सीधे मुख्य सामग्री पर जाएं

'भारतक्लाउड' आणि 'बीडीआयए' कडून 'भारत डिजिटल संवाद'मध्ये भागीदारी

मुंबई। नवी दिल्ली येथे 'भारतात डिजिटल पायाभूत सुविधा संघटना' (बीडीआयए) द्वारे आयोजित पहिल्या राष्ट्रीय परिषदेत म्हणजेच 'भारत डिजिटल संवादा'मध्ये 'भारतक्लाउड 'ने सहभाग घेतला. या परिषदेत देशाचे धोरणकर्ते, क्लाउड पायाभूत सुविधा क्षेत्रातील आघाडीचे नेते, नियामक संस्था, व्यावसायिक उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख घटक एकत्र आले होते. या सर्वांनी भारताचे डिजिटल सार्वभौमत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधांची सज्जता आणि देशांतर्गत क्लाउड परिसंस्थेचे भविष्य याविषयी सविस्तर चर्चा केली.

या कार्यक्रमात 'भारत डिजिटल पायाभूत सुविधा संघटना' (बीडीआयए) ची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली. ही एक ना-नफा तत्त्वावर काम करणारी उद्योग संघटना असून धोरणात्मक चर्चा, परस्पर सहकार्य आणि 'डेटा स्वराज्य' या संकल्पनेच्या माध्यमातून भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास व सुधारणा करण्यासाठी ती समर्पित आहे. या परिषदेतील चर्चा प्रामुख्याने सार्वभौम क्लाउड पायाभूत सुविधांचा विकास, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सज्ज असलेली संगणकीय परिसंस्था, डिजिटल उद्योग धोरणे आणि परदेशी नियंत्रणाखालील डिजिटल पायाभूत सुविधांवर असणारे दीर्घकालीन अवलंबित्व अशा महत्त्वाच्या विषयांवर केंद्रित होती.

या परिषदेतील चर्चेवरून 'डेटा स्वराज्य' आणि स्वतःचे नियंत्रण असलेल्या म्हणजेच स्वायत्त कृत्रिम बुद्धिमत्ता सज्ज पायाभूत सुविधांवर वाढता भर दिला जात असल्याचे स्पष्ट झाले. तसेच भारताच्या दीर्घकालीन डिजिटल लवचिकतेला पाठबळ देण्यासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता क्लाउड'चा स्वीकार करण्यावरही भर देण्यात आला. संपूर्ण परिषदेत डिजिटल सार्वभौमत्व आणि पायाभूत सुविधा धोरणाबाबत उद्योग क्षेत्राच्या अत्यंत व्यापक दृष्टिकोनावरच मुख्यत्वे चर्चा केंद्रित होती.

'भारतक्लाउड'चे सह-संस्थापक आणि 'बीडीआयए'चे संस्थापक सदस्य राहुल टक्कलपल्ली या कार्यक्रमात सहभागी होताना म्हणाले, “जेव्हा भारतीय तंत्रज्ञान कंपन्या एकाच परिसंस्थेमध्ये एकमेकांच्या सहकार्याने काम करतील आणि एकत्र प्रगती करतील, तेव्हाच भारताची डिजिटल घोडदौड अधिक मजबूत होईल. डिजिटल सार्वभौमत्व, विश्वासार्ह पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन तंत्रज्ञान लवचिकता या सामायिक उद्दिष्टासाठी 'बीडीआयए'च्या माध्यमातून जवळपास ४० संस्था एकत्र आल्याचे पाहणे अत्यंत उत्साहवर्धक आहे. उदयोन्मुख संस्थांचे हे सहकार्य 'बीडीआयए'ची क्षमता अधोरेखित करते.

बीडीआयए'चे अध्यक्ष आणि 'ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड'चे प्रवर्तक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी म्हणाले, “भारताने आधीच जगातील सर्वात व्यापक डिजिटल पायाभूत सुविधा परिसंस्थेपैकी एक उभारली आहे. 
'बीडीआयए'चे सरचिटणीस अभिषेक भट्ट म्हणाले, “रेडिफ, सिफी, खोज आणि इंडियाटाइम्स यांसारख्या मंचांच्या माध्यमातून भारताने सुरुवातीच्या काळात या क्षेत्रात आघाडी घेतली होती, परंतु देशांतर्गत परिसंस्थेला स्पर्धात्मक पातळीवर विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक पाठबळाची कमतरता भासली.

या परिषदेत तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या स्वावलंबनाच्या महत्त्वाकांक्षेला बळ देणारी ठोस चौकट तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यादरम्यानची चर्चा केवळ उद्योग पातळीपुरती मर्यादित न राहता धोरणात्मक विकास आणि त्यांच्या अंमलबजावणीपर्यंत विस्तारली होती. याशिवाय, हा मंच भविष्यातील धोरणात्मक शिफारसी, औद्योगिक मानके आणि पायाभूत सुविधांच्या योजनांसाठी एक मार्ग तयार करेल; ज्याचा उपयोग भारताच्या पुढील टप्प्यातील विकासादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीला व प्रशासनाला आकार देण्यासाठी केला जाईल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

‘फार्म टू फॉरेन’ उपक्रम महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक पटलावर नेणार

असोचॅमच्या 'फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन  मुंबई। महाराष्ट्राचा ‘फार्म टू फॉरेन’ हा उपक्रम शेतकरी, उत्पादक, उद्योजक आणि जागतिक फॅशन उद्योगाला एकत्र जोडण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे महाराष्ट्र एक प्रमुख वस्त्रोद्योग आणि निर्यात केंद्र म्हणून नावारूपास येईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (ASSOCHAM - असोचॅम) द्वारे मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६’ मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेने “ॲडव्हान्सिंग इंडियाज ५एफ व्हिजन फॉर सस्टेनेबल अँड ट्रेसेबल टेक्स्टाईल व्हॅल्यू चेन्स” या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, उत्पादक, शाश्वतता तज्ज्ञ आणि महत्त्वाचे भागधारक एकत्र आले होते. केंद्र सरकारच्या '५एफ विजन'—फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेनला अनुसरून असलेल्या या उपक्रमात भारताची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे, ह...

फुजीफिल्म इंडियाने मुंबईत भारतातील पहिले 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी' सुरू केले

भारतातील पहिल्या 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी'चे उद्घाटन जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त करण्यात आले, जो छायाचित्रणाच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. ही आकर्षक जागा फुजीफिल्मचा संपूर्ण इमेजिंग पोर्टफोलिओ, क्रिएटर अनुभव आणि समुदाय-आधारित शिक्षण एकाच छताखाली एकत्र आणते. मुंबई। फुजीफिल्म इंडियाने ' फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी 'च्या उद्घाटनाची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील पहिले आणि जागतिक स्तरावरील अकरावे केंद्र आहे, जे फोटोग्राफी आणि इमेजिंगचा एक परिपूर्ण अनुभव देते. हे उद्घाटन जागतिक फोटोग्राफी दिनाच्या (१९ ऑगस्ट) दिवशी होत असून, या वर्षी फोटोग्राफीच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे स्थित, हे दोन मजली, ५,७९५ चौरस फुटांचे केंद्र फुजीफिल्मच्या संपूर्ण इमेजिंग इकोसिस्टमला एकाच छताखाली एकत्र आणते. केवळ एक अनुभव केंद्र नसून, फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी ही एक सर्जनशील जागा आहे, जिथे इमेजिंग तंत्रज्ञान, कला आणि कथाकथन एकत्र येतात. हे नवीन फोटोग्राफर, चित्रपट निर्माते, कंटेंट क्रिएटर किंवा व्यावसायिक...

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने अँथे 2026 सुरू केले आहे

विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता ओळखण्यास आणि स्पर्धात्मक यशासाठी तयार होण्यास मदत करणारी सर्वात मोठी टॅलेंट हंट परीक्षा. भारतातील सर्वात जुन्या प्रतिभा ओळख परीक्षेने गेल्या १६ वर्षांत १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना काय सुधारायचे आहे आणि पुढे काय करायचे आहे हे समजण्यास मदत करण्यासाठी शास्त्रीय मूल्यांकन, राष्ट्रीय बेंचमार्किंग आणि वैयक्तिकृत शैक्षणिक अंतर्दृष्टी यांचा मेळ साधते अँथे २०२६ एका दृष्टिक्षेपात: • अँथे ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक काळ चालणारी प्रतिभा शोध परीक्षा आहे, ज्यामध्ये गेल्या १६ वर्षांत १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. • परीक्षेतील प्रत्येक प्रश्न उद्देश-केंद्रित असून, तो विविध विषयांमधील विशिष्ट संकल्पना आणि क्षमतांचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केलेला आहे. • ही एक व्यापक, शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली निदान चाचणी आहे, जी केवळ गुणांपलीकडे जाऊन विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी, स्पर्धात्मक तयारी आणि परीक्षेतील वर्तणूक समजून घेते. • विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि कामगिरीसाठी १००% पर्यंत श...