सीधे मुख्य सामग्री पर जाएं

फोनपेतर्फे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसह यूपीआय पेमेंट्सची सुविधा सुरू

मुंबई। फोनपेतर्फे आज यूपीआय पेमेंट्ससाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुविधा सुरू केल्याची घोषणा करण्यात आली असून, या सुविधेमुळे वापरकर्त्यांना अधिक जलद आणि सहज ‘वन-टच’ पेमेंट अनुभव मिळणार आहे. या नव्या सुविधेच्या माध्यमातून युजर त्यांच्या स्मार्टफोनमधील नेटिव्ह सिक्युरिटी, उदा. फिंगरप्रिंट किंवा फेस रिकग्निशनचा वापर करून व्यवहार ऑथोराइझ करू शकतात, त्यामुळे प्रत्येक व्यवहारासाठी यूपीआय पिन मॅन्युअली एंटर करण्याची आवश्यकता राहणार नाही. या सुविधेमुळे, फोनपे हे मोठ्या प्रमाणावर ही क्षमता प्रत्यक्षात उपलब्ध करून देणाऱ्या आघाडीच्या पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक ठरले आहे.

युजरच्या पेमेंट प्रवासातील सामान्य अडथळे दूर करून डिजिटल पेमेंट्सची सुरक्षितता आणि विश्वासार्हता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही सुविधा तयार करण्यात आली आहे. डिव्हाइस स्तरावरील बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनचा वापर केल्यामुळे गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणीही युजर सुरक्षितपणे व्यवहार करू शकतात आणि ‘शोल्डर सर्फिंग’ किंवा UPI पिन उघड होण्याचा धोका प्रभावीपणे टाळला जातो. सुरक्षिततेबरोबरच, विसरलेला किंवा चुकीचा यूपीआय पिन एंटर केल्यामुळे होणारे व्यवहार अयशस्वी होण्याचे प्रमाण कमी झाल्याने या एकात्मिक सुविधेमुळे व्यवहार यशस्वी होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. सातत्यपूर्ण अनुभवासाठी या सुविधेमध्ये फॉलबॅक यंत्रणा देण्यात आली असून, प्रकाश कमी असेल किंवा सेन्सरशी संबंधित अडचणींमुळे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमध्ये अडथळा आल्यास युजर त्वरित त्यांच्या नेहमीच्या यूपीआय पिनचा वापर करून व्यवहार करू शकतात.

सध्याच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही ‘वन-टच’ पद्धत ₹५,००० पर्यंतच्या UPI व्यवहारांसाठी डिव्हाइस स्तरावरील बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनचा सुरक्षित टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन लेयर म्हणून वापर करते. या मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी कमाल सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यूपीआय पिन ऑथेंटिफिकेशन आवश्यक असेल. युजरना ही बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुविधा दैनंदिन वापरातील विविध ठिकाणी वापरता येणार असून, यामध्ये पीअर-टू-पीअर मनी ट्रान्सफर, दुकानांमध्ये क्यूआर स्कॅन करून पेमेंट करणे, ऑनलाइन पेमेंट्स तसेच बँक बॅलन्स तपासणे यांचा समावेश आहे.

सुविधेच्या लाँचबद्दल फोनपेचे पेमेंट्स विभाग प्रमुख दीप अग्रवाल म्हणाले, “प्रत्येक भारतीयासाठी डिजिटल पेमेंट्स अधिक सहज, समजण्यास सोपे आणि ॲक्सेसिबल करणे हेच फोनपेमध्ये आमचे ध्येय राहिले आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची एकात्मिक सुविधा देऊन आम्ही खऱ्या अर्थाने सुलभ व विनाअडथळा पेमेंट अनुभवाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ही सुविधेमुळे वेळेची बचत होतेच, त्याचप्रमाणे युजरना त्यांच्या दैनंदिन परिस्थितीत सुरक्षित ठेवणारी हार्डवेअर-ग्रेडचा सुरक्षा स्तर मिळतो. सामान्य अडथळे दूर करून आम्ही डिजिटल पेमेंट्स सर्वांसाठी अधिक सुलभ आणि सुरक्षित करत असल्याचा आम्हाला विश्वास आहे.”

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एहसान खान, नाफे खान अभिनीत आणि रझूल आलम दिग्दर्शित "गरम माहौल" चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर लाँच

मुंबई। बॉलीवूड दिग्दर्शक रझूल आलम यांच्या हिंदी चित्रपट "गरम माहौल" चे पोस्टर आणि ट्रेलर मुंबईतील इम्पा थिएटरमध्ये एहसान खान, गायिका दीपा नारायण झा, अभिनेते नाफे खान आणि शब्बीर शेख यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. पोस्टर लाँचनंतर, चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी देखील दाखवण्यात आली. लिटिल स्टेप आर्ट्स (एलएसए) निर्मित, या चित्रपटाची सह-निर्मिती विक्रांत वाधवा आणि राहुल जाटव यांनी केली आहे. "गरम माहौल" च्या कलाकारांमध्ये एहसान खान, नाफे खान, बबिता चौधरी, पूजा दत्ता, विक्रांत वाधवा, नरेंद्र, अमित श्रीवास्तव आणि राहुल जाटव यांचा समावेश आहे. लिटिल स्टेप आर्ट्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लाइन प्रोड्यूसर रवी प्रकाश भारद्वाज हे संगीत दिग्दर्शक आहेत. संगीत राज सेन आणि इक्बाल सरगम ​​यांनी दिले आहे. गायकांमध्ये अलका याज्ञिक, दीपा नारायण झा, रितू पाठक आणि पी.के. यांचा समावेश आहे. चित्रपटाचे डीओपी विजय मिश्रा आहेत, लेखक राकेश कुमार आहेत आणि कार्यकारी निर्माता सतीश कुमार आहेत. एहसान खान म्हणाला, "मी राजुल आलमसोबत याआधी खूप काम केले आहे. या चित...

आकाश इन्स्टिट्यूट मुंबईने जेईई मेन २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली; साहिल प्रधानने ९९.९९ टक्के गुण मिळवले

उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीमुळे मुंबई आणि आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ला अभिमान आहे   मुंबई: आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) मुंबईतील विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२६ (सत्र १) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पुन्हा एकदा या प्रदेशाची सतत शैक्षणिक उत्कृष्टता दाखवून दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने १६ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या निकालांनुसार, बोरिवली शाखेतील साहिल प्रधान या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के गुणांसह मुंबईत अव्वल स्थान पटकावले. उत्कृष्ट कामगिरीच्या या मालिकेत, बोरिवली शाखेतील जीत व्होराने १ वर्षाच्या क्लासरूम प्रोग्राममध्ये ९९.८७ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. ध्वज जैन यांनी ९९.७९ टक्के आणि शिव तिवारी यांनी ९९.४५ टक्के गुण मिळवून शाखेच्या प्रभावी शैक्षणिक निकालांना आणखी बळकटी दिली. विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल भाष्य करताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख डॉ. एच.आर. राव म्हणाले, "मुंबईतील आमच्या विद्यार्थ्यांचे अपवादात्मक निकाल त्यांच्या शैक्षणिक वचनबद्धतेचे आणि आकाश येथी...

राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 पुण्यात यशस्वीरीत्या संपन्न

पुणे। देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी भोसरी, पुणे येथे अत्यंत दिमाखदार व गौरवपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन देविदास ग्रुप बिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट तर्फे करण्यात आले होते. आपल्या व्यवसायातून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय आणि प्रभावी भूमिका बजावणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये Le-Vanshi Group Of Company चे Founder, Business Tycoon Author Kuntal Arora, Mrs. Simran Kuntal Arora, तसेच Riyansh Solar Power Plus Pvt. Ltd. चे Founder Mr. Umesh Bhardwaj यांचे विशेष सहकार्य व भक्कम समर्थन लाभले. त्यांच्या दूरदृष्टी, सकारात्मक नेतृत्व आणि सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य व प्रभावी ठरला. या विशेष प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उल्लाल तसेच प्रख्यात अभिनेते शहबाज खान प्रमुख पाहुणे म्...