सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘महालक्ष्मी सरस २०२६’ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद; एकाच दिवसात ६ कोटींची विक्रमी उलाढाल

मुंबई। उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बीकेसी येथे २ मे पासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाला मुंबईकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, खाद्यपरंपरा, हस्तकला आणि महिला उद्योजकतेचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळत आहे.

ग्रामीण महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना जागतिक ओळख, कायमस्वरूपी बाजारपेठ आणि मोठे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचे प्रदर्शन अधिक आधुनिक व आकर्षक स्वरूपात साकारले आहे. या संकल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मान्यता व पाठबळ दिले. त्यामुळे हे प्रदर्शन जागतिक दर्जाचे सांस्कृतिक व व्यावसायिक व्यासपीठ ठरत आहे.

राज्यभरातील लाखो महिला बचत गटांनी तयार केलेले दागिने, साड्यांचे कलेक्शन, बांबूच्या वस्तू, घरगुती सजावटीचे साहित्य, ग्रामीण कलाकुसरीचे नमुने येथे विक्रीसाठी आहेत. सेंद्रिय गूळ, पापड, लोणची, मसाले, चटण्या, पुरणपोळ्या आणि ग्रामीण भागातील खास खाद्यपदार्थांनाही मुंबईकरांची पसंती मिळत आहे. काही महिला उद्योजिकांच्या पारंपरिक लोणच्यांना किलोमागे हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. अनेक स्टॉल्सवरील ६० टक्क्यांहून अधिक माल काही दिवसांतच विकला गेला.

९ मे रोजी एका दिवसात ६ कोटी रुपयांची विक्री झाली. आतापर्यंत प्रदर्शनातून ३२ कोटींची उलाढाल झाली असून, यंदा ५० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी नागपूरला १६ कोटी व वाशी येथे २२ कोटींची उलाढाल झाली होती. मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता प्रदर्शनाची मुदत १७ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

शाश्वत बाजारपेठेसाठी ‘उमेद मॉल’:
महिलांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी विक्रीचे व्यासपीठ मिळावे यासाठी ‘उमेद मार्ट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबतच ‘उमेद मॉल’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचे काम सुरू असून, भविष्यात तालुका स्तरापर्यंत विस्ताराचे नियोजन आहे. चालू वर्षात १३ उमेद मॉलचे काम सुरू होत असून पुढच्या एका वर्षात ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक मॉल किमान २० हजार चौरस फुटांचा असेल.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आणि जागतिक स्वरूप देण्यासाठी दिल्लीच्या मित्तल कंपनीची मदत घेण्यात आली. अधिकाऱ्यांसोबत त्यांनीही चांगले काम केले आहे.

सुविधा:
संपूर्ण परिसर वातानुकूलित असून स्वतंत्र एसी फूड कोर्ट, डिजिटल थीम पार्क आणि होम डिलिव्हरी सुविधा यंदा प्रथमच उपलब्ध आहे. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सुविधा आणि वांद्रे पूर्व व कुर्ला पश्चिम स्थानकांवरून मोफत बस सेवा आहे. शनिवार-रविवारी १५ ते २० हजार नागरिकांची उपस्थिती असते.

उमेद अभियानाची यशस्वी वाटचाल:
सन २०११ पासून अभियानाची यशस्वी अंमलबजावणी सुरू असून ३४ जिल्हे, ३५१ तालुके आणि ३१,५७८ गावांमध्ये उमेद पोहोचले आहे. ६६ लाख ग्रामीण कुटुंबांचा सहभाग असून ६ लाख ७० हजार स्वयं सहायता गटांची स्थापना झाली आहे. बँकांमार्फत बचत गटांना ५०,१५० कोटींहून अधिक कर्जवाटप, तर समुदाय निधी स्वरूपात ४,६४० कोटींचा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यात ५० लाख लखपती दीदी तयार झाल्या असून, मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली १ कोटी लखपती दीदी घडविण्याचे उद्दिष्ट आहे. ‘उमेद मार्ट’वर सुरुवातीला ४,२०० उत्पादने उपलब्ध असून अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टसोबत विक्री वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण:
राज्यास टप्पा १ अंतर्गत सन २०१६-१७ ते २०२२-२३ पर्यंत १३,११,६९९ घरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले. त्यापैकी १००% म्हणजेच सर्व घरांना मंजुरी मिळून १२,८४,२२९ घरकुले पूर्ण झाली आहेत. सन २०२४-२५ मध्ये राज्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये ६.३७ लाख, डिसेंबर २०२४ मध्ये १३.२९ लाख तसेच पीएमजनमन अंतर्गत ४५,७७० आणि सन २०२५-२६ मध्ये १० लाख असे मिळून एकूण ३० लाख इतके देशातील सर्वाधिक उद्दिष्ट मंजूर झाले. त्यापैकी २७,८६,८५३ घरांना मंजुरी असून ५,०८,२६७ घरकुले पूर्ण झाली आहेत, तर २२,७८,५८६ प्रगतीपथावर आहेत.

मागील एका वर्षातच ५,०८,२६७ घरकुले पूर्ण करण्याची विक्रमी कामगिरी झाली. या ५ लाख घरकुलांचे लोकार्पण केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान व मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रासाठी सुमारे १०,००० कोटी निधीची घोषणा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करून ३० लाख नव्या घरकुलांचे उद्दिष्ट मिळवले.

“मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्यासाठी आभार. एक कोटी लखपती दीदी बनविण्याचे लक्ष मुख्यमंत्र्यांनी दिले, आम्ही त्या दिशेने वाटचाल करीत आहोत. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकत आहोत,” असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

डोळ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे

जागरूकता निर्माण करण्यासाठी सेंटर फॉर साईटने मिलिंद सोमण यांच्याशी भागीदारी केली आहे मुंबई। जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त, भारतातील आघाडीचे सुपर-स्पेशालिटी आय हॉस्पिटल नेटवर्क, सेंटर फॉर साईटने वयाशी संबंधित डोळ्यांच्या आजारांमध्ये वेळेवर हस्तक्षेप करण्याची तातडीची गरज यावर भर दिला आहे. जागरूकता वाढवण्यासाठी, सेंटर फॉर साईटने फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांच्याशी भागीदारी केली आहे, जे सक्रिय वृद्धत्व आणि समग्र आरोग्याचे प्रतीक आहेत. ही मोहीम कुटुंबांना आठवण करून देते की नियमित डोळ्यांची तपासणी केल्याशिवाय आरोग्य अपूर्ण आहे. देशात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे १४ कोटींहून अधिक लोक आहेत, त्यापैकी जवळजवळ प्रत्येक तीनपैकी एकाला दृष्टी कमी होते. ही स्थिती वृद्धांच्या स्वातंत्र्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम करते. जागतिक स्तरावर, ८० टक्के अंधत्वाच्या घटना टाळता येतात. तरीही, गैरसमज आणि विलंबित काळजीमुळे वृद्धांना त्यांची दृष्टी जाते. भारतात अंधत्वाचे प्रमुख कारण असलेले मोतीबिंदू, आता त्याच दिवशी प्रगत ब्लेडलेस, रोबोटिक लेसर शस्त्रक्रियेने उपचार केले जाऊ शकतात. "...

आगरी समाज हॉल, नेरळ येथे नियमित योग शिबिर

नेरळ। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, रायगड जिल्ह्यातील नेरळ तालुक्यात एक दिवसीय योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. योग साधना केंद्राच्या संस्थापिका नलिनी मंगेश कराळे (योग शिक्षिका, योगशास्त्रात एम.ए., मराठी साहित्यात एम.फिल., ॲडव्हान्स्ड योग, पॉवर योग, झुंबा आणि इतर उपक्रम) यांच्या मार्गदर्शनाखाली आगरी समाज हॉलमध्ये नेरळ येथील स्थानिक स्त्री-पुरुषांनी योग वर्गात सहभाग घेतला. आगरी समाज हॉलमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस योग सत्रे आयोजित केली जातात. १९ जून रोजी सकाळी, निवृत्त शिक्षक प्रभाकर चासकर, योग शिक्षिका नलिनी कराळे आणि सहशिक्षिका मीना गोडे यांनी दीपप्रज्वलन करून आणि पूजा करून योग सत्राची सुरुवात केली. त्यांनी प्राणायाम योग आणि योगाच्या महत्त्वावर आपले विचारही मांडले. योग हा व्यायाम नसून एक सराव आहे. सुखम स्थायर्य आसनांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आजच्या वेगवान जीवनाचा आणि बदलत्या जीवनशैलीचा शरीरावर होणारा परिणाम आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांविषयी बोलताना, नलिनी कराले यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले.

स्टँडर्ड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीने जीस्केल एनर्जीमधील बहुसंख्य हिस्सेदारी खरेदी केली

मुंबई। भारतातील अग्रगण्य प्रिसिजन आणि मल्टिडिसिप्लिनरी इंजिनिअरिंग कंपनी, स्टँडर्ड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी लिमिटेडने आज जीस्केल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमधील ५१% ची बहुसंख्य इक्विटी हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. हा करार भारताच्या 'एआय' इन्फ्रास्ट्रक्चर प्रवासातील आणि 'एसईटीएल'च्या एक फुल-स्पेक्ट्रम इंजिनिअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून होणाऱ्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे. गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून, 'एसईटीएल'ने फार्मा आणि केमिकल उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उभारण्यात नैपुण्य मिळवले आहे. यामध्ये कुलिंग स्किड्स, हीट एक्सचेंजर्स, व्हॅक्यूम सिस्टीम्स, इलेक्ट्रिकल सिस्टीम्स, ऑटोमेशन, एअर हँडलिंग युनिट्स, प्रोसेस डिस्ट्रिब्युशन युनिट्स, मॉड्युलर प्रोसेस इक्विपमेंट आणि संपूर्ण टर्नकी प्लांट्सचा समावेश आहे. प्रत्येक फार्मा सुविधेला प्रिसिजन-इंजिनिअर्ड पॉवर मॅनेजमेंट, थर्मल कंट्रोल, क्लीन युटिलिटीज आणि फेल-सेफ ऑटोमेशनची आवश्यकता असते. हीच अचूकता प्रत्येक आधुनिक 'एआय डेटासेंटर'साठी देखील आवश्यक असते. जि...