सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘कामत्स लेगसी’तर्फे ‘उगादी सद्या ’निमित्त विशेष मेजवानी

मुंबई। दक्षिण भारतीय नववर्षाचे औचित्य साधून ‘विक्रम कामत हॉस्पिटॅलिटी लिमिटेड’चा मुख्य ब्रँड असलेल्या ‘कामत्स लेगसी’तर्फे ‘उगादी सद्या’ या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ ते २३ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या उत्सवात भारताच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा वारसा, चव आणि एकत्र येण्याचा आनंद अनुभवता येईल. दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘कामत्स लेगसी’ ‘उगादी’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे.

पोंगल, विशू आणि ओणम यांसारखे सण साजरे करणारा पहिला आणि एकमेव हॉस्पिटॅलिटी ब्रँड म्हणून ओळख असलेल्या ‘कामत्स लेगसी’ने आपल्या ‘उगादी सद्या’च्या माध्यमातून प्रादेशिक अस्सलता आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

उत्सवाचे खास आकर्षण म्हणून पाहुण्यांना पारंपरिक केळीच्या पानावर अस्सल दक्षिण भारतीय पद्धतीने जेवणाचा आनंद घेता येणार आहे. या मेन्यूमध्ये भात, सांबर, कैरीची कढी, पारंपरिक तोंडी लावणं तसेच गोड पोंगलसारख्या मिष्टान्नांचा समावेश असेल. याशिवाय आयुष्यातील विविध अनुभवांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सहा स्वादांचे मिश्रण असलेली ‘उगादी पचडी’ ही खास डिशही या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. ही खास मेजवानी प्रति व्यक्ती ६९९ रुपयांमध्ये उपलब्ध असून मालाड, नरिमन पॉइंट, वाशी आणि मीरा रोड येथील ‘कामत्स लेगसी’च्या आउटलेट्समध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे.

‘विक्रम कामत हॉस्पिटॅलिटी लिमिटेड’चे संस्थापक डॉ. विक्रम कामत म्हणाले, की ‘कामत्स लेगसी मध्ये आमचा असा विश्वास आहे, की जेवण हे केवळ अन्नापुरते मर्यादित नसून, ती एक भावना आहे जी लोकांना एकत्र आणते. पोंगलच्या यशानंतर आता उगादी च्या माध्यमातून आम्ही भारतीय सणांचा उत्साह आणि अस्सल चव लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत.’

‘उगादी’ हा शब्द ‘युग’ (काळ) आणि ‘आदी’ (सुरुवात) या दोन शब्दांपासून बनला आहे, ज्याचा अर्थ आहे ‘नवीन युगाची सुरुवात.’ हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जो सृष्टीच्या निर्मितीचा आणि निसर्गाच्या पुनरुज्जीवनाचा काळ मानला जातो. हा दिवस केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसून, आयुष्यातील सुख-दुःखाचा समतोल स्वीकारण्याचा संदेश देणारा सण आहे.

‘उगादी उत्सवम’ हा आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांत साजरा केल्या जाणाऱ्या परंपरांना दिलेला एक सन्मान आहे. या खास मेन्यूमध्ये दक्षिण भारतीय पाककला परंपरेतील जुन्या पाककृती आणि प्रादेशिक स्वादांचा सुरेख संगम पाहायला मिळेल.

उगादी’च्या या शुभ प्रसंगी एकूण सहा विशिष्ट चवींच्या पदार्थांचा नैवेद्य (उगादी पचडी) वाढला जातो; ज्यामध्ये कडू (कडूनिंबाची फुले): आयुष्यातील दुःखाचे प्रतीक,गोड (गूळ): आनंदाचे प्रतीक, तिखट (मिरची/मिरी): रागाचे प्रतीक,खारट (मीठ): भीतीचे प्रतीक,आंबट (चिंच): आव्हानांचे प्रतीक, तुरट (कैरी): आश्चर्याचे प्रतीक.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

वर्षा राणे यांच्या ‘‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ला सन्मान, दादा साहेब फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये होणार स्क्रीनिंग

मुंबई। ऑल प्ले प्रोडक्शन्सची डेब्यू मराठी लघुपट ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ज्याचे लेखन व दिग्दर्शन वर्षा राणे यांनी केले आहे, 16 व्या दादासाहेब फ़िल्म फेस्टिवल 2026 मध्ये अधिकृत निवडीसह सन्मानित झाला आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंगही होणार आहे, जे कोणत्याही नवोदित दिग्दर्शकासाठी महत्त्वाची कामगिरी मानली जाते। हा महोत्सव दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाल्के Dhundiraj Govind Phalke यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो आणि नव्या, अर्थपूर्ण व प्रगतिशील सिनेमाला व्यासपीठ उपलब्ध करून देतो. अशा व्यासपीठावर निवड होणे म्हणजे चित्रपटाच्या विषयवस्तूची आणि मांडणीची गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे। ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ हा सामाजिक आशय असलेला चित्रपट असून अंधश्रद्धा आणि जागरूकता यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडतो. कथानक एका छोट्या मुलीभोवती फिरते, जी आपल्या गावातील प्रचलित समजुतींना आव्हान देते. विशेष म्हणजे या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका स्वतः वर्षा राणे यांनी साकारली आहे, ज्यामुळे कथेला वैयक्तिक आणि वास्तवदर्शी स्पर्श मिळतो। मर्य...

१० हजारांखाली आयटेल सर्वाधिक टिकाऊ व विश्वासार्ह ब्रँड: सीएमआर

मुंबई। आयटेल या आपल्‍या नवनवीन स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सच्या माध्यमातून तंत्रज्ञान सहजसाध्य करण्‍यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्या ताज्या अहवालात अव्वल स्थान पटकावले आहे. 'भारतातील डिवाईस मार्केटमध्‍ये टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या किमतीची वाढती भूमिका' या विषयावर हा अहवाल आधारित आहे. विविध श्रेणींमधील टिकाऊपणाची कामगिरी, पोर्टफोलिओची ताकद आणि व्याप्ती या आधारावर आयटेल १० हजार रुपयांखालील श्रेणीत ०.८६ च्या प्रभावी ड्यूरेबिलिटी इंडेक्ससह अव्वल ब्रँड ठरला आहे. यानंतर सॅमसंग (०.७९) आणि विवो (०.७२) यांचा क्रमांक आहे. १५ कोटींहून अधिक ग्राहकवर्ग असलेला आयटेल ब्रँड आज जगभरातील ८० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्‍या इंडस्ट्री रिसर्च ग्रुप (आयआरजी)चे उपाध्यक्ष प्रभू राम म्हणाले की, १०,००० रुपयांखालील सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात मोठा बदल होत असून टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणारी किंमत (डीआरए) हे खरेदीचे प्रमुख घटक बनले आहेत. ग्राहक आता मजबूत बा...

किया इंडियाने ५०० वर्कशॉप्सचा टप्पा ओलांडला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने अहमदाबादमधील चांदखेडा येथे आपल्या ५००व्या सर्व्हिस वर्कशॉपच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. या टप्‍प्‍यामधून कंपनीची ग्राहकांना प्राधान्‍य देण्‍याप्रती अतूट कटिबद्धता दिसून येते. तसेच, हे पाऊल देशभरातील १.५ दशलक्षहून अधिक ग्राहकांच्या वाढत्या संख्येसाठी मजबूत आणि भविष्यवेधी विक्रीपश्चात्त परिसंस्‍थेला प्रबळ करते. ५००व्‍या वर्कशॉपचा हा टप्पा नेटवर्कचा विस्‍तार दाखवण्‍यासोबत विनासायास, पारदर्शक आणि सोयीस्कर मालकीचा अनुभव देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर अधोरेखित करतो. 'मूव्‍हमेंट दॅट इन्‍स्‍पायर्स' या मूळ तत्त्वावर आधारित कंपनी आपल्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सेवा क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांशी होणारा प्रत्येक संवाद विश्वास, कार्यक्षमता आणि सुलभतेने परिपूर्ण असेल. अहमदाबादमधील चांदखेडा येथे नुकतेच उद्घाटन झालेले वेस्ट कोस्ट वर्कशॉप हे कियाचे भारतातील सर्वात मोठे वर्कशॉप आहे, ज्‍यामधून कंपनीची विस्तार आणि सेवा उत्कृष्टतेप्रती असलेली कटिबद्धता दिसून येत...