साखर, इथेनॉल आणि बायोएनर्जी क्षेत्रातील एआय-आधारित परिवर्तनाला नवी चालना
मुंबई। फाइंडेबिलिटी सायन्सेसने शुगर, इथेनॉल अँड बायोएनर्जी इंडिया कॉन्फरन्स २०२६ (एसईआयसी २०२६) सोबत एक्सक्लुझिव्ह टेक पार्टनर म्हणून भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीमुळे भारतातील साखर, इथेनॉल आणि बायोएनर्जी क्षेत्रांमध्ये एआय-आधारित परिवर्तनाला गती देण्यात कंपनीची भूमिका अधिक बळकट झाली आहे.
भारत अधिक कार्यक्षम, स्वच्छ ऊर्जा मार्ग आणि स्मार्ट औद्योगिक विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना, ही भागीदारी फाइंडेबिलिटी सायन्सेस आणि स्टोमाटा लॅब्स यांना या महत्त्वाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणते. कृषी एआय, प्रोसेस इंटेलिजन्स आणि प्रेडिक्टिव्ह निर्णयप्रक्रिया यांच्या मदतीने शेतीपासून ते कारखान्यापर्यंत संपूर्ण क्षेत्राचे आधुनिकीकरण कसे साधता येईल, यावर ही भागीदारी लक्ष केंद्रित करते.
फाइंडेबिलिटी सायन्सेसचे व्हाइस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर (सीओई) मंदार कुलकर्णी म्हणाले, “आम्ही अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष कारखान्यांमध्ये आणि कृषी पुरवठा साखळीत कार्य करणारी एआय सोल्यूशन्स विकसित करत आहोत. साखर उद्योग सध्या अशा टप्प्यावर आहे, जिथे क्रशिंग कार्यक्षमता, ऊर्जा पुनर्प्राप्ती आणि ऊस गुणवत्तेबाबतचे निर्णय केवळ अनुभवावर आधारित राहू शकत नाहीत. स्टोमाटा लॅब्सच्या माध्यमातून ही बुद्धिमत्ता थेट रोजच्या कामकाजात गुंतलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील कामकाजाद्वारे, फाइंडेबिलिटी सायन्सेस संपूर्ण व्हॅल्यू चेनमध्ये इंटेलिजन्स आणण्यास मदत करत आहे. यामुळे ऊस गुणवत्तेची स्पष्टता, उत्पादन कार्यक्षमता, ऑपरेशनल स्थिरता आणि ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा होत आहे. कंपनीने स्टोमाटा लॅब्सची स्थापना जागतिक साखर मूल्य साखळीसाठी समर्पित अॅग्री एआय विभाग म्हणून केली असून, त्याचा प्रभाव आधीच सिद्ध झाला आहे.
लॅटिन अमेरिकेतील अग्रगण्य साखर उत्पादकांपैकी एक असलेल्या ग्रुपो पॅन्टालिऑनसोबतच्या यशस्वी भागीदारीद्वारे, स्टोमाटा लॅब्सने कृषी, कारखाना संचालन आणि व्यावसायिक निर्णय प्रक्रियेत एआय-आधारित उपाययोजना राबवल्या आहेत. यामुळे शेतीपासून कारखान्यापर्यंत लक्षणीय सुधारणा साध्य झाल्या आहेत. हे उदाहरण दर्शवते की ‘अॅप्लाइड एआय’ मोठ्या प्रमाणावर साखर उद्योगात कसा परिवर्तन घडवू शकतो, आणि आता फाइंडेबिलिटी सायन्सेस हीच क्षमता भारतीय बाजारात आणत आहे.
फाइंडेबिलिटी सायन्सेसच्या सीनियर व्हाइस प्रेसिडेंट राधिका कृष्णस्वामी म्हणाल्या, “साखर, इथेनॉल आणि बायोएनर्जी क्षेत्र हे आज भारतात अॅप्लाइड एआयसाठी सर्वात मोठ्या संधींपैकी एक आहे. शेती पातळीवरील उत्पादन विश्लेषणापासून ते कारखाना स्तरावरील प्रक्रिया ऑप्टिमायझेशन आणि ऊर्जा व्यवस्थापनापर्यंत, संपूर्ण मूल्य साखळी डेटा-आधारित निर्णयांमुळे लाभ घेऊ शकते. एसईआयसी २०२६ हे या संवादाला उद्योगातील महत्त्वाच्या घटकांसोबत पुढे नेण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे.”
फाइंडेबिलिटी सायन्सेसच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर कविता जी. राव म्हणाल्या, “एसईआयसी 2026 सारख्या भागीदाऱ्या केवळ दृश्यमानतेपुरत्या मर्यादित नसून, त्या तंत्रज्ञान स्वीकारण्यास सज्ज असलेल्या उद्योगाप्रती आमची बांधिलकी दर्शवतात. भारतातील साखर उद्योगाचा दृष्टिकोन आता केवळ प्रमाणावरून मूल्यनिर्मितीकडे वळत आहे, आणि या बदलामध्ये एआयची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ही भागीदारी उद्योगाचे भविष्य घडवणाऱ्या नेतृत्वापर्यंत हा संदेश पोहोचवण्याचे एक प्रभावी माध्यम ठरेल.”
भारत इथेनॉल मिश्रण, बायोएनर्जी विस्तार आणि शाश्वत औद्योगिक विकासावर अधिक भर देत असताना, एआय हे कृषी, उत्पादन आणि ऊर्जा प्रणालींमध्ये अधिक परिणामकारक निर्णय घेण्यासाठी एक सक्षम साधन म्हणून उदयास येत आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें