सीधे मुख्य सामग्री पर जाएं

३५०० हून अधिक सहभागींसह ‘मुंबईहॅक्‍स २०२५’ चे यशस्वी आयोजन

जगातील सर्वात मोठी एजेंटिक एआय हॅकेथॉन बनली 

मुंबई: मुंबईतील नेस्‍को येथे इतिहास रचण्‍यात आला. टेक आंत्रेप्रीन्‍युअर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीईएएम) आणि शहरातील तंत्रज्ञान परिसंस्‍था प्रबळ करण्‍याचा मनसुबा असलेला ना-नफा तत्त्वावर आधारित उपक्रम मेड इन मुंबई यांनी मुंबईहॅक्‍स २०२५ चे आयोजन केले. स्‍वत:चा विक्रम मोडून काढत हा इव्‍हेण्‍ट जागतिक स्‍तरावर सर्वात मोठा एजेंटिक एआय हॅकेथॉन बनला आहे. या इव्‍हेण्‍टची व्‍याप्‍ती व महत्त्वाकांक्षेमधून भारतातील एआय इनोव्‍हेशन हब म्‍हणून मुंबईचा वाढता दर्जा दिसून आला. आघाडीची जागतिक तंत्रज्ञान कंपनी एचसीएलटेकने हा इव्‍हेण्‍ट सादर केला होता.

नाविन्‍यतेला नव्‍या उंचीवर नेलेल्‍या तीन विजेत्‍या टीम्‍समध्‍ये १ कोटी रूपयांचे रोख पारितोषिक आणि रिवॉर्ड्स विभागण्‍यात आले. दर्शन खापेकर, श्रावणी रासम, आदिल शाल व अल्फिया सिद्दीक (हेल्थटेक); हिमांशू शर्मा व हेमिश जैन (फिनटेक); आणि सेजल चौधरी, सुप्रिया नायक, शांभवी पाटील व आकृती सिंग (मिसइन्‍फॉर्मेशन) यांचा सर्व महिलांचा समूह. हे सर्व त्‍यांच्‍या संबंधित क्षेत्रांमध्‍ये अपवादात्‍मक कौशल्‍य दाखवत आहेत.

या दोन-दिवसीय उत्‍साहवर्धक इव्‍हेण्‍टमध्‍ये एचसीएलटेक टायटल स्‍पॉन्‍सर होते, तर बँकिंग सहयोगी आयडीएफसी फर्स्‍ट बँकेने त्‍यांचे एमडी व सीईओ वैद्यनाथन यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत आपली सक्रिय भूमिका दाखवली. ३,५०० हून अधिक नवप्रवर्तक, तसेच ९०० महिलांच्‍या उल्‍लेखनीय समूहाने (२७ टक्‍के सहभागी) या इव्‍हेण्‍टमध्‍ये सहभाग घेतला, जेथे त्‍यांनी एआयच्‍या मर्यादांना दूर करण्‍याचा, तसेच फिनटेक, हेल्‍थटेक व मिसइन्‍फॉर्मेशन डिटेक्‍शन या तीन ट्रॅक्‍समध्‍ये उल्‍लेखनीय सोल्‍यूशन्‍स शोधण्‍याचा प्रयत्‍न केला. या इव्‍हेण्‍टमध्‍ये प्रेरणेची भर करत उद्योगांमधील उद्योजकांनी मार्गदर्शकांची भूमिका बजावली, दिवसरात्र सहभागींना प्रशिक्षित केले, तज्ञ मार्गदर्शन व पाठिंबा दिला आणि फायनालिस्‍ट्सना शॉर्टलिस्‍ट करण्‍यामध्‍ये मदत केली. 

तंत्रज्ञानामध्‍ये महिलांसाठी नवीन महत्त्वपूर्ण टप्‍पा स्‍थापित करत मुंबईतील सर्व महिला असलेल्‍या टीमने मिसइन्‍फॉर्मेशन ट्रॅकमध्‍ये विजय मिळवला, ज्‍यामधून भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचे वाढते नेतृत्‍व दिसून येते. या उल्‍लेखनीय इव्‍हेण्‍टने निदर्शनास आणले की¸ भारतातील हुशार व्‍यक्‍तींना एका दृष्टिकोनासह एकत्र आणले तर अशक्‍य देखील शक्‍य होते आणि तो दृष्टिकोन म्‍हणजे तंत्रज्ञानामध्‍ये क्रांती घडवून आणणे.

इव्‍हेण्‍टमध्‍ये निर्णायक क्षण ठरलेल्‍या अनपेक्षित पुढाकारामध्‍ये आयडीएफसी फर्स्‍ट बँकेचे एमडी व सीईओ श्री. वैद्यनाथन सहभागींची आवड व पुढाकार पाहून प्रभावित झाले आणि त्‍यांनी स्‍वत: मंचावरच टॉप १०० टीम्‍सना प्रति सदस्य ३,००० रुपयांचे व्हाउचर देण्याची घोषणा केली. या पुरस्‍काराने टॉप १० टक्‍के सहभागींना प्रशंसित केले, ज्‍यामधून इव्‍हेण्‍टचा स्‍पर्धात्‍मक उत्‍साह आणि नाविन्‍यतेला चालना देण्‍यासोबत तंत्रज्ञान उद्योजकांच्‍या भावी पिढीला पाठिंबा देण्‍याप्रती आयडीएफसी फर्स्‍ट बँकेची दृढ कटिबद्धता दिसून येते.

''मुंबईहॅक्‍स हॅकेथॉनमधून चळवळीमध्‍ये बदलली आहे, जी भारतातील एआय राजधानी म्‍हणून मुंबईच्‍या ओळखला आकार देत आहे,'' असे आयोजक विवेक खेमानी म्‍हणाले. ''सर्वात मोठा एजेंटिक एआय इव्‍हेण्‍ट, तसेच वास्‍तविक विश्वातील आव्‍हानांचे निराकरण करणारे सोल्‍यूशन्‍स निर्माण करणाऱ्या अपवादात्‍मक टॅलेंटना पाहून नाविन्‍यता प्रगत होणारी परिसंस्‍था घडवण्‍याप्रती आमचे मिशन अधिक प्रबळ झाले आहे. आमचे नेक्‍स्‍ट-जनरेशन टेक प्रोफेशनल्‍स निश्चितच जागतिक ट्रेलब्‍लेझर्स बनण्‍यास सज्‍ज आहेत. सर्व विजेत्‍यांचे त्‍यांच्‍या दूरदर्शी सोल्‍यूशन्‍ससाठी अभिनंदन.''


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची एआय-आधारित ग्राहक सेवेसाठी भागीदारी

भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक असलेली टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी, सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून 24 तास ग्राहक सेवा आणि रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना उत्तर मिळण्याचा वेळ काहीकाही दिवसांवरून कमी होऊन 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच ईमेल उघडण्याचे प्रमाण 50–60% पर्यंत वाढले आहे. मुंबई। टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (टीआरआयएल) आणि जगातील नंबर 1 एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्सफोर्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. ग्राहकांना उत्तर देण्याचा वेळ काही दिवसांवरून कमी होऊन आता फक्त 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच कंपनी आता एकाच वेळी हजारो ग्राहकांशी सहज संपर्क साधू शकते.  असे गिरीश हड़कर (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड), अरुंधती भट्टाचार्य (प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया – ...

सॅमसंग आणि गुगलने दिली नवीन इंटेलिजेंट आयवेअरची पहिली झलक

मुंबई। सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड आणि गुगलने गुगल आय/ओ २०२६ मध्ये आयवेअर भागीदार जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्कर यांच्या सहयोगाने डिझाइन केलेल्‍या दोन प्रीमियम मॉडेल्सची पहिली झलक दाखवत नवीन इंटेलिजेंट आयवेअरचे अनावरण केले. मोबाइल फोनसाठी सहयोगी डिवाईस म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले हे नवीन आयवेअर वापरकर्त्‍यांना आवाजाच्या संवादाद्वारे मदत मिळवण्यास आणि त्यांच्या फोनशी विनासायासपणे जोडले जाण्यास सक्षम करते, जेथे ही सुविधा नेहमीच्या चष्म्याच्या रचनेत मिळते. आयवेअर भागीदारांसह सह-निर्मित केलेले हे इंटेलिजेंट आयवेअर क्रांतिकारी एआय क्षमतांना आराम आणि शैलीसोबत एकत्र आणते, ज्यामध्ये सॅमसंगचे हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील अग्रस्थान आणि गुगलचे एआय तंत्रज्ञान प्रीमियम आयवेअर डिझाइनशी जोडले गेले आहे. प्रत्येक आयवेअर ब्रँड या डिवाईसला वेगळा डिझाइन दृष्टिकोन देतो. फॅशन आयवेअरमधील आपल्या परंपरेसाठी प्रसिद्ध असलेले जेंटल मॉन्स्टर हे नाविन्यपूर्ण तरीही सुबक शैली सादर करते, तर वॉर्बी पार्कर परिष्कृत आणि चिरंतन डिझाइन्सचे प्रदर्शन करते. वापरकर्त्‍यांच्‍या सोबतीने रिअल टाइममध्ये ...

कर्करोग वगळता इतर शारीरिक व्याधी असलेल्या वृद्ध व्यक्तींना सदभावना वृद्धाश्रममध्ये मोफत प्रवेश मिळेल

मुंबई। जगातील सर्वात मोठे मोफत सदभावना वृद्धाश्रम, विनूभाई बाचूभाई नगरेचा येथील नवीन परिसरात, निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना आयुष्यभर पूर्णपणे मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये ७ टॉवर्समधील प्रत्येक टॉवरमध्ये ११ मजले असतील, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला पुरेशी जागा आणि काळजी मिळेल. तसेच, जैन समाजातील वृद्धांसाठी एक संपूर्ण टॉवर वेगळा बनवण्यात आला आहे, जिथे एक मंदिरही बांधण्यात आले आहे. ‘विनूभाई बाचूभाई नगरेचा परिसर’ येथील सदभावना वृद्धाश्रम २० लाख चौरस फूट बांधकामाचे आहे. ५०० कोटी रुपये खर्च करून, १४०० खोल्यांमध्ये ५००० निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची सोय केली जाईल. वृद्धाश्रम ही केवळ भारतीय संस्कृतीच नाही, तर आजच्या कलियुगाची गरज आहे. दुर्दैवाने, संयुक्त कुटुंब पद्धती मोडीत निघत असल्यामुळे अनेक लोक असहाय्य होत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून राजकोटमध्ये 'विनुभाई बचूभाई नगरेचा परिसर' सदभावना वृद्धाश्रम चालवले जात आहे. या वृद्धाश्रमात जात किंवा धर्माचा कोणताही भेदभाव न करता, गरजू वृद्धांना नियमांनुसार आणि संस्थेच्या प्रवे...