सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘कापडिया हॉस्पिटल’ची ‘मिस्सो' प्रणालीसह अस्थिरोग शस्त्रक्रियेत क्रांती

मुंबई। कापडिया हॉस्पिटल’ने गुढघा बदल शस्त्रक्रियेसाठी भारतात रचना झालेली मिस्सो (एमआयएसएसओ) ही प्रगत रोबोटिक प्रणाली स्थापित करुन आपल्या अस्थिरोग शुश्रूषा अधिक उत्तम बनवली आहे. मुंबईत प्रथमच स्थापित झालेल्या या मिस्सो प्रणालीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रिया नैपुण्य यांचा संगम असून त्यामुळे शस्त्रक्रियेत उच्च अचूकता येते, रुग्ण जलद बरा होतो आणि लोकांना दर्जेदार आरोग्यसुरक्षा मोठ्या प्रमाणात प्राप्त करता येते.

पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलेली ‘मिस्सो’ प्रणालीची कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चलित अचूकता व किमान छेदन दृष्टीकोनामुळे रुग्ण जलद बरे होण्यास तसेच शस्त्रक्रियांची सुधारित फलिते मिळण्यास मदत होते. केंद्रीय उद्योग व पुरवठा मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते सादर झालेल्या मिस्सो प्रणालीने रोबोटिक सांधेबदलात गुणवत्तेचा नवा मापदंड स्थापित केला आहे.

‘मिस्सो’ची रचना व निर्मिती भारतात झाली असून त्यात शस्त्रक्रियांचे त्रिमित मापन (थ्री डी मॅपिंग) करण्यासाठी प्रगत संगणन (ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) व तत्काळ माहितीसाठा (रिअल-टाइम डाटा) यांचा वापर केला जातो ज्यामुळे शल्यविशारदांना अचूक छेद घेण्यास व रोपण करण्यास मार्गदर्शन होते. प्रणालीतील सिक्स-जॉइंट रोबोटिक आर्म, ट्रॅकिंग कॅमेरा व सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे तत्काळ सुधारणा करता येतात आणि सांध्यांची स्थिर व नैसर्गिक हालचाल साध्य होते. किमान छेदन (मिनीमल इन्व्हेजन) दृष्टीकोनामुळे उतिंचे (टिश्यू) नुकसान, रक्तस्त्राव व बरे होण्याचा कालावधी कमी होतो आणि रुग्णांना वेगाने दैनंदिन जीवन सुरळित जगण्यास मदत होते. आत्मनिर्भर भारत धोरणाशी संलग्न असलेली मिस्सो प्रणाली वैद्यकीय तंत्रज्ञानातील भारताच्या अभिनवतेचे प्रतिक असून त्यामुळे जागतिक दर्जाच्या रोबोटिक शस्त्रक्रिया लोकांपर्यंत अधिक प्रमाणात पोचू शकतील.

‘कापडिया हॉस्पिटल’चे रोबोटिक नी अँड शोल्डर सर्जन डॉ. राहुल मोदी म्हणाले, “मिस्सो प्रणालीने अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व शस्त्रक्रिया नैपुण्याचा संगम घडवून भारतातील अस्थिरोग शस्त्रक्रियांची नवी व्याख्या रचली आहे. या स्वदेशी रोबोटिक प्रणालीमुळे अचूकता प्राप्त होते, रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी होतो, शस्त्रक्रियेची फलिते सुधारतात आणि रुग्णांना खूप आराम मिळून पुन्हा हालचाल करणे जलद शक्य होते. वैद्यकीय तंत्रज्ञानातील या क्रांतीमुळे रुग्ण शुश्रूषेच्या गुणवत्तेचा मापदंड उंचावला गेला आहे व अत्याधुनिक अस्थिरोग उपचार अधिक प्रभावी व अधिक लोकांपर्यंत पोचणारे झाले आहेत.”

‘कापडिया हॉस्पिटल’चे संस्थापक, मालक व कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. राजन मोदी म्हणाले, “मिस्सो प्रणालीच्या बहुगुणांमुळे ती आगळी ठरते आणि आम्हाला विविध अस्थिरोग शस्त्रक्रिया अत्यंत अचूकतेने करणे शक्य होते. पारंपरिक रोबोटिक प्रणालींच्या तुलनेत मिस्सो प्रणाली शस्त्रक्रिया कार्यप्रवाहांचे सुसूत्रीकरण करते व विविध प्लॅटफॉर्म वापरण्याची गरज न उरता रुग्णालय साधनसंपत्तीचा कुशल वापर घडवते. डेकेअर नी रिप्लेसमेंट सर्जरींचा समावेश केल्याने रुग्ण लवकर बरे होणे, उच्च कार्य़क्षमता, सुधारित संपर्क, रुग्ण शुश्रूषा दर्जाचे नवे मापदंड यासारखी वैशिष्ट्ये आता आम्ही देऊ शकतो.”

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रीपाद नाईक यांनी ECAMEX 2026 चे उद्घाटन केले; अक्षय ऊर्जेचा वाढता वाटा, सौर ऊर्जेचा प्रसार आणि मेक इन इंडिया संधींवर भर

मुंबई। भारत सरकारचे नवीन व अक्षय ऊर्जा तसेच वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोरेगाव येथील BEC येथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ECAM) च्या 101 वर्षपूर्ती निमित्त आयोजित भारतातील मेगा इलेक्ट्रिकल व ऊर्जा प्रदर्शन ECAMEX 2026 चे उद्घाटन केले. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की भारताच्या वाढत्या ऊर्जा मागणीची शाश्वत पूर्तता करण्यासाठी अक्षय ऊर्जेतून होणाऱ्या वीज निर्मितीचा टक्का लक्षणीयरीत्या वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की अक्षय ऊर्जा क्षेत्र उद्योग, नवोन्मेष आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देत असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळकटी देते. मंत्र्यांनी पुढे सांगितले की मेक इन इंडिया उपक्रमामुळे सौर उपकरणे, इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत उत्पादनासाठी मजबूत संधी निर्माण होत आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी उद्योगांनी स्वदेशी उत्पादन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासात गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केल...

दादर जैन ज्ञान मंदिरात श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला

मुंबई। राजा सिद्धार्थ यांचे वंशज आणि माता त्रिशला यांचे पुत्र, परम कृपाळू भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जयंतीनिमित्त या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, श्री आत्म कमल लब्धी सुरीश्वरजी जैन ज्ञान मंदिर आणि जिन रक्षा इंटरनॅशनल ग्रुप यांनी केले होते. शासन प्रदीप परम पूज्य आचार्य भगवंत श्री विजय प्रदीप चंद्र सुरीश्वरजी महाराज साहिब यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली, भगवान महावीर स्वामींच्या जन्म कल्याणकाचे एक सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन सादर करण्यात आले. आज जागतिक तापमानवाढ असो वा दहशतवाद, भगवान महावीरांची केवळ दोन तत्त्वे जगाला वाचवू शकतात: • अपरिग्रह: निसर्गाचे शोषण थांबवा, केवळ गरजेपुरतेच वापरा. शाळेतील सर्व पंडित, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संजयभाई शाह, अशोकभाई चरला, महिला विभागाच्या उपाध्यक्षा अल्पाबेन संजय शाह आणि संदीप दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी, ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त सा...

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा – खऱ्या फळांचा स्वाद, कोणतीही अतिरिक्त साखर नाही आणि कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत • साखरयुक्त पेये आणि कोल्ड ड्रिंक्सला एक आरोग्यदायी पर्याय – नाश्ता, मधल्या वेळचा स्नॅक आणि इतर वेळांसाठी योग्य • नैसर्गिक पोषण, हायड्रेशन आणि अतिरिक्त साखर टाळू इच्छिणाऱ्या आरोग्य-जागरूक ग्राहकांसाठी उत्तम पेय मुंबई। भारताची अग्रगण्य नैसर्गिक आरोग्य व आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडचा लोकप्रिय पॅकेज्ड फळ रस ब्रँड ‘रियल’ आपल्या सजग पोषणाच्या बांधिलकीला अधिक बळकट करत ‘रियल अ‍ॅक्टिव्ह’ फळ रस सादर करत आहे — कोणतीही अतिरिक्त साखर नसलेला, चविष्ट आणि ताजेतवाने फळ रसांचा हा विशेष श्रेणी आहे. आजच्या काळात ग्राहक अधिक आरोग्यदायी जीवनशैलीच्या पर्यायांकडे वळत असताना, रियल अ‍ॅक्टिव्ह भारतात हायड्रेशनची नवी व्याख्या करत आहे. अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हशिवाय, रियल अ‍ॅक्टिव्ह खऱ्या फळांचे नैसर्गिक गुणधर्म देतो. त्यामुळे हा उन्हाळ्यात दिवसभरासाठी एक उत्तम साथीदार ठरतो — पौष्टिक नाश्त्यापासून ते मधल्या वेळच्या स्नॅकपर्यंत. “उन्हाळ्य...