सीधे मुख्य सामग्री पर जाएं

भारतीय MMA फायटर संग्राम सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईत ‘‘गिर वेजिज'ऑर्गेनिक ब्रँडचे लॉन्च

मिलावटी अन्नपदार्थ आणि रासायनिक कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील शेतकरी-उद्योजक शैलेश जारिया यांनी मुंबईत “‘गिर वेजिज'” या ऑर्गेनिक ब्रँडची सुरुवात केली. या कार्यक्रमाला भारतीय MMA फायटर आणि अभिनेता संग्राम सिंह उपस्थित होते आणि त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शैलेश जारिया नी सांगितले की कर्करोग, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार यासारख्या आजारांच्या वाढीमागे केमिकलयुक्त आणि मिलावटी अन्नपदार्थ हेही एक मोठे कारण आहे.

गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील अमरापूर गिर गावात असलेल्या ‘शैलेश जारिया नी वाडी’ या शेतावर ‘गिर वेजिज' या ब्रँड अंतर्गत ऑर्गेनिक शेती केली जाते. येथे 30 पेक्षा जास्त प्रकारची फळे आणि 50 पेक्षा अधिक प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात. यामध्ये आंबा, पेरू, केळी, पपई, डाळिंब, जांभूळ यांसारख्या फळांचा समावेश आहे. तसेच गहू, बाजरी, मका, हरभरा आणि तूरडाळ यांसारखे धान्यही पिकवले जाते.

या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे शेतातून थेट ग्राहकांपर्यंत ताजी आणि केमिकल-मुक्त उत्पादने पोहोचवणे.

संग्राम सिंह यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की आजच्या वेगवान शहरी जीवनात लोक नैसर्गिक आणि शुद्ध अन्नापासून दूर जात आहेत. “लहानपणी आपण झाडांवरून थेट फळे तोडून खात होतो, पण शहरांमध्ये तो अनुभव आता दुर्मिळ झाला आहे,” असे ते म्हणाले.

उल्लेखनीय म्हणजे संग्राम सिंह 5 एप्रिल 2026 रोजी अर्जेंटिनामध्ये ‘Samurai Fight League’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय MMA सामना खेळणार असून त्यांचा सामना फ्रान्सच्या प्रतिस्पर्ध्याशी होणार आहे.

सुरुवातीला कांदिवली, बोरीवली, दहिसर आणि मालाड या भागांमध्ये आठवड्यातून दोन वेळा ऑर्गेनिक फळे आणि भाज्यांची होम डिलिव्हरी केली जाणार आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

वर्षा राणे यांच्या ‘‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ला सन्मान, दादा साहेब फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये होणार स्क्रीनिंग

मुंबई। ऑल प्ले प्रोडक्शन्सची डेब्यू मराठी लघुपट ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ज्याचे लेखन व दिग्दर्शन वर्षा राणे यांनी केले आहे, 16 व्या दादासाहेब फ़िल्म फेस्टिवल 2026 मध्ये अधिकृत निवडीसह सन्मानित झाला आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंगही होणार आहे, जे कोणत्याही नवोदित दिग्दर्शकासाठी महत्त्वाची कामगिरी मानली जाते। हा महोत्सव दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाल्के Dhundiraj Govind Phalke यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो आणि नव्या, अर्थपूर्ण व प्रगतिशील सिनेमाला व्यासपीठ उपलब्ध करून देतो. अशा व्यासपीठावर निवड होणे म्हणजे चित्रपटाच्या विषयवस्तूची आणि मांडणीची गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे। ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ हा सामाजिक आशय असलेला चित्रपट असून अंधश्रद्धा आणि जागरूकता यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडतो. कथानक एका छोट्या मुलीभोवती फिरते, जी आपल्या गावातील प्रचलित समजुतींना आव्हान देते. विशेष म्हणजे या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका स्वतः वर्षा राणे यांनी साकारली आहे, ज्यामुळे कथेला वैयक्तिक आणि वास्तवदर्शी स्पर्श मिळतो। मर्य...

१० हजारांखाली आयटेल सर्वाधिक टिकाऊ व विश्वासार्ह ब्रँड: सीएमआर

मुंबई। आयटेल या आपल्‍या नवनवीन स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सच्या माध्यमातून तंत्रज्ञान सहजसाध्य करण्‍यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्या ताज्या अहवालात अव्वल स्थान पटकावले आहे. 'भारतातील डिवाईस मार्केटमध्‍ये टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या किमतीची वाढती भूमिका' या विषयावर हा अहवाल आधारित आहे. विविध श्रेणींमधील टिकाऊपणाची कामगिरी, पोर्टफोलिओची ताकद आणि व्याप्ती या आधारावर आयटेल १० हजार रुपयांखालील श्रेणीत ०.८६ च्या प्रभावी ड्यूरेबिलिटी इंडेक्ससह अव्वल ब्रँड ठरला आहे. यानंतर सॅमसंग (०.७९) आणि विवो (०.७२) यांचा क्रमांक आहे. १५ कोटींहून अधिक ग्राहकवर्ग असलेला आयटेल ब्रँड आज जगभरातील ८० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्‍या इंडस्ट्री रिसर्च ग्रुप (आयआरजी)चे उपाध्यक्ष प्रभू राम म्हणाले की, १०,००० रुपयांखालील सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात मोठा बदल होत असून टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणारी किंमत (डीआरए) हे खरेदीचे प्रमुख घटक बनले आहेत. ग्राहक आता मजबूत बा...

किया इंडियाने ५०० वर्कशॉप्सचा टप्पा ओलांडला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने अहमदाबादमधील चांदखेडा येथे आपल्या ५००व्या सर्व्हिस वर्कशॉपच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. या टप्‍प्‍यामधून कंपनीची ग्राहकांना प्राधान्‍य देण्‍याप्रती अतूट कटिबद्धता दिसून येते. तसेच, हे पाऊल देशभरातील १.५ दशलक्षहून अधिक ग्राहकांच्या वाढत्या संख्येसाठी मजबूत आणि भविष्यवेधी विक्रीपश्चात्त परिसंस्‍थेला प्रबळ करते. ५००व्‍या वर्कशॉपचा हा टप्पा नेटवर्कचा विस्‍तार दाखवण्‍यासोबत विनासायास, पारदर्शक आणि सोयीस्कर मालकीचा अनुभव देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर अधोरेखित करतो. 'मूव्‍हमेंट दॅट इन्‍स्‍पायर्स' या मूळ तत्त्वावर आधारित कंपनी आपल्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सेवा क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांशी होणारा प्रत्येक संवाद विश्वास, कार्यक्षमता आणि सुलभतेने परिपूर्ण असेल. अहमदाबादमधील चांदखेडा येथे नुकतेच उद्घाटन झालेले वेस्ट कोस्ट वर्कशॉप हे कियाचे भारतातील सर्वात मोठे वर्कशॉप आहे, ज्‍यामधून कंपनीची विस्तार आणि सेवा उत्कृष्टतेप्रती असलेली कटिबद्धता दिसून येत...