सीधे मुख्य सामग्री पर जाएं

महालक्ष्मी सरस २०२६ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सात दिवसांत १५ कोटींची उलाढाल

मुंबई। २ मे २०२६ पासून सुरू झालेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या सात दिवसांत प्रदर्शनातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीओओ निलेश सागर आणि सीईओ निखिल ओसवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

महिलांना दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य:

सीओओ निलेश सागर यांनी सांगितले की, महिलांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंडच्या माध्यमातून दिले जाते. याअंतर्गत यापूर्वी ६० हजार रुपये दिले जात होते; मात्र आता हा निधी वाढवून तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. महिलांच्या व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन गटस्तरावर निर्णय घेतले जातात. यासाठी कोणतीही जमीन किंवा सोने तारण घेतले जात नाही.

केवळ बचत गटांनाच नव्हे, तर वैयक्तिक महिलांनाही त्यांच्या गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. महिलांच्या घरगुती परिस्थितीचा, व्यवसायाच्या गरजांचा आणि आर्थिक स्थितीचा विचार करून त्यांना आर्थिक मदत केली जाते. यामुळे ग्रामीण भागातील सावकारी पद्धतीला आणि जास्त व्याजदराने पैसे देणाऱ्या अनधिकृत आर्थिक व्यवस्थांना मोठ्या प्रमाणावर आळा बसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

७१ लाख महिलांचा अभियानात सहभाग:

यावेळी बोलताना निखिल ओसवाल यांनी सांगितले की, २०११ मध्ये केंद्र शासनामार्फत सुरू झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हा होता. २०१८ पासून महाराष्ट्रभर या अभियानाचा विस्तार करण्यात आला. गावागावांमध्ये महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, एका गावातील किमान दहा महिलांना एकत्र आणून बचत गट उभारण्यात आले.

महाराष्ट्रात आजपर्यंत ६ लाख ७ हजार महिला बचत गटांची स्थापना झाली असून, त्यामध्ये ७१ लाखांहून अधिक महिलांचा सहभाग आहे. ग्रामीण भागात सुमारे ५५ टक्के आर्थिक सक्षमीकरण घडवून आणण्यात या अभियानाला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. एकल महिला, तृतीयपंथी, दिव्यांग आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांनाही या अभियानामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

“उमेद मार्ट”मुळे महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ:

उमेद अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या “उमेद मार्ट” या ऑनलाईन व्यासपीठामुळे महिला बचत गटांची उत्पादने आता जागतिक स्तरावर पोहोचत आहेत. दोन वर्षांत या व्यासपीठावर ४२०० हून अधिक उत्पादने नोंदवण्यात आली असून, यावर्षी आणखी १००० नवीन उत्पादने समाविष्ट करण्यात आली आहेत. महिलांना डिजिटल विपणन आणि ऑनलाईन विक्रीचे विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

एक लाख “लखपती दीदी” तयार करण्याचे उद्दिष्ट अभियानाने ठेवले असून, हा आकडा आणखी ५० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांना व्यवसाय, विपणन आणि आर्थिक स्वावलंबनासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्य स्टॉल्सचे आकर्षण:

यंदाच्या महालक्ष्मी सरसमध्ये ५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्यपदार्थ स्टॉल्स सहभागी झाले आहेत. उत्पादनांची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि नावीन्य लक्षात घेऊन सहभागींची निवड करण्यात आली आहे. नवोदित महिलांनाही मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. नागरिकांसाठी मोफत बस सेवा, घरपोच  सामानाची सेवा तसेच दिव्यांगांसाठी  व्हील चेअरची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

४० कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा:

याआधी नागपूर येथे झालेल्या प्रदर्शनामध्ये १६ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता, तर वाशी येथे २२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. मुंबईतील महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये अवघ्या ७ दिवसांत १५ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला असून, यंदा ४० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

क्रेडाई-एमसीएचआयने आपल्या चॅनेल भागीदारांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या विशेष 'प्रॉपर्टी एक्स्पो'

क्रेडाई-एमसीएचआयने आपल्या चॅनेल भागीदारांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या विशेष 'प्रॉपर्टी एक्स्पो'मध्ये MMR क्षेत्रातील ६०% रिअल इस्टेट विक्रीचे मुख्य चालक म्हणून या भागीदारांचा गौरव! आपल्या प्रकारचा हा पहिलाच एक्स्पो रिअल इस्टेट क्षेत्रातील सहकार्य, पारदर्शकता आणि व्यवसायाच्या वाढीला गती देण्यासाठी ४८ संघटना आणि ५० हून अधिक विकासकांना (Developers) एका छताखाली आणतो. मुंबई। सुखराज नाहर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) रिअल इस्टेट विकासकांची सर्वोच्च संस्था असलेल्या क्रेडाई-एमसीएचआयने, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये चॅनल पार्टनर्ससाठी आपला पहिला विशेष प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित केला. विकासक आणि घर खरेदीदार यांच्यातील महत्त्वाचा दुवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, या एक्स्पोने ५,००० हून अधिक चॅनल पार्टनर्स आणि ४८ चॅनल पार्टनर संघटनांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले. जवळपास ६०% स्थावर मालमत्तेची विक्री चॅनल पार्टनर इकोसिस्टममार्फत होत असल्याचे लक्षात घेता, 'व्यवसाय सुलभता' वाढवणे, चॅनल पार्टनर्सच्या योगदानाला मान्यता देणे आणि...

खुशी ठाकूरला मुंबईत 'व्हॉईस ऑफ द व्हॅली' म्हणूनही ओळखले जाते

संगीत विश्वात झपाट्याने ओळख मिळवणारी गायिका खुशी ठाकूर एक उदयोन्मुख नाव बनली आहे. आपल्या मधुर आवाजाने आणि मेहनतीने ती लाईव्ह आणि पार्श्वगायन या दोन्ही क्षेत्रांत आपली छाप पाडत आहे. विशेषतः, खुशी तिच्या दुःखद आणि रोमँटिक गाण्यांमधील भावपूर्ण आवाजासाठी ओळखली जाते आणि ती एक अष्टपैलू गायिका म्हणूनही उदयास येत आहे. खुशी ठाकूरला मुंबईत 'व्हॉईस ऑफ द व्हॅली' म्हणूनही ओळखले जाते. तिच्या मधुर, भावपूर्ण आवाजाने आणि उत्कृष्ट सादरीकरणाने तिला ही ओळख मिळवून दिली आहे, जे तिची वाढती लोकप्रियता आणि प्रतिभा दर्शवते. खुशीने संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे आणि आपली कला अधिक निखारण्यासाठी ती दररोज सकाळी आणि संध्याकाळी सराव करते. तिला लहानपणापासूनच संगीताची आवड आहे. ती नृत्यातही पारंगत असून तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. खुशी ठाकूरने 'लव्ह के फंडे' या चित्रपटातील 'अनमोल मस्का' या गाण्याने आपल्या पार्श्वगायन कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून तिने सातत्याने यश मिळवले असून, २० हून अधिक हिंदी आणि पंजाबी संगीत व्हिडिओंना आपला आवाज दिला आहे. खुशी थेट सादरीकर...