सीधे मुख्य सामग्री पर जाएं

भारतातील २ ते ५ टक्‍के व्‍यक्‍ती हायपरहायड्रोसिसने पीडित

जसलोक हॉस्पिटलमध्ये प्रगत व्‍हीएटीएस शस्त्रक्रियेने यशस्वी उपचार 

मुंबई। जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने पाल्मर हायपरहायड्रोसिसने पीडित आधी एअरहोस्टेस म्हणून काम केलेल्या तरुणीवर बायलॅटरल थोरॅकोस्कोपिक सिम्पॅथेक्टॉमी (व्‍हीएटीएस)च्‍या माध्‍यमातून यशस्वीरित्या उपचार केले. ही सुरक्षित, किमान इन्‍वेसिव्‍ह, डे-केअर शस्‍त्रक्रिया आहे, ज्‍यामधून त्‍वरित परिणाम मिळतात.

भारतातील २ ते ५ टक्‍के व्‍यक्‍ती हायपरहायड्रोसिसने पीडित असण्‍याचा अंदाज आहे. असे असताना देखील या स्थितीबाबत जागरूकतेचा अभाव आहे. परिणामत: अनेक व्‍यक्‍तींना या वैद्यकीय स्थितीबाबत माहित नाही आणि ते नकळतपणे आजार सहन करतात. वेळेवर उपचार न केल्‍यास या आजाराचा दैनंदिन काम, मानसिक आरोग्‍य आणि व्‍यावसायिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. 

या महिला रुग्णाला किशोरावस्थेपासून लक्षणे जाणवत होती आणि गेल्या काही वर्षांपासून तिने अनेक वैद्यकीय उपचार देखील केले, पण त्‍यामधून हा आजार कायमसाठी बरा झाला नाही. या आजारामुळे तिला तिची नोकरी सोडावी लागली, तसेच तिच्‍या मानसिक आरोग्‍यावर परिणाम होण्‍यासोबत मनोबल कमी झाले.

डॉ. विमेश राजपूत, कन्‍सल्‍टण्‍ट, थोरॅसिस सर्जरी यानी महिला रूग्‍णावर बायलॅटरल थोरॅसिस्‍कोपिक सिम्‍पॅथेक्‍टोमी (व्‍हीएटीएस) प्रक्रिया केली. डॉ. सावी कपिला, कन्‍सल्‍टण्‍ट, अॅनेस्‍थेसियोलॉजी यांनी कुशलपणे अनेस्‍थेसियाचे व्‍यवस्‍थापन केले. या एक तासाच्‍या शस्‍त्रक्रियेमध्‍ये हातांना जास्‍त घाम येण्‍यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सिम्‍पॅथेटिक नसांना प्रतिबंध केला जातो.

हायपरहायड्रोसिस सामान्य आजार नसून शारीरिक अक्षमता आणणारा आजार आहे, जो रूग्‍णांना समाजापासून वेगळे करू शकतो, त्‍यांच्‍यामध्‍ये चिंता व नैराश्‍य आणू शकतो,'' असे जसलोक हॉस्पिटलमधील थोरॅसिस सर्जन डॉ. विमेश राजपूत म्‍हणाले. “पण चिंताजनक बाब म्‍हणजे या आजारावर निश्चित, सुरक्षित उपचार उपलब्‍ध असताना देखील आजाराबाबत जागरूकता कमी प्रमाणात आहे.'' 

या प्रक्रियेच्‍या परिणामकारकतेवर भर देत ते पुढे म्‍हणाले, ही किमान इन्‍वेसिव्‍ह, डे-केअर शस्‍त्रक्रिया आहे. वर्षानुवर्षे त्रास होत असलेल्‍या या आजारासह रूग्‍ण हॉस्पिटलमध्‍ये येतात त्‍याच दिवशी शस्‍त्रक्रियेसह बरे होऊन डिस्‍चार्ज दिला जातो. या शस्‍त्रक्रियेचे परिणाम सर्वोत्तम, दीर्घकालीन आणि जीवनाला कलाटणी देणारे असतात.''

डॉ. राजपूत यांनी देखील लवकर सल्‍लामसलत व हस्‍तक्षेपाच्‍या महत्त्वाला निदर्शनास आणले, अनेक रूग्‍ण अधिक प्रमाणात येणाऱ्या घामाकडे दुर्लक्ष करतात, त्‍यांना ते सामान्‍य असल्‍यासारखे वाटते. पण काळासह या आजारामुळे त्‍यांचा आत्‍मविश्वास कमी होतो, समाजामध्‍ये उपस्थिती कमी होते आणि मानसिक आरोग्‍यावर परिणाम होतो. लवकर निदान आणि वेळेवर शस्‍त्रक्रिया उपचारामुळे आजारामधून पूर्णपणे बरे होण्‍यासोबत जीवनाचा दर्जा सुधारू शकतो.'' 

शस्‍त्रक्रियेनंतर महिला रूग्‍णाला लक्षणे त्‍वरित व पूर्णपणे बरी झाल्‍याचे जाणवले, ज्‍यासह ती भिती, संकोच व अस्‍वस्‍थतेला दूर करत पुन्‍हा सामान्‍य दैनंदिन काम करू लागली.

या केसबाबत मत व्‍यक्‍त करत जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्‍हणाले, “हायपरहायड्रोसिसचे योग्‍य निदान होणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. व्‍हीएटीएस सिम्‍पॅथेक्‍टोमी सारख्‍या किमान इन्‍वेसिव्‍ह, शॉर्ट-स्‍टे प्रक्रिया त्‍वरित आराम देऊ शकतात आणि रूग्‍णांचा आत्‍मविश्वास वाढवू शकतात. याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करणे आवश्‍यक आहे, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींना या आजारावर उपचार करता येऊ शकतो हे समजेल आणि वेळेवर वैद्यकीय हस्‍तक्षेप होऊ शकतो. जसलोक हॉस्पिटलमधील वैद्यकीय उत्‍कृष्‍टता सर्व प्रकारच्‍या आजारांचे जागतिक दर्जाच्‍या केअरसह सर्वसमावेशक व्‍यवस्‍थापन करण्‍याची खात्री देते.'' 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची एआय-आधारित ग्राहक सेवेसाठी भागीदारी

भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक असलेली टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी, सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून 24 तास ग्राहक सेवा आणि रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना उत्तर मिळण्याचा वेळ काहीकाही दिवसांवरून कमी होऊन 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच ईमेल उघडण्याचे प्रमाण 50–60% पर्यंत वाढले आहे. मुंबई। टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (टीआरआयएल) आणि जगातील नंबर 1 एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्सफोर्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. ग्राहकांना उत्तर देण्याचा वेळ काही दिवसांवरून कमी होऊन आता फक्त 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच कंपनी आता एकाच वेळी हजारो ग्राहकांशी सहज संपर्क साधू शकते.  असे गिरीश हड़कर (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड), अरुंधती भट्टाचार्य (प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया – ...

सॅमसंग आणि गुगलने दिली नवीन इंटेलिजेंट आयवेअरची पहिली झलक

मुंबई। सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड आणि गुगलने गुगल आय/ओ २०२६ मध्ये आयवेअर भागीदार जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्कर यांच्या सहयोगाने डिझाइन केलेल्‍या दोन प्रीमियम मॉडेल्सची पहिली झलक दाखवत नवीन इंटेलिजेंट आयवेअरचे अनावरण केले. मोबाइल फोनसाठी सहयोगी डिवाईस म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले हे नवीन आयवेअर वापरकर्त्‍यांना आवाजाच्या संवादाद्वारे मदत मिळवण्यास आणि त्यांच्या फोनशी विनासायासपणे जोडले जाण्यास सक्षम करते, जेथे ही सुविधा नेहमीच्या चष्म्याच्या रचनेत मिळते. आयवेअर भागीदारांसह सह-निर्मित केलेले हे इंटेलिजेंट आयवेअर क्रांतिकारी एआय क्षमतांना आराम आणि शैलीसोबत एकत्र आणते, ज्यामध्ये सॅमसंगचे हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील अग्रस्थान आणि गुगलचे एआय तंत्रज्ञान प्रीमियम आयवेअर डिझाइनशी जोडले गेले आहे. प्रत्येक आयवेअर ब्रँड या डिवाईसला वेगळा डिझाइन दृष्टिकोन देतो. फॅशन आयवेअरमधील आपल्या परंपरेसाठी प्रसिद्ध असलेले जेंटल मॉन्स्टर हे नाविन्यपूर्ण तरीही सुबक शैली सादर करते, तर वॉर्बी पार्कर परिष्कृत आणि चिरंतन डिझाइन्सचे प्रदर्शन करते. वापरकर्त्‍यांच्‍या सोबतीने रिअल टाइममध्ये ...

कर्करोग वगळता इतर शारीरिक व्याधी असलेल्या वृद्ध व्यक्तींना सदभावना वृद्धाश्रममध्ये मोफत प्रवेश मिळेल

मुंबई। जगातील सर्वात मोठे मोफत सदभावना वृद्धाश्रम, विनूभाई बाचूभाई नगरेचा येथील नवीन परिसरात, निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना आयुष्यभर पूर्णपणे मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये ७ टॉवर्समधील प्रत्येक टॉवरमध्ये ११ मजले असतील, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला पुरेशी जागा आणि काळजी मिळेल. तसेच, जैन समाजातील वृद्धांसाठी एक संपूर्ण टॉवर वेगळा बनवण्यात आला आहे, जिथे एक मंदिरही बांधण्यात आले आहे. ‘विनूभाई बाचूभाई नगरेचा परिसर’ येथील सदभावना वृद्धाश्रम २० लाख चौरस फूट बांधकामाचे आहे. ५०० कोटी रुपये खर्च करून, १४०० खोल्यांमध्ये ५००० निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची सोय केली जाईल. वृद्धाश्रम ही केवळ भारतीय संस्कृतीच नाही, तर आजच्या कलियुगाची गरज आहे. दुर्दैवाने, संयुक्त कुटुंब पद्धती मोडीत निघत असल्यामुळे अनेक लोक असहाय्य होत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून राजकोटमध्ये 'विनुभाई बचूभाई नगरेचा परिसर' सदभावना वृद्धाश्रम चालवले जात आहे. या वृद्धाश्रमात जात किंवा धर्माचा कोणताही भेदभाव न करता, गरजू वृद्धांना नियमांनुसार आणि संस्थेच्या प्रवे...