सीधे मुख्य सामग्री पर जाएं

'गायत्री-एआय'च्या भारतातील पहिल्या 'एआय'आधारित 'वेलनेस सेंटर'चे उद्घाटन

मुंबई। भारताच्या वेलनेस क्षेत्रासाठी एका ऐतिहासिक पर्वणी ठरलेल्या 'गायत्री-एआय'ने सोमवार, ७ जुलै रोजी मुंबईतील अंधेरी येथे त्यांचे 'एआय' आधारित क्वांटम वेलनेस सेंटर सुरू केले. 'क्वालिमाइंड्स कॉर्प सर्व्हिसेस लिमिटेड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि फार्मा उद्योगातील एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक श्री. के. आनंद वेंकट राव, तसेच बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटी पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत क्वांटम वेलनेस सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतात अतिशय सुलभ आणि एआय-आधारित सकल रोगनिवारक उपचार पद्धतीच्या (थेरपी) एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे.
नव्याने उद्घाटन झालेल्या केंद्रात एनएलएस बायोरेसोनन्स ४डी निदानोपयोगी औषधेमुक्त आरोग्य पुनर्वसन उपकरण मेटाट्रॉन मेटापॅथिया, मेटाट्रॉन झेड १०० प्लाझ्माहील एक्स४, नारिया चेअर (टेस्लाटेकपेक्षाही श्रेष्ठ), स्केलर ३६० क्यूआय कॉइल™️, झेड-१०० क्वांटम बायो-स्टिम्युलेटर आणि प्रगत हायड्रो-कोलन उपचार प्रणाली यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे समर्थित असलेल्या उपचारात्मक कल्याण मापदंडाद्वारे एकत्रित केले आहेत, जे वैयक्तिक आणि भविष्यसूचक उपचार प्रदान करतात.
'गायत्री-एआय'मध्ये आम्ही प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आरोग्याची निरंतर जबाबदारी घेण्यास सक्षम बनवण्यावर विश्वास ठेवतो," असे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. धर्मप्रकाश त्रिपाठी म्हणाले. 'जिथे मानवी कौशल्यांद्वारे वैज्ञानिक कल्पकतेची जोड देऊन महत्त्वपूर्ण आणि आवश्यक उपचार दिले जातात, अशा दृष्टिकोनाचे 'गायत्री एआय' हे एक प्रतीक आहे, असेही त्यांनी सांगितले. 'गायत्री-एआय'च्या संस्थापक श्रीमती शोभना डीपी त्रिपाठी म्हणाल्या, 'सुदृध आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव, असे नाही - तर ते संतुलन, जीवनशक्ती आणि उद्देश आदींचा सहवास असते', असे 'गायत्री एआय'च्या संस्थापक शोभना डीपी त्रिपाठी म्हणाल्या. 'आमची परिसंस्था तंत्रज्ञान, अंत:स्फूर्ती आणि करुणा यांना एकत्रित करून त्या प्रवासाला अर्थपूर्णपणे सहकार्य करते', असेही त्यांनी पुढे नमूद केले.
क्वालिमाइंड्स कॉर्प सर्व्हिसेसचे एमडी आणि सीईओ, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे माजी उपाध्यक्ष, लुपिनचे माजी अध्यक्ष, ग्लेनमार्कचे माजी अध्यक्ष, कॅडिला (झायडीज) चे माजी उपाध्यक्ष आणि जागतिक प्रमुख आणि 'निकोलस पिरामल'चे माजी उपाध्यक्ष श्री. के. आनंद वेंकट राव उद्घाटन सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले, 'भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पारंपरिक आरोग्य मूल्यांना कसे सक्षम बनवता येते याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे गायत्री-एआय आहे'. हे केंद्र संपूर्ण भारतात आरोग्य सक्षमीकरणाच्या चळवळीला प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अग्रगण्य वेलनेस केंद्राच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला चार चांद लावण्यासाठी ईशा कोपीकर आणि निहारिका रायजादा सेलिब्रिटी उपस्थित होत्या. या सर्वांच्या चमकदार उपस्थितीने हा उद्घाटन सोहळा अधिकच उजळून निघाला. उपस्थित मान्यवरांना एनएलएस बायोरेसोनन्स, क्यूआय कॉइल™️ स्केलर उपचार, प्लाझ्माहील एक्स४, एचएचओ इनहेलेशन आणि प्रगत हायड्रो-कोलन उपचार प्रणालीसारख्या वैशिष्ट्यीकृत उपचारांचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच केंद्रातील अत्याधुनिक सुविधांचा  धावता आढावा घेऊन, संस्थापक, वैद्यकीय सल्लागार आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्यात आला.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एहसान खान, नाफे खान अभिनीत आणि रझूल आलम दिग्दर्शित "गरम माहौल" चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर लाँच

मुंबई। बॉलीवूड दिग्दर्शक रझूल आलम यांच्या हिंदी चित्रपट "गरम माहौल" चे पोस्टर आणि ट्रेलर मुंबईतील इम्पा थिएटरमध्ये एहसान खान, गायिका दीपा नारायण झा, अभिनेते नाफे खान आणि शब्बीर शेख यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. पोस्टर लाँचनंतर, चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी देखील दाखवण्यात आली. लिटिल स्टेप आर्ट्स (एलएसए) निर्मित, या चित्रपटाची सह-निर्मिती विक्रांत वाधवा आणि राहुल जाटव यांनी केली आहे. "गरम माहौल" च्या कलाकारांमध्ये एहसान खान, नाफे खान, बबिता चौधरी, पूजा दत्ता, विक्रांत वाधवा, नरेंद्र, अमित श्रीवास्तव आणि राहुल जाटव यांचा समावेश आहे. लिटिल स्टेप आर्ट्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लाइन प्रोड्यूसर रवी प्रकाश भारद्वाज हे संगीत दिग्दर्शक आहेत. संगीत राज सेन आणि इक्बाल सरगम ​​यांनी दिले आहे. गायकांमध्ये अलका याज्ञिक, दीपा नारायण झा, रितू पाठक आणि पी.के. यांचा समावेश आहे. चित्रपटाचे डीओपी विजय मिश्रा आहेत, लेखक राकेश कुमार आहेत आणि कार्यकारी निर्माता सतीश कुमार आहेत. एहसान खान म्हणाला, "मी राजुल आलमसोबत याआधी खूप काम केले आहे. या चित...

आकाश इन्स्टिट्यूट मुंबईने जेईई मेन २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली; साहिल प्रधानने ९९.९९ टक्के गुण मिळवले

उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीमुळे मुंबई आणि आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ला अभिमान आहे   मुंबई: आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) मुंबईतील विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२६ (सत्र १) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पुन्हा एकदा या प्रदेशाची सतत शैक्षणिक उत्कृष्टता दाखवून दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने १६ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या निकालांनुसार, बोरिवली शाखेतील साहिल प्रधान या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के गुणांसह मुंबईत अव्वल स्थान पटकावले. उत्कृष्ट कामगिरीच्या या मालिकेत, बोरिवली शाखेतील जीत व्होराने १ वर्षाच्या क्लासरूम प्रोग्राममध्ये ९९.८७ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. ध्वज जैन यांनी ९९.७९ टक्के आणि शिव तिवारी यांनी ९९.४५ टक्के गुण मिळवून शाखेच्या प्रभावी शैक्षणिक निकालांना आणखी बळकटी दिली. विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल भाष्य करताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख डॉ. एच.आर. राव म्हणाले, "मुंबईतील आमच्या विद्यार्थ्यांचे अपवादात्मक निकाल त्यांच्या शैक्षणिक वचनबद्धतेचे आणि आकाश येथी...

राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 पुण्यात यशस्वीरीत्या संपन्न

पुणे। देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी भोसरी, पुणे येथे अत्यंत दिमाखदार व गौरवपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन देविदास ग्रुप बिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट तर्फे करण्यात आले होते. आपल्या व्यवसायातून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय आणि प्रभावी भूमिका बजावणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये Le-Vanshi Group Of Company चे Founder, Business Tycoon Author Kuntal Arora, Mrs. Simran Kuntal Arora, तसेच Riyansh Solar Power Plus Pvt. Ltd. चे Founder Mr. Umesh Bhardwaj यांचे विशेष सहकार्य व भक्कम समर्थन लाभले. त्यांच्या दूरदृष्टी, सकारात्मक नेतृत्व आणि सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य व प्रभावी ठरला. या विशेष प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उल्लाल तसेच प्रख्यात अभिनेते शहबाज खान प्रमुख पाहुणे म्...