सीधे मुख्य सामग्री पर जाएं

दूधवाले, वृत्तपत्र विक्रेत्यांचे डिजिटायझेशन करणारे ‘नगदपे’ अ‍ॅप लॉन्च

मुंबई। भारतातील असंघटित आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना डिजिटल वित्तीय सेवांशी जोडण्याच्या उद्देशाने नगदपे या फिनटेक माध्यमाचा अधिकृत शुभारंभ मुंबईत रविवारी, ३ मे २०२६ रोजी करण्यात आला. दूध विक्रेते, वृत्तपत्र वितरक आणि लहान दैनंदिन उत्पन्नावर काम करणाऱ्या सेवा पुरवठादारांना डिजिटल आर्थिक व्यवस्थेत सामील करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

नगदपे अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्ते डिजिटल इनव्हॉइस तयार करू शकतात, वेळेवर पेमेंट स्वीकारू शकतात आणि एक विश्वासार्ह आर्थिक ओळख निर्माण करू शकतात. यामुळे त्यांना कर्ज आणि इतर औपचारिक आर्थिक सेवांपर्यंत प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.

भारतामध्ये जिथे दिवसाची सुरुवात दूधवाला, वृत्तपत्र विक्रेता किंवा इस्त्री करणाऱ्याच्या दारावरच्या टकटकने होते, तेथे लाखो लहान आणि असंघटित सेवा पुरवठादार अजूनही वहीत नोंदी ठेवून आणि महिन्याच्या शेवटी रोख वसुलीवर अवलंबून आहेत.

नगदपे हा बदल घडवण्याच्या उद्देशाने पुढे आला आहे. हा प्लॅटफॉर्म ब्लू-कॉलर कामगारांसाठी तयार करण्यात आला असून, डिजिटल पेमेंट आणि लेजर सोल्यूशनद्वारे ग्राहक व्यवस्थापन, पेमेंट वसुली आणि वहीखात्याचा त्रास कमी करण्यास मदत करतो. देशात डिजिटल पेमेंटचा वापर वाढत असला तरी, अनेक स्थानिक सेवा अजूनही पारंपरिक पद्धतींवर अवलंबून असल्यामुळे उशिरा होणारी पेमेंट्स आणि कामकाजातील अडचणी कायम आहेत.

‘नगदपे’चे सह-संस्थापक गजेन्द्र गर्ग म्हणाले, “दूधवाला, वृत्तपत्र विक्रेता यांची सकाळ कधीही चुकत नाही. आपला भारत आपल्या अशा या दैनंदिन नायकांवर चालतो. मात्र त्यांच्या आर्थिक व्यवहारात अजूनही जुनी पद्धत आहे. ‘नगदपे’च्या माध्यमातून आम्ही त्यांना सुलभता, पारदर्शकता आणि आर्थिक सशक्तीकरण देण्याचा प्रयत्न करत आहोत.”

या अ‍ॅपमध्ये सोपी आणि जलद नोंदणी प्रक्रिया, स्थानिक भाषांचा पर्याय (लवकरच), तांत्रिक ज्ञानाची गरज नाही आदी सुविधा उपलब्ध आहेत.  मुंबईत सुरू झालेला ‘नगदपे’ लवकरच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये आणि देशभर विस्तार करण्याच्या तयारीत आहे. भविष्यात हा अ‍ॅप असंघटित कामगारांसाठी आर्थिक ओळख निर्माण करणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. हे अ‍ॅप दूध वितरण, वृत्तपत्र सेवा, इस्त्री व लॉन्ड्री व्यवसाय, किरकोळ विक्रेते आणि नियमित रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. ‘नगदपे’ अ‍ॅप सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

वर्षा राणे यांच्या ‘‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ला सन्मान, दादा साहेब फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये होणार स्क्रीनिंग

मुंबई। ऑल प्ले प्रोडक्शन्सची डेब्यू मराठी लघुपट ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ज्याचे लेखन व दिग्दर्शन वर्षा राणे यांनी केले आहे, 16 व्या दादासाहेब फ़िल्म फेस्टिवल 2026 मध्ये अधिकृत निवडीसह सन्मानित झाला आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंगही होणार आहे, जे कोणत्याही नवोदित दिग्दर्शकासाठी महत्त्वाची कामगिरी मानली जाते। हा महोत्सव दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाल्के Dhundiraj Govind Phalke यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो आणि नव्या, अर्थपूर्ण व प्रगतिशील सिनेमाला व्यासपीठ उपलब्ध करून देतो. अशा व्यासपीठावर निवड होणे म्हणजे चित्रपटाच्या विषयवस्तूची आणि मांडणीची गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे। ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ हा सामाजिक आशय असलेला चित्रपट असून अंधश्रद्धा आणि जागरूकता यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडतो. कथानक एका छोट्या मुलीभोवती फिरते, जी आपल्या गावातील प्रचलित समजुतींना आव्हान देते. विशेष म्हणजे या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका स्वतः वर्षा राणे यांनी साकारली आहे, ज्यामुळे कथेला वैयक्तिक आणि वास्तवदर्शी स्पर्श मिळतो। मर्य...

१० हजारांखाली आयटेल सर्वाधिक टिकाऊ व विश्वासार्ह ब्रँड: सीएमआर

मुंबई। आयटेल या आपल्‍या नवनवीन स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सच्या माध्यमातून तंत्रज्ञान सहजसाध्य करण्‍यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्या ताज्या अहवालात अव्वल स्थान पटकावले आहे. 'भारतातील डिवाईस मार्केटमध्‍ये टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या किमतीची वाढती भूमिका' या विषयावर हा अहवाल आधारित आहे. विविध श्रेणींमधील टिकाऊपणाची कामगिरी, पोर्टफोलिओची ताकद आणि व्याप्ती या आधारावर आयटेल १० हजार रुपयांखालील श्रेणीत ०.८६ च्या प्रभावी ड्यूरेबिलिटी इंडेक्ससह अव्वल ब्रँड ठरला आहे. यानंतर सॅमसंग (०.७९) आणि विवो (०.७२) यांचा क्रमांक आहे. १५ कोटींहून अधिक ग्राहकवर्ग असलेला आयटेल ब्रँड आज जगभरातील ८० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्‍या इंडस्ट्री रिसर्च ग्रुप (आयआरजी)चे उपाध्यक्ष प्रभू राम म्हणाले की, १०,००० रुपयांखालील सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात मोठा बदल होत असून टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणारी किंमत (डीआरए) हे खरेदीचे प्रमुख घटक बनले आहेत. ग्राहक आता मजबूत बा...

किया इंडियाने ५०० वर्कशॉप्सचा टप्पा ओलांडला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने अहमदाबादमधील चांदखेडा येथे आपल्या ५००व्या सर्व्हिस वर्कशॉपच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. या टप्‍प्‍यामधून कंपनीची ग्राहकांना प्राधान्‍य देण्‍याप्रती अतूट कटिबद्धता दिसून येते. तसेच, हे पाऊल देशभरातील १.५ दशलक्षहून अधिक ग्राहकांच्या वाढत्या संख्येसाठी मजबूत आणि भविष्यवेधी विक्रीपश्चात्त परिसंस्‍थेला प्रबळ करते. ५००व्‍या वर्कशॉपचा हा टप्पा नेटवर्कचा विस्‍तार दाखवण्‍यासोबत विनासायास, पारदर्शक आणि सोयीस्कर मालकीचा अनुभव देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर अधोरेखित करतो. 'मूव्‍हमेंट दॅट इन्‍स्‍पायर्स' या मूळ तत्त्वावर आधारित कंपनी आपल्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सेवा क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांशी होणारा प्रत्येक संवाद विश्वास, कार्यक्षमता आणि सुलभतेने परिपूर्ण असेल. अहमदाबादमधील चांदखेडा येथे नुकतेच उद्घाटन झालेले वेस्ट कोस्ट वर्कशॉप हे कियाचे भारतातील सर्वात मोठे वर्कशॉप आहे, ज्‍यामधून कंपनीची विस्तार आणि सेवा उत्कृष्टतेप्रती असलेली कटिबद्धता दिसून येत...