सीधे मुख्य सामग्री पर जाएं

आयडी फ्रेशने ऑरगॅनिक बॅटर लॉन्च केले

मुंबई। भारतातील सर्वाधिक पसंतीचा फ्रेश फूड ब्रँड आयडी फ्रेश फूडने ऑर्गेनिक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची घोषणा करत आयडी ऑरगॅनिक बॅटर लॉन्च केले आहे. हा लॉन्च आयडीच्या त्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये चव, प्रामाणिकता आणि पारदर्शकतेशी कोणतीही तडजोड न करता क्लीन-लेबल, ताजे आणि विश्वासार्ह दैनंदिन अन्नपदार्थ तयार केले जातात.

आपल्या ऑरगॅनिक बटर रेंजसाठी कंपनी एक स्थापित ऑर्गेनिक सोर्सिंग मॉडेलद्वारे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील २,५०० हून अधिक शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करत आहे. या प्रक्रियेत एनजीओ सक्रियपणे शेतकरी सहभाग आणि स्थानिक पातळीवरील सहाय्य प्रदान करत आहेत. ही सोर्सिंग पद्धत जबाबदार शेतकरी भागीदारी आणि शाश्वत शेती पद्धतींप्रती आयडीची दीर्घकालीन बांधिलकी दर्शवते.

लॉन्चबाबत प्रतिक्रिया देताना आयडी फ्रेश फूडचे सीईओ – भारत, रजत दिवाकर म्हणाले, “आयडी ऑरगॅनिकच्या पुढील टप्प्याची सुरुवात करताना आम्ही बाजारातील अंतर्दृष्टी लक्षात घेऊन या उत्पादनाची नव्याने मांडणी केली आहे आणि उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आयडीमध्ये दैनंदिन अन्न नेहमीच विश्वास आणि पारदर्शकतेवर आधारित राहिले आहे, आणि ऑर्गेनिक क्षेत्रात प्रवेश करणे ही त्या विश्वासाची नैसर्गिक पुढची पायरी आहे. आयडी ऑरगॅनिक बॅटरद्वारे आम्ही ग्राहकांना प्रमाणित ऑर्गेनिक सोर्सिंगची हमी देत आहोत, तसेच त्यांनी आमच्याकडून अपेक्षित असलेली चव, ताजेपणा आणि सातत्य कायम ठेवत आहोत.”

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पर्नोड रिकार्डकडून वंचित तरुणांना शिक्षण व रोजगाराची मोठी संधी

२५०० हून अधिक विद्यार्थ्यांना ११.६८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती  मुंबई। पर्नोड रिकार्ड इंडिया फाउंडेशन (पीआरआयएफ) ने युथ ड्रीमर्स फाउंडेशनसोबत भागीदारी करून वंचित समुदायातील तरुणांना शिक्षण, कौशल्य विकास आणि अर्थपूर्ण रोजगाराचे मार्ग उपलब्ध करून देत त्यांना सक्षम करण्याचे कार्य अधिक वेगाने पुढे नेले आहे. २०१९ पासून सुरू असलेल्या 'PRIF शिष्यवृत्ती सहाय्य कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमधील २,५७६ विद्यार्थ्यांना यशस्वीपणे सहाय्य करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत थेट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ६.९१ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, सरकारी आणि खाजगी शिष्यवृत्ती योजनांद्वारे आणखी ४.७७ कोटी रुपयांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण ११.६८ कोटी रुपयांचे शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. केवळ आर्थिक मदत न देता तरुणांना शिक्षणापासून थेट रोजगारापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी शिष्यवृत्तीसोबतच मार्गदर्शन, करिअर गाईडन्स आणि रोजगारासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार तरुणांना सक्षम करण्यासाठी पीआ...

कॉईनडीसीएक्सची दैनिक आणि मासिक एसआयपी सुविधा

अवघ्या १०० रुपयांच्या गुंतवणुकीसह क्रिप्टो गुंतवणूक केली अधिक सुलभ  मुंबई। भारतातील प्रमुख क्रिप्टो एक्सचेंज असलेल्या कॉईनडीसीएक्सने आपल्या 'दैनिक एसआयपी' सुविधेची घोषणा केली आहे. कंपनीच्या आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या मासिक एसआयपी सुविधेचा हा एक नवीन विस्तार असून, याद्वारे वापरकर्त्यांना आता दररोज अवघ्या १०० रुपयांपासून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करता येईल. ही नवीन सुविधा गुंतवणूक प्रक्रियेस सोपी, स्वयंचलित आणि सहज ठेवण्यासोबतच, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अधिक नियमितता प्रदान करते. याव्यतिरिक्त, कॉईनडीसीएक्सने एक्सआयआरआर ट्रॅकिंग देखील सुरू केले आहे. हे उद्योग क्षेत्रातील एक मानक मूल्य आहे, जे आवर्ती (रिकरिंग) गुंतवणुकीतून मिळणाऱ्या वार्षिक परताव्याचे अचूक चित्र मांडते आणि वेळेनुसार पोर्टफोलिओच्या कामगिरीचे योग्य मूल्यमापन करण्यास वापरकर्त्यांना मदत करते. या सुधारणेबाबत बोलताना, कॉईनडीसीएक्सचे एक्झिक्युटिव्ह व्हीपी - ग्रोथ अँड क्रिप्टो बिझनेस हेड, मिनाल ठुकराल म्हणाले, "एसआयपी हे कॉईनडीसीएक्स वरील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक उत्पादनांपैकी एक राहिले आहे आणि दैनिक तसेच मा...

खाडी देशांमध्ये महिलांसाठी सात ‘वन-स्टॉप सेंटर’

संकटग्रस्त भारतीय महिला कामगारांना तातडीने मदत; वैद्यकीय, कायदेशीर सेवांसह समुपदेशनाची सुविधा मुंबई। खाडी देशांमध्ये रोजगारासाठी गेलेल्या भारतीय महिला कामगारांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, त्यांच्या मदतीसाठी खाडीतील प्रमुख शहरांमध्ये सात ‘वन-स्टॉप सेंटर’ सुरू करण्यात आली आहेत. संकटात सापडलेल्या भारतीय महिलांना तातडीने आणि समन्वयाने मदत मिळावी, हा या केंद्रांचा उद्देश आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. राज्यसभा सदस्य राजीव सिंह यांनी खाडी देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाडी देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्यापैकी संयुक्त अरब अमिरातीमध्ये ४५ लाख, सौदी अरेबियात २७ लाख, कुवेतमध्ये १० लाख, कतारमध्ये ८.२० लाख, ओमानमध्ये ६.७० लाख आणि बहरीनमध्ये ३.१० लाख भारतीय आहेत. २०१४ ते जून २०२६ या...