सीधे मुख्य सामग्री पर जाएं

फोनपेतर्फे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसह यूपीआय पेमेंट्सची सुविधा सुरू

मुंबई। फोनपेतर्फे आज यूपीआय पेमेंट्ससाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुविधा सुरू केल्याची घोषणा करण्यात आली असून, या सुविधेमुळे वापरकर्त्यांना अधिक जलद आणि सहज ‘वन-टच’ पेमेंट अनुभव मिळणार आहे. या नव्या सुविधेच्या माध्यमातून युजर त्यांच्या स्मार्टफोनमधील नेटिव्ह सिक्युरिटी, उदा. फिंगरप्रिंट किंवा फेस रिकग्निशनचा वापर करून व्यवहार ऑथोराइझ करू शकतात, त्यामुळे प्रत्येक व्यवहारासाठी यूपीआय पिन मॅन्युअली एंटर करण्याची आवश्यकता राहणार नाही. या सुविधेमुळे, फोनपे हे मोठ्या प्रमाणावर ही क्षमता प्रत्यक्षात उपलब्ध करून देणाऱ्या आघाडीच्या पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक ठरले आहे.

युजरच्या पेमेंट प्रवासातील सामान्य अडथळे दूर करून डिजिटल पेमेंट्सची सुरक्षितता आणि विश्वासार्हता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही सुविधा तयार करण्यात आली आहे. डिव्हाइस स्तरावरील बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनचा वापर केल्यामुळे गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणीही युजर सुरक्षितपणे व्यवहार करू शकतात आणि ‘शोल्डर सर्फिंग’ किंवा UPI पिन उघड होण्याचा धोका प्रभावीपणे टाळला जातो. सुरक्षिततेबरोबरच, विसरलेला किंवा चुकीचा यूपीआय पिन एंटर केल्यामुळे होणारे व्यवहार अयशस्वी होण्याचे प्रमाण कमी झाल्याने या एकात्मिक सुविधेमुळे व्यवहार यशस्वी होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. सातत्यपूर्ण अनुभवासाठी या सुविधेमध्ये फॉलबॅक यंत्रणा देण्यात आली असून, प्रकाश कमी असेल किंवा सेन्सरशी संबंधित अडचणींमुळे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमध्ये अडथळा आल्यास युजर त्वरित त्यांच्या नेहमीच्या यूपीआय पिनचा वापर करून व्यवहार करू शकतात.

सध्याच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही ‘वन-टच’ पद्धत ₹५,००० पर्यंतच्या UPI व्यवहारांसाठी डिव्हाइस स्तरावरील बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनचा सुरक्षित टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन लेयर म्हणून वापर करते. या मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी कमाल सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यूपीआय पिन ऑथेंटिफिकेशन आवश्यक असेल. युजरना ही बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुविधा दैनंदिन वापरातील विविध ठिकाणी वापरता येणार असून, यामध्ये पीअर-टू-पीअर मनी ट्रान्सफर, दुकानांमध्ये क्यूआर स्कॅन करून पेमेंट करणे, ऑनलाइन पेमेंट्स तसेच बँक बॅलन्स तपासणे यांचा समावेश आहे.

सुविधेच्या लाँचबद्दल फोनपेचे पेमेंट्स विभाग प्रमुख दीप अग्रवाल म्हणाले, “प्रत्येक भारतीयासाठी डिजिटल पेमेंट्स अधिक सहज, समजण्यास सोपे आणि ॲक्सेसिबल करणे हेच फोनपेमध्ये आमचे ध्येय राहिले आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची एकात्मिक सुविधा देऊन आम्ही खऱ्या अर्थाने सुलभ व विनाअडथळा पेमेंट अनुभवाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ही सुविधेमुळे वेळेची बचत होतेच, त्याचप्रमाणे युजरना त्यांच्या दैनंदिन परिस्थितीत सुरक्षित ठेवणारी हार्डवेअर-ग्रेडचा सुरक्षा स्तर मिळतो. सामान्य अडथळे दूर करून आम्ही डिजिटल पेमेंट्स सर्वांसाठी अधिक सुलभ आणि सुरक्षित करत असल्याचा आम्हाला विश्वास आहे.”

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रीपाद नाईक यांनी ECAMEX 2026 चे उद्घाटन केले; अक्षय ऊर्जेचा वाढता वाटा, सौर ऊर्जेचा प्रसार आणि मेक इन इंडिया संधींवर भर

मुंबई। भारत सरकारचे नवीन व अक्षय ऊर्जा तसेच वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोरेगाव येथील BEC येथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ECAM) च्या 101 वर्षपूर्ती निमित्त आयोजित भारतातील मेगा इलेक्ट्रिकल व ऊर्जा प्रदर्शन ECAMEX 2026 चे उद्घाटन केले. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की भारताच्या वाढत्या ऊर्जा मागणीची शाश्वत पूर्तता करण्यासाठी अक्षय ऊर्जेतून होणाऱ्या वीज निर्मितीचा टक्का लक्षणीयरीत्या वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की अक्षय ऊर्जा क्षेत्र उद्योग, नवोन्मेष आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देत असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळकटी देते. मंत्र्यांनी पुढे सांगितले की मेक इन इंडिया उपक्रमामुळे सौर उपकरणे, इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत उत्पादनासाठी मजबूत संधी निर्माण होत आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी उद्योगांनी स्वदेशी उत्पादन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासात गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केल...

दादर जैन ज्ञान मंदिरात श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला

मुंबई। राजा सिद्धार्थ यांचे वंशज आणि माता त्रिशला यांचे पुत्र, परम कृपाळू भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जयंतीनिमित्त या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, श्री आत्म कमल लब्धी सुरीश्वरजी जैन ज्ञान मंदिर आणि जिन रक्षा इंटरनॅशनल ग्रुप यांनी केले होते. शासन प्रदीप परम पूज्य आचार्य भगवंत श्री विजय प्रदीप चंद्र सुरीश्वरजी महाराज साहिब यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली, भगवान महावीर स्वामींच्या जन्म कल्याणकाचे एक सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन सादर करण्यात आले. आज जागतिक तापमानवाढ असो वा दहशतवाद, भगवान महावीरांची केवळ दोन तत्त्वे जगाला वाचवू शकतात: • अपरिग्रह: निसर्गाचे शोषण थांबवा, केवळ गरजेपुरतेच वापरा. शाळेतील सर्व पंडित, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संजयभाई शाह, अशोकभाई चरला, महिला विभागाच्या उपाध्यक्षा अल्पाबेन संजय शाह आणि संदीप दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी, ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त सा...

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा – खऱ्या फळांचा स्वाद, कोणतीही अतिरिक्त साखर नाही आणि कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत • साखरयुक्त पेये आणि कोल्ड ड्रिंक्सला एक आरोग्यदायी पर्याय – नाश्ता, मधल्या वेळचा स्नॅक आणि इतर वेळांसाठी योग्य • नैसर्गिक पोषण, हायड्रेशन आणि अतिरिक्त साखर टाळू इच्छिणाऱ्या आरोग्य-जागरूक ग्राहकांसाठी उत्तम पेय मुंबई। भारताची अग्रगण्य नैसर्गिक आरोग्य व आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडचा लोकप्रिय पॅकेज्ड फळ रस ब्रँड ‘रियल’ आपल्या सजग पोषणाच्या बांधिलकीला अधिक बळकट करत ‘रियल अ‍ॅक्टिव्ह’ फळ रस सादर करत आहे — कोणतीही अतिरिक्त साखर नसलेला, चविष्ट आणि ताजेतवाने फळ रसांचा हा विशेष श्रेणी आहे. आजच्या काळात ग्राहक अधिक आरोग्यदायी जीवनशैलीच्या पर्यायांकडे वळत असताना, रियल अ‍ॅक्टिव्ह भारतात हायड्रेशनची नवी व्याख्या करत आहे. अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हशिवाय, रियल अ‍ॅक्टिव्ह खऱ्या फळांचे नैसर्गिक गुणधर्म देतो. त्यामुळे हा उन्हाळ्यात दिवसभरासाठी एक उत्तम साथीदार ठरतो — पौष्टिक नाश्त्यापासून ते मधल्या वेळच्या स्नॅकपर्यंत. “उन्हाळ्य...