सीधे मुख्य सामग्री पर जाएं

'ऑपरेशन सिंधू'अंतर्गत ४,४०० हून अधिक भारतीय मायदेशी

मुंबई। इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान पश्चिम आशियात अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने १८ जून रोजी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले होते. २८ जूनपर्यंत, इराण आणि इस्रायलमधील संघर्षग्रस्त भागातून एकूण ४,४१५ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात सरकारला यश आले आहे. 
 भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) तीन सी-१७ विमानांसह १९ विशेष उड्डाणांद्वारे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले. प्रादेशिक एकतेचे प्रतीक म्हणून, मानवतावादी दृष्टीकोनातून भारत सरकारने शेजारील देशांतील नागरिकांच्या स्थलांतरासही सहाय्य केले. इराणमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये १४ 'ओसीआय' (भारताचे परदेशी नागरिक) कार्डधारक, ९ नेपाळी नागरिक, ४ श्रीलंकेचे नागरिक आणि एका भारतीय नागरिकाच्या १ इराणी जोडीदाराचा समावेश होता.
 भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, तेहरान, येरेवन आणि अश्गाबात येथील भारतीय दूतावासांनी जमिनीवरील सीमा ओलांडण्यासह स्थलांतरितांना सुरक्षित मार्गाने जाण्यासाठी विशेष समन्वय साधण्यात आला. इराणमधून बहुतेक भारतीयांचे स्थलांतर मशहादमार्गे करण्यात आले. १८ ते २६ जून दरम्यान, १५ हून अधिक भारतीय राज्यांमधील विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक, यात्रेकरू आणि मच्छीमार अशा एकूण ३,५९७ नागरिकांना स्थलांतरासाठी १५ विशेष विमानांची सोय करण्यात आली होती. या सर्वांना येरेवन, अश्गाबात आणि मशहाद येथून मायदेशी परत आणण्यात आले.
 इस्रायलमधून भारतीय नागरिकांना परत मायदेशी आणण्याची मोहीम २३ जून रोजी सुरू झाली. भारतीय नागरिकांना जमिनीवरील सीमेवरून जॉर्डन आणि इजिप्तमध्ये जाता यावे यासाठी तेल अवीव, रामल्लाह, अम्मान आणि कैरो येथील भारतीय दूतावासांनी त्या सरकारशी समन्वय साधला. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २२ ते २५ जून या कालावधीत अम्मान आणि शर्म अल शेख येथून तीन 'आयएएफ सी-१७' विमानांसह चार निर्वासन उड्डाणांद्वारे एकूण ८१८ भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, कामगार आणि व्यावसायिकांचा समावेश होता.
 भारत सरकारने परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी आपली तीव्र वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. या मोहिमेदरम्यान सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल इराण, इस्रायल, जॉर्डन, इजिप्त, आर्मेनिया आणि तुर्कमेनिस्तानच्या सरकारांचेही त्यांनी आभार मानले. परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, भारतीय राजनैतिक मिशन इराण, इस्रायल आणि पश्चिम आशियातील स्थानिक अधिकाऱ्यांशी आणि भारतीय समुदायांशी सक्रियपणे संपर्कात असेल आणि भविष्यातील सर्वप्रकारच्या घडामोडींवर लक्ष ठेवून त्यावर आवश्यक प्रतिसाद दिला जाईल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने भावी डॉक्टरांचा सन्मान करून राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने भावी डॉक्टरांचा सन्मान करून राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला; NEET मधील आपल्या ३७ वर्षांच्या वारशावर प्रकाश टाकला AESL ने MBBS करत असलेल्या माजी आकाशियन आणि तरुण वैद्यकीय व्यावसायिकांचा सत्कार केला, तसेच भारताच्या आरोग्यसेवा कर्मचारी वर्गाला घडवण्याच्या आपल्या ३७ वर्षांच्या वारशावर प्रकाश टाकला मुंबई। राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सोहळ्याचा एक भाग म्हणून, भारतातील सर्वात प्रसिद्ध परीक्षा तयारी संस्था असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने, डॉक्टर म्हणून कारकीर्द घडवलेल्या माजी आकाशियनचा आणि नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये MBBS च्या प्रगत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. हा सत्कार देशाच्या आरोग्यसेवा क्षेत्रावरील संस्थेच्या चिरस्थायी प्रभावाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. हा प्रसंग डॉक्टरांच्या पिढ्यानपिढ्या घडवण्याच्या AESL च्या समृद्ध परंपरेचे प्रतिबिंब होता. AESL जवळपास चार दशकांपासून भारतातील वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीशी संबंधित आहे आणि गेल्या काही वर्षांत ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना कठीण प्रवेश पर...

किया इंडियाकडून ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ चे आयोजन

मुंबई। ग्राहकांना वैविध्‍यपूर्ण आणि फायदेशीर मालकीहक्क अनुभव देण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ कर किया इंडियाने किया ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ ची घोषणा केली आहे. हा कॅम्प ३ जुलै ते १२ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ग्राहकांना जागतिक दर्जाची विक्रीपश्चात सेवा, वेईकलची सर्वसमावेशक केअर आणि विशेष फायदे सहज उपलब्ध करून देण्यावर ब्रँडचा असलेला भर लक्षात घेऊन हा उपक्रम ३६५ शहरांमधील कियाच्या ५२१ अधिकृत सर्व्हिस वर्कशॉप्समध्ये राबवला जाईल. या सर्व्हिस कॅम्पदरम्यान किया इंडिया ग्राहकांसाठी अनेक विशेष फायदे देत आहे. यामध्ये कार केअर सर्व्हिसेसवर २० टक्‍के सूट, एक्सटेंडेड वॉरंटी पॅकेजवर १० टक्‍क्‍यांपर्यंत सूट, रिटेल रोडसाइड असिस्टन्स (आरएसए) प्लॅन्सवर १० टक्‍के सूट, पार्ट्स व लेबर चार्जवर (मजुरी) १० टक्‍के सूट आणि किया जेन्युइन अॅक्सेसरीजवर १० टक्‍के सूट समाविष्ट आहे. कियाच्या अधिकृत सर्व्हिस नेटवर्कच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सोयीस्कर, उत्तम सुरक्षा आणि किफायतशीर दरात वेईकलची देखभाल करता यावी, यासाठी या मूल्यवर्धित सेवा डिझाइन केल्या आहेत. या उपक्रमाबाबत मत व्‍यक...

किया इंडियाकडून जून महिन्यातील आजपर्यंतच्‍या सर्वोच्च विक्रीची नोंद

१९ टक्के वाढीसह २४,५५२ युनिट्सची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आपल्या स्थापनेपासून जून महिन्यातील आतापर्यंतची सर्वोच्च विक्री जाहीर केली आहे. जून २०२५ मध्ये विकल्या गेलेल्या २०,६२५ युनिट्सच्‍या तुलनेत यंदा जून महिन्यात २४,५५२ युनिट्सची घाऊक विक्री झाली आहे, ज्‍यामध्‍ये वार्षिक १९ टक्‍के वाढ नोंदवण्यात आली आहे. या प्रबळ कामगिरीमधून कंपनीचा सातत्यपूर्ण विकास आणि कंपनीच्‍या प्रगत उत्पादन श्रेणीला ग्राहकांकडून मिळणारी चांगली पसंती दिसून येते. वर्ष २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत किया इंडियाने १,६३,७४९ युनिट्सची विक्री केली, जी कंपनीची पहिल्‍या सहामाहीमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या १,४२,१३९ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत यात वार्षिक १५.२ टक्‍के वाढ नोंदवली गेली आहे. या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींनुसार उत्पादने उपलब्ध करून देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर दिसून येतो. कॉम्पॅक्ट एसयूव्ही, मिड-सादझ एसयूव्ही, रिक्रिएशनल वेईकल्‍स आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स...