सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘कापडिया हॉस्पिटल’ची ‘मिस्सो' प्रणालीसह अस्थिरोग शस्त्रक्रियेत क्रांती

मुंबई। कापडिया हॉस्पिटल’ने गुढघा बदल शस्त्रक्रियेसाठी भारतात रचना झालेली मिस्सो (एमआयएसएसओ) ही प्रगत रोबोटिक प्रणाली स्थापित करुन आपल्या अस्थिरोग शुश्रूषा अधिक उत्तम बनवली आहे. मुंबईत प्रथमच स्थापित झालेल्या या मिस्सो प्रणालीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रिया नैपुण्य यांचा संगम असून त्यामुळे शस्त्रक्रियेत उच्च अचूकता येते, रुग्ण जलद बरा होतो आणि लोकांना दर्जेदार आरोग्यसुरक्षा मोठ्या प्रमाणात प्राप्त करता येते.

पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलेली ‘मिस्सो’ प्रणालीची कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चलित अचूकता व किमान छेदन दृष्टीकोनामुळे रुग्ण जलद बरे होण्यास तसेच शस्त्रक्रियांची सुधारित फलिते मिळण्यास मदत होते. केंद्रीय उद्योग व पुरवठा मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते सादर झालेल्या मिस्सो प्रणालीने रोबोटिक सांधेबदलात गुणवत्तेचा नवा मापदंड स्थापित केला आहे.

‘मिस्सो’ची रचना व निर्मिती भारतात झाली असून त्यात शस्त्रक्रियांचे त्रिमित मापन (थ्री डी मॅपिंग) करण्यासाठी प्रगत संगणन (ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) व तत्काळ माहितीसाठा (रिअल-टाइम डाटा) यांचा वापर केला जातो ज्यामुळे शल्यविशारदांना अचूक छेद घेण्यास व रोपण करण्यास मार्गदर्शन होते. प्रणालीतील सिक्स-जॉइंट रोबोटिक आर्म, ट्रॅकिंग कॅमेरा व सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे तत्काळ सुधारणा करता येतात आणि सांध्यांची स्थिर व नैसर्गिक हालचाल साध्य होते. किमान छेदन (मिनीमल इन्व्हेजन) दृष्टीकोनामुळे उतिंचे (टिश्यू) नुकसान, रक्तस्त्राव व बरे होण्याचा कालावधी कमी होतो आणि रुग्णांना वेगाने दैनंदिन जीवन सुरळित जगण्यास मदत होते. आत्मनिर्भर भारत धोरणाशी संलग्न असलेली मिस्सो प्रणाली वैद्यकीय तंत्रज्ञानातील भारताच्या अभिनवतेचे प्रतिक असून त्यामुळे जागतिक दर्जाच्या रोबोटिक शस्त्रक्रिया लोकांपर्यंत अधिक प्रमाणात पोचू शकतील.

‘कापडिया हॉस्पिटल’चे रोबोटिक नी अँड शोल्डर सर्जन डॉ. राहुल मोदी म्हणाले, “मिस्सो प्रणालीने अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व शस्त्रक्रिया नैपुण्याचा संगम घडवून भारतातील अस्थिरोग शस्त्रक्रियांची नवी व्याख्या रचली आहे. या स्वदेशी रोबोटिक प्रणालीमुळे अचूकता प्राप्त होते, रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी होतो, शस्त्रक्रियेची फलिते सुधारतात आणि रुग्णांना खूप आराम मिळून पुन्हा हालचाल करणे जलद शक्य होते. वैद्यकीय तंत्रज्ञानातील या क्रांतीमुळे रुग्ण शुश्रूषेच्या गुणवत्तेचा मापदंड उंचावला गेला आहे व अत्याधुनिक अस्थिरोग उपचार अधिक प्रभावी व अधिक लोकांपर्यंत पोचणारे झाले आहेत.”

‘कापडिया हॉस्पिटल’चे संस्थापक, मालक व कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. राजन मोदी म्हणाले, “मिस्सो प्रणालीच्या बहुगुणांमुळे ती आगळी ठरते आणि आम्हाला विविध अस्थिरोग शस्त्रक्रिया अत्यंत अचूकतेने करणे शक्य होते. पारंपरिक रोबोटिक प्रणालींच्या तुलनेत मिस्सो प्रणाली शस्त्रक्रिया कार्यप्रवाहांचे सुसूत्रीकरण करते व विविध प्लॅटफॉर्म वापरण्याची गरज न उरता रुग्णालय साधनसंपत्तीचा कुशल वापर घडवते. डेकेअर नी रिप्लेसमेंट सर्जरींचा समावेश केल्याने रुग्ण लवकर बरे होणे, उच्च कार्य़क्षमता, सुधारित संपर्क, रुग्ण शुश्रूषा दर्जाचे नवे मापदंड यासारखी वैशिष्ट्ये आता आम्ही देऊ शकतो.”

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एहसान खान, नाफे खान अभिनीत आणि रझूल आलम दिग्दर्शित "गरम माहौल" चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर लाँच

मुंबई। बॉलीवूड दिग्दर्शक रझूल आलम यांच्या हिंदी चित्रपट "गरम माहौल" चे पोस्टर आणि ट्रेलर मुंबईतील इम्पा थिएटरमध्ये एहसान खान, गायिका दीपा नारायण झा, अभिनेते नाफे खान आणि शब्बीर शेख यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. पोस्टर लाँचनंतर, चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी देखील दाखवण्यात आली. लिटिल स्टेप आर्ट्स (एलएसए) निर्मित, या चित्रपटाची सह-निर्मिती विक्रांत वाधवा आणि राहुल जाटव यांनी केली आहे. "गरम माहौल" च्या कलाकारांमध्ये एहसान खान, नाफे खान, बबिता चौधरी, पूजा दत्ता, विक्रांत वाधवा, नरेंद्र, अमित श्रीवास्तव आणि राहुल जाटव यांचा समावेश आहे. लिटिल स्टेप आर्ट्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लाइन प्रोड्यूसर रवी प्रकाश भारद्वाज हे संगीत दिग्दर्शक आहेत. संगीत राज सेन आणि इक्बाल सरगम ​​यांनी दिले आहे. गायकांमध्ये अलका याज्ञिक, दीपा नारायण झा, रितू पाठक आणि पी.के. यांचा समावेश आहे. चित्रपटाचे डीओपी विजय मिश्रा आहेत, लेखक राकेश कुमार आहेत आणि कार्यकारी निर्माता सतीश कुमार आहेत. एहसान खान म्हणाला, "मी राजुल आलमसोबत याआधी खूप काम केले आहे. या चित...

आकाश इन्स्टिट्यूट मुंबईने जेईई मेन २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली; साहिल प्रधानने ९९.९९ टक्के गुण मिळवले

उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीमुळे मुंबई आणि आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ला अभिमान आहे   मुंबई: आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) मुंबईतील विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२६ (सत्र १) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पुन्हा एकदा या प्रदेशाची सतत शैक्षणिक उत्कृष्टता दाखवून दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने १६ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या निकालांनुसार, बोरिवली शाखेतील साहिल प्रधान या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के गुणांसह मुंबईत अव्वल स्थान पटकावले. उत्कृष्ट कामगिरीच्या या मालिकेत, बोरिवली शाखेतील जीत व्होराने १ वर्षाच्या क्लासरूम प्रोग्राममध्ये ९९.८७ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. ध्वज जैन यांनी ९९.७९ टक्के आणि शिव तिवारी यांनी ९९.४५ टक्के गुण मिळवून शाखेच्या प्रभावी शैक्षणिक निकालांना आणखी बळकटी दिली. विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल भाष्य करताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख डॉ. एच.आर. राव म्हणाले, "मुंबईतील आमच्या विद्यार्थ्यांचे अपवादात्मक निकाल त्यांच्या शैक्षणिक वचनबद्धतेचे आणि आकाश येथी...

राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 पुण्यात यशस्वीरीत्या संपन्न

पुणे। देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी भोसरी, पुणे येथे अत्यंत दिमाखदार व गौरवपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन देविदास ग्रुप बिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट तर्फे करण्यात आले होते. आपल्या व्यवसायातून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय आणि प्रभावी भूमिका बजावणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये Le-Vanshi Group Of Company चे Founder, Business Tycoon Author Kuntal Arora, Mrs. Simran Kuntal Arora, तसेच Riyansh Solar Power Plus Pvt. Ltd. चे Founder Mr. Umesh Bhardwaj यांचे विशेष सहकार्य व भक्कम समर्थन लाभले. त्यांच्या दूरदृष्टी, सकारात्मक नेतृत्व आणि सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य व प्रभावी ठरला. या विशेष प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उल्लाल तसेच प्रख्यात अभिनेते शहबाज खान प्रमुख पाहुणे म्...