सीधे मुख्य सामग्री पर जाएं

नारायण सेवा संस्थानाचा दिव्यांगसाठी मोफत शिबिर

४१९ दिव्यांगांनी ‘नारायण कृत्रिम अवयव’ घालून आत्मविश्वासाने हासत पुढे चालले

मुंबई। उदयपूरस्थित नारायण सेवा संस्थानाच्या वतीने मुंबईतील निको हॉल, नायगाव क्रॉस रोड, वडाळा उद्योग भवनजवळ, दादर येथे ‘नारायण लिम्ब आणि केलिपर्स फिटमेंट’ मोफत शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिराचा उद्देश शारीरिकदृष्ट्या असमर्थ असलेल्या व्यक्तींना चालण्यायोग्य बनवण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेची भावना निर्माण करणे हा होता. कृत्रिम अवयव बसवल्यानंतर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसून आला. या शिबिरात मुंबईसह दूरवरून आलेल्या ४१९ दिव्यांगांना अपर-लोअर व मल्टिपल कृत्रिम अवयव आणि केलिपर्स लावण्यात आले.

या शिबिराचे मुख्य अतिथी जसवंतभाई शाह होते. अध्यक्षस्थानी शांतिलाल मारू होते. विशेष अतिथी म्हणून साध्वी सुश्री यती किशोरी देवीजी, गुड्डी अग्रवाल, हर्ष बापना (आलोक इंडस्ट्रीज), श्याम सिंघानिया, नरेंद्र (इंडियन ओव्हरसीज बँकेचे माजी चेअरमन), सत्यसाई ट्रस्टचे डॉ. श्रीनिवास, कमल लोढा, सतीश अग्रवाल, गोपाल हलानी आणि टाटा टेली सर्व्हिसेस लिमिटेडच्या CSR विभागाकडून शीनू माथाई, सपना पंजाबी आणि कॉग्निझंट कंपनी, ICC आयलंड सिटी सेंटरचे अतिथी व स्वयंसेवक उपस्थित होते.

मुख्य अतिथी जसवंतभाई शाह म्हणाले, “नारायण सेवा संस्थान फक्त दिव्यांगांना सक्षम करत नाही तर त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि निराशाही दूर करत आहे. ही समाजोपयोगी सेवा आहे. अशा सकारात्मक विचारांमुळेच ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते.” त्यांनी संस्थेला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आणि संस्थापक कैलाश मानव व अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांच्या सेवाभावाचे कौतुक केले.

शिबिराचे अध्यक्ष शांतिलाल मारू म्हणाले, “ही उपक्रम योजना अशा घटकांसाठी आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत किंवा अपघातामुळे दिव्यांग झाले आहेत. आपल्या सर्वांचे ध्येय दिव्यांगांना नवजीवन आणि आत्मनिर्भरता प्रदान करणे आहे.”

शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सर्व अतिथींनी रुग्णांशी संवाद साधला, त्यांचे अनुभव ऐकले आणि डॉक्टरांकडून फिटमेंट प्रक्रिया जाणून घेतली. लाभार्थी दिव्यांगांना प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांनी बास्केटबॉल व फुटबॉल खेळत सहभाग घेतला.

शिबिराच्या सुरुवातीस नारायण सेवा संस्थानाच्या संचालिका पलक अग्रवाल, ट्रस्टी-संचालक देवेंद्र चोबीसा व महर्षि अग्रवाल यांनी मंचावरील अतिथ्यांचे मेवाडी परंपरेनुसार स्वागत केले.

संचालिका पलक अग्रवाल म्हणाल्या, “दिव्यांगांना त्यांच्या घराजवळच सेवा मिळावी म्हणून २३ मार्च रोजी मुंबईत शिबिर आयोजित केले होते. त्यात ५०० हून अधिक रुग्ण आले, त्यापैकी ४१९ दिव्यांगांची कृत्रिम अवयवासाठी निवड झाली. आज त्यांना नवजीवनाचे दान मिळाले आहे.” कार्यक्रमात दिव्यांगांनी कृत्रिम अवयव घालून परेड केली. संस्थेच्या डॉक्टरांनी त्यांना चालण्याचे प्रशिक्षण आणि कृत्रिम अवयवांच्या देखभालीची माहिती दिली.

ट्रस्टी-संचालक देवेंद्र चोबीसा म्हणाले, “मुंबईत प्रथमच मोठ्या प्रमाणावर दिव्यांगांनी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित नारायण लिम्ब घालून घरी परतले. हे सर्वजण कधीतरी अपघातात हात-पाय गमावून हालअपेष्टा सहन करत होते.”

या शिबिरात संस्थेच्या ८० जणांच्या टीमने सेवा दिली. मुंबई शाखेचे प्रमुख महेश अग्रवाल यांनी अतिथ्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन महिम जैन यांनी केले.

नारायण सेवा संस्थान १९८५ पासून ‘नर सेवा - नारायण सेवा’ या भावनेने कार्यरत आहे. संस्थापक श्री कैलाश मानव यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री सन्मान प्रदान केला आहे. नुकतीच ३० मे रोजी दिल्लीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांना ‘सामुदायिक सेवा व सामाजिक उत्थान’ या श्रेणीत सन्मानित केले. अध्यक्ष प्रशांत अग्रवाल हे वैद्यकीय, शिक्षण, कौशल्य विकास व क्रीडा अकादमीच्या माध्यमातून लाखो दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहेत. वर्ष २०२३ मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेने आतापर्यंत ४० हजारांहून अधिक कृत्रिम अवयव बसवले आहेत. आता संस्था मुंबईतील दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव सेवा मोठ्या प्रमाणावर देणार आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

‘फार्म टू फॉरेन’ उपक्रम महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक पटलावर नेणार

असोचॅमच्या 'फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन  मुंबई। महाराष्ट्राचा ‘फार्म टू फॉरेन’ हा उपक्रम शेतकरी, उत्पादक, उद्योजक आणि जागतिक फॅशन उद्योगाला एकत्र जोडण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे महाराष्ट्र एक प्रमुख वस्त्रोद्योग आणि निर्यात केंद्र म्हणून नावारूपास येईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (ASSOCHAM - असोचॅम) द्वारे मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६’ मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेने “ॲडव्हान्सिंग इंडियाज ५एफ व्हिजन फॉर सस्टेनेबल अँड ट्रेसेबल टेक्स्टाईल व्हॅल्यू चेन्स” या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, उत्पादक, शाश्वतता तज्ज्ञ आणि महत्त्वाचे भागधारक एकत्र आले होते. केंद्र सरकारच्या '५एफ विजन'—फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेनला अनुसरून असलेल्या या उपक्रमात भारताची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे, ह...

फुजीफिल्म इंडियाने मुंबईत भारतातील पहिले 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी' सुरू केले

भारतातील पहिल्या 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी'चे उद्घाटन जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त करण्यात आले, जो छायाचित्रणाच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. ही आकर्षक जागा फुजीफिल्मचा संपूर्ण इमेजिंग पोर्टफोलिओ, क्रिएटर अनुभव आणि समुदाय-आधारित शिक्षण एकाच छताखाली एकत्र आणते. मुंबई। फुजीफिल्म इंडियाने ' फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी 'च्या उद्घाटनाची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील पहिले आणि जागतिक स्तरावरील अकरावे केंद्र आहे, जे फोटोग्राफी आणि इमेजिंगचा एक परिपूर्ण अनुभव देते. हे उद्घाटन जागतिक फोटोग्राफी दिनाच्या (१९ ऑगस्ट) दिवशी होत असून, या वर्षी फोटोग्राफीच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे स्थित, हे दोन मजली, ५,७९५ चौरस फुटांचे केंद्र फुजीफिल्मच्या संपूर्ण इमेजिंग इकोसिस्टमला एकाच छताखाली एकत्र आणते. केवळ एक अनुभव केंद्र नसून, फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी ही एक सर्जनशील जागा आहे, जिथे इमेजिंग तंत्रज्ञान, कला आणि कथाकथन एकत्र येतात. हे नवीन फोटोग्राफर, चित्रपट निर्माते, कंटेंट क्रिएटर किंवा व्यावसायिक...

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने अँथे 2026 सुरू केले आहे

विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता ओळखण्यास आणि स्पर्धात्मक यशासाठी तयार होण्यास मदत करणारी सर्वात मोठी टॅलेंट हंट परीक्षा. भारतातील सर्वात जुन्या प्रतिभा ओळख परीक्षेने गेल्या १६ वर्षांत १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना काय सुधारायचे आहे आणि पुढे काय करायचे आहे हे समजण्यास मदत करण्यासाठी शास्त्रीय मूल्यांकन, राष्ट्रीय बेंचमार्किंग आणि वैयक्तिकृत शैक्षणिक अंतर्दृष्टी यांचा मेळ साधते अँथे २०२६ एका दृष्टिक्षेपात: • अँथे ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक काळ चालणारी प्रतिभा शोध परीक्षा आहे, ज्यामध्ये गेल्या १६ वर्षांत १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. • परीक्षेतील प्रत्येक प्रश्न उद्देश-केंद्रित असून, तो विविध विषयांमधील विशिष्ट संकल्पना आणि क्षमतांचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केलेला आहे. • ही एक व्यापक, शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली निदान चाचणी आहे, जी केवळ गुणांपलीकडे जाऊन विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी, स्पर्धात्मक तयारी आणि परीक्षेतील वर्तणूक समजून घेते. • विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि कामगिरीसाठी १००% पर्यंत श...