सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाने ‘बकल अप’ रस्ता सुरक्षा उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू केला

मुंबई। जबाबदार गतीशीलता प्रमुख म्‍हणून आपली भूमिका अधिक दृढ करत किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास प्रीमियम कारमेकर कंपनीने रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्‍या (एमओआरटीएच) आश्रयांतर्गत द सोशल लॅब फाऊंडेशन (टीएसएल)सोबत सहयोगाने आपला प्रमुख रस्‍ता सुरक्षा उपक्रम 'बकल अप'च्‍या लाँचची घोषणा केली. या पुढील टप्‍प्‍यानिमित्त किया इंडिया आणि टीएसएलने या उपक्रमाची अधिक पोहोच व प्रभावासाठी सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली. नवी दिल्‍लीमधील ट्रान्‍सपोर्ट भवन येथे एमओआरटीएचचे राज्‍यमंत्री अजय टम्‍टा यांच्‍या हस्‍ते फेज २ चे उद्घाटन करण्‍यात आले. याप्रसंगी वरिष्‍ठ सरकारी अधिकारी आणि किया इंडियाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

बकल-अप प्रकल्‍पाच्‍या फेज १ दरम्‍यान (फेब्रुवारी २०२४ - फेब्रुवारी २०२६), किया इंडियाने रस्‍ता सुरक्षेसंदर्भात आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी गुरूग्राम वाहतूक पोलिसांसोबत सहयोग केला, जेथे पायाभूत सुविधा आणि वर्तणूकीसंदर्भात जागरूकता यांवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले. या उपक्रमांतर्गत गुरुग्राममधील ओळखण्‍यात आलेल्‍या अत्‍यंत धोकादायक भागांमध्‍ये ७५० क्रॅश बॅरियर्स बसवण्‍यात आले, ज्‍यासह प्रत्‍यक्ष प्रतिबंधात्‍मक पायाभूत सुविधा प्रबळ करण्‍यात आल्‍या. या प्रयत्‍नांना पूरक म्‍हणून किया इंडियाने १०० शाळांमध्‍ये संरचित रस्‍ता सुरक्षा माहिती उपक्रम राबवले, ज्‍याद्वारे ते जवळपास ३२,००० विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचले आणि रस्‍त्‍यावरील तरूण वापरकर्त्‍यांमध्‍ये लवकर जागरूकता निर्माण करण्‍याला चालना दिली.

फेज १ अंतर्गत तरुणांचा सहभाग वाढवत आणि स्थानिक प्राधिकरणांसोबत सहयोगाने काम करत समुदाय-केंद्रित रस्ता सुरक्षेसाठी विकासात्मक व निष्पत्ती-केंद्रित मॉडेल तयार करण्यात आले. या मजबूत पायावर आधारित फेज २ (एप्रिल २०२६ – मार्च २०२८) मध्ये उपक्रमाचा भौगोलिक विस्तार आणि प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवले जाणार आहे. दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये १०० कॉलेजमधील सुमारे २०,००० विद्यार्थ्यांना प्रगत ड्रायव्हिंग सिम्युलेटर्स व संरचित प्रशिक्षण मॉड्यूल्सद्वारे सहभागी करून सुरक्षित ड्रायव्हिंगविषयी जागरूकता निर्माण केली जाईल. तसेच गुरगाव आणि दिल्ली-उत्तराखंड महामार्गासारख्या उच्च-जोखीम भागांमध्ये अतिरिक्त क्रॅश बॅरियर्स बसवून रस्ता सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करण्यात येतील.

एमओआरटीएचचे राज्यमंत्री अजय टम्टा यांनी पायाभूत सुविधा व जागरूकता उपक्रमांद्वारे रस्ता सुरक्षा बळकट करण्यासाठी किया इंडियाच्या संरचित दृष्टिकोनाचे कौतुक केले आणि अपघात कमी करण्यासाठी उद्योग-सरकार सहयोगाचे महत्त्व अधोरेखित केले.

किया इंडियाचे प्रतिनिधी श्री. सूद यांनी सांगितले की, ‘बकल अप’ उपक्रमाद्वारे सुरक्षित गतीशीलता परिसंस्था निर्माण करण्याची कंपनीची दीर्घकालीन बांधिलकी अधिक दृढ होत आहे आणि फेज २ मध्ये तरुण व पहिल्यांदा वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हर्सपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाईल.

टीएसएल फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक अपूर्व शर्मा यांनी नमूद केले की, फेज १ मध्ये तयार झालेल्या ऑपरेशनल पायावर आधारित फेज २ मध्ये या उपक्रमाचा विस्तार नवीन भौगोलिक क्षेत्रे व विविध वयोगटांपर्यंत केला जाईल.

या उपक्रमाद्वारे किया इंडिया सरकार, स्थानिक प्राधिकरणे आणि समुदाय भागधारकांसोबत सहयोगाने काम करत देशभरात सुरक्षित रस्ता वर्तणूक आणि मजबूत गतीशीलता परिसंस्था निर्माण करण्यास हातभार लावत आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

अक्षयकल्प ऑर्गेनिकचा मुंबई आणि पुण्यात प्रवेश

दक्षिण भारतात सुरू झालेला भारताचा आघाडीचा प्रमाणित ऑर्गेनिक डेअरी ब्रँडचा प्रवास आता महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावर विस्तारत आहे  मुंबई। भारतातील आघाडीचा प्रमाणित ऑर्गेनिक डेअरी ब्रँड (सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादन ब्रँड) अक्षयकल्प ऑर्गेनिकने आज मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. दक्षिण भारतातील लोकप्रिय ब्रँडपासून संपूर्ण भारतातील घराघरात पोहोचण्याच्या त्यांच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 2010 मध्ये स्थापन झालेल्या आणि स्वच्छ पोषण व शेतकरी सक्षमीकरण या दोन तत्त्वांवर उभारलेल्या अक्षयकल्प ऑर्गेनिककडून महाराष्ट्रात त्यांच्या प्रमाणित सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादनांचा संपूर्ण संच उपलब्ध करून दिला जात आहे. यामध्ये दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक तसेच त्यांची वेगाने वाढणारी उच्च-प्रथिनांची श्रेणी यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा उरलेला साका किंवा गाळ, अन्न खराब होऊ नये, जास्त काळ टिकावे आणि त्याची गुणवत्ता कायम राहावी यासाठी वापरली जाणारी संरक्षक द्रव्ये आणि कृत्रिम अॅडिटिव्ह्सपासून ...

होमलेनकडून सीबीडी बेलापूर नवी मुंबईमध्ये नवीन स्टुडिओचे उद्घाटन

नवी मुंबई। होमलेन या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान व एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँडने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे आपला पहिला स्टुडिओ लाँच केला आहे. प्रबळ पायाभूत सुविधा आणि मुंबई महानगर क्षेत्राशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे बेलापूर हे महत्त्वाचे व्यापारी आणि निवासी केंद्र म्हणून ओळखले जाते. या लाँचसह, होमलेनने वेगाने वाढणाऱ्या शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, तसेच तंत्रज्ञानावर आधारित एंड-टू-एंड होम इंटीरियर सोल्यूशन्स आता घरमालकांच्या अधिक जवळ आणले आहेत. हा स्टुडिओ संतोष कुमार जे आणि पार्थिबन सुधमन यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे. त्यांची स्थानिक बाजारपेठेतील सखोल समज आणि होमलेनचा तंत्रज्ञान-आधारित दृष्टिकोन यामुळे नवी मुंबईतील घरमालकांना अधिक पारदर्शक, त्रासमुक्त व विनाव्यत्यय इंटीरियरचा अनुभव मिळण्यास मदत होईल. होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी म्हणाले, “नवी मुंबई आमच्यासाठी नेहमी महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे, विशेषतः सीबीडी बेलापूरसारखी ठिकाणे, जिथे प्रबळ पायाभूत सुविधांमुळे निवासी क्षेत्रात शाश्वत वाढ होत आहे. या...

'बोलो राधे राधे' मध्ये प्रसिद्ध गायकांचा सहभाग, चित्रपटाची आध्यात्मिक खोली अधिक दृढ करत आहे

लखनऊ/मथुरा। आगामी धार्मिक हिंदी चित्रपट "बोलो राधे राधे" प्रचंड चर्चेत असून, त्यामुळे त्याच्या भक्तीपूर्ण भावना अधिकच दृढ होत आहेत. आता या चित्रपटाशी एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक संबंध जोडला गेला आहे, कारण पूजनीय संत आणि भक्तीगायक श्री गुरु स्वामी रसराज कृष्णदास यांनी आपल्या सुमधुर आवाजाने चित्रपटाच्या संगीताला समृद्ध केले आहे. भक्ती परंपरेत खोलवर रुजलेल्या स्वामी रसराज कृष्णदास यांचे हे योगदान केवळ एक संगीत सहयोग म्हणून नव्हे, तर एक आध्यात्मिक समर्पण म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाच्या मूळ संदेशाला—भक्ती, सेवा आणि शाश्वत मूल्ये—अधिक सत्यता प्राप्त होते. चित्रपटाचे संगीत मन्न मिश्रा यांनी दिले आहे, जे पारंपरिक भक्ती संगीताची खोली आणि चित्रपटीय अभिव्यक्ती यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न करतात. गीते लेखक-दिग्दर्शक रवी भाटिया यांनी लिहिली आहेत. या दुहेरी जबाबदारीमुळे संगीत चित्रपटाच्या कथेला आणि भावनिक प्रवाहाला खोलवर जोडले जाते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या सहयोगाला एक आशीर्वाद संबोधून कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचा विश्वास आहे ...