सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मध्‍य मुंबईत पहिली ५जी-सक्षम प्रगत रूग्‍ण्‍वाहिका सेवा सुरू

रेड हेल्‍थ आणि डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम 

मुंबई। डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई आणि रेड हेल्‍थ यांच्या संयुक्त विद्यमाने मध्‍य मुंबईत पहिली ५जी-सक्षम अॅडवान्‍स्‍ड लाइफ सपोर्ट (एएलएस) रूग्‍णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या आपत्कालीन आरोग्यसेवेतील महत्वपूर्ण सेवेचे उदघाटन प्रदीप चव्हाण, पोलिस उपायुक्‍त, मुंबई (वाहतूक पूर्व विभाग) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेड हेल्‍थचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रभदीप सिंग, डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटलचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर कुलकर्णी आणि हॉस्पिटलचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. 

ही क्रांतिकारी 5G-सक्षम रुग्णवाहिका सेवा आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद तंत्रज्ञानामध्ये एक महत्त्वपूर्ण झेप आहे, जी मध्य मुंबईला पुढील पिढीच्या आरोग्यसेवा वितरणाच्या अग्रस्थानी नेते. या रुग्णवाहिकेत अत्याधुनिक ५जी कनेक्टिव्हिटीचा वापर केला जातो, ज्यामुळे रिअल-टाइम वैद्यकीय डेटा ट्रान्समिशन, रिमोट तज्ञ सल्लामसलत आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके व रुग्णालय सुविधांमध्‍ये विनासायास समन्‍वय शक्‍य होते.

मध्‍य मुंबईत सुरू करण्‍यात आलेल्‍या या पहिल्‍या ५जी-सक्षम प्रगत रूग्‍णवाहिका सेवेमधून आरोग्‍यसेवा नाविन्‍यतेमध्‍ये अग्रस्‍थानी असण्‍याप्रती शहराची कटिबद्धता दिसून येते. ही अत्‍याधुनिक आपत्‍कालीन प्रतिसाद यंत्रणा हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्‍यापूर्वीच्‍या केअरमध्‍ये अनपेक्षित क्षमतांची भर करते, ज्‍यामुळे आपत्‍कालीन स्थितीत महत्त्वपूर्ण वैद्यकीय हस्‍तक्षेप त्‍वरित सुरू होण्‍याची खात्री मिळते. ५जी तंत्रज्ञानामुळे तज्ञ डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधता येतो, ज्यामुळे गंभीर क्षणी रिअल-टाइम मार्गदर्शन मिळण्‍यासोबत‍ निर्णय घेता येतो.

रेड हेल्‍थचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रभदीप सिंग म्‍हणाले, “मुंबईच्या आपत्कालीन आरोग्यसेवेच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मध्य मुंबईत सुरू करण्‍यात आलेली पहिली ५जी-सक्षम अॅडवान्स्ड लाइफ सपोर्ट रूग्‍णवाहिका सेवा आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञानातील शक्तिशाली प्रगती आहे. दुर्दैवाने, कोणतीही वैद्यकीय आणीबाणी येते तेव्हा घाबरणे हा मानवी स्वभाव आहे. अशा परिस्थितीत काय करावे, कोणाला कॉल करायचा यासारखे मुलभूत निर्णय घेताना देखील व्‍यक्‍ती गोंधळून जातात. आता सुव्यवस्थित आपत्कालीन सेवा आपल्‍याला अत्‍यंत महत्त्वपूर्ण ‘गोल्‍डन अवर'चा योग्‍य उपयोग करण्‍याची प्रबळ संधी देतात, जेथे हे गोल्‍डन अवर कधी-कधी पुढील उपचारांचे यश किंवा अपयश ठरवते.''

डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटलचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर कुलकर्णी म्‍हणाले, “मध्य मुंबईत पहिली ५जी-सक्षम अॅडवान्‍स्‍ड लाइफ सपोर्ट रूग्‍णवाहिका सेवा सुरू करताना आम्हाला अभिमान वाटत आहे, जी आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्‍यामधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कधी-कधी वाहतूक कोंडीमुळे विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमध्‍ये पोहोचणे आव्‍हानात्‍मक ठरू शकते. वैद्यकीय आणीबाणीनंतचा काळ गोल्‍डन अवर मानला जातो, जो जीवनदायी वैद्यकीय किंवा शस्‍त्रक्रिया हस्‍तक्षेपासाठी अत्‍यंत महत्त्वाचा असतो. अशा गंभीर स्थितीमध्‍ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि रुग्णवाहिका पथकाने त्‍वरित केलेली कृती व्‍यक्‍तीचा जीव वाचवण्‍यामध्‍ये निर्णायक ठरू शकते. रुग्णवाहिकांमधील ही ५जी क्षमता रिअल-टाइम डेटा ट्रान्समिशन, दुरून देखरेख आणि रूग्‍णवाहिकेमधून हॉस्पिटलमध्‍ये जात असताना तज्ञांसोबत सल्लामसलत करण्याची सुविधा देईल. रुग्ण घरातून बाहेर पडल्यापासून निदान आणि उपचारांसाठी लागणारा वेळ कमी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. मध्य मुंबईतील रुग्ण आपत्कालीन परिस्थितीत आमच्यावर अवलंबून असतात. त्या गंभीर क्षणांमध्ये रुग्णांना आवश्यक असलेली त्वरित आणि प्रभावी केअर सेवा मिळावी, याची खात्री घेण्याचा आमचा प्रयत्‍न आहे.''

 प्रदीप चव्हाण, पोलिस उपायुक्‍त, मुंबई (वाहतूक पूर्व विभाग) म्‍हणाले, “डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल आणि रेड हेल्थ यांनी मध्य मुंबईत अद्वितीय पहिलीच ५जी-सक्षम रुग्णवाहिका सेवा सुरू करून प्रशंसनीय पाऊल उचलले आहे. ही प्रगत सेवा जलद आणि अधिक कार्यक्षम आपत्कालीन प्रतिसाद सुनिश्चित करून जनतेला फायदा व्हावा यासाठी डिझाइन केली आहे. रस्ते अपघातांसारख्या गंभीर परिस्थितीत रुग्णाला घटनास्थळापासून हॉस्पिटलमध्‍ये नेण्यासाठी लागणारा वेळ महत्त्वपूर्ण ठरू शकतो. अशी आधुनिक आणि सुसज्ज रुग्णवाहिका सेवा सुरू केल्याबद्दल मी डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल आणि रेड हेल्थ यांचे अभिनंदन करतो, ज्याचा नागरिकांना खूप फायदा होईल असा माझा विश्वास आहे.'' 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रीपाद नाईक यांनी ECAMEX 2026 चे उद्घाटन केले; अक्षय ऊर्जेचा वाढता वाटा, सौर ऊर्जेचा प्रसार आणि मेक इन इंडिया संधींवर भर

मुंबई। भारत सरकारचे नवीन व अक्षय ऊर्जा तसेच वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोरेगाव येथील BEC येथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ECAM) च्या 101 वर्षपूर्ती निमित्त आयोजित भारतातील मेगा इलेक्ट्रिकल व ऊर्जा प्रदर्शन ECAMEX 2026 चे उद्घाटन केले. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की भारताच्या वाढत्या ऊर्जा मागणीची शाश्वत पूर्तता करण्यासाठी अक्षय ऊर्जेतून होणाऱ्या वीज निर्मितीचा टक्का लक्षणीयरीत्या वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की अक्षय ऊर्जा क्षेत्र उद्योग, नवोन्मेष आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देत असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळकटी देते. मंत्र्यांनी पुढे सांगितले की मेक इन इंडिया उपक्रमामुळे सौर उपकरणे, इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत उत्पादनासाठी मजबूत संधी निर्माण होत आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी उद्योगांनी स्वदेशी उत्पादन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासात गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केल...

दादर जैन ज्ञान मंदिरात श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला

मुंबई। राजा सिद्धार्थ यांचे वंशज आणि माता त्रिशला यांचे पुत्र, परम कृपाळू भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जयंतीनिमित्त या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, श्री आत्म कमल लब्धी सुरीश्वरजी जैन ज्ञान मंदिर आणि जिन रक्षा इंटरनॅशनल ग्रुप यांनी केले होते. शासन प्रदीप परम पूज्य आचार्य भगवंत श्री विजय प्रदीप चंद्र सुरीश्वरजी महाराज साहिब यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली, भगवान महावीर स्वामींच्या जन्म कल्याणकाचे एक सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन सादर करण्यात आले. आज जागतिक तापमानवाढ असो वा दहशतवाद, भगवान महावीरांची केवळ दोन तत्त्वे जगाला वाचवू शकतात: • अपरिग्रह: निसर्गाचे शोषण थांबवा, केवळ गरजेपुरतेच वापरा. शाळेतील सर्व पंडित, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संजयभाई शाह, अशोकभाई चरला, महिला विभागाच्या उपाध्यक्षा अल्पाबेन संजय शाह आणि संदीप दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी, ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त सा...

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा – खऱ्या फळांचा स्वाद, कोणतीही अतिरिक्त साखर नाही आणि कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत • साखरयुक्त पेये आणि कोल्ड ड्रिंक्सला एक आरोग्यदायी पर्याय – नाश्ता, मधल्या वेळचा स्नॅक आणि इतर वेळांसाठी योग्य • नैसर्गिक पोषण, हायड्रेशन आणि अतिरिक्त साखर टाळू इच्छिणाऱ्या आरोग्य-जागरूक ग्राहकांसाठी उत्तम पेय मुंबई। भारताची अग्रगण्य नैसर्गिक आरोग्य व आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडचा लोकप्रिय पॅकेज्ड फळ रस ब्रँड ‘रियल’ आपल्या सजग पोषणाच्या बांधिलकीला अधिक बळकट करत ‘रियल अ‍ॅक्टिव्ह’ फळ रस सादर करत आहे — कोणतीही अतिरिक्त साखर नसलेला, चविष्ट आणि ताजेतवाने फळ रसांचा हा विशेष श्रेणी आहे. आजच्या काळात ग्राहक अधिक आरोग्यदायी जीवनशैलीच्या पर्यायांकडे वळत असताना, रियल अ‍ॅक्टिव्ह भारतात हायड्रेशनची नवी व्याख्या करत आहे. अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हशिवाय, रियल अ‍ॅक्टिव्ह खऱ्या फळांचे नैसर्गिक गुणधर्म देतो. त्यामुळे हा उन्हाळ्यात दिवसभरासाठी एक उत्तम साथीदार ठरतो — पौष्टिक नाश्त्यापासून ते मधल्या वेळच्या स्नॅकपर्यंत. “उन्हाळ्य...