सीधे मुख्य सामग्री पर जाएं

'ऑपरेशन सिंधू'अंतर्गत ४,४०० हून अधिक भारतीय मायदेशी

मुंबई। इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान पश्चिम आशियात अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने १८ जून रोजी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले होते. २८ जूनपर्यंत, इराण आणि इस्रायलमधील संघर्षग्रस्त भागातून एकूण ४,४१५ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात सरकारला यश आले आहे. 
 भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) तीन सी-१७ विमानांसह १९ विशेष उड्डाणांद्वारे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले. प्रादेशिक एकतेचे प्रतीक म्हणून, मानवतावादी दृष्टीकोनातून भारत सरकारने शेजारील देशांतील नागरिकांच्या स्थलांतरासही सहाय्य केले. इराणमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये १४ 'ओसीआय' (भारताचे परदेशी नागरिक) कार्डधारक, ९ नेपाळी नागरिक, ४ श्रीलंकेचे नागरिक आणि एका भारतीय नागरिकाच्या १ इराणी जोडीदाराचा समावेश होता.
 भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, तेहरान, येरेवन आणि अश्गाबात येथील भारतीय दूतावासांनी जमिनीवरील सीमा ओलांडण्यासह स्थलांतरितांना सुरक्षित मार्गाने जाण्यासाठी विशेष समन्वय साधण्यात आला. इराणमधून बहुतेक भारतीयांचे स्थलांतर मशहादमार्गे करण्यात आले. १८ ते २६ जून दरम्यान, १५ हून अधिक भारतीय राज्यांमधील विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक, यात्रेकरू आणि मच्छीमार अशा एकूण ३,५९७ नागरिकांना स्थलांतरासाठी १५ विशेष विमानांची सोय करण्यात आली होती. या सर्वांना येरेवन, अश्गाबात आणि मशहाद येथून मायदेशी परत आणण्यात आले.
 इस्रायलमधून भारतीय नागरिकांना परत मायदेशी आणण्याची मोहीम २३ जून रोजी सुरू झाली. भारतीय नागरिकांना जमिनीवरील सीमेवरून जॉर्डन आणि इजिप्तमध्ये जाता यावे यासाठी तेल अवीव, रामल्लाह, अम्मान आणि कैरो येथील भारतीय दूतावासांनी त्या सरकारशी समन्वय साधला. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २२ ते २५ जून या कालावधीत अम्मान आणि शर्म अल शेख येथून तीन 'आयएएफ सी-१७' विमानांसह चार निर्वासन उड्डाणांद्वारे एकूण ८१८ भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, कामगार आणि व्यावसायिकांचा समावेश होता.
 भारत सरकारने परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी आपली तीव्र वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. या मोहिमेदरम्यान सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल इराण, इस्रायल, जॉर्डन, इजिप्त, आर्मेनिया आणि तुर्कमेनिस्तानच्या सरकारांचेही त्यांनी आभार मानले. परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, भारतीय राजनैतिक मिशन इराण, इस्रायल आणि पश्चिम आशियातील स्थानिक अधिकाऱ्यांशी आणि भारतीय समुदायांशी सक्रियपणे संपर्कात असेल आणि भविष्यातील सर्वप्रकारच्या घडामोडींवर लक्ष ठेवून त्यावर आवश्यक प्रतिसाद दिला जाईल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

झी-लाइव्हतर्फे ‘मराठी वाजलंच पाहिजे’

मराठी तरुणाई स्ट्रीट-आर्टमधील गुणवत्तेसह महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं दर्शन घडवणार मुंबई। झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेस लिमिटेड (झी) या भारतातील कंटेंट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने त्यांच्या नव्या प्रायोगिक टप्प्याच्या पहिल्या अध्यायाची झी लाइव्हची घोषणा केली. त्याअंतर्गत वर्ल्ड ऑफ वाइब्ज या टॅलेट कंपनीच्या सहकार्याने मराठी वाजलंच पाहिजे (एमपीव्ही) हा पहिला प्रमुख कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी फिनिक्स मार्केट सिटी, पुणे येथे होणार असलेला एमपीव्ही हा केवळ एक लाइव्ह कॉन्सर्ट नाही, तर ती एक सांस्कृतिक चळवळ आहे. त्यामधे मराठी तरुणाई संस्कृतीचं प्रतिबिंब झळकणार असून हिप-हॉप, इंडी म्युझिक, स्ट्रीट आर्टमधील नव्या गुणवत्तेसह महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं दर्शन घडवलं जाणार आहे. क्रॅटेक्स, संजू राठोड, श्रेयस अँड वेदांग, एमसी गावठी आणि पट्या द डॉक अशा ४०+ कलाकारांचा समावेश असलेलं हे फेस्टिवल धमाल उर्जेसह आजच्या तरुणाईची अस्सल आणि लोकल गोष्ट सांगणार आहे. एमपीव्ही हा असा मंच आहे, जिथं परंपरा आणि आधुनिक अभिव्यक्तीचा संगम होईल आणि आजच्या क्रिएटर्सच्या सूर, ...

भावना शर्मा जैन यांनी वायव्य मुंबई जिल्हा काँग्रेसची जबाबदारी स्वीकारली

मुंबई। ऑल इंडिया कांग्रेस कमेटी सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केलेल्या पदांच्या यादीनुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील संघटना निर्मिती उपक्रमांतर्गत, ऑल इंडिया कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, काँग्रेसच्या दिग्गज नेत्या भावना शर्मा जैन यांना वायव्य जिल्हा अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मजबूत तरुण महिला चेहरा म्हणून त्यांची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. माजी खासदार गुरदास कामत यांच्या जवळच्या सहकारी जैन यांची त्यांच्याच लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने हे स्पष्ट होते की काँग्रेसने त्यांना काळजीपूर्वक विचार करून ही जबाबदारी दिली आहे. भावना शर्मा जैन यांनी या जबाबदारीबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मुंबई प्रभारी चेनी थल्ला आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांचे आभार मानले. तिने सांगितले की ती तिच्या सर्व शक्ती, निष्ठा आणि समर्पणाने काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्य...

एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडिया अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक वेलनेस प्रोग्राम यांच्यासह मुंबईतील आयव्हीएफ क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार

उद्योगातील आघाडीच्या फर्टिलिटी शृंखलेने लाइव्ह योग सत्रे, तज्ञांचे वेबिनार आणि निवडक रुग्णांसाठी तिच्या अत्याधुनिक एम्ब्रयोलॉजी प्रयोगशाळेच्या फिजिकल टूर्स यांच्यासह अनोखा, विनामूल्य-ॲक्सेस डिजिटल अनुभव उपलब्ध करवून दिला आहे मुंबई। देशातील आघाडीची आयव्हीएफ आणि फर्टिलिटी उपचार संस्था, एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडियाने एका नवीन वेबसाइटसह फ्री-टू-ऍक्सेस फिजिटल अनुभवांचा एक अभिनव संच लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. आयव्हीएफ आणि फर्टिलिटी उपचारांच्या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर भावी पालकांना मदत करण्यासाठी प्रत्यक्ष आणि डिजिटल अनुभवांचे संयोजन करून, आपल्या देशात प्रजनन देखभाल क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी हे व्यापक व्यासपीठ डिझाइन केले आहे. या क्लिनिकमध्ये दर शनिवारी निवडक जोडप्यांसाठी मोफत प्रयोगशाळा भेटी आयोजित केल्या जातात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्यातील गर्भांचे संरक्षण करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम श्रेणीतील प्रक्रिया समोरासमोर पाहता येतात. गर्भ ट्रॅकिंग आणि आयडेंटिफिकेशन क्लिनिकच्या आरआय विटनेस टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशान...