सीधे मुख्य सामग्री पर जाएं

टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामचे उद्घाटन

मुंबई। टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने शरयू टोयोटा यांच्या भागीदारीत सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम (टी-टीईपी) चे उद्घाटन केले. या उपक्रमाद्वारे भारताच्या ‘स्किल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ या ध्येयांना पाठबळ देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

नवीन स्थापन केलेले प्रशिक्षण केंद्र सीएसएमएसएस संस्थेचे अध्यक्ष श्री. रंजीत पी. मुलाय, सचिव श्री. पद्माकर एच. मुलाय, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत जी. देशमुख, सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. शशिकांत आर. डिकले, सीएसएमएसएस छ. शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. गणेश बी. डोंगरे, शरयू टोयोटाचे संचालक श्री. नसीर मानेर तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र तांत्रिक शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि उद्योगातील अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे, विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समुदायातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

टी-टीईपी अभ्यासक्रमात शैक्षणिक शिक्षणासोबत टोयोटा डीलरशिपमध्ये इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्ये सर्व्हिस अॅडव्हायझर आणि सेल्स कन्सल्टंट या प्रवाहांवर विशेष भर दिला जात आहे, ज्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सहा तांत्रिक शाखांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल आणि वार्षिक 480 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. केंद्रात आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असून त्यात इंजिन मॉडेल्स, घटकांचे कट-सेक्शन, सिम्युलेटर आणि साधने आहेत. या सर्व सुविधा टोयोटाच्या हायब्रिड व सर्व्हिस तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष दर्शन घडवतात. याशिवाय बॉडी अँड माइंड ट्रेनिंग – कल्चर डेव्हलपमेंट साहित्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे.

शरयू टोयोटाचे संचालक नासिर मणेर म्हणाले, “टी-टीईपी सुविधा ही केवळ प्रशिक्षण केंद्र नाही, तर ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक लॉन्चपॅड आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण साधन आणि स्थानिक संधी यांचा संगम करून आम्ही विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत.”

या उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया देताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कंट्री हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स व गव्हर्नन्स) श्री. विक्रम गुलाटी म्हणाले, “टी-टीईपी सारख्या उपक्रमांद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे, प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन आत्मविश्वास, कौशल्य आणि उद्देशाने सक्षम बनवू इच्छितो. हे नवीन केंद्र, सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, छत्रपती संभाजीनगर येथे, सर्वसमावेशक विकास साधण्याचे आणि भारताच्या कौशल्य परिसंस्थेला तळापासून बळकट करण्याचे आमचे ध्येय प्रतिबिंबित करते.”

टोयोटा किर्लोस्कर मोटरने कौशल्य विकासासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि टी-टीईपी सारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगाशी संलग्न प्रशिक्षण दिले जाते. २००६ मध्ये सुरू झालेल्या टी-टीईपी कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत भारतभरात १४,००० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापैकी ७०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी देशातील ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्या आणि अधिकृत डीलरशिपमध्ये रोजगार मिळवला आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

कॉईनडीसीएक्सने ‘सतर्क रहे’ सायबर सुरक्षा जनजागृती मोहिम सुरू केली

मुंबई। भारतातील सर्वात मोठी क्रिप्टो एक्स्चेंज कंपनी कॉईनडीसीएक्सने ‘सतर्क रहे’ या सोशल फर्स्ट सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमेची घोषणा केली. ही मोहिम भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (१४सी) आणि गृहमंत्रालय (एमएचए) यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ‘सायबर जागरूकता दिवस’ या राष्ट्रीय मोहिमेशी जोडलेला आहे, जो १४सी आणि गृहमंत्रालयाच्या पुढाकाराने दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी साजरा केला जातो. ‘सतर्क रहे’ ही मोहिम कॉईनडीसीएक्सच्या १०० कोटी रुपयांचा उपक्रम डिजिटल सुरक्षा नेटवर्क (डीएसएन)चा विस्तार आहे, ज्याचा उद्देश नागरिकांना डिजिटल आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षित ठेवणे आणि देशभरात सायबर सुरक्षा जनजागृती मजबूत करणे आहे. ‘सतर्क रहे’ मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना सामान्य डिजिटल फसवणुकीची ओळख करून देणे आणि त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठी मदत करणे. ‘सतर्क’ या व्यक्तिरेखेभोवती ही संकल्पना उभी करण्यात आली असून, सोशल मीडिया वरील दैनंदिन प्रसंग आणि संवादात्मक स्वरूप वापरून फसवणूक शिक्षण अधिक सोपे, संबंधित आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी करण्याचा प्रयत्न केल...

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाचे उद्घाटन

मलाबार ग्रुप केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज मोफत पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणार मुंबई। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील कांदिवली पूर्व येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र (ABVKVK) येथे मलाबार ग्रुपच्या ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाचे उद्घाटन केले. हा उपक्रम युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि भविष्यातील रोजगार संधींना बळकटी देण्यासाठी पोषणाच्या महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो. या उपक्रमाअंतर्गत, मलाबार ग्रुप केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज १०० पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणार आहे. यामुळे त्यांच्या आरोग्य आणि कल्याणाला आधार मिळेल तसेच ते व्यावसायिक प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, करिअर विकास आणि भविष्यातील रोजगार संधींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतील. हा उपक्रम मलाबार ग्रुपच्या हंगर फ्री वर्ल्ड कार्यक्रमाचा एक भाग आहे, जो समूहाच्या प्रमुख कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांपैकी एक असून, भूक निर्मूलन आणि वंचित समुदायांना पोषणाची उपलब्धता वाढविण्यावर केंद्रित आहे. हंगर फ्री वर्ल्...