सीधे मुख्य सामग्री पर जाएं

'टाटा टी जागो रे' चे पर्यावरण जागरूकते साठी एआय अभियान

हवामानातील बदला-बद्दल जागरूकतेसाठी 'टाटा टी जागो रे' वचनबद्ध आहे

मुंबई : टाटा टी जागो रे सादर करत आहे नवीन मोहीम आणि यावेळी हा ब्रँड हवामानातील बदलाविरुद्धच्या सुरू असलेल्या लढ्यात योगदान देत आहे. 'प्रत्येक ग्रीन अॅक्शनने फरक पडेल' ही मोहीम एआय-संचालित आहे आणि लोकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात लहान पण अर्थपूर्ण गोष्टी करण्यास प्रेरित करण्याचा उद्देश आहे, जेणेकरून एकत्रितपणे पर्यावरणावर अधिक सकारात्मक प्रभाव पाडू शकतील. ‘टाटा टी जागो रे’ आपल्या काळातील सर्वात मोठ्या संकटाबद्दल - हवामानातील बदलाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी वचनबद्ध आहे आणि ही मोहीम त्यालाच पुन्हा एकदा पुष्टी देते, तसेच सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी ग्राहकांना जागृत करण्यासाठी उत्प्रेरक बनण्याच्या ब्रँडच्या उद्दिष्टाला पुढे नेते.

हवामानातील बदलाविरुद्ध पावले उचलण्यात रस नसणे, त्याविषयी चिंता न वाटणे किंवा कृती करण्याची प्रेरणा नसणे, ही सर्वात मोठी आव्हाने आहेत ज्यामुळे ही समस्या सोडवणे कठीण होते. या समस्येचे गांभीर्य माहिती असूनही, लोक त्यावर कृती करण्याचा प्रयत्न करत नाहीत. अनेकदा असे मानले जाते आणि म्हटले जाते की एका व्यक्तीने काही केल्याने फारसा फरक पडणार नाही. 'जागो रे' अभियानाचा प्रभाव आणखी वाढवण्यासाठी, ग्राहकांनी केलेल्या प्रत्येक १० ग्रीन ऍक्शन्ससाठी, टाटा टी एक झाड लावण्यास वचनबद्ध आहे.

या मोहिमेत, 'टाटा टी जागो रे'ने त्यांच्या मायक्रोसाइट www.JaagoRe.com वर एक नाविन्यपूर्ण एआय-संचालित व्हॉट्सअॅप आधारित टूल आणले आहे. गुगलच्या जेमिनीसह तयार केलेले, हे टूल ग्राहकांना 'ग्रीन अॅक्शन्स'चा सकारात्मक परिणाम पाहण्यास सक्षम बनवते, जसे की, स्वयंपाक करताना भांड्यावर झाकण ठेवणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, एअर कंडिशनरचे तापमान व्यवस्थापित करणे आणि आंघोळ करताना शॉवरऐवजी बादली वापरणे इत्यादी दैनंदिन कामे. ग्राहक आता टाटा टी जागो रे चॅट टूल वापरून या ग्रीन ऍक्शन करतानाचे फोटो अपलोड करू शकतात. हे एआय टूल ग्रीन ऍक्शन ओळखण्यासाठी प्रगत इमेज रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करते आणि व्यक्तींना त्यांच्या प्रयत्नांचा पर्यावरणावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांबद्दल माहिती देते. यामुळे लोकांना खात्री मिळते की त्यांचे काम अर्थपूर्ण आहे आणि हवामान बदलाशी लढ्यामध्ये ते योगदान देत आहेत.

मुलेन लिंटास यांची संकल्पना असलेल्या फिल्ममध्ये हा संदेश अतिशय प्रभावीपणे देण्यात आला आहे. या फिल्ममध्ये पर्यावरणावर एकत्रितपणे सकारात्मक परिणाम करणाऱ्या दैनंदिन कृतींचे चित्रण केले आहे. फिल्मची सुरुवात होते एक महिला आणि पुरुष पर्यावरणाच्या सद्यस्थितीबद्दल चर्चा करत आहेत, येथे आपल्याला दिसतो एक मथळा जो कमी होत चाललेल्या ग्रीन कव्हरबद्दल भाष्य करतो. एकीकडे मोठ्या व्यक्तींना शंका वाटते पण, मुले मात्र छोट्या-छोट्या कृती रोजच्या रोज करून हवामानातील बदलांविरुद्ध लढाईचे नेतृत्व करत आहेत, जसे की, शॉवरऐवजी बादली वापरणे आणि भांड्यांमध्ये पदार्थ उकळत असताना त्यावर झाकण ठेवणे इत्यादी. मुलांच्या कोरस गायनातून, पर्यावरणासाठी लहान, सामूहिक कृतींचा संदेश मनावर ठसतो, जेव्हा प्रत्येकजण योगदान देतो तेव्हा अर्थपूर्ण बदल साध्य करता येतो यावर भर दिला जातो.

पुनीत दास, अध्यक्ष-पॅकेज्ड बेव्हरेजेस (भारत आणि दक्षिण आशिया), टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स म्हणाले,“टाटा टी जागो रे नेहमीच वर्तमान काळातील महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांवर समाजाची सामूहिक जाणीव वाढवण्यावर विश्वास ठेवत आले आहे. पृथ्वीचे भविष्य अबाधित राखसाठी हवामान बदलाविरुद्ध लढण्याची गरज आज सर्वात मोठी आहे. हवामान बदलाच्या आव्हानांविरुद्धच्या लढाईत, आपण अनेकदा सामूहिक कृतींच्या शक्तीच्या प्रभावाला कमी लेखतो. टाटा टी जागो रेचा हा नवीन उपक्रम सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. रोजच्या रोज लहान कृतींमुळे किती अर्थपूर्ण फरक पडू शकतो हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. गुगल क्लाउडच्या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून हे अभियान तयार करण्यात आले आहे. आम्ही ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी आणि त्यांच्याशी आमचे संबंध अधिक सखोल करण्यासाठी एआयचा वापर करत आहोत. या उपक्रमाद्वारे, आम्हाला आशा आहे की, चांगल्या भविष्यासाठी अर्थपूर्ण बदल घडवून आणता येतील आणि लोकांकडून सामूहिक कृतीची शक्ती अनलॉक करता येईल, कारण ‘जर आपण सर्वांनी एक-एक करून कृती केली, तर फरक पडेल.'"

बिक्रम सिंग बेदी, व्हाईस चेयरमन-कंट्री एमडी, गुगल क्लाउड इंडिया म्हणाले,“युजर्सनी सबमिट केलेल्या कृतींची पडताळणी करण्याचे आव्हान दूर करण्यासाठी जेमिनीच्या प्रगत इमेज रेकग्निशन क्षमतांचा वापर करून टाटा टी जागो रे च्या नवीन अभियानामध्ये सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. या कृतींचे रिअल-टाइममध्ये विश्लेषण केले जाते आणि युजर्सना नैसर्गिक भाषेत त्वरित अभिप्राय आणि प्रमाणीकरण दिले जाते. हे जबाबदारी आणि कामगिरीची भावना दोन्हीला प्रोत्साहन देते. हे प्रभावी सोल्युशन वैयक्तिक परिणामांचे मापन करण्यास मदत करते, युजर्सच्या कृतींना मूर्त पर्यावरणीय लाभामध्ये रूपांतरित करते.”

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

झी-लाइव्हतर्फे ‘मराठी वाजलंच पाहिजे’

मराठी तरुणाई स्ट्रीट-आर्टमधील गुणवत्तेसह महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं दर्शन घडवणार मुंबई। झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेस लिमिटेड (झी) या भारतातील कंटेंट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने त्यांच्या नव्या प्रायोगिक टप्प्याच्या पहिल्या अध्यायाची झी लाइव्हची घोषणा केली. त्याअंतर्गत वर्ल्ड ऑफ वाइब्ज या टॅलेट कंपनीच्या सहकार्याने मराठी वाजलंच पाहिजे (एमपीव्ही) हा पहिला प्रमुख कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी फिनिक्स मार्केट सिटी, पुणे येथे होणार असलेला एमपीव्ही हा केवळ एक लाइव्ह कॉन्सर्ट नाही, तर ती एक सांस्कृतिक चळवळ आहे. त्यामधे मराठी तरुणाई संस्कृतीचं प्रतिबिंब झळकणार असून हिप-हॉप, इंडी म्युझिक, स्ट्रीट आर्टमधील नव्या गुणवत्तेसह महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं दर्शन घडवलं जाणार आहे. क्रॅटेक्स, संजू राठोड, श्रेयस अँड वेदांग, एमसी गावठी आणि पट्या द डॉक अशा ४०+ कलाकारांचा समावेश असलेलं हे फेस्टिवल धमाल उर्जेसह आजच्या तरुणाईची अस्सल आणि लोकल गोष्ट सांगणार आहे. एमपीव्ही हा असा मंच आहे, जिथं परंपरा आणि आधुनिक अभिव्यक्तीचा संगम होईल आणि आजच्या क्रिएटर्सच्या सूर, ...

भावना शर्मा जैन यांनी वायव्य मुंबई जिल्हा काँग्रेसची जबाबदारी स्वीकारली

मुंबई। ऑल इंडिया कांग्रेस कमेटी सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केलेल्या पदांच्या यादीनुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील संघटना निर्मिती उपक्रमांतर्गत, ऑल इंडिया कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, काँग्रेसच्या दिग्गज नेत्या भावना शर्मा जैन यांना वायव्य जिल्हा अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मजबूत तरुण महिला चेहरा म्हणून त्यांची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. माजी खासदार गुरदास कामत यांच्या जवळच्या सहकारी जैन यांची त्यांच्याच लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने हे स्पष्ट होते की काँग्रेसने त्यांना काळजीपूर्वक विचार करून ही जबाबदारी दिली आहे. भावना शर्मा जैन यांनी या जबाबदारीबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मुंबई प्रभारी चेनी थल्ला आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांचे आभार मानले. तिने सांगितले की ती तिच्या सर्व शक्ती, निष्ठा आणि समर्पणाने काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्य...

एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडिया अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक वेलनेस प्रोग्राम यांच्यासह मुंबईतील आयव्हीएफ क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार

उद्योगातील आघाडीच्या फर्टिलिटी शृंखलेने लाइव्ह योग सत्रे, तज्ञांचे वेबिनार आणि निवडक रुग्णांसाठी तिच्या अत्याधुनिक एम्ब्रयोलॉजी प्रयोगशाळेच्या फिजिकल टूर्स यांच्यासह अनोखा, विनामूल्य-ॲक्सेस डिजिटल अनुभव उपलब्ध करवून दिला आहे मुंबई। देशातील आघाडीची आयव्हीएफ आणि फर्टिलिटी उपचार संस्था, एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडियाने एका नवीन वेबसाइटसह फ्री-टू-ऍक्सेस फिजिटल अनुभवांचा एक अभिनव संच लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. आयव्हीएफ आणि फर्टिलिटी उपचारांच्या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर भावी पालकांना मदत करण्यासाठी प्रत्यक्ष आणि डिजिटल अनुभवांचे संयोजन करून, आपल्या देशात प्रजनन देखभाल क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी हे व्यापक व्यासपीठ डिझाइन केले आहे. या क्लिनिकमध्ये दर शनिवारी निवडक जोडप्यांसाठी मोफत प्रयोगशाळा भेटी आयोजित केल्या जातात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्यातील गर्भांचे संरक्षण करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम श्रेणीतील प्रक्रिया समोरासमोर पाहता येतात. गर्भ ट्रॅकिंग आणि आयडेंटिफिकेशन क्लिनिकच्या आरआय विटनेस टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशान...