सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मुंबईत फेडएक्सची इलेक्ट्रिक वाहनांद्वारे डिलिव्हरी सेवा

मुंबई। फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (“फेडएक्स”) ही जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस ट्रान्सपोर्ट कंपनी मुंबईत लास्ट-माइल डिलिव्हरीसाठी अतिरिक्त इलेक्ट्रिक वाहने (इव्ही) तैनात करून भारतात शाश्वत लॉजिस्टिक्सचे प्रमाण वाढवत आहे. अलीकडेच मुंबईत दाखल केलेल्या १३ टाटा एस इव्हीसह दिल्ली, बंगळूर सहितच्या प्रमुख भारतीय शहरांत कंपनीसाठी कार्यरत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची एकूण संख्या ५९ वर पोहोचली आहे. हे प्रयत्न २०४० पर्यंत जागतिक स्तरावर कार्बन-न्यूट्रल ऑपरेशन्स साध्य करण्याच्या फेडएक्सच्या लक्ष्याशी सुसंगत आहेत. तसेच जगभरात अधिक शाश्वत पुरवठा साखळी सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

शाश्वतता आणि ब्रॅंड सिनर्जीची सांगड घालण्याच्या प्रयत्नात फेडएक्सने मुंबई, दिल्ली आणि बंगळूर मध्ये फेडएक्स-सीएसके को-ब्रॅंडेड इव्ही सुरू केल्या आहेत आणि जबाबदारीपूर्वक वस्तू पोहोचवण्याची आपली वचनबद्धता बळकट केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अधिकृत पार्टनर म्हणून हा उपक्रम वेग, नेमकेपणा आणि उत्कृष्टता या गुणांवर उभ्या असलेल्या दोन ब्रॅंडमधील दमदार संगतीचे प्रतिनिधित्व करतो. ही को-ब्रॅंडेड वाहने भारतातील कंपनीची उपस्थिती वाढवतात आणि मार्केटमधील त्यांची सध्या असलेली गुंतवणूक अधिक मजबूत करतात.

फेडएक्सच्या इंडिया ऑपरेशन्स आणि प्लॅनिंग आणि इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष सुवेंदू चौधरी म्हणाले, “फेडएक्स ही पहिली जागतिक डिलिव्हरी कंपनी होती, जिने २००३ मध्ये हायब्रिड इलेक्ट्रिक वाहने दाखल केली होती, तर बॅटरी-संचालित वाहनांचा आमचा प्रवास तर त्याही आधी १९९४ मध्ये सुरू झाला होता. हीच परंपरा पुढे नेत कार्बन उत्सर्जन कमी करण्यात आणि भारतात शाश्वत लॉजिस्टिक्सला चालना देण्यात भूमिका बजावताना आम्हाला अभिमान वाटत आहे. टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याच्या आमच्या व्यावहारिक दृष्टिकोनासह आमच्या ग्राहकांना सेवा प्रदान करत असतानाच कार्बन उत्सर्जन कमीत कमी करण्याची काळजी आम्ही घेत आहोत.”

इलेक्ट्रिक वाहने स्मार्ट, स्वच्छ आणि कार्यक्षम सोल्यूशन्स प्रदान करून लॉजिस्टिक्स क्षेत्रात क्रांती घडवत आहेत. कार्बन उत्सर्जन आणि हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या पलीकडे जाऊन ही वाहने शाश्वत व्यावसायिक पद्धतींसाठी उपभोक्त्यांची वाढती पसंती मिळवत आहेत. शाश्वततेसाठीच्या उपभोक्त्यांच्या अपेक्षा वाढत आहेत. फेडएक्सने केलेल्या एका संशोधना त असे दिसून आले आहे की, ९०% भारतीय उपभोक्ते अशा व्यवसायांना प्राथमिकता देत आहेत, ज्या व्यवसायांत शाश्वत पद्धतींना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे इव्हीचा अंगिकार करण्यात एक धोरणात्मक फायदा देखील दडलेला आहे. आपल्या इव्ही वाहनांचा ताफा वाढवण्याचे धोरण चालू ठेवून फेडएक्स अशा स्मार्ट, जबाबदार लॉजिस्टिक्स सोल्यूशन्सना चालना देत आहे, जी सोल्यूशन्स भारतातील पुरवठा साखळीच्या बदलत्या गरजा भागवताना पर्यावरणावर कमीत कमी प्रभाव करतात.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रीपाद नाईक यांनी ECAMEX 2026 चे उद्घाटन केले; अक्षय ऊर्जेचा वाढता वाटा, सौर ऊर्जेचा प्रसार आणि मेक इन इंडिया संधींवर भर

मुंबई। भारत सरकारचे नवीन व अक्षय ऊर्जा तसेच वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोरेगाव येथील BEC येथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ECAM) च्या 101 वर्षपूर्ती निमित्त आयोजित भारतातील मेगा इलेक्ट्रिकल व ऊर्जा प्रदर्शन ECAMEX 2026 चे उद्घाटन केले. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की भारताच्या वाढत्या ऊर्जा मागणीची शाश्वत पूर्तता करण्यासाठी अक्षय ऊर्जेतून होणाऱ्या वीज निर्मितीचा टक्का लक्षणीयरीत्या वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की अक्षय ऊर्जा क्षेत्र उद्योग, नवोन्मेष आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देत असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळकटी देते. मंत्र्यांनी पुढे सांगितले की मेक इन इंडिया उपक्रमामुळे सौर उपकरणे, इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत उत्पादनासाठी मजबूत संधी निर्माण होत आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी उद्योगांनी स्वदेशी उत्पादन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासात गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केल...

दादर जैन ज्ञान मंदिरात श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला

मुंबई। राजा सिद्धार्थ यांचे वंशज आणि माता त्रिशला यांचे पुत्र, परम कृपाळू भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जयंतीनिमित्त या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, श्री आत्म कमल लब्धी सुरीश्वरजी जैन ज्ञान मंदिर आणि जिन रक्षा इंटरनॅशनल ग्रुप यांनी केले होते. शासन प्रदीप परम पूज्य आचार्य भगवंत श्री विजय प्रदीप चंद्र सुरीश्वरजी महाराज साहिब यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली, भगवान महावीर स्वामींच्या जन्म कल्याणकाचे एक सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन सादर करण्यात आले. आज जागतिक तापमानवाढ असो वा दहशतवाद, भगवान महावीरांची केवळ दोन तत्त्वे जगाला वाचवू शकतात: • अपरिग्रह: निसर्गाचे शोषण थांबवा, केवळ गरजेपुरतेच वापरा. शाळेतील सर्व पंडित, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संजयभाई शाह, अशोकभाई चरला, महिला विभागाच्या उपाध्यक्षा अल्पाबेन संजय शाह आणि संदीप दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी, ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त सा...

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा – खऱ्या फळांचा स्वाद, कोणतीही अतिरिक्त साखर नाही आणि कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत • साखरयुक्त पेये आणि कोल्ड ड्रिंक्सला एक आरोग्यदायी पर्याय – नाश्ता, मधल्या वेळचा स्नॅक आणि इतर वेळांसाठी योग्य • नैसर्गिक पोषण, हायड्रेशन आणि अतिरिक्त साखर टाळू इच्छिणाऱ्या आरोग्य-जागरूक ग्राहकांसाठी उत्तम पेय मुंबई। भारताची अग्रगण्य नैसर्गिक आरोग्य व आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडचा लोकप्रिय पॅकेज्ड फळ रस ब्रँड ‘रियल’ आपल्या सजग पोषणाच्या बांधिलकीला अधिक बळकट करत ‘रियल अ‍ॅक्टिव्ह’ फळ रस सादर करत आहे — कोणतीही अतिरिक्त साखर नसलेला, चविष्ट आणि ताजेतवाने फळ रसांचा हा विशेष श्रेणी आहे. आजच्या काळात ग्राहक अधिक आरोग्यदायी जीवनशैलीच्या पर्यायांकडे वळत असताना, रियल अ‍ॅक्टिव्ह भारतात हायड्रेशनची नवी व्याख्या करत आहे. अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हशिवाय, रियल अ‍ॅक्टिव्ह खऱ्या फळांचे नैसर्गिक गुणधर्म देतो. त्यामुळे हा उन्हाळ्यात दिवसभरासाठी एक उत्तम साथीदार ठरतो — पौष्टिक नाश्त्यापासून ते मधल्या वेळच्या स्नॅकपर्यंत. “उन्हाळ्य...