सीधे मुख्य सामग्री पर जाएं

धारावी पुनर्विकास प्रकल्पावर बसपाचा तीव्र आक्षेप!

प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरेंची सरकार, अदानी समूहावर टीका

सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करू नका; सरकारला आवाहन

मुंबई। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली सरकार व अदानी समूह धारावीतील गरिबांच्या हक्कांवर गदा आणत आहे.हा प्रकल्प सामान्य जनतेच्या हक्कांचे उल्लंघन असून, संपूर्ण प्रक्रियेत लोकशाही मूल्यांना आणि जनतेच्या आरोग्याला धक्का पोचवणारा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. सुनील डोंगरे यांनी सोमवारी (ता.७ जुले) व्यक्त केली. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेतून ऍड.डोंगरे यांनी केंद्र, राज्य सरकारसह अदानी समुहाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.राज्य महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोनचे मुख्य प्रभारी आणि पुण्याचे माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, बसपाच्या शिष्टमंडळाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर श्रीनिवास यांना निवेदन देत धारावीतील समस्यांबाबत अवगत करवले. प्रदेश सचिव नागसेन माला, इंजि.दादाराव उईके यावेळी उपस्थित होते.

धारावीतून लोकांना जबरदस्तीने हटवून देवनार डम्पिंग ग्राऊंडजवळ पुनर्वसित करण्याचा घाट घातला जातोय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार, डम्पिंग ग्राऊंडच्या जवळपास ५०० मीटर परिसरात कुठलेही बांधकाम कायदेशीरदृष्ट्याही चुकीचे आहे. अशा विषारी परिसरात घरे बांधून लोकांना स्थलांतरित करणे म्हणजे थेट त्यांच्या जिवाशी खेळ करण्यासारखे आहे, असे मत व्यक्त करीत ऍड.डोंगरे यांनी सरकारच्या हेतूंवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. धारावीच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जैवविविधतेचा विनाश करून या भागाचे ‘बीकेसी २’ करण्याचा व्यापारी हेतू आहे, असा आरोप त्यांनी केला.

अदानी समूह समाजसेवा नाही, तर व्यावसायिक उद्देशाने काम करतोय. धारावीतील लोकांनी वर्षानुवर्षे मुंबईच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ दिले आहे. त्यांना घरे देणे सरकारचे उपकार नाही, तर सामाजिक व कायदेशीर जबाबदारी आहे,अशी स्पष्ट भूमिका बसपा ची असल्याचे ऍड.डोंगरे म्हणाले.

प्रकल्पाच्या आराखड्यात फक्त घरांचे पुनर्वसन आहे, लघुउद्योगांचे नाही.धारावीतील हजारो लघुउद्योग, विशेषतः चामडा, वस्त्रनिर्मिती, अन्नप्रक्रिया, मातीशिल्प हे रोजगाराचे स्रोत आहेत. जर या उद्योगांचे पुनर्वसन नसेल, तर लोकांना नोकरीविना घरे देऊन आणखी गंभीर समस्या निर्माण होतील.प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव आहे. नागरिकांसह स्थानिक प्रतिनिधी, सामाजिक संस्थांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. अपात्रतेची कारणे, आर्थिक व्यवहार, पुनर्वसन निकष सर्व काही गोंधळात आहे. हा ‘टॉप-डाऊन’ दृष्टिकोन लोकशाही विरोधात आहे,असा आरोप बसपाचा आहे.

धारावीतील ६०% हून अधिक जमीन सार्वजनिक मालकीची असून, ती खासगी कंपन्यांना विकणे म्हणजे जनतेच्या मालकीच्या संपत्तीचे खासगीकरण होय. धारावीतील सर्व रहिवाशांना पात्र ठरवून त्यांना त्यांच्या मूळ जागीच घरे देण्यात यावीत. सरकारने कुठल्याही सवलतीच्या नावाखाली वंचितांची थट्टा करू नये. बसपा ही नेहमीच शोषित, वंचित, कष्टकरी वर्गाच्या बाजूने उभी राहिल आणि त्यांच्या हक्कांसाठी झगडत राहील, असे प्रतिपादन प्रदेश महासचिव डॉ. हुलगेश चलवादी यांनी केले.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

झी-लाइव्हतर्फे ‘मराठी वाजलंच पाहिजे’

मराठी तरुणाई स्ट्रीट-आर्टमधील गुणवत्तेसह महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं दर्शन घडवणार मुंबई। झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेस लिमिटेड (झी) या भारतातील कंटेंट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने त्यांच्या नव्या प्रायोगिक टप्प्याच्या पहिल्या अध्यायाची झी लाइव्हची घोषणा केली. त्याअंतर्गत वर्ल्ड ऑफ वाइब्ज या टॅलेट कंपनीच्या सहकार्याने मराठी वाजलंच पाहिजे (एमपीव्ही) हा पहिला प्रमुख कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी फिनिक्स मार्केट सिटी, पुणे येथे होणार असलेला एमपीव्ही हा केवळ एक लाइव्ह कॉन्सर्ट नाही, तर ती एक सांस्कृतिक चळवळ आहे. त्यामधे मराठी तरुणाई संस्कृतीचं प्रतिबिंब झळकणार असून हिप-हॉप, इंडी म्युझिक, स्ट्रीट आर्टमधील नव्या गुणवत्तेसह महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं दर्शन घडवलं जाणार आहे. क्रॅटेक्स, संजू राठोड, श्रेयस अँड वेदांग, एमसी गावठी आणि पट्या द डॉक अशा ४०+ कलाकारांचा समावेश असलेलं हे फेस्टिवल धमाल उर्जेसह आजच्या तरुणाईची अस्सल आणि लोकल गोष्ट सांगणार आहे. एमपीव्ही हा असा मंच आहे, जिथं परंपरा आणि आधुनिक अभिव्यक्तीचा संगम होईल आणि आजच्या क्रिएटर्सच्या सूर, ...

भावना शर्मा जैन यांनी वायव्य मुंबई जिल्हा काँग्रेसची जबाबदारी स्वीकारली

मुंबई। ऑल इंडिया कांग्रेस कमेटी सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केलेल्या पदांच्या यादीनुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील संघटना निर्मिती उपक्रमांतर्गत, ऑल इंडिया कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, काँग्रेसच्या दिग्गज नेत्या भावना शर्मा जैन यांना वायव्य जिल्हा अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मजबूत तरुण महिला चेहरा म्हणून त्यांची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. माजी खासदार गुरदास कामत यांच्या जवळच्या सहकारी जैन यांची त्यांच्याच लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने हे स्पष्ट होते की काँग्रेसने त्यांना काळजीपूर्वक विचार करून ही जबाबदारी दिली आहे. भावना शर्मा जैन यांनी या जबाबदारीबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मुंबई प्रभारी चेनी थल्ला आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांचे आभार मानले. तिने सांगितले की ती तिच्या सर्व शक्ती, निष्ठा आणि समर्पणाने काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्य...

एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडिया अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक वेलनेस प्रोग्राम यांच्यासह मुंबईतील आयव्हीएफ क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार

उद्योगातील आघाडीच्या फर्टिलिटी शृंखलेने लाइव्ह योग सत्रे, तज्ञांचे वेबिनार आणि निवडक रुग्णांसाठी तिच्या अत्याधुनिक एम्ब्रयोलॉजी प्रयोगशाळेच्या फिजिकल टूर्स यांच्यासह अनोखा, विनामूल्य-ॲक्सेस डिजिटल अनुभव उपलब्ध करवून दिला आहे मुंबई। देशातील आघाडीची आयव्हीएफ आणि फर्टिलिटी उपचार संस्था, एआरटी फर्टिलिटी क्लिनिक्स इंडियाने एका नवीन वेबसाइटसह फ्री-टू-ऍक्सेस फिजिटल अनुभवांचा एक अभिनव संच लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. आयव्हीएफ आणि फर्टिलिटी उपचारांच्या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर भावी पालकांना मदत करण्यासाठी प्रत्यक्ष आणि डिजिटल अनुभवांचे संयोजन करून, आपल्या देशात प्रजनन देखभाल क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी हे व्यापक व्यासपीठ डिझाइन केले आहे. या क्लिनिकमध्ये दर शनिवारी निवडक जोडप्यांसाठी मोफत प्रयोगशाळा भेटी आयोजित केल्या जातात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्यातील गर्भांचे संरक्षण करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम श्रेणीतील प्रक्रिया समोरासमोर पाहता येतात. गर्भ ट्रॅकिंग आणि आयडेंटिफिकेशन क्लिनिकच्या आरआय विटनेस टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशान...