सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सीजीटीएमएसईचा रौप्य महोत्सव – सदस्य ऋणसंस्था सन्मान समारंभ

मुंबई : क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस (सीजीटीएमएसई) ने आपल्या 25 वर्षांच्या प्रभावी प्रवासाचे स्मरण करत, रौप्य महोत्सव साजरा केला. या प्रसंगी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील आर्थिक सहाय्य, कर्ज धोका व्यवस्थापन आणि संस्थात्मक उत्कृष्टतेसाठी उल्लेखनीय योगदान दिलेल्या प्रमुख सदस्य ऋणसंस्थांचा (एमएलआय) सन्मान करण्यात आला. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमातून, भारतातील सूक्ष्म व लघु उद्योजकांना बिनजामिनी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सीजीटीएमएसईच्या कटिबद्धतेचे पुनःप्रतिबिंब उमटले.
सन्मान वितरण सीजीटीएमएसईचे अध्यक्ष आणि सिडबीचे सीएमडी मनोज मित्तल, सिडबीचे उपव्यवस्थापक संचालक प्रकाश कुमार आणि सीजीटीएमएसईचे सीईओ मनीष सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसबीआयचे उपव्यवस्थापक संचालक सुरेंद्र राणा, तसेच एसबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक अनिंद्य सुंदर पॉल आणि इतर अनेक वरिष्ठ बँक अधिकारी उपस्थित होते.
गारंटी कव्हरेज (रक्कम) व वर्षानुवर्षांची वाढ या निकषांवर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ला सर्वोच्च सन्मान मिळाला. युनियन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक यांनी गारंटी कव्हरेज (संख्या) या विभागात आघाडी घेतली, तर खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँकेचा उल्लेखनीय सहभाग होता. बजाज फायनान्स, जना स्मॉल फायनान्स बँक, कर्नाटक विकास ग्रामीण बँक आणि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक यांना त्यांच्या-त्यांच्या श्रेणीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. डिजिटल नवकल्पना आणि विशेष पोहोच उपक्रमांसाठीही पुरस्कार देण्यात आले.
एनबीएफसी (NBFC) वर्गामध्ये बजाज फायनान्स लिमिटेडने गारंटी कव्हरेज (रक्कम) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला, तर टाटा मोटर्स फायनान्स आणि एसएमएफजी इंडिया क्रेडिट यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. इतर प्रमुख सन्मानांमध्ये: बँक ऑफ इंडियाला नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी, इंडसइंड बँकला अनौपचारिक मायक्रो उद्योग (IME) पोहोच उपक्रमासाठी, पंजाब अँड सिंध बँकला सर्वात वेगवान वाढीसाठी, आणि बँक ऑफ बडोदाला स्थिर कामगिरीसाठी गौरवण्यात आले. येस बँक, इंडियन बँक, ऍक्सिस बँक आणि एसबीआय यांनाही सीजीटीएमएसईच्या उपक्रमांमध्ये सातत्याने दिलेल्या पाठिंब्यासाठी गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाद्वारे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनास बळ देण्याच्या आणि एक मजबूत क्रेडिट गॅरंटी यंत्रणा उभारण्याच्या सीजीटीएमएसईच्या अविरत प्रयत्नांची पुनःपुष्टी करण्यात आली.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

झी-लाइव्हतर्फे ‘मराठी वाजलंच पाहिजे’

मराठी तरुणाई स्ट्रीट-आर्टमधील गुणवत्तेसह महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं दर्शन घडवणार मुंबई। झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेस लिमिटेड (झी) या भारतातील कंटेंट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने त्यांच्या नव्या प्रायोगिक टप्प्याच्या पहिल्या अध्यायाची झी लाइव्हची घोषणा केली. त्याअंतर्गत वर्ल्ड ऑफ वाइब्ज या टॅलेट कंपनीच्या सहकार्याने मराठी वाजलंच पाहिजे (एमपीव्ही) हा पहिला प्रमुख कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी फिनिक्स मार्केट सिटी, पुणे येथे होणार असलेला एमपीव्ही हा केवळ एक लाइव्ह कॉन्सर्ट नाही, तर ती एक सांस्कृतिक चळवळ आहे. त्यामधे मराठी तरुणाई संस्कृतीचं प्रतिबिंब झळकणार असून हिप-हॉप, इंडी म्युझिक, स्ट्रीट आर्टमधील नव्या गुणवत्तेसह महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं दर्शन घडवलं जाणार आहे. क्रॅटेक्स, संजू राठोड, श्रेयस अँड वेदांग, एमसी गावठी आणि पट्या द डॉक अशा ४०+ कलाकारांचा समावेश असलेलं हे फेस्टिवल धमाल उर्जेसह आजच्या तरुणाईची अस्सल आणि लोकल गोष्ट सांगणार आहे. एमपीव्ही हा असा मंच आहे, जिथं परंपरा आणि आधुनिक अभिव्यक्तीचा संगम होईल आणि आजच्या क्रिएटर्सच्या सूर, ...

भावना शर्मा जैन यांनी वायव्य मुंबई जिल्हा काँग्रेसची जबाबदारी स्वीकारली

मुंबई। ऑल इंडिया कांग्रेस कमेटी सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केलेल्या पदांच्या यादीनुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील संघटना निर्मिती उपक्रमांतर्गत, ऑल इंडिया कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, काँग्रेसच्या दिग्गज नेत्या भावना शर्मा जैन यांना वायव्य जिल्हा अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मजबूत तरुण महिला चेहरा म्हणून त्यांची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. माजी खासदार गुरदास कामत यांच्या जवळच्या सहकारी जैन यांची त्यांच्याच लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने हे स्पष्ट होते की काँग्रेसने त्यांना काळजीपूर्वक विचार करून ही जबाबदारी दिली आहे. भावना शर्मा जैन यांनी या जबाबदारीबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मुंबई प्रभारी चेनी थल्ला आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांचे आभार मानले. तिने सांगितले की ती तिच्या सर्व शक्ती, निष्ठा आणि समर्पणाने काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्य...

एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडिया अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक वेलनेस प्रोग्राम यांच्यासह मुंबईतील आयव्हीएफ क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार

उद्योगातील आघाडीच्या फर्टिलिटी शृंखलेने लाइव्ह योग सत्रे, तज्ञांचे वेबिनार आणि निवडक रुग्णांसाठी तिच्या अत्याधुनिक एम्ब्रयोलॉजी प्रयोगशाळेच्या फिजिकल टूर्स यांच्यासह अनोखा, विनामूल्य-ॲक्सेस डिजिटल अनुभव उपलब्ध करवून दिला आहे मुंबई। देशातील आघाडीची आयव्हीएफ आणि फर्टिलिटी उपचार संस्था, एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडियाने एका नवीन वेबसाइटसह फ्री-टू-ऍक्सेस फिजिटल अनुभवांचा एक अभिनव संच लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. आयव्हीएफ आणि फर्टिलिटी उपचारांच्या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर भावी पालकांना मदत करण्यासाठी प्रत्यक्ष आणि डिजिटल अनुभवांचे संयोजन करून, आपल्या देशात प्रजनन देखभाल क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी हे व्यापक व्यासपीठ डिझाइन केले आहे. या क्लिनिकमध्ये दर शनिवारी निवडक जोडप्यांसाठी मोफत प्रयोगशाळा भेटी आयोजित केल्या जातात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्यातील गर्भांचे संरक्षण करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम श्रेणीतील प्रक्रिया समोरासमोर पाहता येतात. गर्भ ट्रॅकिंग आणि आयडेंटिफिकेशन क्लिनिकच्या आरआय विटनेस टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशान...