सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोदींच्या कार्यकाळाला ‘राष्ट्रनिर्माणाचा सुवर्णकाळ’म्हणून केले अधोरेखित

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांची पूर्तता: भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोदींच्या कार्यकाळाला ‘राष्ट्रनिर्माणाचा सुवर्णकाळ’म्हणून केले अधोरेखित

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा बदलला चेहरा; 12 वर्षांच्या त्यांच्या कार्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया

मुंबई। देशाचा स्वाभिमान जागा करून परिवर्तन घडवलं जाऊ शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याने दाखवून दिले आहे. फक्त अनुदान घेणे ही वृत्ती न बाळगता देशाला जगामध्ये स्वाभिमानाने उभा असलेला भारत देश बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एवढेच नाही तर देशात मेक इन इंडिया ही चळवळ राबवून मेक फॉर वर्ल्ड च्या दिशेने देशाची वाटचाल सुरू करण्यामागे मोलाचे योगदान दिले आहे. ज्या भारताकडे पूर्वी एक याचक राष्ट्र म्हणून पाहिले जायचे, त्याला जागतिक महाशक्ती बनविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काढले. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे २०२६ रोजी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची १२ वर्षे पूर्ण करत आहेत. मोदीजींच्या यशस्वी, दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे एक तप हे भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले आहे. या ऐतिहासिक पर्वानिमित्त 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मुंबईतील प्रभादेवी स्थित रविंद्र नाट्यमंदिर येथे करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या सोबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कुटे, आमदार सुनील राणे उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मोदींजींनी मागील 12 वर्षांत केलेले कार्य खूप मोठे आहे. एका पुस्तकात ते कार्य मांडणे खूप कठीण काम आहे. देशातील तळागाळातील शेवटच्या माणसाला सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी मोदींजींनी सतत प्रयत्न केले. हर घर शौचालय, उज्वला गॅस योजना यांसारख्या योजना त्यांनी राबवल्या. सरकारच्या अनुदानावर जनतेला न ठेवता गरीब केंद्रित अजेंडा त्यांनी राबवला. त्याचाच परिणाम म्हणून मागील 10 वर्षांत 25 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश आले. भारताचा GDP 2013-14 मध्ये 103 लाख कोटी होता तो 2025-26 मध्ये 357 लाख कोटींपर्यंत म्हणजेच तिप्पट वाढवला. महाराष्ट्राचा GDP 2013-14 मध्ये 13 लाख कोटी इतका होता तो 2025-26 पर्यंत 54 लाख कोटी इतका वाढवला. हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. पंतप्रधान मोदींजींचे 12 वर्षांत केलेला देशाचा विकास हा फक्त घोषणांनी झालेला नाही, तर त्यामागे त्यांची विकासाभिमुख नियोजनबद्ध रणनीती हे मुख्य कारण आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत भारताने केवळ विकास केला नाही, तर जगासमोर एका नव्या राष्ट्रशक्तीचा आदर्श उभा केला आहे. आजचा भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारा, डिजिटल तंत्रज्ञानाने सक्षम झालेला, उद्योगशील आणि नारीशक्तीला केंद्रस्थानी ठेवणारा समर्थ राष्ट्र म्हणून जगभरात ओळखला जात आहे, असे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती”या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात काढले. “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती”म्हणजे खरंतर देशाच्या जनतेने अनुभवलेला परिवर्तनाचा इतिहास आहे, असे सांगत रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले की, गेल्या एका तपामध्ये सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेला बदल प्रत्येक भारतीयाने अनुभवला आहे. शेतकरी, कामगार, गरीब, वंचित आणि उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी व्यवस्था मोदी सरकारने निर्माण केली. 

पारदर्शक शासनपद्धतीमुळे सरकारी योजनांचा लाभ थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला. देशातील गरीबांच्या घरात उजेड, महिलांच्या आयुष्यात सन्मान, युवकांच्या हातात संधी आणि सामान्य नागरिकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. “एक भारत, अखंड भारत”ते “विकसित भारत”या प्रवासातील परिवर्तनाची १२ विषयांवरील तथ्यपूर्ण मांडणी या विशेष अंकातून करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

या विशेष संग्राह्य अंकामध्ये अखंड भारत, अंत्योदय, सुरक्षित भारत, युवा भारत, मातृप्रधान भारत अशा विषयांपासून विज्ञान, उद्योग आणि विकसित भारत २०४७ यावर विशेष प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. भारताने जागतिक स्तरावर निर्माण केलेला प्रभाव, सीमांवर शत्रूला दिलेले सडेतोड उत्तर आणि जगातील संकटसमयी मानवतेसाठी धावून जाणारा संवेदनशील भारत यांचेही या अंकात दस्तावेजीकरण करण्यात आले आहे. “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती”हा केवळ स्मरणिका नसून नव्या भारताच्या परिवर्तनाचा साक्षीदार ठरणारा ऐतिहासिक दस्तावेज असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी नमूद केले.

“काही व्यक्ती अध्यात्मातून तपस्या करतात, काही कला आणि साहित्याच्या माध्यमातून समाजासाठी जगतात; पण मोदीजींनी स्वतःला राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले आहे. म्हणूनच ते राष्ट्र तपस्वी आहेत,” असे सांगत मोदीजींच्या कार्याची पुस्तकरूपी माहिती जनतेला संकलित स्वरूपात द्यावी, या उद्देशाने “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती”हा विशेष संग्राह्य अंक प्रकाशित करण्यात आल्याचेही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

केनडियर चे विरार मध्ये नवीन स्टोअर

महाराष्ट्रातील रिटेल उपस्थिती केली आणखी मजबूत ब्रँडचे हे १२५ वे स्टोअर विरार। कल्याण ज्वेलर्सचा प्रसिद्ध ब्रँड 'केनडियर बाय कल्याण' आपल्या आधुनिक आणि ट्रेंडी डिझाईन्ससाठी ओळखला जातो. आता केनडियरने महाराष्ट्रातील विरारमध्ये आपले नवीन आलिशान स्टोअर सुरू केले आहे. विरार वेस्ट येथील टर्नर रोडवर असलेले हे आऊटलेट या ब्रँडचे देशभरातील १२५ वे स्टोअर आहे. आजच्या आधुनिक ग्राहकांपर्यंत स्टायलिश, ट्रेंडी आणि मौल्यवान दागिने पोहोचवण्याचे आपले वचन पूर्ण करण्यासाठी ब्रँडने हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. विरारमधील केनडियर बाय कल्याणचे हे नवीन स्टोअर महाराष्ट्रातील रिटेल विस्ताराच्या प्रवासातील एक मोठा टप्पा आहे. विरार हे मुंबई महानगर क्षेत्रातील एक प्रमुख निवासी आणि व्यावसायिक केंद्र आहे. त्यामुळे येथे आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी हे स्टोअर एक सुवर्णसंधी आहे. रोजच्या रोज सहज वापरता येतील असे, स्वतःची वेगळी ओळख जपणारे आणि भेट देण्यासाठी आधुनिक व सुंदर दागिन्यांच्या शोधात असणाऱ्या पारखी ग्राहकांशी थेट जोडले जाण्यासाठी हे स्टोअर अत्यंत उपयुक्त ठरेल. केनडियर बाय कल्याण हा ब्रँड व...

सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी ची भारतात विक्री सुरू

कॅशबॅक ऑफर्स आणि झिरो डाऊन-पेमेंट योजना उपलब्ध  मुंबई। सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए२७ ५जी स्मार्टफोनची विक्री सुरू झाल्याची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन आता सॅमसंग आऊटलेट्स, भागीदार स्टोअर्स, सॅमसंग डॉटकॉम आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन लाइट ग्रीन, लाइट पिंक व ब्लॅक या तीन रंगांमध्ये आणि तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी हा स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून, या सर्व मॉडेल्सवर ३,००० रुपयांचा 'मल्टी-बँक आणि यूपीआई कॅशबॅक' ऑफर दिला जात आहे. या ऑफरनंतर, फोनच्या सुरुवातीच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची नेट इफेक्टिव्ह प्राईस २८,९९९ रुपये आहे. त्याचा दुसरा व्हेरियंट ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज सह येतो, ज्याची नेट इफेक्टिव्ह प्राईस ३१,९९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर, या सिरीजमधील सर्वात टॉप व्हेरियंट ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफरनंतर ३७,४९९ रुपये या नेट इफेक्टिव्ह प्राईसवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. गॅलेक्सी ए२७ ५जी मध्ये ६.७ इंच, १२० हर्ट्झ सुपर एएमओएईडी डिस्प्ले ...

किया इंडियाकडून ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ चे आयोजन

मुंबई। ग्राहकांना वैविध्‍यपूर्ण आणि फायदेशीर मालकीहक्क अनुभव देण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ कर किया इंडियाने किया ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ ची घोषणा केली आहे. हा कॅम्प ३ जुलै ते १२ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ग्राहकांना जागतिक दर्जाची विक्रीपश्चात सेवा, वेईकलची सर्वसमावेशक केअर आणि विशेष फायदे सहज उपलब्ध करून देण्यावर ब्रँडचा असलेला भर लक्षात घेऊन हा उपक्रम ३६५ शहरांमधील कियाच्या ५२१ अधिकृत सर्व्हिस वर्कशॉप्समध्ये राबवला जाईल. या सर्व्हिस कॅम्पदरम्यान किया इंडिया ग्राहकांसाठी अनेक विशेष फायदे देत आहे. यामध्ये कार केअर सर्व्हिसेसवर २० टक्‍के सूट, एक्सटेंडेड वॉरंटी पॅकेजवर १० टक्‍क्‍यांपर्यंत सूट, रिटेल रोडसाइड असिस्टन्स (आरएसए) प्लॅन्सवर १० टक्‍के सूट, पार्ट्स व लेबर चार्जवर (मजुरी) १० टक्‍के सूट आणि किया जेन्युइन अॅक्सेसरीजवर १० टक्‍के सूट समाविष्ट आहे. कियाच्या अधिकृत सर्व्हिस नेटवर्कच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सोयीस्कर, उत्तम सुरक्षा आणि किफायतशीर दरात वेईकलची देखभाल करता यावी, यासाठी या मूल्यवर्धित सेवा डिझाइन केल्या आहेत. या उपक्रमाबाबत मत व्‍यक...