सीधे मुख्य सामग्री पर जाएं

चंद्रपूरमध्ये भारतातील पहिल्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड कोळसा गॅसिफिकेशन आणि कार्बन कॅप्चर प्रकल्पाचा शुभारंभ

चंद्रपूर। देशात कोळसा गॅसिफिकेशन आणि कोळशापासून रसायने बनवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा बनवण्यासाठी न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्ल प्रायव्हेट लिमिटेड ही अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने चंद्रपूर येथे देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड कोळका गॅसिफिकेशन आणि कार्बन कॉम्प्लेक्स उभारणीसाठी भूमिपूजन सभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर येथील भद्रावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी देखील उपस्थित होते.
सुमारे १ हजार ६५० एकर विस्तीर्ण क्षेत्रावर या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. हा प्रकल्प भारतातील कोळशावर आधारित रसायन उत्पादन क्षेत्रातील सर्वात अत्याधुनिक प्रकल्प मानला जात आहे. यात अत्याधुनिक कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानासोबत कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज पायाभूत सुविधा एकत्रितपणे विकसित करण्यात येत आहेत. या प्रकल्पाद्वारे देशांतर्गत उपलब्ध असलेल्या कोळशाचे रुपांतर खत, खाणकाम, वस्त्रोद्योग आणि पॅकेजिंगसारख्या विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरल्या जाणा-या महत्त्वाच्या रसायनांमध्ये तसेच इंधनामध्ये केले जाईल. हा प्रकल्प पूर्णपणे विकसित झाल्यानंतर वर्षागणिक ५० लाख मेट्रिक टनांहून अधिक कोळशावर प्रक्रिया केली जाईल. या सोयीसुविधांमुळे हा प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक मोठा प्रकल्प ठरेल. संबंधित सरकारी संस्थांनी प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेले पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र दिले असून, कच्च्या मालाचा नियमित पुरवठा निश्चित करण्यासाठी या प्रकल्पाला एक कोळसा खाण देण्यात आली आहे.  
हा प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांत पूर्ण केला जाईल. पहिल्या टप्प्यात अमोनिया, अमोनियम नायट्रेड आणि मोनो इथिलीन ग्लायकॉल (एमईजी) आदी उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले जाईल. दुस-या टप्प्यात उत्पादन श्रेणीचा विस्तार केला जाईल. यात डीएमई (डाय मिथिल इथर), युरिया, शाश्वत विमान इंधन (एसएएफ) आणि इथेनॉलचा समावेश असेल. परिणामी, औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या देशांतर्गत कच्च्या मालाच्या उत्पादनाला मोठी चालना मिळेल. दोन्ही टप्प्यांकरिता एकूण २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल.
भारतात रसायने, खते आणि इंधन मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. परदेशातून ही उत्पादने मोठ्या प्रमाणावर येत असल्याने देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यावर मोठा ताण येत आहे. चंद्रपूरातील या प्रकल्पाच्या उभारणीनंतर हा ताण कमी होईल. देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या कोळशाचे रुपांतर औद्योगिक उत्पादनांमध्ये केले जाईल. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. परकीय चलनाची बचत होईल. देशाची औद्योगिक स्वावलंबन क्षमता मजबूत होईल. 
या प्रकल्पाच्या भूमिपूजनच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले “चंद्रपूर येथे भारतातील पहिल्या हरित एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन आणि कार्बन कॅप्चर प्रकल्पाचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा केवळ औद्योगिक प्रकल्प नसून, भारताने शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी मी न्यू इरा क्लीनकेट कंपनीच्या संपूर्ण टीमने मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या अथक परिश्रमांना शुभेच्छा देतो.”

न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्स प्रा. लि.चे अध्यक्ष मधुसूदन अग्रवाल म्हणाले,” भारताकडे कोळशाचे साठे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या कोळसा संपत्तीचा जबाबदारीने वापर करुन देशांतर्गत औद्योगिक परिसंस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. भारतात रसायने, इंधने आणि खत मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. आम्ही अत्याधुनिक कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञान आणि कार्बन कॅप्चर सुविधांच्या माध्यमातून रसायने, इंधने आणि खतांच्या निर्मातीसाठी आवश्यक घटकांचे उत्पादन करणार आहोत. हा प्रकल्प भारताच्या उत्पादन क्षेत्राला स्वावलंबी करेल. शिवाय उत्सर्जित कार्बन उत्पादन कामांसाठी पुनर्वापराच्या माध्यमातून सर्कुलर कार्बन इकॉनॉमी निर्माण करेल. हा प्रकल्प भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षिततेला बळ देण्यास, औद्योगिक विकासाला गती देण्यास आणि अधिक स्वच्छ व शाश्वत तंत्रज्ञानाकडे होणा-या संक्रमणाला चालना देण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल.” असा आमचा विश्वास आहे. 
न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब दराडे म्हणाले,”हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक परिसंस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे देशांतर्गत अत्यावश्यक स्वरुपातील रसायने आणि इंधन उत्पादनाला चालना मिळेल. भूमिपूजन सोहळ्याद्वारे या संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामांना औपचारिक सुरवात झाली असून, पुढील काही वर्षांत हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित केला जाईल. प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर भारताचे आयातीमधून मिळणा-या रसायनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. विदर्भातील औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला महत्त्वपूर्ण चालना मिळेल.”
न्यू इरा क्लीनटेक सोल्यूशन्सची स्थापना महत्त्वकांक्षी आणि ठाम विचारसरणीतून झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कोळशाचे योग्यरित्या जबाबदारीने वापर केल्यास, अत्याधुनिक कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे उत्पादन कार्यक्षम स्वरुपात रुपांतरित केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत होईल. देशात नवी आत्मनिर्भर औद्योगिक अर्थव्यवस्था उदयास येईल. कोळशाच्या संसाधनांचा शाश्वत, मूल्यवर्धित पद्धतीने वापर करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. यातूनच औद्योगिक विकासाला चालना देणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

वर्षा राणे यांच्या ‘‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ला सन्मान, दादा साहेब फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये होणार स्क्रीनिंग

मुंबई। ऑल प्ले प्रोडक्शन्सची डेब्यू मराठी लघुपट ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ज्याचे लेखन व दिग्दर्शन वर्षा राणे यांनी केले आहे, 16 व्या दादासाहेब फ़िल्म फेस्टिवल 2026 मध्ये अधिकृत निवडीसह सन्मानित झाला आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंगही होणार आहे, जे कोणत्याही नवोदित दिग्दर्शकासाठी महत्त्वाची कामगिरी मानली जाते। हा महोत्सव दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाल्के Dhundiraj Govind Phalke यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो आणि नव्या, अर्थपूर्ण व प्रगतिशील सिनेमाला व्यासपीठ उपलब्ध करून देतो. अशा व्यासपीठावर निवड होणे म्हणजे चित्रपटाच्या विषयवस्तूची आणि मांडणीची गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे। ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ हा सामाजिक आशय असलेला चित्रपट असून अंधश्रद्धा आणि जागरूकता यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडतो. कथानक एका छोट्या मुलीभोवती फिरते, जी आपल्या गावातील प्रचलित समजुतींना आव्हान देते. विशेष म्हणजे या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका स्वतः वर्षा राणे यांनी साकारली आहे, ज्यामुळे कथेला वैयक्तिक आणि वास्तवदर्शी स्पर्श मिळतो। मर्य...

१० हजारांखाली आयटेल सर्वाधिक टिकाऊ व विश्वासार्ह ब्रँड: सीएमआर

मुंबई। आयटेल या आपल्‍या नवनवीन स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सच्या माध्यमातून तंत्रज्ञान सहजसाध्य करण्‍यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्या ताज्या अहवालात अव्वल स्थान पटकावले आहे. 'भारतातील डिवाईस मार्केटमध्‍ये टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या किमतीची वाढती भूमिका' या विषयावर हा अहवाल आधारित आहे. विविध श्रेणींमधील टिकाऊपणाची कामगिरी, पोर्टफोलिओची ताकद आणि व्याप्ती या आधारावर आयटेल १० हजार रुपयांखालील श्रेणीत ०.८६ च्या प्रभावी ड्यूरेबिलिटी इंडेक्ससह अव्वल ब्रँड ठरला आहे. यानंतर सॅमसंग (०.७९) आणि विवो (०.७२) यांचा क्रमांक आहे. १५ कोटींहून अधिक ग्राहकवर्ग असलेला आयटेल ब्रँड आज जगभरातील ८० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्‍या इंडस्ट्री रिसर्च ग्रुप (आयआरजी)चे उपाध्यक्ष प्रभू राम म्हणाले की, १०,००० रुपयांखालील सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात मोठा बदल होत असून टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणारी किंमत (डीआरए) हे खरेदीचे प्रमुख घटक बनले आहेत. ग्राहक आता मजबूत बा...

किया इंडियाने ५०० वर्कशॉप्सचा टप्पा ओलांडला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने अहमदाबादमधील चांदखेडा येथे आपल्या ५००व्या सर्व्हिस वर्कशॉपच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. या टप्‍प्‍यामधून कंपनीची ग्राहकांना प्राधान्‍य देण्‍याप्रती अतूट कटिबद्धता दिसून येते. तसेच, हे पाऊल देशभरातील १.५ दशलक्षहून अधिक ग्राहकांच्या वाढत्या संख्येसाठी मजबूत आणि भविष्यवेधी विक्रीपश्चात्त परिसंस्‍थेला प्रबळ करते. ५००व्‍या वर्कशॉपचा हा टप्पा नेटवर्कचा विस्‍तार दाखवण्‍यासोबत विनासायास, पारदर्शक आणि सोयीस्कर मालकीचा अनुभव देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर अधोरेखित करतो. 'मूव्‍हमेंट दॅट इन्‍स्‍पायर्स' या मूळ तत्त्वावर आधारित कंपनी आपल्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सेवा क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांशी होणारा प्रत्येक संवाद विश्वास, कार्यक्षमता आणि सुलभतेने परिपूर्ण असेल. अहमदाबादमधील चांदखेडा येथे नुकतेच उद्घाटन झालेले वेस्ट कोस्ट वर्कशॉप हे कियाचे भारतातील सर्वात मोठे वर्कशॉप आहे, ज्‍यामधून कंपनीची विस्तार आणि सेवा उत्कृष्टतेप्रती असलेली कटिबद्धता दिसून येत...