सीधे मुख्य सामग्री पर जाएं

धारावी पुनर्विकास प्रकल्पावर बसपाचा तीव्र आक्षेप!

प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरेंची सरकार, अदानी समूहावर टीका

सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करू नका; सरकारला आवाहन

मुंबई। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली सरकार व अदानी समूह धारावीतील गरिबांच्या हक्कांवर गदा आणत आहे.हा प्रकल्प सामान्य जनतेच्या हक्कांचे उल्लंघन असून, संपूर्ण प्रक्रियेत लोकशाही मूल्यांना आणि जनतेच्या आरोग्याला धक्का पोचवणारा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. सुनील डोंगरे यांनी सोमवारी (ता.७ जुले) व्यक्त केली. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेतून ऍड.डोंगरे यांनी केंद्र, राज्य सरकारसह अदानी समुहाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.राज्य महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोनचे मुख्य प्रभारी आणि पुण्याचे माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, बसपाच्या शिष्टमंडळाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर श्रीनिवास यांना निवेदन देत धारावीतील समस्यांबाबत अवगत करवले. प्रदेश सचिव नागसेन माला, इंजि.दादाराव उईके यावेळी उपस्थित होते.

धारावीतून लोकांना जबरदस्तीने हटवून देवनार डम्पिंग ग्राऊंडजवळ पुनर्वसित करण्याचा घाट घातला जातोय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार, डम्पिंग ग्राऊंडच्या जवळपास ५०० मीटर परिसरात कुठलेही बांधकाम कायदेशीरदृष्ट्याही चुकीचे आहे. अशा विषारी परिसरात घरे बांधून लोकांना स्थलांतरित करणे म्हणजे थेट त्यांच्या जिवाशी खेळ करण्यासारखे आहे, असे मत व्यक्त करीत ऍड.डोंगरे यांनी सरकारच्या हेतूंवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. धारावीच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जैवविविधतेचा विनाश करून या भागाचे ‘बीकेसी २’ करण्याचा व्यापारी हेतू आहे, असा आरोप त्यांनी केला.

अदानी समूह समाजसेवा नाही, तर व्यावसायिक उद्देशाने काम करतोय. धारावीतील लोकांनी वर्षानुवर्षे मुंबईच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ दिले आहे. त्यांना घरे देणे सरकारचे उपकार नाही, तर सामाजिक व कायदेशीर जबाबदारी आहे,अशी स्पष्ट भूमिका बसपा ची असल्याचे ऍड.डोंगरे म्हणाले.

प्रकल्पाच्या आराखड्यात फक्त घरांचे पुनर्वसन आहे, लघुउद्योगांचे नाही.धारावीतील हजारो लघुउद्योग, विशेषतः चामडा, वस्त्रनिर्मिती, अन्नप्रक्रिया, मातीशिल्प हे रोजगाराचे स्रोत आहेत. जर या उद्योगांचे पुनर्वसन नसेल, तर लोकांना नोकरीविना घरे देऊन आणखी गंभीर समस्या निर्माण होतील.प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव आहे. नागरिकांसह स्थानिक प्रतिनिधी, सामाजिक संस्थांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. अपात्रतेची कारणे, आर्थिक व्यवहार, पुनर्वसन निकष सर्व काही गोंधळात आहे. हा ‘टॉप-डाऊन’ दृष्टिकोन लोकशाही विरोधात आहे,असा आरोप बसपाचा आहे.

धारावीतील ६०% हून अधिक जमीन सार्वजनिक मालकीची असून, ती खासगी कंपन्यांना विकणे म्हणजे जनतेच्या मालकीच्या संपत्तीचे खासगीकरण होय. धारावीतील सर्व रहिवाशांना पात्र ठरवून त्यांना त्यांच्या मूळ जागीच घरे देण्यात यावीत. सरकारने कुठल्याही सवलतीच्या नावाखाली वंचितांची थट्टा करू नये. बसपा ही नेहमीच शोषित, वंचित, कष्टकरी वर्गाच्या बाजूने उभी राहिल आणि त्यांच्या हक्कांसाठी झगडत राहील, असे प्रतिपादन प्रदेश महासचिव डॉ. हुलगेश चलवादी यांनी केले.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रीपाद नाईक यांनी ECAMEX 2026 चे उद्घाटन केले; अक्षय ऊर्जेचा वाढता वाटा, सौर ऊर्जेचा प्रसार आणि मेक इन इंडिया संधींवर भर

मुंबई। भारत सरकारचे नवीन व अक्षय ऊर्जा तसेच वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोरेगाव येथील BEC येथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ECAM) च्या 101 वर्षपूर्ती निमित्त आयोजित भारतातील मेगा इलेक्ट्रिकल व ऊर्जा प्रदर्शन ECAMEX 2026 चे उद्घाटन केले. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की भारताच्या वाढत्या ऊर्जा मागणीची शाश्वत पूर्तता करण्यासाठी अक्षय ऊर्जेतून होणाऱ्या वीज निर्मितीचा टक्का लक्षणीयरीत्या वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की अक्षय ऊर्जा क्षेत्र उद्योग, नवोन्मेष आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देत असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळकटी देते. मंत्र्यांनी पुढे सांगितले की मेक इन इंडिया उपक्रमामुळे सौर उपकरणे, इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत उत्पादनासाठी मजबूत संधी निर्माण होत आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी उद्योगांनी स्वदेशी उत्पादन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासात गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केल...

दादर जैन ज्ञान मंदिरात श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला

मुंबई। राजा सिद्धार्थ यांचे वंशज आणि माता त्रिशला यांचे पुत्र, परम कृपाळू भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जयंतीनिमित्त या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, श्री आत्म कमल लब्धी सुरीश्वरजी जैन ज्ञान मंदिर आणि जिन रक्षा इंटरनॅशनल ग्रुप यांनी केले होते. शासन प्रदीप परम पूज्य आचार्य भगवंत श्री विजय प्रदीप चंद्र सुरीश्वरजी महाराज साहिब यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली, भगवान महावीर स्वामींच्या जन्म कल्याणकाचे एक सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन सादर करण्यात आले. आज जागतिक तापमानवाढ असो वा दहशतवाद, भगवान महावीरांची केवळ दोन तत्त्वे जगाला वाचवू शकतात: • अपरिग्रह: निसर्गाचे शोषण थांबवा, केवळ गरजेपुरतेच वापरा. शाळेतील सर्व पंडित, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संजयभाई शाह, अशोकभाई चरला, महिला विभागाच्या उपाध्यक्षा अल्पाबेन संजय शाह आणि संदीप दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी, ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त सा...

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा – खऱ्या फळांचा स्वाद, कोणतीही अतिरिक्त साखर नाही आणि कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत • साखरयुक्त पेये आणि कोल्ड ड्रिंक्सला एक आरोग्यदायी पर्याय – नाश्ता, मधल्या वेळचा स्नॅक आणि इतर वेळांसाठी योग्य • नैसर्गिक पोषण, हायड्रेशन आणि अतिरिक्त साखर टाळू इच्छिणाऱ्या आरोग्य-जागरूक ग्राहकांसाठी उत्तम पेय मुंबई। भारताची अग्रगण्य नैसर्गिक आरोग्य व आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडचा लोकप्रिय पॅकेज्ड फळ रस ब्रँड ‘रियल’ आपल्या सजग पोषणाच्या बांधिलकीला अधिक बळकट करत ‘रियल अ‍ॅक्टिव्ह’ फळ रस सादर करत आहे — कोणतीही अतिरिक्त साखर नसलेला, चविष्ट आणि ताजेतवाने फळ रसांचा हा विशेष श्रेणी आहे. आजच्या काळात ग्राहक अधिक आरोग्यदायी जीवनशैलीच्या पर्यायांकडे वळत असताना, रियल अ‍ॅक्टिव्ह भारतात हायड्रेशनची नवी व्याख्या करत आहे. अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हशिवाय, रियल अ‍ॅक्टिव्ह खऱ्या फळांचे नैसर्गिक गुणधर्म देतो. त्यामुळे हा उन्हाळ्यात दिवसभरासाठी एक उत्तम साथीदार ठरतो — पौष्टिक नाश्त्यापासून ते मधल्या वेळच्या स्नॅकपर्यंत. “उन्हाळ्य...