सीधे मुख्य सामग्री पर जाएं

भारतातील पहिला एक्‍स्‍पेरिअन्‍सेस-टू-कंझ्युमर ब्रँड 'दिलसे' लाँच

मुंबई। मुंबईतील प्रतिष्ठित एक्‍स्‍पेरिमेण्‍टल थिएटर, एनसीपीए येथे १५ जुलै रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या लाइव्‍ह नाट्य प्रदर्शनादरम्‍यान दिलसे, द हॅप्‍पीनेस कलेक्टिव्‍ह प्रायव्‍हेट लिमिटेड हा भारतातील पहिला एक्‍स्‍पेरिअन्‍सेस-टू-कंझ्युमर (ई२सी) ब्रँड लाँच करण्‍यात आला.

"दिलसे - द लव्ह थिएट्रिकल" असे शीर्षक असलेले हे दोन तासांचे तल्लीन करणारे सादरीकरण पारंपारिक ब्रँड इव्हेंट नव्हते, तर सखोल भावनिक अनुभव होता, ज्यामध्ये मूळ कविता, लाइव्‍ह म्‍युझिक, नाट्यकथन आणि सिनेमॅटिक दृश्ये यांचे संयोजन पाहायला मिळाले.

हर्षवर्धन चौहान यांनी या शोची संकल्‍पना मांडण्‍यासोबत लेखन देखील केले. तसेच त्‍यांनी मुख्‍य पात्राची भूमिका देखील बजावली. या शोमध्ये मूळ कविता, नाट्य संवाद, लाइव्‍ह म्‍युझिक, धार्मिक कथाकथन आणि चित्रपटातील दृश्ये यांचा समावेश होता, ज्‍यामधून भावनिक अनुभव मिळाला. प्रत्येक संवाद, प्रत्येक गीत, प्रत्येक संगीतमय मोटिफ या क्षणासाठी तयार करण्यात आले होते.

सुमित शर्मा दिग्दर्शित, दिलीप रावत आणि राहुल भल्ला यांच्या संगीतासह, या कार्यक्रमात तरुण खेम यांचे कथन, देविका सिंग, तोशी रावल, रिया भल्ला आणि रविंदर पाठक यांचे भावपूर्ण गायन आणि अमन उप्पल, दिया राजपूत, गौतम आणि द दिलसे गर्ल अँड एन्सेम्बल यांचे आकर्षक सादरीकरण होते. हा कार्यक्रम दोन भागांमध्ये विभागला गेला: मीडिया, निर्माते आणि सांस्कृतिक संरक्षकांसाठी इन्‍व्‍हाइट-ओन्‍ली प्रीमियर, त्यानंतर डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटोद्वारे सार्वजनिक प्रदर्शन.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थित असलेल्‍या अभिनेत्री चित्रगंधा सिंग म्‍हणाल्‍या, ''या कार्यक्रमामध्‍ये अत्‍यंत वास्‍तविक अनुभव मिळाला. प्रत्‍येक परफॉर्मन्‍स प्रामाणिक व अत्‍यंत वैयक्तिक वाटला. दिलसेने असा अनुभव दिला, जेथे भावना व्‍यक्‍त होण्‍यासह खऱ्या अर्थाने जाणवल्‍या. मी अशा प्रामाणिक गोष्टीचा भाग होऊ शकल्‍याने स्‍वत:ला भाग्‍यशाली मानते.''

दिलसे - द लव्ह थिएट्रिकलसह भारतातील वाणिज्य क्षेत्रात नवीन श्रेणी एक्‍स्‍पेरिअन्‍सेस-टू-कंझ्युमर (ई२सी)चा उदय झाला. प्रत्‍यक्ष उत्पादनांची विक्री करणाऱ्या समकालीन ब्रँड्सच्‍या तुलनेत दिलसे कामगिरी, साऊंड, आवाज, डिझाइन आणि डिजिटल कथाकथन यांद्वारे भावनिक अनुभव देते. ही उत्‍साहपूर्ण चळवळ आहे, जी रूपांतरण नाही तर संबंधाच्‍या माध्‍यमातून भारतातील वाणिज्‍याला नवीन आकार देत आहे.

दिलसेचे संस्‍थाप‍क व निर्माता हर्षवर्धन चौहान म्‍हणाले, ''हे फक्‍त लाँच नव्‍हते तर आत्‍मीय करार होता. या कथानकामधील प्रत्येक शब्द आपल्‍या लुप्‍त व शांत भावनांमधून आला आहे. मला रंगमंच नको होता. मला आरसा हवा होता. आणि या परफॉर्मन्‍सच्‍या माध्‍यमातून आम्‍ही अभिनय साकारला नाही तर जुन्‍या आठवणींना उजाळा दिला. आम्‍ही भावनांना व्‍यक्‍त करण्‍यासोबत त्‍यामधील अर्थाला सादर केले. भारतात मोठ्या जल्‍लोषात ब्रँड्स निर्माण होताना दिसण्‍यात आले आहे, पण दिलसे उत्‍साहपूर्ण भावनेसह निर्माण करण्‍यात आला आहे. आमची उत्‍पादने परिधान करण्‍यासोबत जाणवली जातील. रंगमंचावर हे फक्‍त नाटक नव्‍हते तर आठवण होती.''

लाँच प्रदर्शनाला मिळालेल्‍या यशानंतर दिलसे आता २३ जुलै २०२५ रोजी दिलसे अॅपच्‍या सॉफ्ट लाँचसह आपले स्‍थान दृढ करण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍यामागे भारतातील पहिले आत्‍मीय डिजिटल क्षेत्र म्‍हणून दर्जा स्‍थापित करण्‍याचा दृष्टिकोन आहे. ऑगस्‍ट २०२५ पासून ब्रँड उत्‍पादने व वीअरेबल्‍स लाँच करण्‍यास सुरूवात करेल, जी ई२सी अनुभवाला अधिक दृढ करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एहसान खान, नाफे खान अभिनीत आणि रझूल आलम दिग्दर्शित "गरम माहौल" चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर लाँच

मुंबई। बॉलीवूड दिग्दर्शक रझूल आलम यांच्या हिंदी चित्रपट "गरम माहौल" चे पोस्टर आणि ट्रेलर मुंबईतील इम्पा थिएटरमध्ये एहसान खान, गायिका दीपा नारायण झा, अभिनेते नाफे खान आणि शब्बीर शेख यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. पोस्टर लाँचनंतर, चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी देखील दाखवण्यात आली. लिटिल स्टेप आर्ट्स (एलएसए) निर्मित, या चित्रपटाची सह-निर्मिती विक्रांत वाधवा आणि राहुल जाटव यांनी केली आहे. "गरम माहौल" च्या कलाकारांमध्ये एहसान खान, नाफे खान, बबिता चौधरी, पूजा दत्ता, विक्रांत वाधवा, नरेंद्र, अमित श्रीवास्तव आणि राहुल जाटव यांचा समावेश आहे. लिटिल स्टेप आर्ट्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लाइन प्रोड्यूसर रवी प्रकाश भारद्वाज हे संगीत दिग्दर्शक आहेत. संगीत राज सेन आणि इक्बाल सरगम ​​यांनी दिले आहे. गायकांमध्ये अलका याज्ञिक, दीपा नारायण झा, रितू पाठक आणि पी.के. यांचा समावेश आहे. चित्रपटाचे डीओपी विजय मिश्रा आहेत, लेखक राकेश कुमार आहेत आणि कार्यकारी निर्माता सतीश कुमार आहेत. एहसान खान म्हणाला, "मी राजुल आलमसोबत याआधी खूप काम केले आहे. या चित...

आकाश इन्स्टिट्यूट मुंबईने जेईई मेन २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली; साहिल प्रधानने ९९.९९ टक्के गुण मिळवले

उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीमुळे मुंबई आणि आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ला अभिमान आहे   मुंबई: आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) मुंबईतील विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२६ (सत्र १) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पुन्हा एकदा या प्रदेशाची सतत शैक्षणिक उत्कृष्टता दाखवून दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने १६ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या निकालांनुसार, बोरिवली शाखेतील साहिल प्रधान या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के गुणांसह मुंबईत अव्वल स्थान पटकावले. उत्कृष्ट कामगिरीच्या या मालिकेत, बोरिवली शाखेतील जीत व्होराने १ वर्षाच्या क्लासरूम प्रोग्राममध्ये ९९.८७ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. ध्वज जैन यांनी ९९.७९ टक्के आणि शिव तिवारी यांनी ९९.४५ टक्के गुण मिळवून शाखेच्या प्रभावी शैक्षणिक निकालांना आणखी बळकटी दिली. विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल भाष्य करताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख डॉ. एच.आर. राव म्हणाले, "मुंबईतील आमच्या विद्यार्थ्यांचे अपवादात्मक निकाल त्यांच्या शैक्षणिक वचनबद्धतेचे आणि आकाश येथी...

राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 पुण्यात यशस्वीरीत्या संपन्न

पुणे। देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी भोसरी, पुणे येथे अत्यंत दिमाखदार व गौरवपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन देविदास ग्रुप बिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट तर्फे करण्यात आले होते. आपल्या व्यवसायातून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय आणि प्रभावी भूमिका बजावणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये Le-Vanshi Group Of Company चे Founder, Business Tycoon Author Kuntal Arora, Mrs. Simran Kuntal Arora, तसेच Riyansh Solar Power Plus Pvt. Ltd. चे Founder Mr. Umesh Bhardwaj यांचे विशेष सहकार्य व भक्कम समर्थन लाभले. त्यांच्या दूरदृष्टी, सकारात्मक नेतृत्व आणि सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य व प्रभावी ठरला. या विशेष प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उल्लाल तसेच प्रख्यात अभिनेते शहबाज खान प्रमुख पाहुणे म्...