सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मध्‍य मुंबईत पहिली ५जी-सक्षम प्रगत रूग्‍ण्‍वाहिका सेवा सुरू

रेड हेल्‍थ आणि डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम 

मुंबई। डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई आणि रेड हेल्‍थ यांच्या संयुक्त विद्यमाने मध्‍य मुंबईत पहिली ५जी-सक्षम अॅडवान्‍स्‍ड लाइफ सपोर्ट (एएलएस) रूग्‍णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या आपत्कालीन आरोग्यसेवेतील महत्वपूर्ण सेवेचे उदघाटन प्रदीप चव्हाण, पोलिस उपायुक्‍त, मुंबई (वाहतूक पूर्व विभाग) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेड हेल्‍थचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रभदीप सिंग, डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटलचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर कुलकर्णी आणि हॉस्पिटलचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. 

ही क्रांतिकारी 5G-सक्षम रुग्णवाहिका सेवा आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद तंत्रज्ञानामध्ये एक महत्त्वपूर्ण झेप आहे, जी मध्य मुंबईला पुढील पिढीच्या आरोग्यसेवा वितरणाच्या अग्रस्थानी नेते. या रुग्णवाहिकेत अत्याधुनिक ५जी कनेक्टिव्हिटीचा वापर केला जातो, ज्यामुळे रिअल-टाइम वैद्यकीय डेटा ट्रान्समिशन, रिमोट तज्ञ सल्लामसलत आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके व रुग्णालय सुविधांमध्‍ये विनासायास समन्‍वय शक्‍य होते.

मध्‍य मुंबईत सुरू करण्‍यात आलेल्‍या या पहिल्‍या ५जी-सक्षम प्रगत रूग्‍णवाहिका सेवेमधून आरोग्‍यसेवा नाविन्‍यतेमध्‍ये अग्रस्‍थानी असण्‍याप्रती शहराची कटिबद्धता दिसून येते. ही अत्‍याधुनिक आपत्‍कालीन प्रतिसाद यंत्रणा हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्‍यापूर्वीच्‍या केअरमध्‍ये अनपेक्षित क्षमतांची भर करते, ज्‍यामुळे आपत्‍कालीन स्थितीत महत्त्वपूर्ण वैद्यकीय हस्‍तक्षेप त्‍वरित सुरू होण्‍याची खात्री मिळते. ५जी तंत्रज्ञानामुळे तज्ञ डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधता येतो, ज्यामुळे गंभीर क्षणी रिअल-टाइम मार्गदर्शन मिळण्‍यासोबत‍ निर्णय घेता येतो.

रेड हेल्‍थचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रभदीप सिंग म्‍हणाले, “मुंबईच्या आपत्कालीन आरोग्यसेवेच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मध्य मुंबईत सुरू करण्‍यात आलेली पहिली ५जी-सक्षम अॅडवान्स्ड लाइफ सपोर्ट रूग्‍णवाहिका सेवा आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञानातील शक्तिशाली प्रगती आहे. दुर्दैवाने, कोणतीही वैद्यकीय आणीबाणी येते तेव्हा घाबरणे हा मानवी स्वभाव आहे. अशा परिस्थितीत काय करावे, कोणाला कॉल करायचा यासारखे मुलभूत निर्णय घेताना देखील व्‍यक्‍ती गोंधळून जातात. आता सुव्यवस्थित आपत्कालीन सेवा आपल्‍याला अत्‍यंत महत्त्वपूर्ण ‘गोल्‍डन अवर'चा योग्‍य उपयोग करण्‍याची प्रबळ संधी देतात, जेथे हे गोल्‍डन अवर कधी-कधी पुढील उपचारांचे यश किंवा अपयश ठरवते.''

डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटलचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर कुलकर्णी म्‍हणाले, “मध्य मुंबईत पहिली ५जी-सक्षम अॅडवान्‍स्‍ड लाइफ सपोर्ट रूग्‍णवाहिका सेवा सुरू करताना आम्हाला अभिमान वाटत आहे, जी आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्‍यामधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कधी-कधी वाहतूक कोंडीमुळे विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमध्‍ये पोहोचणे आव्‍हानात्‍मक ठरू शकते. वैद्यकीय आणीबाणीनंतचा काळ गोल्‍डन अवर मानला जातो, जो जीवनदायी वैद्यकीय किंवा शस्‍त्रक्रिया हस्‍तक्षेपासाठी अत्‍यंत महत्त्वाचा असतो. अशा गंभीर स्थितीमध्‍ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि रुग्णवाहिका पथकाने त्‍वरित केलेली कृती व्‍यक्‍तीचा जीव वाचवण्‍यामध्‍ये निर्णायक ठरू शकते. रुग्णवाहिकांमधील ही ५जी क्षमता रिअल-टाइम डेटा ट्रान्समिशन, दुरून देखरेख आणि रूग्‍णवाहिकेमधून हॉस्पिटलमध्‍ये जात असताना तज्ञांसोबत सल्लामसलत करण्याची सुविधा देईल. रुग्ण घरातून बाहेर पडल्यापासून निदान आणि उपचारांसाठी लागणारा वेळ कमी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. मध्य मुंबईतील रुग्ण आपत्कालीन परिस्थितीत आमच्यावर अवलंबून असतात. त्या गंभीर क्षणांमध्ये रुग्णांना आवश्यक असलेली त्वरित आणि प्रभावी केअर सेवा मिळावी, याची खात्री घेण्याचा आमचा प्रयत्‍न आहे.''

 प्रदीप चव्हाण, पोलिस उपायुक्‍त, मुंबई (वाहतूक पूर्व विभाग) म्‍हणाले, “डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल आणि रेड हेल्थ यांनी मध्य मुंबईत अद्वितीय पहिलीच ५जी-सक्षम रुग्णवाहिका सेवा सुरू करून प्रशंसनीय पाऊल उचलले आहे. ही प्रगत सेवा जलद आणि अधिक कार्यक्षम आपत्कालीन प्रतिसाद सुनिश्चित करून जनतेला फायदा व्हावा यासाठी डिझाइन केली आहे. रस्ते अपघातांसारख्या गंभीर परिस्थितीत रुग्णाला घटनास्थळापासून हॉस्पिटलमध्‍ये नेण्यासाठी लागणारा वेळ महत्त्वपूर्ण ठरू शकतो. अशी आधुनिक आणि सुसज्ज रुग्णवाहिका सेवा सुरू केल्याबद्दल मी डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल आणि रेड हेल्थ यांचे अभिनंदन करतो, ज्याचा नागरिकांना खूप फायदा होईल असा माझा विश्वास आहे.'' 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची एआय-आधारित ग्राहक सेवेसाठी भागीदारी

भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक असलेली टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी, सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून 24 तास ग्राहक सेवा आणि रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना उत्तर मिळण्याचा वेळ काहीकाही दिवसांवरून कमी होऊन 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच ईमेल उघडण्याचे प्रमाण 50–60% पर्यंत वाढले आहे. मुंबई। टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (टीआरआयएल) आणि जगातील नंबर 1 एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्सफोर्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. ग्राहकांना उत्तर देण्याचा वेळ काही दिवसांवरून कमी होऊन आता फक्त 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच कंपनी आता एकाच वेळी हजारो ग्राहकांशी सहज संपर्क साधू शकते.  असे गिरीश हड़कर (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड), अरुंधती भट्टाचार्य (प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया – ...

सॅमसंग आणि गुगलने दिली नवीन इंटेलिजेंट आयवेअरची पहिली झलक

मुंबई। सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड आणि गुगलने गुगल आय/ओ २०२६ मध्ये आयवेअर भागीदार जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्कर यांच्या सहयोगाने डिझाइन केलेल्‍या दोन प्रीमियम मॉडेल्सची पहिली झलक दाखवत नवीन इंटेलिजेंट आयवेअरचे अनावरण केले. मोबाइल फोनसाठी सहयोगी डिवाईस म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले हे नवीन आयवेअर वापरकर्त्‍यांना आवाजाच्या संवादाद्वारे मदत मिळवण्यास आणि त्यांच्या फोनशी विनासायासपणे जोडले जाण्यास सक्षम करते, जेथे ही सुविधा नेहमीच्या चष्म्याच्या रचनेत मिळते. आयवेअर भागीदारांसह सह-निर्मित केलेले हे इंटेलिजेंट आयवेअर क्रांतिकारी एआय क्षमतांना आराम आणि शैलीसोबत एकत्र आणते, ज्यामध्ये सॅमसंगचे हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील अग्रस्थान आणि गुगलचे एआय तंत्रज्ञान प्रीमियम आयवेअर डिझाइनशी जोडले गेले आहे. प्रत्येक आयवेअर ब्रँड या डिवाईसला वेगळा डिझाइन दृष्टिकोन देतो. फॅशन आयवेअरमधील आपल्या परंपरेसाठी प्रसिद्ध असलेले जेंटल मॉन्स्टर हे नाविन्यपूर्ण तरीही सुबक शैली सादर करते, तर वॉर्बी पार्कर परिष्कृत आणि चिरंतन डिझाइन्सचे प्रदर्शन करते. वापरकर्त्‍यांच्‍या सोबतीने रिअल टाइममध्ये ...

कर्करोग वगळता इतर शारीरिक व्याधी असलेल्या वृद्ध व्यक्तींना सदभावना वृद्धाश्रममध्ये मोफत प्रवेश मिळेल

मुंबई। जगातील सर्वात मोठे मोफत सदभावना वृद्धाश्रम, विनूभाई बाचूभाई नगरेचा येथील नवीन परिसरात, निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना आयुष्यभर पूर्णपणे मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये ७ टॉवर्समधील प्रत्येक टॉवरमध्ये ११ मजले असतील, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला पुरेशी जागा आणि काळजी मिळेल. तसेच, जैन समाजातील वृद्धांसाठी एक संपूर्ण टॉवर वेगळा बनवण्यात आला आहे, जिथे एक मंदिरही बांधण्यात आले आहे. ‘विनूभाई बाचूभाई नगरेचा परिसर’ येथील सदभावना वृद्धाश्रम २० लाख चौरस फूट बांधकामाचे आहे. ५०० कोटी रुपये खर्च करून, १४०० खोल्यांमध्ये ५००० निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची सोय केली जाईल. वृद्धाश्रम ही केवळ भारतीय संस्कृतीच नाही, तर आजच्या कलियुगाची गरज आहे. दुर्दैवाने, संयुक्त कुटुंब पद्धती मोडीत निघत असल्यामुळे अनेक लोक असहाय्य होत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून राजकोटमध्ये 'विनुभाई बचूभाई नगरेचा परिसर' सदभावना वृद्धाश्रम चालवले जात आहे. या वृद्धाश्रमात जात किंवा धर्माचा कोणताही भेदभाव न करता, गरजू वृद्धांना नियमांनुसार आणि संस्थेच्या प्रवे...