सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सेंटचे मुंबईत 'क्लिनीकल प्रिव्हेंशन सेंटर' कार्यान्वित

मुंबईतील विस्तारासह भारतातील दुस-या केंद्राचा शुभारंभ 

मुंबई। 'अर्ली डिटेक्शन' (आजारपणाचे लवकर निदान) क्षेत्रातील अग्रगण्य हेल्थकेअर कंपनी 'सेंट'ने (CENT) मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) येथे भारतातील आपल्या दुस-या केंद्राच्या शुभारंभाची घोषणा केली. बेंगळुरूनंतरचे हे नवीन केंद्र सेंटच्या विस्ताराचा टप्पा अधोरेखित करते आणि भारतातील अत्यंत गतीमान शहरी लोकसंख्या असलेल्या मुंबईत आजारपणाचे लवकर निदान करणारे आरोग्य मॉडेल उपलब्ध करून देते.

सेंटची स्थापना संस्थापक आणि बोर्ड चेअर शशांक एनडी, तसेच सह-संस्थापक अर्पित गर्ग आणि अंशुल खंडेलवाल यांनी केली असून, हे तिघे तंत्रज्ञान, उत्पादन, ऑपरेशन्स आणि सदस्य अनुभव या मुख्य विभागांचे नेतृत्व करत आहेत. गंभीर आजारांची लक्षणे दिसण्यापूर्वीच त्यांची ओळख पटली पाहिजे, या संकल्पनेवर आधारित हे मुंबई केंद्र सर्वसमावेशक प्रतिबंधात्मक आरोग्य मूल्यांकन प्रदान करते. यामध्ये प्रगत इमेजिंग, ब्लड बायोमार्कर्स, एआय-आधारित विश्लेषण आणि डॉक्टरांचा सल्ला या सर्व सुविधा एकाच भेटीत उपलब्ध होतात.

मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबतची जागरूकता सातत्याने वाढत असताना, विशेषतः नोकरीपेशा व्यावसायिक, संस्थापक, वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबांमध्ये दीर्घकालीन आरोग्यासाठी 'प्रोअॅक्टिव्ह' दृष्टिकोन स्वीकारण्याकडे कल वाढत असताना हे केंद्र सुरू झाले आहे. जीवनशैलीशी संबंधित वाढते आजार, तणाव, हृदयविकाराचा धोका आणि चयापचय विकारांमुळे नियमित वार्षिक तपासणीच्या पलीकडे जाऊन सखोल आरोग्य तपासणी करण्याबाबत रस वाढत आहे.

गोरेगाव (पश्चिम) येथे स्थापित हे केंद्र विशेषतः प्रतिबंधात्मक काळजीसाठी तयार करण्यात आले आहे. प्रत्येक भेटीमध्ये संपूर्ण शरीराची एमआरआय, अल्ट्रा-लो-डोस कार्डियाक सीटी, डेक्सा, ईसीजी आणि १२० हून अधिक रक्त आणि बायोमार्कर चाचण्यांचा समावेश आहे. यानंतर डॉक्टरांचा सल्ला आणि सेंटच्या मालकीच्या एआय प्रणालीद्वारे तयार केलेला एकत्रित जोखीम अहवाल दिला जातो. हा संपूर्ण अनुभव साधारण दोन तासांत पूर्ण होईल अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे.

अनेक पुरवठादारांकडून तुकड्या-तुकड्यांत केल्या जाणाऱ्या पारंपारिक आरोग्य तपासणी पॅकेजच्या उलट, सेंट हृदयरोग, कर्करोग, न्यूरोलॉजिकल आणि मेटाबॉलिक जोखमींचे लवकर निदान करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रमाणित प्रोटोकॉलचे पालन करते.

या प्रसंगी बोलताना सेंटचे सह-संस्थापक आणि सीबीओ अंशुल खंडेलवाल म्हणाले, "आज लोक आरोग्याकडे ज्या प्रकारे पाहत आहेत, त्यात स्पष्ट बदल दिसून येत आहे, विशेषतः वेगवान शहरी वातावरणात. लक्षणे दिसल्यानंतर आजाराचा शोध लागण्याऐवजी गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्यापूर्वीच त्यावर मात करण्याची लोकांची इच्छा आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी हा विचारपूर्वक आणि प्रोअॅक्टिव्हरीत्या करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग बनत आहे. गेल्या काही महिन्यांतील आमच्या बेंगळुरू केंद्राच्या अनुभवातून, आपल्या आरोग्याबद्दल सखोल माहिती मिळवू इच्छिणाऱ्या लोकांकडून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईसारख्या शहरात, जिथे दीर्घकालीन आरोग्य आणि प्रतिबंधाबाबत जागरूकता आणि इच्छाशक्ती झपाट्याने वाढत आहे, तिथे हा अनुभव आणताना आम्हाला आनंद होत आहे."

मुंबईतील हे केंद्र कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला बेंगळुरूमध्ये केलेल्या लाँचिंगवर आधारित असून, हे भारतातील नियोजित मल्टी-सिटी रोलआउटचा भाग आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत कार्यान्वित झाल्यापासून सेंटच्या भागीदार-नेतृत्वाखालील नेटवर्कने सात शहरांमध्ये २,००० हून अधिक स्कॅन पूर्ण केले आहेत. यापैकी २६% स्कॅनमध्ये वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले, तर ३% प्रकरणांमध्ये तातडीने वैद्यकीय लक्ष देण्याची गरज असलेले गंभीर आजार आढळले. विशेष म्हणजे, स्कॅनच्या वेळी या व्यक्तींमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे नव्हती.

सेंट आपल्या केंद्रांमधील इमेजिंग आणि डायग्नोस्टिक पायाभूत सुविधांसाठी 'सीमेन्स हेल्थिनिअर्स' सोबत जवळून काम करत आहे. मुंबईतील केंद्र प्रगत एमआरआय, सीटी आणि डेक्सा सिस्टीमने सुसज्ज असून, ते विशेषतः प्रतिबंधात्मक तपासणी आणि सेंटच्या प्रमाणित क्लिनिकल प्रोटोकॉलसाठी कॉन्फिगर केले गेले आहेत.

सेंटचे संस्थापक आणि बोर्ड चेअर शशांक एनडी म्हणाले, "माझ्या मनाच्या जवळ असलेल्या मुंबई शहरात सेंटला आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे केंद्र प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबद्दल लोकांच्या विचारात आणि कृतीत अर्थपूर्ण बदल घडवून आणेल, अशी आम्हाला आशा आहे. आजची बहुतांश आरोग्य व्यवस्था लक्षणे दिसल्यानंतरच हस्तक्षेप करण्यासाठी डिझाइन केलेली आहे, तरीही हृदयरोग, कर्करोग आणि मेटाबॉलिक विकार यांसारखे आजार अनेक वर्षे शांतपणे शरीरात वाढत असतात. आमचा विश्वास आहे की आरोग्यसेवेतील पुढचा बदल हा आजारांचे लवकर निदान आणि वेळेवर कृती करण्यासाठी योग्य पाया तयार करण्यातून येईल. सेंट नेमकी हीच प्रतिबंधात्मक पायाभूत सुविधा उभारत आहे."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आगरी समाज हॉल, नेरळ येथे नियमित योग शिबिर

नेरळ। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, रायगड जिल्ह्यातील नेरळ तालुक्यात एक दिवसीय योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. योग साधना केंद्राच्या संस्थापिका नलिनी मंगेश कराळे (योग शिक्षिका, योगशास्त्रात एम.ए., मराठी साहित्यात एम.फिल., ॲडव्हान्स्ड योग, पॉवर योग, झुंबा आणि इतर उपक्रम) यांच्या मार्गदर्शनाखाली आगरी समाज हॉलमध्ये नेरळ येथील स्थानिक स्त्री-पुरुषांनी योग वर्गात सहभाग घेतला. आगरी समाज हॉलमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस योग सत्रे आयोजित केली जातात. १९ जून रोजी सकाळी, निवृत्त शिक्षक प्रभाकर चासकर, योग शिक्षिका नलिनी कराळे आणि सहशिक्षिका मीना गोडे यांनी दीपप्रज्वलन करून आणि पूजा करून योग सत्राची सुरुवात केली. त्यांनी प्राणायाम योग आणि योगाच्या महत्त्वावर आपले विचारही मांडले. योग हा व्यायाम नसून एक सराव आहे. सुखम स्थायर्य आसनांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आजच्या वेगवान जीवनाचा आणि बदलत्या जीवनशैलीचा शरीरावर होणारा परिणाम आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांविषयी बोलताना, नलिनी कराले यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले.

एआय करिअरला नवा आकार देत असताना डब्ल्यूपीयू गोवा उच्च शिक्षणात ट्रान्सडिसिप्लिनरी (आंतरशाखीय) दृष्टिकोनाला समर्थन देत आहे

युनिव्‍हर्सिटीमधील नेतृत्‍वाने वेगवान तंत्रज्ञान बदलांच्या या युगात अनुकूलता, आजीवन शिक्षण आणि ट्रान्सडिसिप्लिनरी शिक्षणाच्या वाढत्या गरजेवर भर दिला मुंबई। आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) आणि वेगवान तंत्रज्ञान बदल जगभरातील उद्योगांना नवा आकार देत असताना युनिव्‍हर्सिटीजनी विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या पहिल्या नोकरीसाठी तयार करण्यापलीकडे जाणे आवश्यक आहे. त्याऐवजी, त्यांना आयुष्यात येणाऱ्या अनेक करिअर बदलांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवले पाहिजे, असे मत २० जून रोजी आयोजित वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू) गोवा ओपन हाऊसमध्ये प्रवक्त्यांनी व्‍यक्त केले. या इव्‍हेण्‍टमध्‍ये भावी विद्यार्थी, पालक आणि शिक्षणतज्ज्ञ एकत्र आले होते. वाढत्या अनपेक्षित जगात उच्च शिक्षणाचे भविष्य आणि युनिव्‍हर्सिटीजकडून बदलत असलेल्या अपेक्षा यावर यावेळी सखोल चर्चा झाली. या संपूर्ण संवादाच्या केंद्रस्थानी डब्ल्यूपीयू गोवाचे ट्रान्सडिसिप्लिनरी शैक्षणिक मॉडेल होते, जे एखाद्या विषयाच्या सखोल अभ्यासासोबत विविध क्षेत्रांचा एकत्रित विचार करण्याची क्षमता, बदल स्वीकारण्याची तयारी आणि वास...

मैत्रीबोध परिवाराद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

मैत्री आणि संस्कृतीच्या मार्गानेच भारत विश्वगुरू बनेल: पूज्य मैत्रेय दादाश्रीजी  मुंबई। मैत्रीबोध परिवाराने शांतिक्षेत्र प्रेमगिरी आश्रम, कर्जत (रायगढ़) येथे एका अनोख्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले. या कार्यक्रमात मैत्री, संस्कृती आणि योगामुळे प्राप्त होणाऱ्या सर्वांगीण आरोग्य लाभांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या विशेष प्रसंगी शेकडो लोक एकत्र जमले आणि योगाच्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव घेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला. मानवतेच्या उन्नतीसाठी आणि व्यक्तीच्या अंतर्मनाचे पोषण करण्यासाठी समर्पित असलेली सामाजिक-आध्यात्मिक संस्था मैत्रीबोध परिवार योगाला आंतरिक परिवर्तन आणि सामूहिक कल्याणाचा प्रभावी मार्ग मानते. संस्थेची आध्यात्मिक मूल्ये आणि दृष्टीकोन हे योगाला जीवनपद्धती म्हणून प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत असलेल्या आयुष मंत्रालयाच्या भावनेशी सखोलपणे सुसंगत आहेत. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून भारताच्या सभ्यतागत आणि सांस्कृतिक वारशाचा अमूल्य भाग आहे. या विचाराला अधिक बळ देण्यासाठी भारत सरकारचे संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे कार्यक्रमाला ...