सीधे मुख्य सामग्री पर जाएं

पेपरफ्रायने भारतातील 'होम रिपोर्ट कार्ड रिवाइंड २०२५' प्रकाशित केले

मुंबई। फर्निचर आणि होम गुड्स क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य 'ओम्नीचॅनेल' बाजारपेठ असलेल्या 'पेपरफ्राय'ने आपले लोकप्रिय 'होम रिपोर्ट कार्ड २०२५' प्रसिद्ध केले असून, या उपक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. २०२५ मध्ये भारतीय कुटुंबांनी आपल्या घरासाठी नेमकी कशी खरेदी केली, याचा सखोल आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. ७०० हून अधिक शहरांमधील प्रत्यक्ष खरेदीच्या व्यवहारांवर आधारित असलेल्या या अहवालातील काही महत्त्वाच्या निष्कर्षांनुसार, आता भारतीय ग्राहक आपले संपूर्ण घर एकाच वेळी सजवण्याऐवजी, वर्षभरात हळूहळू एका-एका खोलीचा कायापालट करण्यावर अधिक भर देत आहेत. फर्निचरच्या तुलनेत होम गुड्स (घरातील वस्तू) श्रेणीतील व्यवहार दुपटीने जास्त झाल्याचे दिसून आले आहे. यात प्रामुख्याने स्टोरेज, किचन युटिलिटीज, ऑर्गनायझर्स आणि लायटिंग या वस्तूंना मोठी मागणी होती. बेंगळुरू, पुणे आणि जयपूर यांसारख्या शहरांमध्ये घराशी संबंधित एकूण खरेदीमध्ये घरातील वस्तूंचे प्रमाण निम्म्याहून अधिक होते.

भारतीय घरांमध्ये लिव्हिंग रूम (दिवाणखाना) ही आता फक्त बसण्या-उठण्याची जागा उरलेली नसून त्या घरातील व्यक्तींचे व्यक्तिमत्व आणि सामाजिक विचार व्यक्त करणारे सर्वात महत्त्वाचे स्थान बनले आहे. लिव्हिंग रूममधील फर्निचरच्या बाबतीत ग्राहकांचा कल लक्षणीयरीत्या वाढला असून, केवळ गरजेपोटी खरेदी करण्याऐवजी जीवनशैली उंचावण्याच्या उद्देशाने नियोजनबद्ध बदल करण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. सोफा बदलण्याचा कालावधी आता मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, ग्राहक साधारणपणे दर ४ वर्षांनी आपला सोफा बदलत आहेत. बेडरूमच्या बाबतीत, संपूर्ण देशभरात क्वीन-साईज बेड आणि गाद्यांची मागणी आजही कायम आहे.

आशिष शाह, सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, पेपरफ्राय म्हणाले की, "पेपरफ्रायच्या 'होम रिपोर्ट कार्ड २०२५'ची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नेहमीप्रमाणेच, हा अहवाल केवळ भविष्यातील अंदाजांवर आधारित नसून, पेपरफ्रायवरून लाखो कुटुंबांनी प्रत्यक्षात केलेल्या खरेदीवर आणि त्यांच्या वर्तणुकीवर आधारित आहे. भारतीय घरे आता अधिक व्यक्तिगत आवडीनिवडी, व्यावहारिक दृष्टिकोन आणि विचारपूर्वक कशी सजवली जात आहेत, याचे दर्शन हा अहवाल घडवतो. दरवेळप्रमाणेच यामध्ये प्रादेशिक आवडीनिवडी आणि पसंतीबाबतची रंजक माहिती देण्यात आली आहे. यावर्षी पेपरफ्रायवर अनेक नवीन डी2सी (थेट ग्राहकांपर्यंत) ब्रँड्स लाँच झाल्यामुळे, ग्राहक आता अधिक चोखंदळ झाले असून ते वैशिष्ट्यपूर्ण आणि डिझाइन-केंद्रित उत्पादनांना पसंती देत आहेत. यावर्षी देखील पेपरफ्राय ग्राहकांसाठी आणि ब्रँड्ससाठी 'फॅशन फॉर होम' चे हक्काचे ठिकाण बनण्याचे आपले ध्येय अधिक जोमाने पुढे नेईल."

कुलभूषण अतकर, मार्केटिंग आणि फर्निचर कॅटेगरी हेड, पेपरफ्राय म्हणाले, “पेपरफ्रायच्या 'होम रिपोर्ट कार्ड २०२५' मधून एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते, ती म्हणजे ग्राहक आता अधूनमधून घर सजवण्याऐवजी सातत्याने घर घडवण्यावर भर देत आहेत. आता ग्राहक खरेदीसाठी सण-उत्सव किंवा नवीन घराची वाट पाहत बसत नाहीत, तर वर्षभरात छोटे पण खात्रीशीर निर्णय घेऊन घर अपग्रेड करत आहेत. ब्रँड्स आणि मार्केटर्ससाठी ही विचार करण्याची नवी दिशा आहे. ग्राहकांच्या जीवनातील विविध टप्पे, ऋतू आणि खास क्षणांनुसार जेव्हा त्यांचे घर बदलासाठी तयार असेल, तेव्हा योग्य सोल्यूशन्स उपलब्ध करून देणे हेच यशाचे गमक ठरेल; केवळ कॅलेंडरमधील तारखा पाहून चालणार नाही.”

यावर्षी डिझाइनच्या बाबतीत 'लायटिंग' (रोषणाई) हा सर्वात मोठा बदल म्हणून समोर आला आहे. महानगरांमध्ये हँगिंग लाइट्स आणि वॉल लॅम्प्सनी सॉफ्ट डेकोरच्या इतर वस्तूंना मागे टाकले आहे. भारतातील होम गुड्सच्या एकूण मागणीमध्ये टियर-२ शहरांचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक राहिला आहे. गोवा, नागपूर, कोची आणि भोपाळ यांसारख्या शहरांनी घराची सजावट आणि उपयुक्तता वाढवणाऱ्या वस्तूंमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची एआय-आधारित ग्राहक सेवेसाठी भागीदारी

भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक असलेली टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी, सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून 24 तास ग्राहक सेवा आणि रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना उत्तर मिळण्याचा वेळ काहीकाही दिवसांवरून कमी होऊन 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच ईमेल उघडण्याचे प्रमाण 50–60% पर्यंत वाढले आहे. मुंबई। टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (टीआरआयएल) आणि जगातील नंबर 1 एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्सफोर्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. ग्राहकांना उत्तर देण्याचा वेळ काही दिवसांवरून कमी होऊन आता फक्त 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच कंपनी आता एकाच वेळी हजारो ग्राहकांशी सहज संपर्क साधू शकते.  असे गिरीश हड़कर (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड), अरुंधती भट्टाचार्य (प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया – ...

सॅमसंग आणि गुगलने दिली नवीन इंटेलिजेंट आयवेअरची पहिली झलक

मुंबई। सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड आणि गुगलने गुगल आय/ओ २०२६ मध्ये आयवेअर भागीदार जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्कर यांच्या सहयोगाने डिझाइन केलेल्‍या दोन प्रीमियम मॉडेल्सची पहिली झलक दाखवत नवीन इंटेलिजेंट आयवेअरचे अनावरण केले. मोबाइल फोनसाठी सहयोगी डिवाईस म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले हे नवीन आयवेअर वापरकर्त्‍यांना आवाजाच्या संवादाद्वारे मदत मिळवण्यास आणि त्यांच्या फोनशी विनासायासपणे जोडले जाण्यास सक्षम करते, जेथे ही सुविधा नेहमीच्या चष्म्याच्या रचनेत मिळते. आयवेअर भागीदारांसह सह-निर्मित केलेले हे इंटेलिजेंट आयवेअर क्रांतिकारी एआय क्षमतांना आराम आणि शैलीसोबत एकत्र आणते, ज्यामध्ये सॅमसंगचे हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील अग्रस्थान आणि गुगलचे एआय तंत्रज्ञान प्रीमियम आयवेअर डिझाइनशी जोडले गेले आहे. प्रत्येक आयवेअर ब्रँड या डिवाईसला वेगळा डिझाइन दृष्टिकोन देतो. फॅशन आयवेअरमधील आपल्या परंपरेसाठी प्रसिद्ध असलेले जेंटल मॉन्स्टर हे नाविन्यपूर्ण तरीही सुबक शैली सादर करते, तर वॉर्बी पार्कर परिष्कृत आणि चिरंतन डिझाइन्सचे प्रदर्शन करते. वापरकर्त्‍यांच्‍या सोबतीने रिअल टाइममध्ये ...

कर्करोग वगळता इतर शारीरिक व्याधी असलेल्या वृद्ध व्यक्तींना सदभावना वृद्धाश्रममध्ये मोफत प्रवेश मिळेल

मुंबई। जगातील सर्वात मोठे मोफत सदभावना वृद्धाश्रम, विनूभाई बाचूभाई नगरेचा येथील नवीन परिसरात, निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना आयुष्यभर पूर्णपणे मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये ७ टॉवर्समधील प्रत्येक टॉवरमध्ये ११ मजले असतील, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला पुरेशी जागा आणि काळजी मिळेल. तसेच, जैन समाजातील वृद्धांसाठी एक संपूर्ण टॉवर वेगळा बनवण्यात आला आहे, जिथे एक मंदिरही बांधण्यात आले आहे. ‘विनूभाई बाचूभाई नगरेचा परिसर’ येथील सदभावना वृद्धाश्रम २० लाख चौरस फूट बांधकामाचे आहे. ५०० कोटी रुपये खर्च करून, १४०० खोल्यांमध्ये ५००० निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची सोय केली जाईल. वृद्धाश्रम ही केवळ भारतीय संस्कृतीच नाही, तर आजच्या कलियुगाची गरज आहे. दुर्दैवाने, संयुक्त कुटुंब पद्धती मोडीत निघत असल्यामुळे अनेक लोक असहाय्य होत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून राजकोटमध्ये 'विनुभाई बचूभाई नगरेचा परिसर' सदभावना वृद्धाश्रम चालवले जात आहे. या वृद्धाश्रमात जात किंवा धर्माचा कोणताही भेदभाव न करता, गरजू वृद्धांना नियमांनुसार आणि संस्थेच्या प्रवे...