मिलावटी अन्नपदार्थ आणि रासायनिक कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील शेतकरी-उद्योजक शैलेश जारिया यांनी मुंबईत “‘गिर वेजिज'” या ऑर्गेनिक ब्रँडची सुरुवात केली. या कार्यक्रमाला भारतीय MMA फायटर आणि अभिनेता संग्राम सिंह उपस्थित होते आणि त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शैलेश जारिया नी सांगितले की कर्करोग, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार यासारख्या आजारांच्या वाढीमागे केमिकलयुक्त आणि मिलावटी अन्नपदार्थ हेही एक मोठे कारण आहे.
गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील अमरापूर गिर गावात असलेल्या ‘शैलेश जारिया नी वाडी’ या शेतावर ‘गिर वेजिज' या ब्रँड अंतर्गत ऑर्गेनिक शेती केली जाते. येथे 30 पेक्षा जास्त प्रकारची फळे आणि 50 पेक्षा अधिक प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात. यामध्ये आंबा, पेरू, केळी, पपई, डाळिंब, जांभूळ यांसारख्या फळांचा समावेश आहे. तसेच गहू, बाजरी, मका, हरभरा आणि तूरडाळ यांसारखे धान्यही पिकवले जाते.
या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे शेतातून थेट ग्राहकांपर्यंत ताजी आणि केमिकल-मुक्त उत्पादने पोहोचवणे.
संग्राम सिंह यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की आजच्या वेगवान शहरी जीवनात लोक नैसर्गिक आणि शुद्ध अन्नापासून दूर जात आहेत. “लहानपणी आपण झाडांवरून थेट फळे तोडून खात होतो, पण शहरांमध्ये तो अनुभव आता दुर्मिळ झाला आहे,” असे ते म्हणाले.
उल्लेखनीय म्हणजे संग्राम सिंह 5 एप्रिल 2026 रोजी अर्जेंटिनामध्ये ‘Samurai Fight League’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय MMA सामना खेळणार असून त्यांचा सामना फ्रान्सच्या प्रतिस्पर्ध्याशी होणार आहे.
सुरुवातीला कांदिवली, बोरीवली, दहिसर आणि मालाड या भागांमध्ये आठवड्यातून दोन वेळा ऑर्गेनिक फळे आणि भाज्यांची होम डिलिव्हरी केली जाणार आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें