सीधे मुख्य सामग्री पर जाएं

फेडएक्सचा मॅजिक बस इंडिया फाउंडेशनसह सहयोग

सायबर सेफ इंडिया मोहिमेची सुरुवात 

मुंबई। शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातील आघाडीची ना-नफा संस्था मॅजिक बस इंडिया फाउंडेशनने जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडएक्स एक्सप्रेस (फेडएक्स) सोबत सहयोगाने सायबर सेफ इंडिया कॅम्पेन सुरू केली आहे. या देशव्‍यापी उपक्रमाचा तरुणांना आणि समुदायांना डिजिटल जगात सुरक्षितपणे व जबाबदारीने नेव्हिगेट करण्यासाठी ज्ञानासह सुसज्ज करून सायबर गुन्ह्यांना रोखण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम डिजिटल जागरूकता वाढवण्यासाठी आणि विशेषतः आव्हानात्मक पार्श्वभूमी असलेल्या समुदायांना विश्वसनीय साधने व प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास प्रेरित करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्‍नई, हैदराबाद, पुणे व कोलकाता यांसह १३ राज्ये आणि २९ शहरांमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे. मॅजिक बसची १३० हून अधिक उपजीविका केंद्रे व १००० हून अधिक महाविद्यालयांच्या विद्यमान नेटवर्कचा वापर करून हा उपक्रम दोन लाखांहून अधिक व्यक्तींपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत-जास्त प्रभाव पाडेल. याव्यतिरिक्‍त, सुरक्षित डिजिटल पद्धतींची व्यापक समज आणि अवलंब वाढवण्यासाठी पथनाट्ये, डिजिटल सुरक्षा सत्रे, जागरूकता शिबिरे आणि स्थानिक सायबर गुन्हे अधिकाऱ्यांशी सहयोग यांसारख्या आकर्षक साधनांद्वारे समुदाय-स्तरीय पोहोचवर भर दिला जाईल.

फेडएक्स, मध्यपूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिका येथील मार्केटिंग, ग्राहक अनुभव व एअर नेटवर्कचे उपाध्यक्ष नितीन नवनीत टाटीवाला म्हणाले, ''आजच्या हायपरकनेक्टिव्ह जगात सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता हे आपले सर्वात मोठे संरक्षण आहे. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार १.३ दशलक्ष नागरिकांनी नोंदवलेल्या फसवणूकीच्या प्रकरणांद्वारे ४३.८६ अब्ज रुपयांपेक्षा जास्त रक्‍कम सुरक्षित करण्यात आली आहे, ज्‍यामधून सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी जागरूकता आणि त्वरित अहवाल देण्याचे महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येतात . फेडएक्समध्‍ये आम्‍हाला लोकांना सतर्क राहण्यास, सुरक्षित राहण्यास आणि डिजिटल जगात अधिक आत्मविश्वासाने नेव्हिगेट करण्यास मदत करणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्याचा अभिमान आहे."

मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे ग्लोबल सीईओ जयंत रस्तोगी म्हणाले, ''भारत डिजिटल-केंद्रित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना सुरक्षित आणि माहितीपूर्ण डिजिटल सहभाग आवश्यक बनला आहे. फेडएक्ससोबतच्या सहयोगाने आम्हाला सायबरसुरक्षा जागरूकता वाढवण्यास सक्षम केले आहे, जे आमची जीवन कौशल्‍ये आणि रोजगार उपक्रमाशी विनासायासपणे संलग्‍न आहे. सायबर सेफ इंडिया मोहीम सर्वसमावेशक डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनाला साकार करण्याच्या दिशेने पाऊल आहे, ज्यामुळे तरुण आणि समुदाय डिजिटल जगात सुरक्षितपणे नेव्हिगेट करण्यासाठी सुसज्ज आहेत याची खात्री मिळते. यामधून उज्‍ज्‍वल भविष्याप्रती आमची समान कटिबद्धता दिसून येते, जेथे डिजिटल प्रवेशामधून डिजिटल सुरक्षितता मिळेल, प्रत्येक कुटुंबाला वाढत्या कनेक्टेड जगात प्रगती करण्‍यास सक्षम करेल.''

भारताच्या राष्ट्रीय डिजिटल सुरक्षा प्राधान्यांशी सुसंगत हा उपक्रम संचार व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अंतर्गत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडवान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक)च्या सहयोगाने राबविला जात आहे आणि प्रादेशिक पोहोच व समन्वयाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सायबर सेल्सशी देखील संलग्‍न असेल.

मॅजिक बस आणि फेडएक्स यांच्यातील हा सहयोग भारताच्या भविष्यातील कर्मचारीवर्गाला डिजिटली कनेक्टेड करण्‍यासोबत डिजिटली जागरूक, सुरक्षित आणि स्थिर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही मोहीम सर्वात जास्त गरज असलेल्या ठिकाणी जागरूकता निर्माण करून आणि सायबर सुरक्षित भारत घडवण्यास मदत करून सर्वसमावेशक नाविन्‍यतेचा आधारस्तंभ म्हणून काम करते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची एआय-आधारित ग्राहक सेवेसाठी भागीदारी

भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक असलेली टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी, सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून 24 तास ग्राहक सेवा आणि रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना उत्तर मिळण्याचा वेळ काहीकाही दिवसांवरून कमी होऊन 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच ईमेल उघडण्याचे प्रमाण 50–60% पर्यंत वाढले आहे. मुंबई। टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (टीआरआयएल) आणि जगातील नंबर 1 एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्सफोर्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. ग्राहकांना उत्तर देण्याचा वेळ काही दिवसांवरून कमी होऊन आता फक्त 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच कंपनी आता एकाच वेळी हजारो ग्राहकांशी सहज संपर्क साधू शकते.  असे गिरीश हड़कर (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड), अरुंधती भट्टाचार्य (प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया – ...

सॅमसंग आणि गुगलने दिली नवीन इंटेलिजेंट आयवेअरची पहिली झलक

मुंबई। सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड आणि गुगलने गुगल आय/ओ २०२६ मध्ये आयवेअर भागीदार जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्कर यांच्या सहयोगाने डिझाइन केलेल्‍या दोन प्रीमियम मॉडेल्सची पहिली झलक दाखवत नवीन इंटेलिजेंट आयवेअरचे अनावरण केले. मोबाइल फोनसाठी सहयोगी डिवाईस म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले हे नवीन आयवेअर वापरकर्त्‍यांना आवाजाच्या संवादाद्वारे मदत मिळवण्यास आणि त्यांच्या फोनशी विनासायासपणे जोडले जाण्यास सक्षम करते, जेथे ही सुविधा नेहमीच्या चष्म्याच्या रचनेत मिळते. आयवेअर भागीदारांसह सह-निर्मित केलेले हे इंटेलिजेंट आयवेअर क्रांतिकारी एआय क्षमतांना आराम आणि शैलीसोबत एकत्र आणते, ज्यामध्ये सॅमसंगचे हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील अग्रस्थान आणि गुगलचे एआय तंत्रज्ञान प्रीमियम आयवेअर डिझाइनशी जोडले गेले आहे. प्रत्येक आयवेअर ब्रँड या डिवाईसला वेगळा डिझाइन दृष्टिकोन देतो. फॅशन आयवेअरमधील आपल्या परंपरेसाठी प्रसिद्ध असलेले जेंटल मॉन्स्टर हे नाविन्यपूर्ण तरीही सुबक शैली सादर करते, तर वॉर्बी पार्कर परिष्कृत आणि चिरंतन डिझाइन्सचे प्रदर्शन करते. वापरकर्त्‍यांच्‍या सोबतीने रिअल टाइममध्ये ...

कर्करोग वगळता इतर शारीरिक व्याधी असलेल्या वृद्ध व्यक्तींना सदभावना वृद्धाश्रममध्ये मोफत प्रवेश मिळेल

मुंबई। जगातील सर्वात मोठे मोफत सदभावना वृद्धाश्रम, विनूभाई बाचूभाई नगरेचा येथील नवीन परिसरात, निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना आयुष्यभर पूर्णपणे मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये ७ टॉवर्समधील प्रत्येक टॉवरमध्ये ११ मजले असतील, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला पुरेशी जागा आणि काळजी मिळेल. तसेच, जैन समाजातील वृद्धांसाठी एक संपूर्ण टॉवर वेगळा बनवण्यात आला आहे, जिथे एक मंदिरही बांधण्यात आले आहे. ‘विनूभाई बाचूभाई नगरेचा परिसर’ येथील सदभावना वृद्धाश्रम २० लाख चौरस फूट बांधकामाचे आहे. ५०० कोटी रुपये खर्च करून, १४०० खोल्यांमध्ये ५००० निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची सोय केली जाईल. वृद्धाश्रम ही केवळ भारतीय संस्कृतीच नाही, तर आजच्या कलियुगाची गरज आहे. दुर्दैवाने, संयुक्त कुटुंब पद्धती मोडीत निघत असल्यामुळे अनेक लोक असहाय्य होत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून राजकोटमध्ये 'विनुभाई बचूभाई नगरेचा परिसर' सदभावना वृद्धाश्रम चालवले जात आहे. या वृद्धाश्रमात जात किंवा धर्माचा कोणताही भेदभाव न करता, गरजू वृद्धांना नियमांनुसार आणि संस्थेच्या प्रवे...