सीधे मुख्य सामग्री पर जाएं

महालक्ष्मी सरस २०२६ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सात दिवसांत १५ कोटींची उलाढाल

मुंबई। २ मे २०२६ पासून सुरू झालेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या सात दिवसांत प्रदर्शनातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीईओ निलेश सागर आणि सीओओ निखिल कुमार ओसवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

महिलांना दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य:

सीईओ निलेश सागर यांनी सांगितले की, महिलांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंडच्या माध्यमातून दिले जाते. याअंतर्गत यापूर्वी ६० हजार रुपये दिले जात होते; मात्र आता हा निधी वाढवून तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. महिलांच्या व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन गटस्तरावर निर्णय घेतले जातात. यासाठी कोणतीही जमीन किंवा सोने तारण घेतले जात नाही.

केवळ बचत गटांनाच नव्हे, तर वैयक्तिक महिलांनाही त्यांच्या गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. महिलांच्या घरगुती परिस्थितीचा, व्यवसायाच्या गरजांचा आणि आर्थिक स्थितीचा विचार करून त्यांना आर्थिक मदत केली जाते. यामुळे ग्रामीण भागातील सावकारी पद्धतीला आणि जास्त व्याजदराने पैसे देणाऱ्या अनधिकृत आर्थिक व्यवस्थांना मोठ्या प्रमाणावर आळा बसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

७१ लाख महिलांचा अभियानात सहभाग:

यावेळी बोलताना निखिल कुमार ओसवाल यांनी सांगितले की, २०११ मध्ये केंद्र शासनामार्फत सुरू झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हा होता. २०१८ पासून महाराष्ट्रभर या अभियानाचा विस्तार करण्यात आला. गावागावांमध्ये महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, एका गावातील किमान दहा महिलांना एकत्र आणून बचत गट उभारण्यात आले.

महाराष्ट्रात आजपर्यंत ६ लाख ७ हजार महिला बचत गटांची स्थापना झाली असून, त्यामध्ये ७१ लाखांहून अधिक महिलांचा सहभाग आहे. ग्रामीण भागात सुमारे ५५ टक्के आर्थिक सक्षमीकरण घडवून आणण्यात या अभियानाला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. एकल महिला, तृतीयपंथी, दिव्यांग आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांनाही या अभियानामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

“उमेद मार्ट”मुळे महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ:

उमेद अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या “उमेद मार्ट” या ऑनलाईन व्यासपीठामुळे महिला बचत गटांची उत्पादने आता जागतिक स्तरावर पोहोचत आहेत. दोन वर्षांत या व्यासपीठावर ४२०० हून अधिक उत्पादने नोंदवण्यात आली असून, यावर्षी आणखी १००० नवीन उत्पादने समाविष्ट करण्यात आली आहेत. महिलांना डिजिटल विपणन आणि ऑनलाईन विक्रीचे विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

एक लाख “लखपती दीदी” तयार करण्याचे उद्दिष्ट अभियानाने ठेवले असून, हा आकडा आणखी ५० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांना व्यवसाय, विपणन आणि आर्थिक स्वावलंबनासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्य स्टॉल्सचे आकर्षण:

यंदाच्या महालक्ष्मी सरसमध्ये ५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्यपदार्थ स्टॉल्स सहभागी झाले आहेत. उत्पादनांची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि नावीन्य लक्षात घेऊन सहभागींची निवड करण्यात आली आहे. नवोदित महिलांनाही मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. नागरिकांसाठी मोफत बस सेवा, घरपोच  सामानाची सेवा तसेच दिव्यांगांसाठी  व्हील चेअरची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

४० कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा:

याआधी नागपूर येथे झालेल्या प्रदर्शनामध्ये १६ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता, तर वाशी येथे २२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. मुंबईतील महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये अवघ्या ७ दिवसांत १५ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला असून, यंदा ४० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आगरी समाज हॉल, नेरळ येथे नियमित योग शिबिर

नेरळ। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, रायगड जिल्ह्यातील नेरळ तालुक्यात एक दिवसीय योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. योग साधना केंद्राच्या संस्थापिका नलिनी मंगेश कराळे (योग शिक्षिका, योगशास्त्रात एम.ए., मराठी साहित्यात एम.फिल., ॲडव्हान्स्ड योग, पॉवर योग, झुंबा आणि इतर उपक्रम) यांच्या मार्गदर्शनाखाली आगरी समाज हॉलमध्ये नेरळ येथील स्थानिक स्त्री-पुरुषांनी योग वर्गात सहभाग घेतला. आगरी समाज हॉलमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस योग सत्रे आयोजित केली जातात. १९ जून रोजी सकाळी, निवृत्त शिक्षक प्रभाकर चासकर, योग शिक्षिका नलिनी कराळे आणि सहशिक्षिका मीना गोडे यांनी दीपप्रज्वलन करून आणि पूजा करून योग सत्राची सुरुवात केली. त्यांनी प्राणायाम योग आणि योगाच्या महत्त्वावर आपले विचारही मांडले. योग हा व्यायाम नसून एक सराव आहे. सुखम स्थायर्य आसनांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आजच्या वेगवान जीवनाचा आणि बदलत्या जीवनशैलीचा शरीरावर होणारा परिणाम आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांविषयी बोलताना, नलिनी कराले यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले.

चाहत खन्ना यांनी त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे — A to E: Actor to Entrepreneur प्रकाशन डायनमिक्स मॉलमधील क्रॉसवर्ड बुकस्टोरमध्ये केले

टाळ्या थांबल्यानंतर: चाहत खन्नाची नवी सुरुवात, एक ब्रँडची उभारणी आणि स्वतःला शोधण्याची कहाणी अभिनेत्रीतून उद्योजक बनलेल्या चाहत खन्नाने मुंबईत आपल्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन करत पडद्यामागची अनकथित कहाणी सांगितली मुंबई। अभिनेत्री आणि उद्योजक चाहत खन्ना यांनी त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे — A to E: Actor to Entrepreneur प्रकाशन मुंबईतील जुहू येथील डायनमिक्स मॉलमधील क्रॉसवर्ड बुकस्टोरमध्ये केले. या कार्यक्रमाला माध्यम प्रतिनिधी, उद्योगातील मित्र आणि शुभचिंतक उपस्थित होते. ओसवाल बुक्स अँड लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडचे साहित्यिक इम्प्रिंट Ctrl+Alt+Lit यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक चाहत यांच्या टेलीव्हिजन क्षेत्रातील यशापासून ते उद्योजकतेपर्यंतच्या प्रवासाचे खरे आणि प्रामाणिक चित्रण आहे. प्रकाशन सोहळ्यात चाहत यांनी पुस्तकातील काही भाग वाचून दाखवले आणि त्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या अनुभवांबद्दल मनमोकळेपणाने बोलल्या मनोरंजन उद्योगातील आव्हानांशी दोन हात करणे, स्वतःवरील शंकेवर मात करणे, मातृत्व स्वीकारणे आणि स्वतःचा व्यवसाय उभारणे. प्रकाशन सोहळ्यात बोलताना चाहत खन्ना म्हणाल्या,...

मीनाक्षी जायसवाल आणि सागर अरोरा यांचा 'तेरा नूर' हा म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे

मुंबई। अभिनेत्री मीनाक्षी जायसवालचा नवीन रोमँटिक म्युझिक व्हिडिओ 'तेरा नूर' १२ जून रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झाला आणि तो प्रेक्षकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या सुंदर गाण्यात मीनाक्षीच्या विरुद्ध सागर अरोरा दिसतो. हे गाणे स्वतः सागर अरोराने लिहिले, संगीतबद्ध केले आणि गायले असून, ते त्याच्या 'डीजे सार' या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे. सागर अरोरा हा दुबईस्थित सुपरमॉडेल आणि अभिनेता आहे. त्याला डीजेइंगमध्ये विशेष आवड असून तो या क्षेत्रातील तज्ञही आहे. 'तेरा नूर' हे एक रोमँटिक गाणे आहे, जे प्रेमाच्या सुंदर भावनांना मनमोहक पद्धतीने टिपते. म्युझिक व्हिडिओचे अप्रतिम छायाचित्रण, सुंदर ठिकाणे आणि मीनाक्षी जायसवाल व सागर अरोरा यांच्यातील उत्कृष्ट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. याचे चित्रीकरण भिवंडी रोडवरील सेट सिटीमध्ये करण्यात आले. कडक ऊन असूनही, संपूर्ण टीमने कठोर परिश्रम आणि समर्पणाने चित्रीकरण पूर्ण केले. मीनाक्षी जायसवालने सांगितले की, उष्ण हवामानात चित्रीकरण करणे आव्हानात्मक होते, परंतु व्हिडिओच्या अंतिम परिणामामुळे सर्व कष्...