सीधे मुख्य सामग्री पर जाएं

जसलोक हॉस्पिटलमध्ये अति-लठ्ठ महिला रुग्णावर सुरक्षित उपचार

भारतात पहिल्यांदाच एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीच्‍या माध्‍यमातून शस्त्रक्रिया 

मुंबई: जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ४५ वर्षीय महिलेवर यशस्‍वीपणे अत्यंत महत्त्वपूर्ण मोनोपोर्टल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी केली आहे. या महिलेला पाठदुखीचा तीव्र त्रास होत होता, तसेच हालचाल देखील करता येत नव्‍हती, ज्यामुळे तिला हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्यात आले होते. ही महिला रुग्ण अति-लठ्ठ होती. तिचे वजन १२० किलो आणि बीएमआय ५२ होता, ज्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. उच्‍च बीएमआय असलेल्या रुग्णावर सुरक्षितपणे शस्त्रक्रिया करण्याची भारतातील ही पहिली केस ठरली आहे, जेथे ही इंटरलॅमिनर एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया सुरक्षितपणे करण्‍यात आली. 

मूळची भारतीय असलेली आणि सध्या जर्मनीमध्ये राहणारी एक ४५ वर्षीय महिला वार्षिक सुट्टीसाठी मायदेशी परतली होती. पण, भारतात आल्यानंतर तिला अचानक पाठदुखीचा तीव्र त्रास होऊ लागला. ही वेदना इतकी वाढली की तिला साधे उभे राहणे किंवा चालणे देखील कठीण झाले. प्राथमिक तपासणीत एल४-एल५ डिस्क हर्निएशनचे निदान झाले, ज्‍यामुळे नसांवर प्रचंड दाब येत असल्‍याचे निदर्शनास आले. सामान्यतः अशा केसमध्‍ये शस्त्रक्रिया केली जाते, पण तिच्या अति वजनामुळे शस्त्रक्रियेचा पर्याय नाकारला जात होता. परिणामी, ती जवळपास दोन महिने अंथरुणाला खिळून होती आणि प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. दीर्घकाळ हालचाल न करण्‍यासोबत जर्मनीला परतणे शक्य नसल्यामुळे तिची नोकरी जाण्याची भीती निर्माण झाली होती.

त्यानंतर तिने जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचे ठरवले, जेथे एंडोस्कोपिक स्पाइन टीमने तिच्या केसची सविस्‍तरपणे तपासणी केली. सर्जन्‍सनी स्‍पष्‍टपणे सांगितले की, मोनोपोर्टल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीसाठी १ सेंटीमीटरपेक्षाही कमी आकाराचा छेद करावा लागतो. ही पद्धत शरीराची गुंतागुंतीची रचना असलेल्या रुग्णांसाठी देखील सुरक्षित आणि व्यवहार्य आहे, त्यामुळे ती अति-लठ्ठ असताना देखील उपचारामध्‍ये कोणताच अडथळा आला नाही. मेडिकल लिटरेचरचा अभ्यास केल्यावर निदर्शनास आले की, ती भारतातील सर्वाधिक बीएमआय असलेली पहिली रूग्‍ण आहे, जिच्‍यावर ही एंडोस्‍कोपिक शस्त्रक्रिया यशस्‍वीपणे करण्‍यात आली. या केसमधून किमान इन्‍वेसिव्‍ह स्‍पाइन केअरमध्‍ये जसलोक हॉस्पिटल नेतृत्‍व दिसून येते.

डॉ. मनिष कोठारी यांनी यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया केली आणि शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याची जबाबदारी अॅनेस्थेसिया विभागाच्या अतिरिक्‍त संचालक डॉ. राजश्री देवपुजारी आणि अॅनेस्‍थेसियोलॉजीचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. अनुराज जैन यांनी सांभाळली. शस्त्रक्रियेनंतर वेदनेपासून मोठा दिलासा मिळाल्याने महिला रुग्णाला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिने वजन कमी करण्‍यासाठी संतुलित आहाराचे सेवन व व्‍यायाम सुरू केला, ज्‍यामुळे पुढील दोन महिन्‍यांमध्‍ये तिचे वजन जवळपास २० किलो कमी झाले. आता ती जर्मनीला परतली असून पुन्‍हा कामावर जात आहे आणि आरोग्‍य उत्तम राखण्‍याची काळजी घेत आहे.

एंडोस्‍कोपिक स्‍पाइन सर्जरीचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. मनिष कोठारी म्‍हणाले, ''अशा उच्‍च बीएमआय असलेल्‍या रूग्‍णावर शस्त्रक्रिया करताना शरीररचनेतील सूक्ष्म बदलांकडे सतत लक्ष देणे आणि वैद्यकीय उपकरणांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक होते. मोनोपोर्टल एंडोस्कोपिक पद्धतीमुळे आम्हाला प्रत्येक टप्प्यावर अचूकता आणि स्थिरता राखण्‍यास मदत झाली, ज्यामुळे नसांवरील दाब सुरक्षितपणे कमी करता आला आणि शरीरावर जखमेची खूण देखील अत्यंत कमी राहिली. महिला रूग्‍ण यशस्‍वी शस्त्रक्रियेनंतर लवकर चालू व हालचाल करू लागली, ज्‍यामधून सिद्ध होते की प्रगत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य एकत्र आल्यास आव्‍हानात्‍मक केसेसमध्‍ये देखील यशस्‍वीरित्‍या उपचार करता येऊ शकतो.''  

चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्‍हणाले, ''या महिला रुग्णाचे वजन जास्त असल्यामुळे तिच्‍यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. असे असताना देखील जसलोक हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरक्षितपणे व यशस्‍वीपणे किमान इन्‍वेसिव्‍ह उपचार करू शकलो. यासारख्‍या केसेसमधून गुंतागुंतीच्‍या स्‍पाइन केअरमध्‍ये आमचे कौशल्‍य व आत्‍मविश्वासासह करणाऱ्या उपचाराचा दर्जा दिसून येतो. या महिला रूग्‍णाला पुन्‍हा लवकर हालचाल करताना पाहिल्यानंतर आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे की, प्रगत एंडोस्‍कोपिक तंत्र शस्त्रक्रिया होऊ न शकणाऱ्या रूग्‍णांसाठी नवीन आशेचा किरण देऊ शकते.''

या यशामधून उच्‍च जोखीम असलेल्‍या रूग्‍णांमधील गुंतागुंतीच्‍या स्‍पाइन केसेसवर उपचार करण्‍यामध्‍ये जसलोक हॉस्पिटलचे कौशल्‍य दिसून येते. तसेच या केसमधून निदर्शनास येते की, प्रगत एंडोस्‍कोपिक तंत्र उपचार होऊ न शकणाऱ्या रूग्‍णांसाठी देखील उपयुक्‍त ठरू शकते. 


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एहसान खान, नाफे खान अभिनीत आणि रझूल आलम दिग्दर्शित "गरम माहौल" चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर लाँच

मुंबई। बॉलीवूड दिग्दर्शक रझूल आलम यांच्या हिंदी चित्रपट "गरम माहौल" चे पोस्टर आणि ट्रेलर मुंबईतील इम्पा थिएटरमध्ये एहसान खान, गायिका दीपा नारायण झा, अभिनेते नाफे खान आणि शब्बीर शेख यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. पोस्टर लाँचनंतर, चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी देखील दाखवण्यात आली. लिटिल स्टेप आर्ट्स (एलएसए) निर्मित, या चित्रपटाची सह-निर्मिती विक्रांत वाधवा आणि राहुल जाटव यांनी केली आहे. "गरम माहौल" च्या कलाकारांमध्ये एहसान खान, नाफे खान, बबिता चौधरी, पूजा दत्ता, विक्रांत वाधवा, नरेंद्र, अमित श्रीवास्तव आणि राहुल जाटव यांचा समावेश आहे. लिटिल स्टेप आर्ट्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लाइन प्रोड्यूसर रवी प्रकाश भारद्वाज हे संगीत दिग्दर्शक आहेत. संगीत राज सेन आणि इक्बाल सरगम ​​यांनी दिले आहे. गायकांमध्ये अलका याज्ञिक, दीपा नारायण झा, रितू पाठक आणि पी.के. यांचा समावेश आहे. चित्रपटाचे डीओपी विजय मिश्रा आहेत, लेखक राकेश कुमार आहेत आणि कार्यकारी निर्माता सतीश कुमार आहेत. एहसान खान म्हणाला, "मी राजुल आलमसोबत याआधी खूप काम केले आहे. या चित...

आकाश इन्स्टिट्यूट मुंबईने जेईई मेन २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली; साहिल प्रधानने ९९.९९ टक्के गुण मिळवले

उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीमुळे मुंबई आणि आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ला अभिमान आहे   मुंबई: आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) मुंबईतील विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२६ (सत्र १) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पुन्हा एकदा या प्रदेशाची सतत शैक्षणिक उत्कृष्टता दाखवून दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने १६ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या निकालांनुसार, बोरिवली शाखेतील साहिल प्रधान या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के गुणांसह मुंबईत अव्वल स्थान पटकावले. उत्कृष्ट कामगिरीच्या या मालिकेत, बोरिवली शाखेतील जीत व्होराने १ वर्षाच्या क्लासरूम प्रोग्राममध्ये ९९.८७ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. ध्वज जैन यांनी ९९.७९ टक्के आणि शिव तिवारी यांनी ९९.४५ टक्के गुण मिळवून शाखेच्या प्रभावी शैक्षणिक निकालांना आणखी बळकटी दिली. विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल भाष्य करताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख डॉ. एच.आर. राव म्हणाले, "मुंबईतील आमच्या विद्यार्थ्यांचे अपवादात्मक निकाल त्यांच्या शैक्षणिक वचनबद्धतेचे आणि आकाश येथी...

राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 पुण्यात यशस्वीरीत्या संपन्न

पुणे। देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी भोसरी, पुणे येथे अत्यंत दिमाखदार व गौरवपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन देविदास ग्रुप बिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट तर्फे करण्यात आले होते. आपल्या व्यवसायातून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय आणि प्रभावी भूमिका बजावणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये Le-Vanshi Group Of Company चे Founder, Business Tycoon Author Kuntal Arora, Mrs. Simran Kuntal Arora, तसेच Riyansh Solar Power Plus Pvt. Ltd. चे Founder Mr. Umesh Bhardwaj यांचे विशेष सहकार्य व भक्कम समर्थन लाभले. त्यांच्या दूरदृष्टी, सकारात्मक नेतृत्व आणि सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य व प्रभावी ठरला. या विशेष प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उल्लाल तसेच प्रख्यात अभिनेते शहबाज खान प्रमुख पाहुणे म्...