सीधे मुख्य सामग्री पर जाएं

महिंद्रा एक्सेलन्स इन थिएटर अवॉर्ड्सचे मार्चमध्ये आयोजन

विक्रमी ४२२ प्रवेशिकांमधून १० उत्कृष्ट नाटकांचे नामांकन

मुंबई। भारतीय रंगभूमीचा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आणि महोत्सव महिंद्रा एक्सेलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (मेटा)चे एकविसावे पर्व देशाची राजधानी नवी दिल्ली येथे  रंगणार आहे. महिंद्रा समूहातर्फे सुरु करण्यात आलेला आणि टीमवर्क आर्ट्सद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा हा सोहळा १९ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत नवी दिल्लीत पार पडेल.

मेटाने २०२६ साठी १३ श्रेणींतील उत्कृष्ट १० नाटकांची घोषणा केली आहे. ही नाटके नवी दिल्लीमध्ये एका आठवडाभर प्रतिष्ठित ज्युरींसमोर सादर केली जातील. २५ मार्च २०२६ रोजी कमानी ऑडिटोरियममध्ये दिमाखदार रेड कार्पेट अवॉर्ड्स नाईटमध्ये विजेत्यांचा गौरव होईल. त्यापूर्वी कमानी ऑडिटोरियम आणि श्री राम सेंटर येथे नाटकांचे प्रयोग दोन सत्रांत रंगतील.

महत्त्वाचे सामाजिक विषय, नाविन्यपूर्ण कथाकथन आणि पौराणिक कथांची नवी मांडणी यासाठी मेटा ओळखले जाते. जात, वर्ग व लिंगभावाच्या रूढींना छेद देत उपेक्षितांचा आवाज आणि विविध भारतीय भाषांचा वेध घेणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. यंदाची नामांकित नाटके पौराणिकता, लिंगभाव, राजकारण, भक्ती, अस्मिता आणि विद्रोह अशा विविध विषयांचा व्यापक आवाका सादर करतात.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

‘फार्म टू फॉरेन’ उपक्रम महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक पटलावर नेणार

असोचॅमच्या 'फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन  मुंबई। महाराष्ट्राचा ‘फार्म टू फॉरेन’ हा उपक्रम शेतकरी, उत्पादक, उद्योजक आणि जागतिक फॅशन उद्योगाला एकत्र जोडण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे महाराष्ट्र एक प्रमुख वस्त्रोद्योग आणि निर्यात केंद्र म्हणून नावारूपास येईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (ASSOCHAM - असोचॅम) द्वारे मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६’ मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेने “ॲडव्हान्सिंग इंडियाज ५एफ व्हिजन फॉर सस्टेनेबल अँड ट्रेसेबल टेक्स्टाईल व्हॅल्यू चेन्स” या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, उत्पादक, शाश्वतता तज्ज्ञ आणि महत्त्वाचे भागधारक एकत्र आले होते. केंद्र सरकारच्या '५एफ विजन'—फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेनला अनुसरून असलेल्या या उपक्रमात भारताची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे, ह...

फुजीफिल्म इंडियाने मुंबईत भारतातील पहिले 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी' सुरू केले

भारतातील पहिल्या 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी'चे उद्घाटन जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त करण्यात आले, जो छायाचित्रणाच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. ही आकर्षक जागा फुजीफिल्मचा संपूर्ण इमेजिंग पोर्टफोलिओ, क्रिएटर अनुभव आणि समुदाय-आधारित शिक्षण एकाच छताखाली एकत्र आणते. मुंबई। फुजीफिल्म इंडियाने ' फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी 'च्या उद्घाटनाची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील पहिले आणि जागतिक स्तरावरील अकरावे केंद्र आहे, जे फोटोग्राफी आणि इमेजिंगचा एक परिपूर्ण अनुभव देते. हे उद्घाटन जागतिक फोटोग्राफी दिनाच्या (१९ ऑगस्ट) दिवशी होत असून, या वर्षी फोटोग्राफीच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे स्थित, हे दोन मजली, ५,७९५ चौरस फुटांचे केंद्र फुजीफिल्मच्या संपूर्ण इमेजिंग इकोसिस्टमला एकाच छताखाली एकत्र आणते. केवळ एक अनुभव केंद्र नसून, फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी ही एक सर्जनशील जागा आहे, जिथे इमेजिंग तंत्रज्ञान, कला आणि कथाकथन एकत्र येतात. हे नवीन फोटोग्राफर, चित्रपट निर्माते, कंटेंट क्रिएटर किंवा व्यावसायिक...

पर्नोड रिकार्डकडून वंचित तरुणांना शिक्षण व रोजगाराची मोठी संधी

२५०० हून अधिक विद्यार्थ्यांना ११.६८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती  मुंबई। पर्नोड रिकार्ड इंडिया फाउंडेशन (पीआरआयएफ) ने युथ ड्रीमर्स फाउंडेशनसोबत भागीदारी करून वंचित समुदायातील तरुणांना शिक्षण, कौशल्य विकास आणि अर्थपूर्ण रोजगाराचे मार्ग उपलब्ध करून देत त्यांना सक्षम करण्याचे कार्य अधिक वेगाने पुढे नेले आहे. २०१९ पासून सुरू असलेल्या 'PRIF शिष्यवृत्ती सहाय्य कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमधील २,५७६ विद्यार्थ्यांना यशस्वीपणे सहाय्य करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत थेट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ६.९१ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, सरकारी आणि खाजगी शिष्यवृत्ती योजनांद्वारे आणखी ४.७७ कोटी रुपयांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण ११.६८ कोटी रुपयांचे शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. केवळ आर्थिक मदत न देता तरुणांना शिक्षणापासून थेट रोजगारापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी शिष्यवृत्तीसोबतच मार्गदर्शन, करिअर गाईडन्स आणि रोजगारासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार तरुणांना सक्षम करण्यासाठी पीआ...