सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी गणेशोत्सवात पॉलीकॅबने मजबूत बंध निर्माण केले

सामान्य लोकांना प्राधान्य देणाऱ्या सुविधांची पॉलीकॅब व्यवस्था

मुंबई। गणेशोत्सवाच्या काळात मुंबई भक्ती आणि उत्सवाच्या वातावरणाने भारलेली असतानाच, पॉलीकॅबने आपल्या ग्राहक केंद्रित दृष्टिकोनाची प्रचिती दिली. शहरातील दोन सर्वात प्रतिष्ठित आणि महत्त्वाची उत्सव स्थळे - लालबागचा राजा आणि जुहू बीच येथे भाविकांची सोय लक्षात घेत योग्य व्यवस्था करत मजबूत बंध निर्माण केले आहेत. भाविकांच्या गरजा ओळखून पॉलीकॅबने आराम, सुरक्षा आणि सुलभतेला प्राधान्य देणाऱ्या कार्यात्मक, भाविकांच्या सोयीसाठी जागा तयार करून त्यांचे स्थान अधिक भक्कम केले आहे. मुंबईतील भाविकांच्या गर्दीच्या गरजा ओळखून त्यांनी आपले उपक्रम तयार केले आहेत. या माध्यमातून पॉलीकॅब सामाजिक भान जपत आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपले स्थान भक्कम करते आहे.

लालबागचा राजा येथे दर्शन प्रवास अधिक सुरळीत आणि आरामदायी करण्यासाठी, पॉलीकॅबने दर्शन मार्गावरील स्थानिक बस स्टॉपचे रूपांतर 'कम्फर्ट झोन' मध्ये केले आहे. यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना जरा विसावा घेता येईल. त्यांचे मोबाइल रिचार्ज करण्यासोबतच ऊन तसेच पावसापासून बचावासाठी हा बस स्टॉपचा उपयोग करता येईल. याशिवाय भाविक तसेच स्वयंसेवकांची कनेक्टिव्हिटी राहावी म्हणून पॉलीकॅबने पंडालमध्ये मोबाइल चार्जिंग स्टेशन, सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या पोलिसांसाठी कम्फर्ट झोन, तसेच हवा खेळती राहणारे पॉलीकॅब पंख्यांनी सुसज्ज अशा  वॉकवे झोनची व्यवस्था केली आहे.

श्वेताल बसू, वरिष्ठ उपाध्यक्ष, ब्रँड आणि मार्कॉम, पॉलीकॅब इंडिया लिमिटेड म्हणाल्या,“गणेश चतुर्थी हा एकता आणि भक्तीचा उत्सव आहे. या व्यवस्थेद्वारे आम्ही समाजाला आराम देण्याचे उद्दिष्ट ठेवतो. केवळ उत्पादनांच्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण, ग्राहक प्रथम कनेक्शन तयार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.''

प्रमुख विसर्जन स्थळ असलेल्या जुहू बीचवर विसर्जनादरम्यान गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पॉलीकॅबने ब्रँडेड सेफ्टी वॉच टॉवर्स बसवले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांना देखील गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. अशा प्रयत्नांमुळे लाखो भाविकांशी असलेले पॉलीकॅबचे नाते अधिक दृढ होते आहे. पॉलीकॅबच्या भारतातील यशस्वी सांस्कृतिक कार्यक्रमांवर हा उपक्रम आधारलेला आहे. पुरीमधील रथयात्रेपासून मुंबईतील गणेश चतुर्थीपर्यंत पॉलीकॅब स्थानिक परंपरांशी जुळवून घेताना आराम, काळजी आणि मजबूत बंधाद्वारे लोकांना प्राधान्य देत उत्सवाचा आनंद द्विगुणित करत आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

कॉस्मॉलॉजिस्ट बलदेवकृष्ण शर्मा यांचे 'नॅचरल युनिव्हर्स एक्सपेंशन' हे पुस्तक मुंबईत प्रकाशित झाले

हे पुस्तक विश्वासाठी एक धाडसी नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन देते मुंबई। प्रसिद्ध कॉस्मॉलॉजिस्ट आणि नवोन्मेषक बलदेवकृष्ण शर्मा यांचे 'नॅचरल युनिव्हर्स एक्सपेंशन' हे पुस्तक गुरुवारी मुंबईत एका आकर्षक कार्यक्रमात प्रकाशित झाले. हे पुस्तक हबलचा नियम आणि महास्फोट सिद्धांत यासारख्या दीर्घकालीन सिद्धांतांना आव्हान देणारे वैश्विक विस्ताराचे एक क्रांतिकारी नवीन मॉडेल सादर करते.  हे अग्रगण्य काम नैसर्गिक विश्व विस्तार कायदा सादर करते, एक नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यामध्ये वेळेला एक गंभीर चल म्हणून समाविष्ट केले जाते, हा घटक लेखक असा युक्तिवाद करतात की हबलच्या नियमात अनुपस्थित आहे. श्री. शर्मा यांच्या मते, या दुर्लक्षामुळे विश्वाच्या विस्ताराच्या सध्याच्या समजुतीमध्ये मूलभूत त्रुटी निर्माण होतात.  "नॅचरल युनिव्हर्स एक्सपेंशन लॉ या अंतरांना दूर करते आणि एक नवीन स्थिरांक, न्यू स्थिरांक सादर करते, जो विश्वाच्या गतिशीलतेचे अधिक चांगले स्पष्टीकरण देतो," असे ते पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी म्हणाले.  नैसर्गिक विश्वाचा विस्तार केवळ वैश्विक विस्ताराच्या यांत्रिकीमध्ये...

आशीर्वाद आटा गहुच्या दाण्याला कृतज्ञतेची वंदना अर्पण करून साजरा करत आहे गणेशोत्सव

ब्रँडने “गहू गहू आहे विशेष, प्रत्येक गव्हामध्ये आहे गणेश” हा नवा उपक्रम सुरू केला आहे - उत्सवाची भावना आणि परंपरा यांचा संगम साधणारा असा हा पहिल्यांदाच राबवलेला उपक्रम. मुंबई। आयटीसीच्या आशीर्वाद आटाने मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेश मंडपांपैकी एक “अंधेरीचा राजा” येथे आपला एक अनोखा उत्सवी उपक्रम सादर केला आहे. “गहू गहू आहे विशेष, प्रत्येक गव्हामध्ये आहे गणेश” या विशेष मोहिमेद्वारे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे आशीर्वादने शुद्धता आणि भक्तीभावाला हृदयस्पर्शी वंदन करत, एक दिव्य आश्चर्य उघडले आहे — शुद्ध गव्हाच्या एका दाण्यावर कोरलेली श्रीगणेशांची प्रतिमा. दोन दशकांहून अधिक काळ आशीर्वाद हे भारतातील सर्वात विश्वासार्ह आटा ब्रँड म्हणून घराघरात पोहोचले आहे आणि उत्तम दर्जाचा गहू पुरवला आहे. हा उपक्रम ब्रँडच्या शुद्धता आणि गुणवत्तेप्रती असलेल्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. या मोहिमेचे मुख्य आकर्षण आहे गणेशा क्रिएशन झोन — जिथे गव्हाच्या शुद्धतेला एक भक्तिपूर्ण अनुभवाच्या रूपाने साकारले आहे. येथे भक्तांना स्वतःच्या कल्पनेप्रमाणे श्रीगणेशांची कलाकृती तयार करण्यासाठी आमं...

मोहन नायर यांच्या 'भास्मंचल' या नाटकाचे अभिनंदन करण्यासाठी पोहोचले बॉलीवूडचे दिलीप सेन, अभिनेत्री माही शर्मा आणि शिवाजी शेंडगे

मुंबई। अलिकडेच सामाजिक कार्यकर्ते आणि महाराणी संघटनेचे संस्थापक मोहन नायर यांनी नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे 'भास्मंचल' हे नाटक सादर केले. 'भास्मंचल' हे नाटक सध्या मुले त्यांच्या पालकांशी कसे वागतात यावर लक्ष केंद्रित करते. या नाटकाच्या माध्यमातून तरुणांमध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाटकाच्या सादरीकरणाप्रसंगी बॉलीवूड संगीतकार दिलीप सेन, अभिनेत्री माही शर्मा (कुमकुम भाग्य आणि पृथ्वीराज चौहान शो फेम), शिवाजी अग्यान शेंडगे, शिवसेना शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, सामाजिक कार्यकर्ते के रविदादा तसेच सामाजिक कार्यकर्त्या सिमी नायर यांच्यासह अनेक विशेष पाहुणे उपस्थित होते. नाटकाची संकल्पना मोहन नायर यांची आहे आणि त्यांनी पटकथा लिहिली आहे आणि दिग्दर्शक हर्षल राणे आहेत. मोहन नायर म्हणाले की पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी देशाबाहेर पाठवतात, त्यामुळे त्यांची संस्कृती बदलते. मुले विलासी जीवनात हरवून जातात. त्यांच्या पालकांबद्दलच्या भावना शून्य होतात आणि शेवटी त्यांना वृद्धाश्रमात पाठवले ज...