सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अथर्व यूनिवर्सिटी – वलनाई मेट्रो स्टेशनचे औपचारिक उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते, सुनील राणे यांच्या उपस्थितीत

मुंबई। मुंबईच्या शैक्षणिक आणि नागरी क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरला, कारण वलनाई–मिठ चौकी मेट्रो स्टेशनचे अधिकृतपणे नाव बदलून “अथर्व यूनिवर्सिटी – वलनाई मेट्रो स्टेशन” असे ठेवण्यात आले आणि त्याचे उद्घाटन पार पडले.

या नामकरण समारंभाचे उद्घाटन भारत सरकारचे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झाले. यावेळी अथर्वा यूनिवर्सिटीचे संस्थापक व कुलाधिपती सुनील राणे आणि अथर्वा फाउंडेशनच्या उपाध्यक्ष वर्षा राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा सोहळा माळाड (पश्चिम) येथील स्टेशन परिसरात पार पडला. यावेळी यूनिवर्सिटीचे वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. स्टेशनच्या नावात "अथर्व यूनिवर्सिटी" समाविष्ट झाल्याने संपूर्ण वातावरणात अभिमान आणि उत्सवाची भावना अनुभवायला मिळाली.
"हे स्टेशन आता शैक्षणिक उत्कृष्टतेचे आणि समाजासाठी केलेल्या योगदानाचे प्रतीक आहे. अथर्व यूनिवर्सिटीने एक समृद्ध परंपरा निर्माण केली आहे आणि आजचे उद्घाटन त्याचा गौरवशाली सन्मान आहे," असे उद्घाटनप्रसंगी पियुष गोयल यांनी सांगितले.
 सुनील राणे यांनी या गौरवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, हा क्षण यूनिवर्सिटीच्या प्रवासाचे आणि मुंबईच्या शैक्षणिक व नागरी जीवनातील तिच्या वाढत्या महत्वाचे प्रतिबिंब आहे.
"हे फक्त एक नाव नाही—तर आमच्या मूल्यांचे, समाजासाठी असलेल्या बांधिलकीचे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी असलेल्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे," असे राणे यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात नव्या स्टेशन फलकाचे अनावरण, मीडियाशी संवाद आणि विद्यार्थ्यांची मान्यवरांशी संवाद सत्रे आयोजित करण्यात आली होती. खासगी यूनिवर्सिटीच्या नावावर मुंबईत मेट्रो स्टेशन नामांकित होण्याची ही एक दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण घटना ठरली आहे, जी शैक्षणिक व नवोपक्रमातील संस्थेच्या योगदानाची साक्ष देते.
अथर्वा यूनिवर्सिटीने या ऐतिहासिक टप्प्याची शक्यताच निर्माण करणाऱ्या मुंबई मेट्रो प्रशासनाचे, सरकारी प्रतिनिधींचे आणि सर्व संबंधितांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

‘फार्म टू फॉरेन’ उपक्रम महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक पटलावर नेणार

असोचॅमच्या 'फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन  मुंबई। महाराष्ट्राचा ‘फार्म टू फॉरेन’ हा उपक्रम शेतकरी, उत्पादक, उद्योजक आणि जागतिक फॅशन उद्योगाला एकत्र जोडण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे महाराष्ट्र एक प्रमुख वस्त्रोद्योग आणि निर्यात केंद्र म्हणून नावारूपास येईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (ASSOCHAM - असोचॅम) द्वारे मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६’ मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेने “ॲडव्हान्सिंग इंडियाज ५एफ व्हिजन फॉर सस्टेनेबल अँड ट्रेसेबल टेक्स्टाईल व्हॅल्यू चेन्स” या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, उत्पादक, शाश्वतता तज्ज्ञ आणि महत्त्वाचे भागधारक एकत्र आले होते. केंद्र सरकारच्या '५एफ विजन'—फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेनला अनुसरून असलेल्या या उपक्रमात भारताची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे, ह...

किया इंडियाने नवीन अकॅडमीसह डीलर ट्रेनिंग नेटवर्कचा विस्तार केला

मुंबई। किया इंडिया या देशातील प्रमुख मास-प्रीमियम कार उत्पादक कंपनीने आज अहमदाबाद, गुजरात येथील सुपरनोव्हा किया येथे आपल्या नवीन डीलर ट्रेनिंग अकॅडमीचे उद्घाटन केले. दरमहा जवळपास २५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली ही अकॅडमी विक्री (सेल) आणि सेवा (सर्व्हिस) विभागांमधील कुशल व तज्ज्ञ डीलर टीम्स विकसित करण्याच्या किया इंडियाच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करते. ही अकॅडमी ग्रुप डीलरशिपमधील विक्री आणि सेवा टीम्ससाठी डीलर-नेतृत्वित लेव्हल-१ प्रशिक्षण उपक्रम राबवण्यास सक्षम करते. स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाची पायाभूत सुविधा निर्माण करून किया इंडिया नवीन कर्मचारीवर्गाचे जलद समावेशन, विद्यमान टीम्सच्या कौशल्यामध्ये सतत वाढ आणि मध्यवर्ती प्रशिक्षणावरील अवलंबित्व कमी करणे सुनिश्चित करते. हा दृष्टिकोन डीलरशिप पातळीवर कर्मचाऱ्यांची स्थिरता सुधारण्यासोबत भूमिकांवर आधारित सखोल प्राविण्य निर्माण करण्यास मदत करतो. या उपक्रमामुळे ठिकाण कोणतेही असो, ग्राहकांना स्पष्ट संवाद, जलद सर्व्हिस टर्नअराउंड वेळ, समान सर्व्हिस मानक आणि अधिक सुलभ मालकीहक्काचा अनुभव मिळण्यास मदत होईल. सध्याच्या...

फुजीफिल्म इंडियाने मुंबईत भारतातील पहिले 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी' सुरू केले

भारतातील पहिल्या 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी'चे उद्घाटन जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त करण्यात आले, जो छायाचित्रणाच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. ही आकर्षक जागा फुजीफिल्मचा संपूर्ण इमेजिंग पोर्टफोलिओ, क्रिएटर अनुभव आणि समुदाय-आधारित शिक्षण एकाच छताखाली एकत्र आणते. मुंबई। फुजीफिल्म इंडियाने ' फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी 'च्या उद्घाटनाची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील पहिले आणि जागतिक स्तरावरील अकरावे केंद्र आहे, जे फोटोग्राफी आणि इमेजिंगचा एक परिपूर्ण अनुभव देते. हे उद्घाटन जागतिक फोटोग्राफी दिनाच्या (१९ ऑगस्ट) दिवशी होत असून, या वर्षी फोटोग्राफीच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे स्थित, हे दोन मजली, ५,७९५ चौरस फुटांचे केंद्र फुजीफिल्मच्या संपूर्ण इमेजिंग इकोसिस्टमला एकाच छताखाली एकत्र आणते. केवळ एक अनुभव केंद्र नसून, फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी ही एक सर्जनशील जागा आहे, जिथे इमेजिंग तंत्रज्ञान, कला आणि कथाकथन एकत्र येतात. हे नवीन फोटोग्राफर, चित्रपट निर्माते, कंटेंट क्रिएटर किंवा व्यावसायिक...