सीधे मुख्य सामग्री पर जाएं

एजीआयच्या बोरिवली डिझाईन फेअर २०२६ चा उद्घाटन आमदार संजय उपाध्यायने केले

मुंबई। आदित्य ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने आयोजित आणि टायटल स्पॉन्सर सुमित ग्रुपच्या वतीने समर्थित बोरिवली डिझाईन फेअर (बीडीएफ) २०२६ बोरिवली पश्चिम, मुंबई येथील आदित्य कॉलेज ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथे एका भव्य उद्घाटन समारंभासह सुरू झाला.
 
संजय उपाध्याय आमदारांसह अन्य प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन झाले. यात शिक्षण क्षेत्रातील अग्रणी, उद्योगाचे प्रतिनिधी आणि समुदायाच्या सदस्यांचा समावेश होता. या उद्घाटन समारंभासोबतच डिझाईन, नवोपक्रम, संस्कृती, नेतृत्व आणि समुदायाच्या सहभागाच्या तीन दिवसांच्या उत्सवाला आरंभ झाला. यामध्ये विद्यार्थी, व्यावसायिक आणि स्थानिक रहिवाशांनी उत्साहाने सहभाग घेतला.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सर्जनशीलता, स्पर्धा आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा समावेश असलेले गतिमान उपक्रम पाहायला मिळाले. डिझाईन थिंकिंग चॅलेंज आणि मॉक स्टॉक सिम्युलेशनने नावीन्यपूर्णता आणि धोरणात्मक विचारसरणीचा पाया रचला, बिझनेस आयडियाज प्लॅटफॉर्ममधून तरुण उद्योजकांना तज्ञ प्रेक्षकांसमोर स्केलेबल संकल्पना सादर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. त्याच वेळी, ई-स्पोर्टस् स्पर्धा आणि सांस्कृतिक प्रदर्शनांनी संपूर्ण कॅम्पसमध्ये उच्च ऊर्जा आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग बघायला मिळाला.
 
बीडीएफच्या व्यापक छत्राखाली उत्साही सांस्कृतिक कार्यक्रम हे या दिवसाचे एक प्रमुख आकर्षण ठरले. यात संगीत, नृत्य, फॅशन, नाट्य आणि लाईव्ह सादरीकरणाद्वारे सर्जनशीलता आणि तरुणाईच्या अभिव्यक्तीचे वातावरण निर्माण करण्यात आले. मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिरे, तसेच स्वयंसेवी संस्था आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवादाचा उपक्रम यांसारख्या समुदाय-केंद्रित उपक्रमांनाही आजपासून सुरूवात झाली. यातून या महोत्सवाच्या सामाजिक परिणाम आणि समावेशकतेप्रति कटिबद्धतेला बळकटी मिळाली.  

याप्रसंगी बोलताना आदित्य ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे प्रवक्ते म्हणाले, "बोरिवली डिझाईन फेअरमध्ये सर्जनशीलता, नावीन्य आणि समुदायांना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब पडले आहे. पहिल्या दिवसाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने महोत्सवातील आगामी दिवसांसाठी एक दमदार पायाभरणी केली आहे."

उद्घाटनाच्या दिवशीच जोरदार सहभाग आणि उत्साही उर्जेने लक्षवेधक ठरलेला बोरिवली डिझाईन फेअर २०२६ आता त्याच्या आगामी आकर्षणांच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामध्ये इनोव्हेशन समिट, रंगरेज कल्चरल शोकेस आणि बहुप्रतिक्षित सीएक्सओ मीट यांचा समावेश आहे. त्यातून पुढील दोन दिवसांत कल्पना, सर्जनशीलता आणि सहकार्याचा खिळऴून ठेवणारा मिलाफ पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

दादर जैन ज्ञान मंदिरात श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला

मुंबई। राजा सिद्धार्थ यांचे वंशज आणि माता त्रिशला यांचे पुत्र, परम कृपाळू भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जयंतीनिमित्त या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, श्री आत्म कमल लब्धी सुरीश्वरजी जैन ज्ञान मंदिर आणि जिन रक्षा इंटरनॅशनल ग्रुप यांनी केले होते. शासन प्रदीप परम पूज्य आचार्य भगवंत श्री विजय प्रदीप चंद्र सुरीश्वरजी महाराज साहिब यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली, भगवान महावीर स्वामींच्या जन्म कल्याणकाचे एक सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन सादर करण्यात आले. आज जागतिक तापमानवाढ असो वा दहशतवाद, भगवान महावीरांची केवळ दोन तत्त्वे जगाला वाचवू शकतात: • अपरिग्रह: निसर्गाचे शोषण थांबवा, केवळ गरजेपुरतेच वापरा. शाळेतील सर्व पंडित, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संजयभाई शाह, अशोकभाई चरला, महिला विभागाच्या उपाध्यक्षा अल्पाबेन संजय शाह आणि संदीप दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी, ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त सा...

श्रीपाद नाईक यांनी ECAMEX 2026 चे उद्घाटन केले; अक्षय ऊर्जेचा वाढता वाटा, सौर ऊर्जेचा प्रसार आणि मेक इन इंडिया संधींवर भर

मुंबई। भारत सरकारचे नवीन व अक्षय ऊर्जा तसेच वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोरेगाव येथील BEC येथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ECAM) च्या 101 वर्षपूर्ती निमित्त आयोजित भारतातील मेगा इलेक्ट्रिकल व ऊर्जा प्रदर्शन ECAMEX 2026 चे उद्घाटन केले. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की भारताच्या वाढत्या ऊर्जा मागणीची शाश्वत पूर्तता करण्यासाठी अक्षय ऊर्जेतून होणाऱ्या वीज निर्मितीचा टक्का लक्षणीयरीत्या वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की अक्षय ऊर्जा क्षेत्र उद्योग, नवोन्मेष आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देत असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळकटी देते. मंत्र्यांनी पुढे सांगितले की मेक इन इंडिया उपक्रमामुळे सौर उपकरणे, इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत उत्पादनासाठी मजबूत संधी निर्माण होत आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी उद्योगांनी स्वदेशी उत्पादन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासात गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केल...

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा – खऱ्या फळांचा स्वाद, कोणतीही अतिरिक्त साखर नाही आणि कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत • साखरयुक्त पेये आणि कोल्ड ड्रिंक्सला एक आरोग्यदायी पर्याय – नाश्ता, मधल्या वेळचा स्नॅक आणि इतर वेळांसाठी योग्य • नैसर्गिक पोषण, हायड्रेशन आणि अतिरिक्त साखर टाळू इच्छिणाऱ्या आरोग्य-जागरूक ग्राहकांसाठी उत्तम पेय मुंबई। भारताची अग्रगण्य नैसर्गिक आरोग्य व आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडचा लोकप्रिय पॅकेज्ड फळ रस ब्रँड ‘रियल’ आपल्या सजग पोषणाच्या बांधिलकीला अधिक बळकट करत ‘रियल अ‍ॅक्टिव्ह’ फळ रस सादर करत आहे — कोणतीही अतिरिक्त साखर नसलेला, चविष्ट आणि ताजेतवाने फळ रसांचा हा विशेष श्रेणी आहे. आजच्या काळात ग्राहक अधिक आरोग्यदायी जीवनशैलीच्या पर्यायांकडे वळत असताना, रियल अ‍ॅक्टिव्ह भारतात हायड्रेशनची नवी व्याख्या करत आहे. अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हशिवाय, रियल अ‍ॅक्टिव्ह खऱ्या फळांचे नैसर्गिक गुणधर्म देतो. त्यामुळे हा उन्हाळ्यात दिवसभरासाठी एक उत्तम साथीदार ठरतो — पौष्टिक नाश्त्यापासून ते मधल्या वेळच्या स्नॅकपर्यंत. “उन्हाळ्य...