सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘महालक्ष्मी सरस २०२६’ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद; एकाच दिवसात ६ कोटींची विक्रमी उलाढाल

मुंबई। उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बीकेसी येथे २ मे पासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाला मुंबईकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, खाद्यपरंपरा, हस्तकला आणि महिला उद्योजकतेचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळत आहे.

ग्रामीण महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना जागतिक ओळख, कायमस्वरूपी बाजारपेठ आणि मोठे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचे प्रदर्शन अधिक आधुनिक व आकर्षक स्वरूपात साकारले आहे. या संकल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मान्यता व पाठबळ दिले. त्यामुळे हे प्रदर्शन जागतिक दर्जाचे सांस्कृतिक व व्यावसायिक व्यासपीठ ठरत आहे.

राज्यभरातील लाखो महिला बचत गटांनी तयार केलेले दागिने, साड्यांचे कलेक्शन, बांबूच्या वस्तू, घरगुती सजावटीचे साहित्य, ग्रामीण कलाकुसरीचे नमुने येथे विक्रीसाठी आहेत. सेंद्रिय गूळ, पापड, लोणची, मसाले, चटण्या, पुरणपोळ्या आणि ग्रामीण भागातील खास खाद्यपदार्थांनाही मुंबईकरांची पसंती मिळत आहे. काही महिला उद्योजिकांच्या पारंपरिक लोणच्यांना किलोमागे हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. अनेक स्टॉल्सवरील ६० टक्क्यांहून अधिक माल काही दिवसांतच विकला गेला.

९ मे रोजी एका दिवसात ६ कोटी रुपयांची विक्री झाली. आतापर्यंत प्रदर्शनातून ३२ कोटींची उलाढाल झाली असून, यंदा ५० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी नागपूरला १६ कोटी व वाशी येथे २२ कोटींची उलाढाल झाली होती. मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता प्रदर्शनाची मुदत १७ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

शाश्वत बाजारपेठेसाठी ‘उमेद मॉल’:
महिलांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी विक्रीचे व्यासपीठ मिळावे यासाठी ‘उमेद मार्ट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबतच ‘उमेद मॉल’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचे काम सुरू असून, भविष्यात तालुका स्तरापर्यंत विस्ताराचे नियोजन आहे. चालू वर्षात १३ उमेद मॉलचे काम सुरू होत असून पुढच्या एका वर्षात ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक मॉल किमान २० हजार चौरस फुटांचा असेल.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आणि जागतिक स्वरूप देण्यासाठी दिल्लीच्या मित्तल कंपनीची मदत घेण्यात आली. अधिकाऱ्यांसोबत त्यांनीही चांगले काम केले आहे.

सुविधा:
संपूर्ण परिसर वातानुकूलित असून स्वतंत्र एसी फूड कोर्ट, डिजिटल थीम पार्क आणि होम डिलिव्हरी सुविधा यंदा प्रथमच उपलब्ध आहे. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सुविधा आणि वांद्रे पूर्व व कुर्ला पश्चिम स्थानकांवरून मोफत बस सेवा आहे. शनिवार-रविवारी १५ ते २० हजार नागरिकांची उपस्थिती असते.

उमेद अभियानाची यशस्वी वाटचाल:
सन २०११ पासून अभियानाची यशस्वी अंमलबजावणी सुरू असून ३४ जिल्हे, ३५१ तालुके आणि ३१,५७८ गावांमध्ये उमेद पोहोचले आहे. ६६ लाख ग्रामीण कुटुंबांचा सहभाग असून ६ लाख ७० हजार स्वयं सहायता गटांची स्थापना झाली आहे. बँकांमार्फत बचत गटांना ५०,१५० कोटींहून अधिक कर्जवाटप, तर समुदाय निधी स्वरूपात ४,६४० कोटींचा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यात ५० लाख लखपती दीदी तयार झाल्या असून, मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली १ कोटी लखपती दीदी घडविण्याचे उद्दिष्ट आहे. ‘उमेद मार्ट’वर सुरुवातीला ४,२०० उत्पादने उपलब्ध असून अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टसोबत विक्री वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण:
राज्यास टप्पा १ अंतर्गत सन २०१६-१७ ते २०२२-२३ पर्यंत १३,११,६९९ घरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले. त्यापैकी १००% म्हणजेच सर्व घरांना मंजुरी मिळून १२,८४,२२९ घरकुले पूर्ण झाली आहेत. सन २०२४-२५ मध्ये राज्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये ६.३७ लाख, डिसेंबर २०२४ मध्ये १३.२९ लाख तसेच पीएमजनमन अंतर्गत ४५,७७० आणि सन २०२५-२६ मध्ये १० लाख असे मिळून एकूण ३० लाख इतके देशातील सर्वाधिक उद्दिष्ट मंजूर झाले. त्यापैकी २७,८६,८५३ घरांना मंजुरी असून ५,०८,२६७ घरकुले पूर्ण झाली आहेत, तर २२,७८,५८६ प्रगतीपथावर आहेत.

मागील एका वर्षातच ५,०८,२६७ घरकुले पूर्ण करण्याची विक्रमी कामगिरी झाली. या ५ लाख घरकुलांचे लोकार्पण केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान व मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रासाठी सुमारे १०,००० कोटी निधीची घोषणा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करून ३० लाख नव्या घरकुलांचे उद्दिष्ट मिळवले.

“मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्यासाठी आभार. एक कोटी लखपती दीदी बनविण्याचे लक्ष मुख्यमंत्र्यांनी दिले, आम्ही त्या दिशेने वाटचाल करीत आहोत. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकत आहोत,” असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

हजारो लोकांना चिंता आणि तणावातून मुक्त करणाऱ्या सीए डॉ. महेश गौड़ यांना 'सुप्रीम वर्ल्ड रेकॉर्ड टाइटल 2026' प्रदान करण्यात आला आहे

नई दिल्ली। सीए डॉ. महेश गौड़, एक प्रसिद्ध मानसिक आणि स्मरणशक्ती प्रशिक्षक, ज्यांनी हजारो लोकांना चिंता, तणाव, नैराश्य आणि मानसिक भीतीवर मात करण्यास मदत केली आहे, त्यांना 'सुप्रीम वर्ल्ड रेकॉर्ड टाइटल २०२६' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा आंतरराष्ट्रीय सन्मान अमेरिकेतील 'इकोहग एलएलसी' (Echohug LLC) या संस्थेद्वारे प्रदान करण्यात आला. सीए डॉ. महेश गौड़ यांना मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले, जे ते विनामूल्य प्रदान करतात. न्यूरो-लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग (NLP) आणि मानसिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून, त्यांनी हजारो लोकांना भीती, तणाव, आघात आणि फोबियावर मात करण्यास मदत केली आहे. डॉ. महेश गौड़ यांची प्रशिक्षण पद्धत सोपी, वैज्ञानिक आणि परिणाम-केंद्रित मानली जाते. त्यांच्या सत्रांमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या मते, त्यांना मानसिक शांती, आत्मविश्वास आणि एकाग्रता प्राप्त झाली आहे. विद्यार्थी, नोकरदार व्यावसायिक आणि सामान्य जनता—प्रत्येकाला—त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे. मानसिक आरोग्यासोबतच, डॉ. महेश गौड़...

प्रियंका भट्टाचार्जीचे लक्ष हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्यावर आहे

अभिनेत्री प्रियंका भट्टाचार्जी आता हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून स्वतःला स्थापित करण्याची तयारी करत आहे. तिने बंगाली चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आधीच एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहान वयातच अभिनयाच्या जगात प्रवेश करून, प्रियंकाने आतापर्यंत सहा बंगाली चित्रपट प्रदर्शित केले आहेत, जे तिचा अनुभव आणि समर्पण दर्शवते. प्रियांकाने स्वतःला केवळ बंगाली चित्रपटांपुरते मर्यादित ठेवलेले नाही. तिने 'जलेबी' या मराठी चित्रपटात स्वप्निल जोशीसोबत स्क्रीन शेअर केली. इतकेच नाही, तर अनुपप्रिया गोएंकासोबतच्या तिच्या 'तालुक' या हिंदी शॉर्ट फिल्मने तिला हिंदी प्रेक्षकांमध्येही ओळख मिळवून दिली. माधुरी दीक्षितपासून प्रेरित होऊन, प्रियंकाचा विश्वास आहे की एका कलाकाराने अशा भूमिका निवडल्या पाहिजेत ज्यात अनेक पैलू असतील आणि तिला विविध प्रकारच्या अभिनयाचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. तिला अशा आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात, ज्या तिच्या अभिनयाची खोली तपासतात. तिच्या प्रवासाविषयी सांगताना प्रियंका सांगते की, लहानपणी तिला एका डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेण्याच...

स्टँडर्ड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीची आर्थिक वर्ष २०२६ मध्ये विक्रमी कामगिरी

मुंबई। स्टँडर्ड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत आणि संपूर्ण वर्षात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत, वर्षासाठी निश्चित केलेले उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. मुख्य व्यवसायांची सुनियोजित अंमलबजावणी, सुधारित कार्यक्षमता, शिस्तबद्ध खर्च व्यवस्थापन आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय संधींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सक्षम व्यवसाय विकास यंत्रणेमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीने वृद्धीच्या पुढील टप्प्यासाठी आपल्या संचालक मंडळाचे बळकटीकरण, जागतिक स्तरावर नेतृत्व क्षमता वाढवणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करणे आणि प्रगत तंत्रज्ञान व धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. श्री. यासुयुकी इकेदा यांची 'कार्यकारी संचालक' म्हणून पुनर्नियुक्ती आणि श्री. कंचर्ला उमा महेश्वर राव यांची 'स्वतंत्र संचालक' म्हणून केलेली नियुक्ती कंपनीचे जागतिक व्यवसाय विकास, तंत्रज्ञान-आधारित विस्तार आणि उत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्सकडे असलेले लक्ष अधोरेखित करते. स्टँडर्ड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी लिमिटेडने...