सीधे मुख्य सामग्री पर जाएं

जसलोक हॉस्पिटलमध्ये अति-लठ्ठ महिला रुग्णावर सुरक्षित उपचार

भारतात पहिल्यांदाच एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीच्‍या माध्‍यमातून शस्त्रक्रिया 

मुंबई: जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ४५ वर्षीय महिलेवर यशस्‍वीपणे अत्यंत महत्त्वपूर्ण मोनोपोर्टल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी केली आहे. या महिलेला पाठदुखीचा तीव्र त्रास होत होता, तसेच हालचाल देखील करता येत नव्‍हती, ज्यामुळे तिला हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्यात आले होते. ही महिला रुग्ण अति-लठ्ठ होती. तिचे वजन १२० किलो आणि बीएमआय ५२ होता, ज्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. उच्‍च बीएमआय असलेल्या रुग्णावर सुरक्षितपणे शस्त्रक्रिया करण्याची भारतातील ही पहिली केस ठरली आहे, जेथे ही इंटरलॅमिनर एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया सुरक्षितपणे करण्‍यात आली. 

मूळची भारतीय असलेली आणि सध्या जर्मनीमध्ये राहणारी एक ४५ वर्षीय महिला वार्षिक सुट्टीसाठी मायदेशी परतली होती. पण, भारतात आल्यानंतर तिला अचानक पाठदुखीचा तीव्र त्रास होऊ लागला. ही वेदना इतकी वाढली की तिला साधे उभे राहणे किंवा चालणे देखील कठीण झाले. प्राथमिक तपासणीत एल४-एल५ डिस्क हर्निएशनचे निदान झाले, ज्‍यामुळे नसांवर प्रचंड दाब येत असल्‍याचे निदर्शनास आले. सामान्यतः अशा केसमध्‍ये शस्त्रक्रिया केली जाते, पण तिच्या अति वजनामुळे शस्त्रक्रियेचा पर्याय नाकारला जात होता. परिणामी, ती जवळपास दोन महिने अंथरुणाला खिळून होती आणि प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. दीर्घकाळ हालचाल न करण्‍यासोबत जर्मनीला परतणे शक्य नसल्यामुळे तिची नोकरी जाण्याची भीती निर्माण झाली होती.

त्यानंतर तिने जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचे ठरवले, जेथे एंडोस्कोपिक स्पाइन टीमने तिच्या केसची सविस्‍तरपणे तपासणी केली. सर्जन्‍सनी स्‍पष्‍टपणे सांगितले की, मोनोपोर्टल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीसाठी १ सेंटीमीटरपेक्षाही कमी आकाराचा छेद करावा लागतो. ही पद्धत शरीराची गुंतागुंतीची रचना असलेल्या रुग्णांसाठी देखील सुरक्षित आणि व्यवहार्य आहे, त्यामुळे ती अति-लठ्ठ असताना देखील उपचारामध्‍ये कोणताच अडथळा आला नाही. मेडिकल लिटरेचरचा अभ्यास केल्यावर निदर्शनास आले की, ती भारतातील सर्वाधिक बीएमआय असलेली पहिली रूग्‍ण आहे, जिच्‍यावर ही एंडोस्‍कोपिक शस्त्रक्रिया यशस्‍वीपणे करण्‍यात आली. या केसमधून किमान इन्‍वेसिव्‍ह स्‍पाइन केअरमध्‍ये जसलोक हॉस्पिटल नेतृत्‍व दिसून येते.

डॉ. मनिष कोठारी यांनी यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया केली आणि शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याची जबाबदारी अॅनेस्थेसिया विभागाच्या अतिरिक्‍त संचालक डॉ. राजश्री देवपुजारी आणि अॅनेस्‍थेसियोलॉजीचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. अनुराज जैन यांनी सांभाळली. शस्त्रक्रियेनंतर वेदनेपासून मोठा दिलासा मिळाल्याने महिला रुग्णाला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिने वजन कमी करण्‍यासाठी संतुलित आहाराचे सेवन व व्‍यायाम सुरू केला, ज्‍यामुळे पुढील दोन महिन्‍यांमध्‍ये तिचे वजन जवळपास २० किलो कमी झाले. आता ती जर्मनीला परतली असून पुन्‍हा कामावर जात आहे आणि आरोग्‍य उत्तम राखण्‍याची काळजी घेत आहे.

एंडोस्‍कोपिक स्‍पाइन सर्जरीचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. मनिष कोठारी म्‍हणाले, ''अशा उच्‍च बीएमआय असलेल्‍या रूग्‍णावर शस्त्रक्रिया करताना शरीररचनेतील सूक्ष्म बदलांकडे सतत लक्ष देणे आणि वैद्यकीय उपकरणांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक होते. मोनोपोर्टल एंडोस्कोपिक पद्धतीमुळे आम्हाला प्रत्येक टप्प्यावर अचूकता आणि स्थिरता राखण्‍यास मदत झाली, ज्यामुळे नसांवरील दाब सुरक्षितपणे कमी करता आला आणि शरीरावर जखमेची खूण देखील अत्यंत कमी राहिली. महिला रूग्‍ण यशस्‍वी शस्त्रक्रियेनंतर लवकर चालू व हालचाल करू लागली, ज्‍यामधून सिद्ध होते की प्रगत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य एकत्र आल्यास आव्‍हानात्‍मक केसेसमध्‍ये देखील यशस्‍वीरित्‍या उपचार करता येऊ शकतो.''  

चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्‍हणाले, ''या महिला रुग्णाचे वजन जास्त असल्यामुळे तिच्‍यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. असे असताना देखील जसलोक हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरक्षितपणे व यशस्‍वीपणे किमान इन्‍वेसिव्‍ह उपचार करू शकलो. यासारख्‍या केसेसमधून गुंतागुंतीच्‍या स्‍पाइन केअरमध्‍ये आमचे कौशल्‍य व आत्‍मविश्वासासह करणाऱ्या उपचाराचा दर्जा दिसून येतो. या महिला रूग्‍णाला पुन्‍हा लवकर हालचाल करताना पाहिल्यानंतर आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे की, प्रगत एंडोस्‍कोपिक तंत्र शस्त्रक्रिया होऊ न शकणाऱ्या रूग्‍णांसाठी नवीन आशेचा किरण देऊ शकते.''

या यशामधून उच्‍च जोखीम असलेल्‍या रूग्‍णांमधील गुंतागुंतीच्‍या स्‍पाइन केसेसवर उपचार करण्‍यामध्‍ये जसलोक हॉस्पिटलचे कौशल्‍य दिसून येते. तसेच या केसमधून निदर्शनास येते की, प्रगत एंडोस्‍कोपिक तंत्र उपचार होऊ न शकणाऱ्या रूग्‍णांसाठी देखील उपयुक्‍त ठरू शकते. 


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

श्रीपाद नाईक यांनी ECAMEX 2026 चे उद्घाटन केले; अक्षय ऊर्जेचा वाढता वाटा, सौर ऊर्जेचा प्रसार आणि मेक इन इंडिया संधींवर भर

मुंबई। भारत सरकारचे नवीन व अक्षय ऊर्जा तसेच वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोरेगाव येथील BEC येथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ECAM) च्या 101 वर्षपूर्ती निमित्त आयोजित भारतातील मेगा इलेक्ट्रिकल व ऊर्जा प्रदर्शन ECAMEX 2026 चे उद्घाटन केले. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की भारताच्या वाढत्या ऊर्जा मागणीची शाश्वत पूर्तता करण्यासाठी अक्षय ऊर्जेतून होणाऱ्या वीज निर्मितीचा टक्का लक्षणीयरीत्या वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की अक्षय ऊर्जा क्षेत्र उद्योग, नवोन्मेष आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देत असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळकटी देते. मंत्र्यांनी पुढे सांगितले की मेक इन इंडिया उपक्रमामुळे सौर उपकरणे, इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या देशांतर्गत उत्पादनासाठी मजबूत संधी निर्माण होत आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी उद्योगांनी स्वदेशी उत्पादन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासात गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केल...

दादर जैन ज्ञान मंदिरात श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला

मुंबई। राजा सिद्धार्थ यांचे वंशज आणि माता त्रिशला यांचे पुत्र, परम कृपाळू भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जयंतीनिमित्त या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, श्री आत्म कमल लब्धी सुरीश्वरजी जैन ज्ञान मंदिर आणि जिन रक्षा इंटरनॅशनल ग्रुप यांनी केले होते. शासन प्रदीप परम पूज्य आचार्य भगवंत श्री विजय प्रदीप चंद्र सुरीश्वरजी महाराज साहिब यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली, भगवान महावीर स्वामींच्या जन्म कल्याणकाचे एक सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन सादर करण्यात आले. आज जागतिक तापमानवाढ असो वा दहशतवाद, भगवान महावीरांची केवळ दोन तत्त्वे जगाला वाचवू शकतात: • अपरिग्रह: निसर्गाचे शोषण थांबवा, केवळ गरजेपुरतेच वापरा. शाळेतील सर्व पंडित, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संजयभाई शाह, अशोकभाई चरला, महिला विभागाच्या उपाध्यक्षा अल्पाबेन संजय शाह आणि संदीप दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी, ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त सा...

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा

डाबर रियल अ‍ॅक्टिव्हसह या उन्हाळ्यात ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहा – खऱ्या फळांचा स्वाद, कोणतीही अतिरिक्त साखर नाही आणि कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत • साखरयुक्त पेये आणि कोल्ड ड्रिंक्सला एक आरोग्यदायी पर्याय – नाश्ता, मधल्या वेळचा स्नॅक आणि इतर वेळांसाठी योग्य • नैसर्गिक पोषण, हायड्रेशन आणि अतिरिक्त साखर टाळू इच्छिणाऱ्या आरोग्य-जागरूक ग्राहकांसाठी उत्तम पेय मुंबई। भारताची अग्रगण्य नैसर्गिक आरोग्य व आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडचा लोकप्रिय पॅकेज्ड फळ रस ब्रँड ‘रियल’ आपल्या सजग पोषणाच्या बांधिलकीला अधिक बळकट करत ‘रियल अ‍ॅक्टिव्ह’ फळ रस सादर करत आहे — कोणतीही अतिरिक्त साखर नसलेला, चविष्ट आणि ताजेतवाने फळ रसांचा हा विशेष श्रेणी आहे. आजच्या काळात ग्राहक अधिक आरोग्यदायी जीवनशैलीच्या पर्यायांकडे वळत असताना, रियल अ‍ॅक्टिव्ह भारतात हायड्रेशनची नवी व्याख्या करत आहे. अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हशिवाय, रियल अ‍ॅक्टिव्ह खऱ्या फळांचे नैसर्गिक गुणधर्म देतो. त्यामुळे हा उन्हाळ्यात दिवसभरासाठी एक उत्तम साथीदार ठरतो — पौष्टिक नाश्त्यापासून ते मधल्या वेळच्या स्नॅकपर्यंत. “उन्हाळ्य...