सीधे मुख्य सामग्री पर जाएं

पीआरआयएफच्या ‘रफ्तार’ उपक्रमाने महाराष्ट्रातील १६००+ आदिवासी मुलांना खेळांपर्यंत पोहोच दिली

मुंबई। राष्ट्रीय युवा दिनी, पर्नोड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन (पीआरआयएफ) ‘रफ्तार’ उपक्रमाची तीन वर्षे पूर्ण करत आहे. ‘रफ्तार’ हा एक व्यवस्थित बांधणी असलेला अॅथलेटिक प्रशिक्षण प्रोग्राम असून ब्रिजिस ऑफ स्पोर्ट्स फाऊंडेशनसोबत भागीदारीत तो नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तळेगाव, अवानखेड आणि करंजी या तीन गावांमध्ये १४ वर्षांखालील आदिवासी मुलांसाठी राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत ‘रफ्तार’ सामुदायिक क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून 1600 पेक्षा जास्त आदिवासी मुलांपर्यंत पोहोचला आहे, ५३१ मुलांना नियमित प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्यात २० असे खेळाडू सामील आहेत, ज्यांना स्प्रिंटिंगमध्ये खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रोग्राममध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्यांत 50% मुली आहेत. यातून सहभाग आणि आत्मविश्वास याबाबतीत मोठे परिवर्तन झाल्याचे दिसून येते. रफ्तार सारख्या प्रोग्राममधून समतापूर्ण समाजासाठी काम करताना विविधता आणि समावेशकता यांच्या प्रती असलेली पीआरआयएफची वचनबद्धता दिसून येते. या प्रोग्राममध्ये खेळांना समावेशकता, शिस्त आणि संधीसाठीचे साधन म्हणून वापरले आहे.

अहवालानुसार, भारतात संघटित खेळांपर्यंतची पोहोच मर्यादित आहे. भारतातील ३५ वर्षांखालील केवळ १% तरुण संघटित खेळांमध्ये भाग घेतात. महिलांचा सहभाग २९% आहे. जो ४०% या जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. दिंडोरी, नाशिक सारख्या भागातील आदिवासी मुलांच्या बाबतीत हे प्रमाण आणखी कमी आहे, ज्याचे कारण आहे शाळांमध्ये शारीरिक शिक्षणासाठी शिक्षक नसणे, क्रीडा साधने नसणे आणि मुलांमधील प्रतिभा शोधून काढण्याचे साधन नसणे. सामाजिक अपेक्षांमुळे मुली शारीरिक क्रियाकलापांमधून आणखी लवकर बाद होतात, ज्यामुळे सर्वांगीण विकास आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या संधींपासून वंचित राहतात.

२०२२ मध्ये रफ्तार हा प्रकल्प २० पेक्षा जास्त प्राथमिक शाळांमधील खेळांच्या ईकोसिस्टमचे मूल्यांकन करून तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्याशी बोलून सुरू करण्यात आला होता. हा प्रोग्राम फिटनेस चाचणीच्या माध्यमातून प्रतिभावान मुले निवडतो आणि त्यांना नियमित कोचिंग, स्पोर्ट्स गियर आणि पोषण देऊन त्यांना तयार करतो. ज्या मुलांमध्ये विशेष गुणवत्ता दिसते, त्यांना प्रगत प्रशिक्षण आणि राज्य-स्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. गेल्या तीन वर्षांमध्ये, या प्रोग्रामने ३०० पेक्षा जास्त प्रशिक्षण सत्रे आयोजित केली आहेत. या प्रोग्रामने त्याच समुदायातील नऊ स्थानिक कोचीसना प्रशिक्षण देऊन स्थानिक क्षमता वाढवली आहे आणि हे उपक्रम दीर्घकाळ चालत राहतील याची खातरजमा केली आहे. ‘रफ्तार’चे समर्थन मिळालेल्या खेळाडूंनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीच्या स्पर्धांमध्ये 50 पेक्षा जास्त पदके जिंकली आहेत. हा प्रोग्राम सुरू होण्यापूर्वीच्या वर्षी केवळ एक पदक होते.

गगनदीप सेठी (वरिष्ठ उपाध्यक्ष – एकात्मिक संचालन, शाश्वतता आणि जबाबदारी, पर्नोड रिकार्ड इंडिया) सांगितले, “विविधता आणि समावेशकता पीआरआयएफच्या कामात केंद्रस्थानी आहे. ‘रफ्तार’च्या माध्यमातून आम्ही आदिवासी मुलांना संरचित खेळांपर्यंत पोहोच मिळवून देण्यास मदत करत आहोत तसेच स्थानिक कोचिंग क्षमता मजबूत करत आहोत आणि महाराष्ट्राच्या आदिवासी भागांमधील मुलांना खेळांमध्ये जास्तत जास्त सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.”

स्थानिक इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी करंजी येथील गुरुकुल शाळेत एक सामुदायिक स्पोर्ट्स जिम-कम-अॅक्टिव्हिटी रूम स्थापन करण्यात आली आहे, जेथे प्रशिक्षण सुविधांचा नियमित लाभ घेऊन शाळा आणि समुदायातील मुलांना फायदा होत आहे.

भविष्यात समुदाय-प्रेरित उपक्रमांना बळकटी देण्याबरोबरच ‘रफ्तार’चा उद्देश जास्तत जास्त आदिवासी मुलांना राष्ट्रीय क्रीडा अकादमी, क्रीडा-संबंधित कारकीर्दी आणि सशस्त्र दलातील संधींपर्यंत प्रवेश मिळवून देण्यात मदत करण्याचा आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची एआय-आधारित ग्राहक सेवेसाठी भागीदारी

भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक असलेली टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी, सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून 24 तास ग्राहक सेवा आणि रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना उत्तर मिळण्याचा वेळ काहीकाही दिवसांवरून कमी होऊन 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच ईमेल उघडण्याचे प्रमाण 50–60% पर्यंत वाढले आहे. मुंबई। टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (टीआरआयएल) आणि जगातील नंबर 1 एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्सफोर्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. ग्राहकांना उत्तर देण्याचा वेळ काही दिवसांवरून कमी होऊन आता फक्त 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच कंपनी आता एकाच वेळी हजारो ग्राहकांशी सहज संपर्क साधू शकते.  असे गिरीश हड़कर (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड), अरुंधती भट्टाचार्य (प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया – ...

सॅमसंग आणि गुगलने दिली नवीन इंटेलिजेंट आयवेअरची पहिली झलक

मुंबई। सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड आणि गुगलने गुगल आय/ओ २०२६ मध्ये आयवेअर भागीदार जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्कर यांच्या सहयोगाने डिझाइन केलेल्‍या दोन प्रीमियम मॉडेल्सची पहिली झलक दाखवत नवीन इंटेलिजेंट आयवेअरचे अनावरण केले. मोबाइल फोनसाठी सहयोगी डिवाईस म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले हे नवीन आयवेअर वापरकर्त्‍यांना आवाजाच्या संवादाद्वारे मदत मिळवण्यास आणि त्यांच्या फोनशी विनासायासपणे जोडले जाण्यास सक्षम करते, जेथे ही सुविधा नेहमीच्या चष्म्याच्या रचनेत मिळते. आयवेअर भागीदारांसह सह-निर्मित केलेले हे इंटेलिजेंट आयवेअर क्रांतिकारी एआय क्षमतांना आराम आणि शैलीसोबत एकत्र आणते, ज्यामध्ये सॅमसंगचे हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील अग्रस्थान आणि गुगलचे एआय तंत्रज्ञान प्रीमियम आयवेअर डिझाइनशी जोडले गेले आहे. प्रत्येक आयवेअर ब्रँड या डिवाईसला वेगळा डिझाइन दृष्टिकोन देतो. फॅशन आयवेअरमधील आपल्या परंपरेसाठी प्रसिद्ध असलेले जेंटल मॉन्स्टर हे नाविन्यपूर्ण तरीही सुबक शैली सादर करते, तर वॉर्बी पार्कर परिष्कृत आणि चिरंतन डिझाइन्सचे प्रदर्शन करते. वापरकर्त्‍यांच्‍या सोबतीने रिअल टाइममध्ये ...

कर्करोग वगळता इतर शारीरिक व्याधी असलेल्या वृद्ध व्यक्तींना सदभावना वृद्धाश्रममध्ये मोफत प्रवेश मिळेल

मुंबई। जगातील सर्वात मोठे मोफत सदभावना वृद्धाश्रम, विनूभाई बाचूभाई नगरेचा येथील नवीन परिसरात, निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना आयुष्यभर पूर्णपणे मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये ७ टॉवर्समधील प्रत्येक टॉवरमध्ये ११ मजले असतील, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला पुरेशी जागा आणि काळजी मिळेल. तसेच, जैन समाजातील वृद्धांसाठी एक संपूर्ण टॉवर वेगळा बनवण्यात आला आहे, जिथे एक मंदिरही बांधण्यात आले आहे. ‘विनूभाई बाचूभाई नगरेचा परिसर’ येथील सदभावना वृद्धाश्रम २० लाख चौरस फूट बांधकामाचे आहे. ५०० कोटी रुपये खर्च करून, १४०० खोल्यांमध्ये ५००० निराधार, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची सोय केली जाईल. वृद्धाश्रम ही केवळ भारतीय संस्कृतीच नाही, तर आजच्या कलियुगाची गरज आहे. दुर्दैवाने, संयुक्त कुटुंब पद्धती मोडीत निघत असल्यामुळे अनेक लोक असहाय्य होत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून राजकोटमध्ये 'विनुभाई बचूभाई नगरेचा परिसर' सदभावना वृद्धाश्रम चालवले जात आहे. या वृद्धाश्रमात जात किंवा धर्माचा कोणताही भेदभाव न करता, गरजू वृद्धांना नियमांनुसार आणि संस्थेच्या प्रवे...