मुंबई। नवी दिल्ली येथे 'भारतात डिजिटल पायाभूत सुविधा संघटना' (बीडीआयए) द्वारे आयोजित पहिल्या राष्ट्रीय परिषदेत म्हणजेच 'भारत डिजिटल संवादा'मध्ये 'भारतक्लाउड 'ने सहभाग घेतला. या परिषदेत देशाचे धोरणकर्ते, क्लाउड पायाभूत सुविधा क्षेत्रातील आघाडीचे नेते, नियामक संस्था, व्यावसायिक उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख घटक एकत्र आले होते. या सर्वांनी भारताचे डिजिटल सार्वभौमत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधांची सज्जता आणि देशांतर्गत क्लाउड परिसंस्थेचे भविष्य याविषयी सविस्तर चर्चा केली.
या कार्यक्रमात 'भारत डिजिटल पायाभूत सुविधा संघटना' (बीडीआयए) ची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली. ही एक ना-नफा तत्त्वावर काम करणारी उद्योग संघटना असून धोरणात्मक चर्चा, परस्पर सहकार्य आणि 'डेटा स्वराज्य' या संकल्पनेच्या माध्यमातून भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास व सुधारणा करण्यासाठी ती समर्पित आहे. या परिषदेतील चर्चा प्रामुख्याने सार्वभौम क्लाउड पायाभूत सुविधांचा विकास, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सज्ज असलेली संगणकीय परिसंस्था, डिजिटल उद्योग धोरणे आणि परदेशी नियंत्रणाखालील डिजिटल पायाभूत सुविधांवर असणारे दीर्घकालीन अवलंबित्व अशा महत्त्वाच्या विषयांवर केंद्रित होती.
या परिषदेतील चर्चेवरून 'डेटा स्वराज्य' आणि स्वतःचे नियंत्रण असलेल्या म्हणजेच स्वायत्त कृत्रिम बुद्धिमत्ता सज्ज पायाभूत सुविधांवर वाढता भर दिला जात असल्याचे स्पष्ट झाले. तसेच भारताच्या दीर्घकालीन डिजिटल लवचिकतेला पाठबळ देण्यासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता क्लाउड'चा स्वीकार करण्यावरही भर देण्यात आला. संपूर्ण परिषदेत डिजिटल सार्वभौमत्व आणि पायाभूत सुविधा धोरणाबाबत उद्योग क्षेत्राच्या अत्यंत व्यापक दृष्टिकोनावरच मुख्यत्वे चर्चा केंद्रित होती.
'भारतक्लाउड'चे सह-संस्थापक आणि 'बीडीआयए'चे संस्थापक सदस्य राहुल टक्कलपल्ली या कार्यक्रमात सहभागी होताना म्हणाले, “जेव्हा भारतीय तंत्रज्ञान कंपन्या एकाच परिसंस्थेमध्ये एकमेकांच्या सहकार्याने काम करतील आणि एकत्र प्रगती करतील, तेव्हाच भारताची डिजिटल घोडदौड अधिक मजबूत होईल. डिजिटल सार्वभौमत्व, विश्वासार्ह पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन तंत्रज्ञान लवचिकता या सामायिक उद्दिष्टासाठी 'बीडीआयए'च्या माध्यमातून जवळपास ४० संस्था एकत्र आल्याचे पाहणे अत्यंत उत्साहवर्धक आहे. उदयोन्मुख संस्थांचे हे सहकार्य 'बीडीआयए'ची क्षमता अधोरेखित करते.
बीडीआयए'चे अध्यक्ष आणि 'ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड'चे प्रवर्तक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी म्हणाले, “भारताने आधीच जगातील सर्वात व्यापक डिजिटल पायाभूत सुविधा परिसंस्थेपैकी एक उभारली आहे.
'बीडीआयए'चे सरचिटणीस अभिषेक भट्ट म्हणाले, “रेडिफ, सिफी, खोज आणि इंडियाटाइम्स यांसारख्या मंचांच्या माध्यमातून भारताने सुरुवातीच्या काळात या क्षेत्रात आघाडी घेतली होती, परंतु देशांतर्गत परिसंस्थेला स्पर्धात्मक पातळीवर विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक पाठबळाची कमतरता भासली.
या परिषदेत तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या स्वावलंबनाच्या महत्त्वाकांक्षेला बळ देणारी ठोस चौकट तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यादरम्यानची चर्चा केवळ उद्योग पातळीपुरती मर्यादित न राहता धोरणात्मक विकास आणि त्यांच्या अंमलबजावणीपर्यंत विस्तारली होती. याशिवाय, हा मंच भविष्यातील धोरणात्मक शिफारसी, औद्योगिक मानके आणि पायाभूत सुविधांच्या योजनांसाठी एक मार्ग तयार करेल; ज्याचा उपयोग भारताच्या पुढील टप्प्यातील विकासादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीला व प्रशासनाला आकार देण्यासाठी केला जाईल.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें