मुंबई। दक्षिण भारतीय नववर्षाचे औचित्य साधून ‘विक्रम कामत हॉस्पिटॅलिटी लिमिटेड’चा मुख्य ब्रँड असलेल्या ‘कामत्स लेगसी’तर्फे ‘उगादी सद्या’ या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ ते २३ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या उत्सवात भारताच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा वारसा, चव आणि एकत्र येण्याचा आनंद अनुभवता येईल. दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘कामत्स लेगसी’ ‘उगादी’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे.
पोंगल, विशू आणि ओणम यांसारखे सण साजरे करणारा पहिला आणि एकमेव हॉस्पिटॅलिटी ब्रँड म्हणून ओळख असलेल्या ‘कामत्स लेगसी’ने आपल्या ‘उगादी सद्या’च्या माध्यमातून प्रादेशिक अस्सलता आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
उत्सवाचे खास आकर्षण म्हणून पाहुण्यांना पारंपरिक केळीच्या पानावर अस्सल दक्षिण भारतीय पद्धतीने जेवणाचा आनंद घेता येणार आहे. या मेन्यूमध्ये भात, सांबर, कैरीची कढी, पारंपरिक तोंडी लावणं तसेच गोड पोंगलसारख्या मिष्टान्नांचा समावेश असेल. याशिवाय आयुष्यातील विविध अनुभवांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सहा स्वादांचे मिश्रण असलेली ‘उगादी पचडी’ ही खास डिशही या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. ही खास मेजवानी प्रति व्यक्ती ६९९ रुपयांमध्ये उपलब्ध असून मालाड, नरिमन पॉइंट, वाशी आणि मीरा रोड येथील ‘कामत्स लेगसी’च्या आउटलेट्समध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
‘विक्रम कामत हॉस्पिटॅलिटी लिमिटेड’चे संस्थापक डॉ. विक्रम कामत म्हणाले, की ‘कामत्स लेगसी मध्ये आमचा असा विश्वास आहे, की जेवण हे केवळ अन्नापुरते मर्यादित नसून, ती एक भावना आहे जी लोकांना एकत्र आणते. पोंगलच्या यशानंतर आता उगादी च्या माध्यमातून आम्ही भारतीय सणांचा उत्साह आणि अस्सल चव लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत.’
‘उगादी’ हा शब्द ‘युग’ (काळ) आणि ‘आदी’ (सुरुवात) या दोन शब्दांपासून बनला आहे, ज्याचा अर्थ आहे ‘नवीन युगाची सुरुवात.’ हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जो सृष्टीच्या निर्मितीचा आणि निसर्गाच्या पुनरुज्जीवनाचा काळ मानला जातो. हा दिवस केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसून, आयुष्यातील सुख-दुःखाचा समतोल स्वीकारण्याचा संदेश देणारा सण आहे.
‘उगादी उत्सवम’ हा आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांत साजरा केल्या जाणाऱ्या परंपरांना दिलेला एक सन्मान आहे. या खास मेन्यूमध्ये दक्षिण भारतीय पाककला परंपरेतील जुन्या पाककृती आणि प्रादेशिक स्वादांचा सुरेख संगम पाहायला मिळेल.
उगादी’च्या या शुभ प्रसंगी एकूण सहा विशिष्ट चवींच्या पदार्थांचा नैवेद्य (उगादी पचडी) वाढला जातो; ज्यामध्ये कडू (कडूनिंबाची फुले): आयुष्यातील दुःखाचे प्रतीक,गोड (गूळ): आनंदाचे प्रतीक, तिखट (मिरची/मिरी): रागाचे प्रतीक,खारट (मीठ): भीतीचे प्रतीक,आंबट (चिंच): आव्हानांचे प्रतीक, तुरट (कैरी): आश्चर्याचे प्रतीक.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें