सीधे मुख्य सामग्री पर जाएं

१० हजारांखाली आयटेल सर्वाधिक टिकाऊ व विश्वासार्ह ब्रँड: सीएमआर

मुंबई। आयटेल या आपल्‍या नवनवीन स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सच्या माध्यमातून तंत्रज्ञान सहजसाध्य करण्‍यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्या ताज्या अहवालात अव्वल स्थान पटकावले आहे. 'भारतातील डिवाईस मार्केटमध्‍ये टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या किमतीची वाढती भूमिका' या विषयावर हा अहवाल आधारित आहे. विविध श्रेणींमधील टिकाऊपणाची कामगिरी, पोर्टफोलिओची ताकद आणि व्याप्ती या आधारावर आयटेल १० हजार रुपयांखालील श्रेणीत ०.८६ च्या प्रभावी ड्यूरेबिलिटी इंडेक्ससह अव्वल ब्रँड ठरला आहे. यानंतर सॅमसंग (०.७९) आणि विवो (०.७२) यांचा क्रमांक आहे. १५ कोटींहून अधिक ग्राहकवर्ग असलेला आयटेल ब्रँड आज जगभरातील ८० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे.

सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्‍या इंडस्ट्री रिसर्च ग्रुप (आयआरजी)चे उपाध्यक्ष प्रभू राम म्हणाले की, १०,००० रुपयांखालील सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात मोठा बदल होत असून टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणारी किंमत (डीआरए) हे खरेदीचे प्रमुख घटक बनले आहेत. ग्राहक आता मजबूत बांधणी, सातत्यपूर्ण कामगिरी, व्यावहारिक डिझाइन आणि विश्वासार्ह सर्व्हिस असलेले डिव्हाइस पसंत करत आहेत. सीएमआरच्या अभ्यासानुसार, ग्राहक ब्रँडला दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता, सुलभ वापर आणि विश्वासार्हतेशी जोडतात, तर उच्च ड्यूरेबिलिटी आणि सुरक्षा मापदंड शहरी व उदयोन्मुख बाजारात खरेदी निर्णयांवर प्रभाव टाकत आहेत.

आयटेलने सीएमआर ड्यूरेबिलिटी इंडेक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, फिचर फोन्समध्ये ०.६५ आणि स्मार्टफोन्समध्ये ०.८६ गुणांकन मिळवले आहे. विशेषतः विश्वासार्हता आणि सर्व्हिस स्कोअरमध्ये या ब्रँडने सातत्याने उच्‍चांक गाठला आहे.

आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्हणाले की, कंपनीच्या प्रत्येक उत्पादनाच्या केंद्रस्थानी टिकाऊपणा आहे आणि खरे नाविन्य उत्पादन किती काळ टिकते यावर ठरते. सीएमआरकडून मिळालेली मान्यता आयटेलच्या टिकाऊपणा व विश्वासार्हतेची पुष्टी करते, तसेच विविध किंमत श्रेणींमध्ये ब्रँडचे वचन सातत्याने पाळल्याचे दर्शवते.

फिचर फोन विभागात आयटेल ९१% गुणांसह टिकाऊपणात आघाडीवर असून एचएमडी (८९%) आणि लावा (८६%) पुढे आहेत. स्मार्टफोनमध्ये आयटेल ८५% गुणांसह दुसऱ्या, तर विवो ८४% सह तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यामुळे आयटेलने दोन्ही श्रेणींमध्ये टॉप-३ मध्ये स्थान मिळवले आहे. सध्याच्या वापरकर्त्यांमध्ये परवडणारी किंमत (५८%), विश्वासार्हता (५६%) आणि टिकाऊपणा (५३%) यावर ब्रँड मजबूत ठरतो. तसेच ८५% वापरकर्त्यांना व्हॅल्यू फॉर मनी, ८१% मजबूती, ७९% डिझाइन आणि ७४% विश्वासार्हता मान्य आहे.

स्मार्ट डिव्हाइसेसमध्ये ब्रँडने ०.८८ असा उच्च स्कोअर मिळवत विश्वासार्ह कामगिरी आणि दैनंदिन टिकाऊपणावरचा भर अधोरेखित केला आहे. सर्वेक्षणानुसार ५१% ग्राहक भविष्यात आयटेल फिचर फोन घेण्यास इच्छुक असून एचएमडी (४३%) आणि लावा (२९%) पुढे आहेत. स्मार्टफोनसाठीही ३०% ग्राहकांनी आयटेलला पसंती दर्शवली आहे. सीएमआर अहवालानुसार, भारतात टिकाऊपणा आता खरेदीनंतरचा दिलासा नसून खरेदी निर्णयातील महत्त्वाचा घटक बनला आहे.

नवीन सीएमआर ड्यूरेबिलिटी इंडेक्समध्ये भारतातील १३ शहरांमधील १८ ते ३५ वर्षे वयोगटातील २,०८६ फिचर फोन आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या बाजारपेठांसह नवी दिल्ली, मुंबई, लखनऊ, जयपूर, म्हैसूर, कोईम्बतूर, नाशिक, गंगटोक, हरिद्वार आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. हा इंडेक्‍स खऱ्या आयुष्यातील टिकाऊपणाचे विविध पैलू एकाच गुणांकात सादर करतो, ज्‍यामुळे डिवाईसची दैनंदिन विश्वासार्हता अचूकपणे दिसून येते. या इंडेक्‍सचे उच्‍च मूल्य ग्राहकांचा दृढ विश्वास दाखवते, जो सातत्यपूर्ण कामगिरी आणि खात्रीशीर सर्व्हिस सपोर्टमुळे निर्माण झाला आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

वर्षा राणे यांच्या ‘‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ला सन्मान, दादा साहेब फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये होणार स्क्रीनिंग

मुंबई। ऑल प्ले प्रोडक्शन्सची डेब्यू मराठी लघुपट ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ ज्याचे लेखन व दिग्दर्शन वर्षा राणे यांनी केले आहे, 16 व्या दादासाहेब फ़िल्म फेस्टिवल 2026 मध्ये अधिकृत निवडीसह सन्मानित झाला आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंगही होणार आहे, जे कोणत्याही नवोदित दिग्दर्शकासाठी महत्त्वाची कामगिरी मानली जाते। हा महोत्सव दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद फाल्के Dhundiraj Govind Phalke यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो आणि नव्या, अर्थपूर्ण व प्रगतिशील सिनेमाला व्यासपीठ उपलब्ध करून देतो. अशा व्यासपीठावर निवड होणे म्हणजे चित्रपटाच्या विषयवस्तूची आणि मांडणीची गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे। ‘बोल बोल राणी, इत्ता इत्ता आनी’ हा सामाजिक आशय असलेला चित्रपट असून अंधश्रद्धा आणि जागरूकता यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडतो. कथानक एका छोट्या मुलीभोवती फिरते, जी आपल्या गावातील प्रचलित समजुतींना आव्हान देते. विशेष म्हणजे या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका स्वतः वर्षा राणे यांनी साकारली आहे, ज्यामुळे कथेला वैयक्तिक आणि वास्तवदर्शी स्पर्श मिळतो। मर्य...

होमलेनकडून सीबीडी बेलापूर नवी मुंबईमध्ये नवीन स्टुडिओचे उद्घाटन

नवी मुंबई। होमलेन या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान व एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँडने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे आपला पहिला स्टुडिओ लाँच केला आहे. प्रबळ पायाभूत सुविधा आणि मुंबई महानगर क्षेत्राशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे बेलापूर हे महत्त्वाचे व्यापारी आणि निवासी केंद्र म्हणून ओळखले जाते. या लाँचसह, होमलेनने वेगाने वाढणाऱ्या शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, तसेच तंत्रज्ञानावर आधारित एंड-टू-एंड होम इंटीरियर सोल्यूशन्स आता घरमालकांच्या अधिक जवळ आणले आहेत. हा स्टुडिओ संतोष कुमार जे आणि पार्थिबन सुधमन यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे. त्यांची स्थानिक बाजारपेठेतील सखोल समज आणि होमलेनचा तंत्रज्ञान-आधारित दृष्टिकोन यामुळे नवी मुंबईतील घरमालकांना अधिक पारदर्शक, त्रासमुक्त व विनाव्यत्यय इंटीरियरचा अनुभव मिळण्यास मदत होईल. होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी म्हणाले, “नवी मुंबई आमच्यासाठी नेहमी महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे, विशेषतः सीबीडी बेलापूरसारखी ठिकाणे, जिथे प्रबळ पायाभूत सुविधांमुळे निवासी क्षेत्रात शाश्वत वाढ होत आहे. या...

'बोलो राधे राधे' मध्ये प्रसिद्ध गायकांचा सहभाग, चित्रपटाची आध्यात्मिक खोली अधिक दृढ करत आहे

लखनऊ/मथुरा। आगामी धार्मिक हिंदी चित्रपट "बोलो राधे राधे" प्रचंड चर्चेत असून, त्यामुळे त्याच्या भक्तीपूर्ण भावना अधिकच दृढ होत आहेत. आता या चित्रपटाशी एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक संबंध जोडला गेला आहे, कारण पूजनीय संत आणि भक्तीगायक श्री गुरु स्वामी रसराज कृष्णदास यांनी आपल्या सुमधुर आवाजाने चित्रपटाच्या संगीताला समृद्ध केले आहे. भक्ती परंपरेत खोलवर रुजलेल्या स्वामी रसराज कृष्णदास यांचे हे योगदान केवळ एक संगीत सहयोग म्हणून नव्हे, तर एक आध्यात्मिक समर्पण म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाच्या मूळ संदेशाला—भक्ती, सेवा आणि शाश्वत मूल्ये—अधिक सत्यता प्राप्त होते. चित्रपटाचे संगीत मन्न मिश्रा यांनी दिले आहे, जे पारंपरिक भक्ती संगीताची खोली आणि चित्रपटीय अभिव्यक्ती यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न करतात. गीते लेखक-दिग्दर्शक रवी भाटिया यांनी लिहिली आहेत. या दुहेरी जबाबदारीमुळे संगीत चित्रपटाच्या कथेला आणि भावनिक प्रवाहाला खोलवर जोडले जाते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या सहयोगाला एक आशीर्वाद संबोधून कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचा विश्वास आहे ...