८० लाखांहून अधिक तरूणांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव घडवून आणला
मुंबई। क्विक हील फाउंडेशन या सायबर सुरक्षा उपाय प्रदान करणारी जागतिक कंपनी क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सीएसआर शाखेने 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा: फ्युचर प्रूफ २०२५-२६' अहवाल सादर केला. २८ मार्च रोजी पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स'च्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालामध्ये फाउंडेशनच्या प्रमुख सायबर जागरूकता उपक्रमाच्या पहिल्या सर्वसमावेशक प्रभाव मूल्यांकनाचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.
सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा सर्वेक्षण आधी व नंतर केलेल्या मूल्यमापनाच्या रचनेवर आधारित आहे. या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील १०.४ लाख विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. या मोठ्या समूहातून सविस्तर विश्लेषणासाठी २,१८,२२१ विद्यार्थ्यांची आकडेवारीनुसार प्रबळ नमुना म्हणून निवड करण्यात आली. हा अहवाल विविध वयोगटातील विद्यार्थ्यांचे डिजिटल जगातील ज्ञान, दृष्टिकोन आणि वर्तणूक बदलण्यात नियोजित सायबर जागरूकता सत्रांचा किती प्रभावी वाटा आहे, याचे पुरावा-आधारित निष्कर्ष देखील सादर करतो.
डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांवर आधारित 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' हा उपक्रम तरुण नागरिकांमध्ये सायबर जागरूकता वाढवणे, डिजिटल कौशल्ये विकसित करणे आणि जबाबदार ऑनलाइन वर्तणुकीला प्रोत्साहन देऊन युवा विकासावर लक्ष केंद्रित करतो. हा उपक्रम युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (एसडीजी) ४, ५, ८, ९ आणि १७ शी सुसंगत आहे, तसेच भारतातील तरुणांमधील डिजिटल साक्षरतेची तफावत कमी करण्यास मदत करत आहे. आढावा घेतलेल्या कालावधीत हा उपक्रम ३६ शैक्षणिक संस्थांसोबत सहयोगाने ५,१६९ नियोजित जागरूकता सत्रांच्या माध्यमातून ३२ जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. क्विक हील फाउंडेशनच्या व्यापक सायबर जागरूकता सीएसआर उपक्रमांनी संपूर्ण भारतात ८० लाखांहून अधिक तरूणांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवून आणला आहे.
'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे की, उपक्रमानंतर सायबर सुरक्षेच्या महत्त्वाच्या संकल्पनांबाबतच्या जागरूकतेची पातळी आता ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यामधून स्पष्टपणे निदर्शनास येते की, ही सत्रे पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी सुरक्षित आणि असुरक्षित डिजिटल पद्धतींमधील फरक ओळखण्यासाठी अधिक सक्षम झाले आहेत. जागरूकतेच्या प्रमाणात इयत्ता ५वी ते ७वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये ४३ टक्क्यांवरून ८९ टक्क्यांपर्यंत, इयत्ता ८वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये ४९ टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत आणि कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये ४३ टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १० पैकी ८ विद्यार्थ्यांनी या सत्रांनंतर अधिक सुरक्षित ऑनलाइन वर्तन ठेवण्याचा स्पष्ट निर्धार व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीतही सकारात्मक बदल दिसून आले आहेत, सुरक्षित डिजिटल पद्धतींचा अवलंब अनुक्रमे ३९ टक्क्यांवरून ८४ टक्क्यांपर्यंत, ३९ टक्क्यांवरून ८२ टक्क्यांपर्यंत आणि २६ टक्क्यांवरून ८९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. परिणामी, सहभागींमधील डिजिटल स्थिरता देखील मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे, जी विविध गटांमध्ये अनुक्रमे ९ टक्क्यांवरून ८६ टक्क्यांवर, ६८ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांवर आणि ७३ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांवर पोहोचली आहे.
क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या ऑपरेशन एक्सलन्सच्या प्रमुख आणि क्विक हील फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर म्हणाल्या, ''मला सांगताना आनंद होत आहे की, सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा मोहिमेद्वारे आम्ही व्यक्तींपर्यंत पोहोचण्यापलीकडे जात निर्माण करत असलेल्या परिवर्तनाचे परिणाम वाढवत आहोत. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष मला विश्वास देतात की, भविष्य हे डिजिटल सक्षम तरुणांचे आहे. ८० लाखांहून अधिक तरुणाच्या जीवनात सकारात्मक प्रभाव घडवूण आणले हा आमच्यासाठी केवळ एक टप्पा नसून संकेत आहे की भारताचे तरुण सुरक्षित डिजिटल इंडियासाठी संरक्षकाची पहिली फळी म्हणून सज्ज आहेत. यामुळे आम्हाला अधिक मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे, जेथे प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक मूल डिजिटल जगात जागरूक असण्यासोबत पूर्णपणे सक्षम आणि सुरक्षित असेल. आमच्या या प्रवासात सोबत असलेल्या सर्व भागीदार संस्था, शैक्षणिक संस्था आणि राज्य प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करते.''
सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा उपक्रमाचा तरुणांमध्ये आणि व्यापक समुदायामध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्याचा आणि सायबर सुरक्षा जागरूकतेचा प्रसार करण्याचा उद्देश आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना सायबर वॉरियर्स बनण्यासाठी सक्षम करतो, ज्यामुळे ते अर्न अँड लर्न म्हणजेच कमवा व शिका मॉडेलद्वारे स्वतःच्या शिक्षणाला हातभार लावू शकतात आणि शाळा, कॉलेज व समुदायांमध्ये सायबर जागरूकता पसरवू शकतात. तांत्रिक ज्ञानासोबत सहभागी विद्यार्थी नेतृत्व, संवाद कौशल्य, सांघिक कार्य आणि प्रकल्प अंमलबजावणी यांसारखी आवश्यक जीवन व व्यावसायिक कौशल्ये विकसित करतात, ज्यामुळे त्यांची केवळ एक शिकाऊ म्हणून नव्हे तर जबाबदार डिजिटल नागरिक म्हणून प्रगती होण्यास मदत होते.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें