्स (आरएसए) प्लॅन्सवर १० टक्‍के सूट, पार्ट्स व लेबर चार्जवर (मजुरी) १० टक्‍के सूट आणि किया जेन्युइन अॅक्सेसरीजवर १० टक्‍के सूट समाविष्ट आहे. कियाच्या अधिकृत सर्व्हिस नेटवर्कच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सोयीस्कर, उत्तम सुरक्षा आणि किफायतशीर दरात वेईकलची देखभाल करता यावी, यासाठी या मूल्यवर्धित सेवा डिझाइन केल्या आहेत. या उपक्रमाबाबत मत व्‍यक...

किया इंडियाकडून जून महिन्यातील आजपर्यंतच्‍या सर्वोच्च विक्रीची नोंद

१९ टक्के वाढीसह २४,५५२ युनिट्सची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आपल्या स्थापनेपासून जून महिन्यातील आतापर्यंतची सर्वोच्च विक्री जाहीर केली आहे. जून २०२५ मध्ये विकल्या गेलेल्या २०,६२५ युनिट्सच्‍या तुलनेत यंदा जून महिन्यात २४,५५२ युनिट्सची घाऊक विक्री झाली आहे, ज्‍यामध्‍ये वार्षिक १९ टक्‍के वाढ नोंदवण्यात आली आहे. या प्रबळ कामगिरीमधून कंपनीचा सातत्यपूर्ण विकास आणि कंपनीच्‍या प्रगत उत्पादन श्रेणीला ग्राहकांकडून मिळणारी चांगली पसंती दिसून येते. वर्ष २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत किया इंडियाने १,६३,७४९ युनिट्सची विक्री केली, जी कंपनीची पहिल्‍या सहामाहीमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या १,४२,१३९ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत यात वार्षिक १५.२ टक्‍के वाढ नोंदवली गेली आहे. या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींनुसार उत्पादने उपलब्ध करून देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर दिसून येतो. कॉम्पॅक्ट एसयूव्ही, मिड-सादझ एसयूव्ही, रिक्रिएशनल वेईकल्‍स आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स...