सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मुंबईकरांच्या प्रेमामुळे महालक्ष्मी सरस २०२६ ला आणखी तीन दिवस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

मुंबईकरांच्या आग्रहास्तव महालक्ष्मी सरस २०२६ आता १७ मेपर्यंत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर प्रदर्शन आणखी तीन दिवस सुरू राहणार

महालक्ष्मी सरस २०२६ ला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद; जयकुमार गोरे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई। बीकेसी येथे सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक मुंबईकरांकडून प्रदर्शनाची तारीख वाढवण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. प्रदर्शनातील महिला बचत गटांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, दररोज वाढणारी गर्दी आणि नागरिकांचा आग्रह लक्षात घेऊन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष प्रस्ताव मांडला.

प्रदर्शनाला मिळणारा उदंड प्रतिसाद, महिलांच्या उत्पादनांची वाढती विक्री आणि नागरिकांचा वाढता उत्साह पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रदर्शनाची दखल घेत सकारात्मक निर्णय घेतला. त्यानंतर महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शन आता १७ मेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला हे प्रदर्शन २ मे ते १४ मेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. मात्र आता नागरिकांना आणखी तीन दिवस महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा आनंद घेता येणार आहे.

ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मोठे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आयोजित या प्रदर्शनामुळे हजारो महिलांना मोठी संधी मिळत आहे. महिलांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ, घरगुती उत्पादने आणि विविध नाविन्यपूर्ण वस्तूंना मुंबईकरांकडून मोठी पसंती मिळत आहे.

२ मेपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल २१ कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे. विशेष म्हणजे, ९ मे २०२६ रोजी एका दिवसातच जवळपास ६ कोटी रुपयांचा व्यवसाय नोंदवण्यात आला. त्यामुळे महिला बचत गटांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या सुरू असलेला सुट्ट्यांचा कालावधी लक्षात घेता अनेक नागरिकांना प्रदर्शनाला भेट देता आली नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रदर्शन आणखी काही दिवस सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत होती. हा जनतेचा आग्रह आणि प्रदर्शनाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रस्ताव मांडला आणि त्याला तत्काळ मान्यताही मिळाली.

यासोबतच प्रदर्शनासाठी मोफत प्रवेशासोबत विशेष मोफत बससेवेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने नागरिक महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला भेट देत असून महिलांच्या उत्पादनांना भरघोस प्रतिसाद देत आहेत.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

क्रेडाई-एमसीएचआयने आपल्या चॅनेल भागीदारांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या विशेष 'प्रॉपर्टी एक्स्पो'

क्रेडाई-एमसीएचआयने आपल्या चॅनेल भागीदारांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या विशेष 'प्रॉपर्टी एक्स्पो'मध्ये MMR क्षेत्रातील ६०% रिअल इस्टेट विक्रीचे मुख्य चालक म्हणून या भागीदारांचा गौरव! आपल्या प्रकारचा हा पहिलाच एक्स्पो रिअल इस्टेट क्षेत्रातील सहकार्य, पारदर्शकता आणि व्यवसायाच्या वाढीला गती देण्यासाठी ४८ संघटना आणि ५० हून अधिक विकासकांना (Developers) एका छताखाली आणतो. मुंबई। सुखराज नाहर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) रिअल इस्टेट विकासकांची सर्वोच्च संस्था असलेल्या क्रेडाई-एमसीएचआयने, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये चॅनल पार्टनर्ससाठी आपला पहिला विशेष प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित केला. विकासक आणि घर खरेदीदार यांच्यातील महत्त्वाचा दुवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, या एक्स्पोने ५,००० हून अधिक चॅनल पार्टनर्स आणि ४८ चॅनल पार्टनर संघटनांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले. जवळपास ६०% स्थावर मालमत्तेची विक्री चॅनल पार्टनर इकोसिस्टममार्फत होत असल्याचे लक्षात घेता, 'व्यवसाय सुलभता' वाढवणे, चॅनल पार्टनर्सच्या योगदानाला मान्यता देणे आणि...

खुशी ठाकूरला मुंबईत 'व्हॉईस ऑफ द व्हॅली' म्हणूनही ओळखले जाते

संगीत विश्वात झपाट्याने ओळख मिळवणारी गायिका खुशी ठाकूर एक उदयोन्मुख नाव बनली आहे. आपल्या मधुर आवाजाने आणि मेहनतीने ती लाईव्ह आणि पार्श्वगायन या दोन्ही क्षेत्रांत आपली छाप पाडत आहे. विशेषतः, खुशी तिच्या दुःखद आणि रोमँटिक गाण्यांमधील भावपूर्ण आवाजासाठी ओळखली जाते आणि ती एक अष्टपैलू गायिका म्हणूनही उदयास येत आहे. खुशी ठाकूरला मुंबईत 'व्हॉईस ऑफ द व्हॅली' म्हणूनही ओळखले जाते. तिच्या मधुर, भावपूर्ण आवाजाने आणि उत्कृष्ट सादरीकरणाने तिला ही ओळख मिळवून दिली आहे, जे तिची वाढती लोकप्रियता आणि प्रतिभा दर्शवते. खुशीने संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे आणि आपली कला अधिक निखारण्यासाठी ती दररोज सकाळी आणि संध्याकाळी सराव करते. तिला लहानपणापासूनच संगीताची आवड आहे. ती नृत्यातही पारंगत असून तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. खुशी ठाकूरने 'लव्ह के फंडे' या चित्रपटातील 'अनमोल मस्का' या गाण्याने आपल्या पार्श्वगायन कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून तिने सातत्याने यश मिळवले असून, २० हून अधिक हिंदी आणि पंजाबी संगीत व्हिडिओंना आपला आवाज दिला आहे. खुशी थेट सादरीकर...

महालक्ष्मी सरस २०२६ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सात दिवसांत १५ कोटींची उलाढाल

मुंबई। २ मे २०२६ पासून सुरू झालेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या सात दिवसांत प्रदर्शनातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीईओ निलेश सागर आणि सीओओ निखिल कुमार ओसवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. महिलांना दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य: सीईओ निलेश सागर यांनी सांगितले की, महिलांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंडच्या माध्यमातून दिले जाते. याअंतर्गत यापूर्वी ६० हजार रुपये दिले जात होते; मात्र आता हा निधी वाढवून तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. महिलांच्या व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन गटस्तरावर निर्णय घेतले जातात. यासाठी कोणतीही जमीन किंवा सोने तारण घेतले जात नाही. केवळ बचत गटांनाच नव्हे, तर वैयक्तिक महिलांनाही त्यांच्या गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. महिलांच्या घरगुती परिस्थितीचा, व्यवसायाच्या गरजांचा आणि आर्थिक स्थितीचा विचार करून त्यांना आर्थिक मदत केली जाते. यामुळे ग्रामीण भागातील सावकारी पद्धतीला आणि जास्त व्या...