सीधे मुख्य सामग्री पर जाएं

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाचे उद्घाटन

मलाबार ग्रुप केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज मोफत पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणार

मुंबई। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील कांदिवली पूर्व येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र (ABVKVK) येथे मलाबार ग्रुपच्या ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाचे उद्घाटन केले. हा उपक्रम युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि भविष्यातील रोजगार संधींना बळकटी देण्यासाठी पोषणाच्या महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो. या उपक्रमाअंतर्गत, मलाबार ग्रुप केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज १०० पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणार आहे. यामुळे त्यांच्या आरोग्य आणि कल्याणाला आधार मिळेल तसेच ते व्यावसायिक प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, करिअर विकास आणि भविष्यातील रोजगार संधींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतील.

हा उपक्रम मलाबार ग्रुपच्या हंगर फ्री वर्ल्ड कार्यक्रमाचा एक भाग आहे, जो समूहाच्या प्रमुख कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांपैकी एक असून, भूक निर्मूलन आणि वंचित समुदायांना पोषणाची उपलब्धता वाढविण्यावर केंद्रित आहे. हंगर फ्री वर्ल्ड सध्या भारतासह विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये दररोज एक लाखाहून अधिक जेवणांचे वितरण करते, जे भूक निर्मूलन आणि समाजकल्याणासाठी समूहाची सातत्यपूर्ण बांधिलकी दर्शवते.समूहाने नुकतीच आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ₹२०० कोटींच्या CSR निधीची घोषणा केली आहे.

पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणाले,"युवकांना सक्षम बनविण्यासाठी आणि त्यांना अर्थपूर्ण रोजगारासाठी तयार करण्यासाठी कौशल्य विकासाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. पोषणासारख्या मूलभूत गरजांद्वारे विद्यार्थ्यांना आधार देणारे उपक्रम त्यांना शिक्षण आणि वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यास मोठी मदत करू शकतात. अशा प्रकारचे सहकार्यपूर्ण प्रयत्न युवक विकास आणि रोजगारक्षमता वाढविणाऱ्या सक्षम परिसंस्थेच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देतात."

एम.पी.अहमद, अध्यक्ष, मलाबार ग्रुप म्हणाले,"पोषण आणि शिक्षण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. सक्षम शिक्षण व्यवस्थेसाठी दर्जेदार प्रशिक्षणासाठी पुरेशा पोषणाची उपलब्धताही आवश्यक आहे. ‘हंगर फ्री वर्ल्ड’ च्या माध्यमातून आम्ही ही मूलभूत गरज पूर्ण करण्याचा आणि व्यक्तींना आत्मनिर्भरता व आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने त्यांच्या प्रवासात मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारचे उपक्रम पोषण, कौशल्य विकास आणि सामुदायिक सहकार्य यांच्या माध्यमातून युवकांसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करू शकतात आणि दीर्घकालीन सामाजिक विकासाला चालना देऊ शकतात."

श्री पीयूष गोयल यांच्या दूरदृष्टीतून स्थापन करण्यात आलेले अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र हे युवकांसाठी एक महत्त्वपूर्ण कौशल्य विकास केंद्र म्हणून कार्यरत आहे. हे केंद्र व्यावसायिक प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन आणि रोजगार सहाय्य उपलब्ध करून देत असून युवकांची रोजगारक्षमता वाढविण्यास आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यास मदत करते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

ऐतिहासिक नॉर्वे दौरा : भारताच्या गुंतवणूक आणि औद्योगिक भागीदारीला नवी ताकद

ओस्लो। ओस्लो येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत-नॉर्वे बिझनेस अँड रिसर्च समिटने द्विपक्षीय आर्थिक सहकार्याचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. भारत आणि नॉर्वेतील उद्योग नेते, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणणाऱ्या या परिषदेमुळे हरित ऊर्जा, उच्च-मूल्य उत्पादन, तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणावरील औद्योगिक गुंतवणुकीसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिषदेत भारत-EFTA व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (TEPA) प्रभावीपणे राबविण्यावर विशेष भर देण्यात आला. या कराराद्वारे भारतात सुमारे १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या भारतीय उद्योग नेत्यांमध्ये वेल्थ मेहता इक्विटीज प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि प्लस५००शी संलग्न असलेले रजत मेहता यांचा समावेश होता. वित्तीय सेवा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत त्यांनी गुंतवणूक संधी, शाश्वत वित्तीय व्यवस्था आणि भारत-नॉर्डिक आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासंबंधी चर्चांमध्ये सहभाग घेतला. राजगीर जेम्...

कॉईनडीसीएक्सने ‘सतर्क रहे’ सायबर सुरक्षा जनजागृती मोहिम सुरू केली

मुंबई। भारतातील सर्वात मोठी क्रिप्टो एक्स्चेंज कंपनी कॉईनडीसीएक्सने ‘सतर्क रहे’ या सोशल फर्स्ट सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमेची घोषणा केली. ही मोहिम भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (१४सी) आणि गृहमंत्रालय (एमएचए) यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ‘सायबर जागरूकता दिवस’ या राष्ट्रीय मोहिमेशी जोडलेला आहे, जो १४सी आणि गृहमंत्रालयाच्या पुढाकाराने दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी साजरा केला जातो. ‘सतर्क रहे’ ही मोहिम कॉईनडीसीएक्सच्या १०० कोटी रुपयांचा उपक्रम डिजिटल सुरक्षा नेटवर्क (डीएसएन)चा विस्तार आहे, ज्याचा उद्देश नागरिकांना डिजिटल आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षित ठेवणे आणि देशभरात सायबर सुरक्षा जनजागृती मजबूत करणे आहे. ‘सतर्क रहे’ मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना सामान्य डिजिटल फसवणुकीची ओळख करून देणे आणि त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठी मदत करणे. ‘सतर्क’ या व्यक्तिरेखेभोवती ही संकल्पना उभी करण्यात आली असून, सोशल मीडिया वरील दैनंदिन प्रसंग आणि संवादात्मक स्वरूप वापरून फसवणूक शिक्षण अधिक सोपे, संबंधित आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी करण्याचा प्रयत्न केल...

आयटेल अॅक्‍वा फक्त १,७९९ रूपयांमध्ये लॉन्च

भारतातील आयपी६७ रेटिंग असलेला एकमेव फीचर फोन  मुंबई। आयटेल या भारतासाठी तंत्रज्ञान सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या नवीन डिवाईसच्‍या लाँचसह सर्वत्र धूमाकूळ निर्माण केली आहे. भारतातील आपल्या टिकाऊ, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या उत्पादनांच्या श्रेणीसाठी प्रसिद्ध असलेल्या आयटेलने भारतातील आयपी६७ रेटिंग* असलेला एकमेव फीचर फोन अॅक्‍वा लाँच केला आहे. आयटेल अॅक्‍वा कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी तयार करण्यात आला आहे, जिथे सामान्य फीचर फोन्स निकामी होतात. आयपी६७ जलरोधक व धूळरोधक संरक्षणामुळे आयटेल अॅक्‍वा कोणत्याही नुकसानाशिवाय ३० मिनिटांपर्यंत पाण्यात बुडूनही सुरक्षित राहू शकतो आणि चिखल किंवा ओल्या वातावरणातही उत्तम कार्यरत राहतो. यासोबत, अॅक्‍वाने भारतातील फीचर फोन्समध्ये आणखी एक पहिलेच तंत्रज्ञान सादर केले आहे, ते म्‍हणजे एआय एन्व्हायरनमेंटल नॉईज कॅन्सलेशन (ईएनसी). हे तंत्रज्ञान बांधकाम साइट्स, बाजारपेठा, कारखाने आणि सामान्य ट्रॅफिकसारख्या गर्दीच्या ठिकाणांमधील पार्श्वभूमीचा गोंगाट दूर करते; ज्यामुळे वापरकर्त्‍याला...