सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘महाविकास २०२६’मध्ये सरकार–उद्योग–ग्राहक यांचा संवाद; २,८७९ कोटींची उलाढाल, राज्य आघाडीवर

मुंबई। देशातील थेट विक्री (डायरेक्ट सेलिंग) क्षेत्रात महाराष्ट्राने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, तब्बल २,८७९ कोटी रुपयांच्या उलाढालीसह राज्य देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. मुंबईतील 'वाय. बी. चव्हाण' सेंटर येथे शुक्रवारी आयोजित 'महाविकास २०२६' या विशेष परिषदेत राज्याच्या या दैदीप्यमान प्रगतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 'इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन' (आयडीएसए) आणि महाराष्ट्र शासनाचा 'अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
या परिषदेत शासकीय अधिकारी, ग्राहक आयोगाचे सदस्य, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि 'माविम'च्या बचत गटांमधील महिला उद्योजिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. थेट विक्री क्षेत्रात पारदर्शकता आणणे, ग्राहकांचे हक्क जोपासणे आणि महिलांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. आयडीएसएच्या आर्थिक वर्ष २०२३–२४ च्या वार्षिक सर्वेक्षणानुसार, देशातील थेट विक्री उद्योगाने २२,१४२ कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ४.०४ टक्के वाढ झाली असून, देशभरात ८८ लाखांहून अधिक थेट विक्रेते या क्षेत्राशी जोडले गेले आहेत. त्यापैकी सुमारे ३९ लाख महिला आहेत.
 
महाराष्ट्र या वाढीचा सर्वात मोठा घटक ठरला आहे. राज्यात २,८७९ कोटी रुपयांची उलाढाल नोंदली गेली असून, राष्ट्रीय बाजारपेठेत १३ टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. राज्यात १० लाखांहून अधिक सक्रिय थेट विक्रेते उपजीविका करत आहेत. त्यामुळे उद्योगवाढ आणि जबाबदार व्यावसायिकता या दोन्ही बाबतींत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे अधोरेखित झाले.
 परिषदेत नियामक चौकट, तक्रार निवारण यंत्रणा आणि जबाबदार व्यवसाय पद्धतींवर सखोल चर्चा झाली. ‘स्मार्ट ग्राहक, मजबूत बाजारपेठ’या सत्रात थेट विक्री प्लॅटफॉर्मची पडताळणी कशी करावी, ग्राहक हक्क काय आहेत आणि संरक्षणाच्या उपाययोजना कोणत्या, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
 
या सत्रात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा वंदना मिश्रा आणि ग्राहक वकील संघटनेचे सदस्य अॅड. उदय वारुंजीकर यांनी मार्गदर्शक विचार मांडले. कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील प्रमुखांनीही आपले विचार मांडले. मोदीकेअरच्या सीओओ सोमा मैत्रा, अ‍ॅटॉमी इंडियाचे सीईओ/एमडी डॉ. अब्राहम ली, आयडीएसएचे अध्यक्ष डॉ. रत्नेश लाल आणि खजिनदार विवेक काटोच यांनी उद्योगातील पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहक संरक्षणाच्या उपाययोजनांवर भर दिला. ‘महिलांना उद्योजकतेतून सक्षम बनवणे’ या सत्रात महिला थेट विक्रेत्या आणि ‘माविम’ स्वयंसहाय्यता गटांच्या यशकथा मांडण्यात आल्या. ग्रामीण व शहरी भागांतून शाश्वत उपजीविका उभारणाऱ्या महिलांचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात आला.
 
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर म्हणाले, “नियम केवळ कागदावर न राहता प्रभावी अंमलबजावणी झाली, तरच त्यांचा परिणाम दिसतो. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव असावी आणि कंपन्यांनी उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे. या संतुलनातूनच सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बाजारपेठ निर्माण होते.” आयडीएसएच्या उपाध्यक्षा अपराजिता सरकार यांनी सांगितले, “वाढ केवळ प्रमाणावर नव्हे, तर विश्वासावर मोजली जाते. पारदर्शक आणि न्याय्य पर्यावरण महिलांना आत्मविश्वास देते, उद्योजकतेला चालना देते आणि शाश्वत उत्पन्नाचे मार्ग खुले करते.”
 
‘महाविकास २०२६’चा समारोप ग्राहक जागरूकता, नैतिक आचारसंहिता आणि महिलांच्या उद्योजकतेला बळकटी देण्याच्या संयुक्त वचनबद्धतेने झाला. महाराष्ट्रातील थेट विक्री क्षेत्राचे भवितव्य विश्वास आणि पारदर्शकतेवर उभे राहील, असा स्पष्ट संदेश या परिषदेतून देण्यात आला.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

डोळ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे

जागरूकता निर्माण करण्यासाठी सेंटर फॉर साईटने मिलिंद सोमण यांच्याशी भागीदारी केली आहे मुंबई। जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त, भारतातील आघाडीचे सुपर-स्पेशालिटी आय हॉस्पिटल नेटवर्क, सेंटर फॉर साईटने वयाशी संबंधित डोळ्यांच्या आजारांमध्ये वेळेवर हस्तक्षेप करण्याची तातडीची गरज यावर भर दिला आहे. जागरूकता वाढवण्यासाठी, सेंटर फॉर साईटने फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांच्याशी भागीदारी केली आहे, जे सक्रिय वृद्धत्व आणि समग्र आरोग्याचे प्रतीक आहेत. ही मोहीम कुटुंबांना आठवण करून देते की नियमित डोळ्यांची तपासणी केल्याशिवाय आरोग्य अपूर्ण आहे. देशात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे १४ कोटींहून अधिक लोक आहेत, त्यापैकी जवळजवळ प्रत्येक तीनपैकी एकाला दृष्टी कमी होते. ही स्थिती वृद्धांच्या स्वातंत्र्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम करते. जागतिक स्तरावर, ८० टक्के अंधत्वाच्या घटना टाळता येतात. तरीही, गैरसमज आणि विलंबित काळजीमुळे वृद्धांना त्यांची दृष्टी जाते. भारतात अंधत्वाचे प्रमुख कारण असलेले मोतीबिंदू, आता त्याच दिवशी प्रगत ब्लेडलेस, रोबोटिक लेसर शस्त्रक्रियेने उपचार केले जाऊ शकतात. "...

फोर्ब्स इंडियाच्या टॉप १० विजिनरी लीडर आणि आइकॉन ऑफ इनोवेशनमध्ये सीए डॉ. महेश गौड़ यांचा समावेश

फोर्ब्स इंडियाच्या टॉप १० विजिनरी लीडर आणि आइकॉन ऑफ इनोवेशनमध्ये सीए डॉ. महेश गौड़ यांचा समावेश मुंबई। शिक्षण, मानसिक विकास आणि नवीन शिक्षण तंत्रज्ञान या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या सीए डॉ. महेश गौड़ यांचा फोर्ब्स इंडियाच्या टॉप १० अग्रगण्य व्यक्तिमत्त्वांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सीए डॉ. महेश गौड़ यांचे हे यश त्यांच्या व्यापक अनुभवाचे, कठोर परिश्रमाचे आणि लोकांची क्षमता वाढवण्याच्या समर्पणाचे फळ आहे. ते एडुक्विकचे सह-संस्थापक असून शिक्षक, एनएलपी प्रशिक्षक, स्मरणशक्ती प्रशिक्षक आणि परिवर्तनशील मार्गदर्शक म्हणून काम करतात. डॉ. महेश गौड़ यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकण्यास आणि प्रगती करण्यास मदत करणे आहे. त्यांनी आतापर्यंत २,००,००० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे, आणि त्यांना अभ्यासासोबतच आत्मविश्वास, एकाग्रता आणि उत्तम विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यांचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नाही. मानसिक विकास आणि व्यक्तिगत परिवर्तनाच्या क्षेत्रात, त्य...

आगरी समाज हॉल, नेरळ येथे नियमित योग शिबिर

नेरळ। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, रायगड जिल्ह्यातील नेरळ तालुक्यात एक दिवसीय योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. योग साधना केंद्राच्या संस्थापिका नलिनी मंगेश कराळे (योग शिक्षिका, योगशास्त्रात एम.ए., मराठी साहित्यात एम.फिल., ॲडव्हान्स्ड योग, पॉवर योग, झुंबा आणि इतर उपक्रम) यांच्या मार्गदर्शनाखाली आगरी समाज हॉलमध्ये नेरळ येथील स्थानिक स्त्री-पुरुषांनी योग वर्गात सहभाग घेतला. आगरी समाज हॉलमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस योग सत्रे आयोजित केली जातात. १९ जून रोजी सकाळी, निवृत्त शिक्षक प्रभाकर चासकर, योग शिक्षिका नलिनी कराळे आणि सहशिक्षिका मीना गोडे यांनी दीपप्रज्वलन करून आणि पूजा करून योग सत्राची सुरुवात केली. त्यांनी प्राणायाम योग आणि योगाच्या महत्त्वावर आपले विचारही मांडले. योग हा व्यायाम नसून एक सराव आहे. सुखम स्थायर्य आसनांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आजच्या वेगवान जीवनाचा आणि बदलत्या जीवनशैलीचा शरीरावर होणारा परिणाम आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांविषयी बोलताना, नलिनी कराले यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले.