सीधे मुख्य सामग्री पर जाएं

निवा बूपा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची अधिकृत आरोग्य विमा प्रमुख भागीदार

मुंबई। निवा बूपा हेल्थ इन्शुरन्सने ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची अधिकृत आरोग्य विमा प्रमुख भागीदारम्हणून आपली भागीदारी जाहीर केली. या भागीदारीचे औचित्य साधून कंपनीने 'सेटबॅक से कमबॅक तक' ही ब्रँड मोहीम सादर केली, जी आरोग्याच्या संकटांवर मात करून अधिक सामर्थ्याने परतणाऱ्या व्यक्तींच्या जिद्दीचा गौरव करते. ही मोहीम जिद्द, पुनर्प्राप्ती आणि सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन देण्याच्या निवा बूपाच्या बांधीलकीला अधिक दृढ करते.

या मोहिमेत भारताच्या दोन सर्वात प्रतिष्ठित क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे—सायना नेहवाल, ऑलिम्पिक पदक विजेती, माजी जागतिक क्रमवारीत नंबर १ बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती, आणि मीराबाई चानू, ऑलिम्पिक पदक विजेती, विश्वविजेती आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती. त्यांच्या अत्यंत वैयक्तिक प्रवासांतून ही मोहीम आपला मध्यवर्ती संदेश जिवंत करत आहे: संकटे चॅम्पियन्सची परीक्षा घेऊ शकतात, पण ती त्यांची व्याख्या ठरवू शकत नाहीत. हीच जिद्द निवा बूपा दररोज अनुभवते. गेल्या पाच आर्थिक वर्षांत 37 लाखांहून अधिक दाव्यांद्वारे सुमारे १४,००० कोटी रुपयांची मदत करत कंपनीने लाखो भारतीयांना आरोग्य संकटांतून सावरून स्वतःच्या कमबॅकच्या कहाण्या लिहिताना साथ दिली आहे.

निवा बूपा हेल्थ इन्शुरन्सचे डायरेक्टर – डिजिटल बिझनेस युनिट आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर निमिष अग्रवाल म्हणाले, "ग्लासगो 2026 ची अधिकृत आरोग्य विमा प्रमुख भागीदार म्हणून आमची भागीदारी निवा बूपा ज्यासाठी उभी आहे तेच दर्शवते—आरोग्य संकटानंतर अधिक सामर्थ्याने परतण्याचा आत्मविश्वास: जिंदगी को क्लेम कर ले. ग्लासगोमध्ये स्पर्धा करणाऱ्या प्रत्येक खेळाडूने संकटांवर मात केली आहे—दुखापत, पराभव किंवा आत्मशंकेचे क्षण. पदक हे केवळ शेवटचे प्रकरण आहे; खरी कहाणी संकटात, आरोग्यपुनर्प्राप्तीत आणि अधिक सामर्थ्याने परतण्याच्या निर्धारात आहे. याच जिद्दीचा आम्ही गौरव करतो. दररोज आम्ही आमच्या ग्राहकांच्या आयुष्यात हीच जिद्द पाहतो, जे मोठ्या शस्त्रक्रिया, अपघात आणि गंभीर आजारांवर मात करून त्यांच्या प्रिय व्यक्तींकडे आणि महत्त्वाच्या क्षणांकडे परततात. 'सेटबॅक से कमबॅक तक' या मोहिमेद्वारे आम्ही या प्रेरणादायी प्रवासांचा गौरव करतो आणि आमचा विश्वास पुन्हा व्यक्त करतो की दर्जेदार आरोग्यसेवा आणि योग्य पाठबळ देणारी आधार व्यवस्था लोकांना आत्मविश्वासाने सावरण्याचे आणि आपले आयुष्य पुन्हा मिळवण्याचे बळ देते."

ऑलिम्पिक पदक विजेती आणि माजी जागतिक नंबर १ बॅडमिंटनपटू सायना नेहवाल म्हणाली, "लोकांना अनेकदा पदके आणि विजय आठवतात, पण प्रत्येक खेळाडूला माहीत असते की सर्वात कठीण लढाया प्रकाशझोतापासून दूर लढल्या जातात. दुखापती केवळ तुमच्या शरीराचीच नव्हे तर तुमच्या आत्मविश्वासाची आणि संयमाचीही परीक्षा घेतात. पुनर्प्राप्तीसाठी शिस्त, विश्वास आणि तुमच्या भोवती योग्य आधार लागतो. म्हणूनच ही मोहीम माझ्या मनाला खोलवर भिडते—ती लोकांना आठवण करून देते की प्रत्येक कमबॅकची सुरुवात कोर्टवर परतण्याच्या खूप आधी होते. खऱ्या विजेत्यांची जडणघडण आरोग्यपुनर्प्राप्तीच्या (बुनर्बलनाच्या) प्रक्रियेतच होते."

ही मोहीम अशा खेळाडूंच्या अनुभवांवर आधारित आहे, ज्यांची कारकीर्द दर्शवते की संकटे आणि आरोग्यपुनर्प्राप्ती हे सातत्यपूर्ण कामगिरीचे अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या प्रवासांतून निवा बूपा आरोग्यसज्जता आणि पुनर्प्राप्ती यांविषयीच्या चर्चा क्रीडाविश्वापलीकडेही अधिक समर्पक आणि जवळच्या वाटतील असा प्रयत्न करत आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

३,१०० भगिनींनी गौरीशंकर चौबे यांच्यासोबत राखी बांधून आणि संरक्षणाची शपथ घेऊन रक्षाबंधन साजरे केले

मुंबई। दरवर्षीप्रमाणे, द्वारिकामाई चॅरिटी संस्थाने दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मालाड पूर्व येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त एका भव्य 'रक्षा शक्ती सन्मान' सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार, आचार्य पवन त्रिपाठी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी, सुमारे ३,१०० भगिनींनी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, गौरीशंकर चौबे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या सोहळ्यादरम्यान, गौरीशंकर चौबे म्हणाले की, रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर भगिनींशी मनापासून जोडले जाण्याचा आणि त्यांचा आदर व संरक्षण करण्याची शपथ घेण्याचा एक पवित्र प्रसंग आहे. ते म्हणाले की, बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद ही समाजसेवेसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे केल्याने प्रचंड आनंद आणि आपलेपणाची भावना अनुभवता आली. राखी बांधल्यानंतर, गौरीशंकर चौबे यांनी सर्व बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देत, त्यांना सर्वतोपरी संरक्षण, सन्मान आणि पाठ...

'आर्ट डेको डिझाइन'च्या शताब्दीनिमित्त मुंबईत ट्विन-सिटी फेस्टिव्हल

'आर्ट डेको डिझाइन'च्या शताब्दीनिमित्त मुंबईत ट्विन-सिटी फेस्टिव्हल ७ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात महोत्सव मुंबई। आर्किटेक्चर आणि डिझाइन क्षेत्रातील 'आर्ट डेको'च्या प्रवासाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने (शताब्दी) मियामी आणि मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्याच ट्विन-सिटी महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री आशीष शेलार आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी 'आर्ट डेको अलाइव्ह'च्या संस्थापक स्मिति कनोडिया आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि संचालक तसनीम मेहता उपस्थित होत्या. ऑक्टोबरमध्ये मियामीत 'आर्ट डेको अलाइव्ह!'चा महोत्सव पार पडला होता. आता यानंतर मुंबईत या महोत्सवाची पहिली आवृत्ती ७ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विविध ठिकाणी पार पडणार आहे.  राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री आशीष शेलार म्हणाले, ''आर्ट डेको अलाइव्ह! आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रह...

लोणावळ्यात अमावी सोबत सुरु केले 'ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज'

ताजचे लक्झरी ब्रँडेड व्हिला क्षेत्रात पदार्पण मुंबई । भारतामधील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने महाराष्ट्रातील लोणावळा येथे ' ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज' सुरू करण्याची घोषणा केली. देशातील एकमेव हॉस्पिटॅलिटीवर केंद्रित, रिअल इस्टेट ब्रँड 'अमावी' च्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या या प्रोजेक्टसाठी ताजने लक्झरी ब्रँडेड व्हिला सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान असलेले लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात पसंतीच्या आणि प्रतिष्ठित पर्यटन स्थळांपैकी एक आहे. नयनरम्य दऱ्या, तलाव आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे हिल स्टेशन सातत्याने वेलनेस हव्या असणाऱ्यांना आकर्षित करत आहेत. पुनीत छटवाल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएचसीएल म्हणाले,“शंभर वर्षांहून अधिक काळापासून, ताजने आपले भव्य राजवाडे, ऐतिहासिक सिटी हॉटेल्स, सफारी आणि रेसिडेन्सेसच्या माध्यमातून लक्झरी हॉस्पिटॅलिटी नवनवीन व्याख्या रचली आहे. जगातील सर्वात मजबूत लक्झरी हॉटेल ब्रँड आणि भारतातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून ओळखला जाणारा ...