सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘क्लायमेट डिकेड’च्या आराखडयासह डब्ल्यूएसडीएस २०२६ची सांगता

मुंबई। द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट अर्थात टेरीने आयोजित केलेल्या वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिटी (डब्ल्यूएसडीएस) २०२६ची सांगता विचार आणि नवीन वचनासह झाली. ‘रिफ्लेक्शन्स, रिसर्जन्स अँड रिजॉल्व फॉर अवर कॉमन फ्युचर (आपल्या सर्वांच्या भविष्यकाळासाठी विचार, पुनरुत्थान आणि निर्धार)’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या निरोपाच्या सत्रात अनेक सरकारांचे प्रतिनिधी, बहुपक्षीय संस्था, व्यवसाय व नागरी समाजाचे प्रतिनिधी एकत्र आले होते.

केवळ जगभरातील मते एकत्र आणणारा नव्हे, तर हवामानासाठी ठोस कृतीला संप्रेरणा देणारा मंच ही डब्ल्यूएसडीएस २०२६ची ओळख, प्रख्यात दरबार हॉलमध्ये झालेल्या अखेरच्या सत्रामुळे आणखी दृढ झाली.

निरोपाच्या सत्रात अनेक विख्यात वक्त्यांची भाषणे झाली. हवामानविषयक कृतीच्या पुढील टप्प्यात जबाबदारी, अंमलबजावणी आणि अनेक पिढ्यांतील नेतृत्व असलेच पाहिजे हा मुद्दा या भाषणांतून अधोरेखित झाला.

भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे (एमओईएफसीसी) पर्यावरण, वन आणि हवामान बदल सचिव तन्मय कुमार म्हणाले, "हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नसून विकास, प्रशासन, सुरक्षितता आणि मानवी आरोग्यासमोरील मोठे आव्हान आहे. भारताचा दृष्टीकोन विज्ञानाधारित आणि न्यायाभिमुख असून, पर्यावरणपूरक ऊर्जेला उपजीविका आणि स्थितीस्थापक विकासाशी जोडले आहे. विकसित देशांनी मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन करून औद्योगिकीकरण केले, मात्र भारत विकास, दारिद्र्यनिर्मूलन आणि कार्बनमुक्ती हे एकाच वेळी साध्य करत आहे. दरडोई केवळ २ टन उत्सर्जनासह भारताने २०३०चे अजीवाष्म ऊर्जेचे ५०% उद्दिष्ट जून २०२५ मध्येच पूर्ण करून ते ५१% पेक्षा अधिक केले आहे. मानवतावाद, विज्ञान आणि न्याय यांच्या आधारावर भविष्य सुरक्षित करण्याचा भारताचा निर्धार आहे."

संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रमाच्या सदिच्छादूत दिया मिर्झा म्हणाल्या, “हवामानातील बदलाचा परिणाम सर्व लिंगांवर सारखाच होत नाही. स्त्रिया आणि मुली जगातील बहुतांश अन्नाची पेरणी करत असल्या आणि कुटुंबं व समुदायांची जोपासना करत असल्या तरी हवामान बदलाच्या परिणामांची तीव्रता त्यांना अधिक जाणवते. तरीही हवामान आणि ऊर्जा यांसंदर्भातील निर्णय प्रक्रियेत त्यांना तेवढे प्रतिनिधीत्वही मिळत नाही. शाश्वतता हा आज ऐच्छिक विषय राहिलेला नाही, तर जगण्याचा, प्रतिष्ठेचा आणि शांतीचा पाया झाला आहे. निसर्गाशी संवाद साधणे ही आता चैनीची बाब राहिलेली नाही, तर प्रत्येक व्यक्तीची ती गरज झाली आहे.”

संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमाच्या उपनिवासी प्रतिनिधी श्रीमती इसाबेल तुशान यांनी भारतातील ६५% तरुण लोकसंख्या शाश्वततेच्या अंमलबजावणीसाठी निर्णायक असल्याचे सांगत, यूएनडीपीने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि टेरीसोबत ‘मिशन लाइफ युथ अँबॅसडर’ कार्यक्रम सुरू केल्याचे नमूद केले.

रिन्यूच्या चेअरमन वैशाली निगम सिन्हा यांनी विकास आणि हवामान ही आता समान उद्दिष्टे असून, पर्यावरणपूरक ऊर्जा आर्थिकदृष्ट्या अपरिहार्य झाल्याचे सांगितले. ‘ग्लोबल साउथ’ उपाय सुचवत असून परिषद ही केवळ चर्चा नसून कृतीचा आदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पीओपी (प्रोटेक्ट अवर प्लॅनेट) चळवळीचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. अॅश पचौरी यांनी डब्ल्यूएसडीएसच्या २५ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत, भूतकाळ साजरा करताना पुढील सामाईक जबाबदारी स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली.

कूल द ग्लोबच्या संस्थापक प्राची शेवगावकर यांनी वैयक्तिक छोट्या कृतीतून सुरू झालेली चळवळ आज १५० देशांपर्यंत पोहोचल्याचे सांगत, शाश्वतता दैनंदिन जीवनाचा भाग करण्याचे आवाहन केले.

टेरीचे चेअरमन नितीन देसाई यांनी सरकार, उद्योग, संशोधक आणि समुदाय यांच्या सहकार्याशिवाय शाश्वत विकास शक्य नसल्याचे सांगितले, तर महासंचालक डॉ. विभा धवन यांनी सहयोग आणि विद्यमान संशोधनाचा प्रभावी वापर हीच पुढील वाट असल्याचे नमूद केले.

क्युरेटर डॉ. शैली केडिया यांनी यंदाच्या परिषदेत विक्रमी २,३८२ सहभाग, १० पूर्णसदस्य व १४ विषयाधारित सत्रे आणि ‘हिम-कनेक्ट’सारख्या उपायाधारित चर्चांचा उल्लेख केला. समारोपात ‘वसुंधरा’ मासिकाचे अनावरण, ‘अॅक्टफॉरअर्थ मॅनिफेस्टो’ प्रकाशन आणि नितीन देसाई लिखित द पॉलिटिक्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट पुस्तकाचे प्रकाशन झाले.

डब्ल्यूएसडीएस २०२६ ने स्पष्ट संदेश दिला—हवामान दशकात वित्त व न्याय, नवोन्मेष व समावेशकता, तसेच महत्त्वाकांक्षा व जबाबदारी यांचे अभिसरण अत्यावश्यक आहे; आणि जागतिक स्तरावर रूपांतरणात्मक हवामान कृतीसाठी दृढ सहयोग हाच पुढील मार्ग आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

'आर्ट डेको डिझाइन'च्या शताब्दीनिमित्त मुंबईत ट्विन-सिटी फेस्टिव्हल

'आर्ट डेको डिझाइन'च्या शताब्दीनिमित्त मुंबईत ट्विन-सिटी फेस्टिव्हल ७ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात महोत्सव मुंबई। आर्किटेक्चर आणि डिझाइन क्षेत्रातील 'आर्ट डेको'च्या प्रवासाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने (शताब्दी) मियामी आणि मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्याच ट्विन-सिटी महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री आशीष शेलार आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी 'आर्ट डेको अलाइव्ह'च्या संस्थापक स्मिति कनोडिया आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि संचालक तसनीम मेहता उपस्थित होत्या. ऑक्टोबरमध्ये मियामीत 'आर्ट डेको अलाइव्ह!'चा महोत्सव पार पडला होता. आता यानंतर मुंबईत या महोत्सवाची पहिली आवृत्ती ७ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विविध ठिकाणी पार पडणार आहे.  राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री आशीष शेलार म्हणाले, ''आर्ट डेको अलाइव्ह! आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रह...

भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनानिमित्त 'बोट'च्या नव्या शॉर्ट फिल्ममध्ये अरबाज खानचा मजेशीर अंदाज

मुंबई। येत्या २८ ऑगस्ट रोजी साजरी होणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड ' बोट' (boAt) ने क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'ब्लिंकिट' (Blinkit) आणि प्रसिद्ध अभिनेते-निर्माते अरबाज खान यांच्या सहकार्याने एका नव्या डिजिटल मोहिमेची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर सध्या या शॉर्ट फिल्मची जोरदार चर्चा सुरू असून, एका मजेशीर उपरोधाद्वारे प्रेक्षकांना "एक सर्वोत्तम भाऊ कसा असावा?" याचा विचार करायला लावला आहे. मॉक्यूमेंट्री फॉरमॅटमधील मजेशीर डिजिटल फिल्म : मॉक्यूमेंट्री फॉरमॅटमध्ये तयार करण्यात आलेल्या या डिजिटल फिल्ममध्ये अरबाज खान हातात माइक घेऊन बॉलिवूडच्या 'ऑल-टाईम फेव्हरेट भाई' बनण्याच्या स्टाइलचे पृथक्करण करताना दिसतो. रात्री १ वाजताचे ट्विट्स, ठरवून मारलेले डायलॉग्स, आणि हिरोसारखा रुबाब दाखवणे म्हणजे प्रेम नव्हे, हे तो आपल्या खास शैलीत सांगतो. स्वतः अरबाजने ही भूमिका साकारल्यामुळे हा विनोद अधिकच रंगतो. बॉलिवूडमधील 'युनिव्हर्सल भाई' या प्रतिमेवर भाष्य करत जेव्हा अरबाज कॅमेऱ्याकडे पाहून म्हणतो, "मी भाईचा भ...

लोणावळ्यात अमावी सोबत सुरु केले 'ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज'

ताजचे लक्झरी ब्रँडेड व्हिला क्षेत्रात पदार्पण मुंबई । भारतामधील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने महाराष्ट्रातील लोणावळा येथे ' ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज' सुरू करण्याची घोषणा केली. देशातील एकमेव हॉस्पिटॅलिटीवर केंद्रित, रिअल इस्टेट ब्रँड 'अमावी' च्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या या प्रोजेक्टसाठी ताजने लक्झरी ब्रँडेड व्हिला सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान असलेले लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात पसंतीच्या आणि प्रतिष्ठित पर्यटन स्थळांपैकी एक आहे. नयनरम्य दऱ्या, तलाव आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे हिल स्टेशन सातत्याने वेलनेस हव्या असणाऱ्यांना आकर्षित करत आहेत. पुनीत छटवाल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएचसीएल म्हणाले,“शंभर वर्षांहून अधिक काळापासून, ताजने आपले भव्य राजवाडे, ऐतिहासिक सिटी हॉटेल्स, सफारी आणि रेसिडेन्सेसच्या माध्यमातून लक्झरी हॉस्पिटॅलिटी नवनवीन व्याख्या रचली आहे. जगातील सर्वात मजबूत लक्झरी हॉटेल ब्रँड आणि भारतातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून ओळखला जाणारा ...