सीधे मुख्य सामग्री पर जाएं

आयटेलकडून फीचर फोन्ससाठी काऊंटर रिप्लेसमेंटची घोषणा

मुंबई। आयटेल हा भारतातील आघाडीचा तंत्रज्ञान ब्रँड टिकाऊपणा, विश्वसार्हता आणि परवडणाऱ्या किमतींसाठी ओळखला जातो. हा ब्रँड भारतातील आपल्या १० वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करत आहे. आयटेलने आता १५ कोटींच्या व्‍यापक ग्राहकवर्गाचा टप्पा गाठला आहे आणि हा त्यांच्या परिवर्तनीय प्रवासातील महत्त्वाचा टप्‍पा ठरला आहे. हे यश साजरे करण्यासाठी, आयटेलने त्यांच्या फीचर फोन्सवर कोणत्याही उत्‍पादन डिफेक्टसाठी उत्‍साहवर्धक १ वर्षाची काऊंटर रिप्लेसमेंट ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी बोनान्‍झा आहे. गेल्या दशकात, आयटेलने परवडणाऱ्या किमतीत टिकाऊ आणि विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून दिली, ज्‍यासह ग्राहकांशी दृढ नाते निर्माण केले आहे आणि भारतातील बाजारपेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

भारतातील १० वर्षांचा प्रवास आणि काऊंटर रिप्लेसमेंट सुविधेच्या लाँचबद्दल मत व्‍यक्त करत आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्हणाले, "भारतात १० वर्षे पूर्ण करणे आणि १५ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचणे हा आयटेलमधील आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आमचे भागीदार, टीम आणि ग्राहक यांची अविरत समर्पितता व पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. आजच्‍या या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून आम्ही काळासह मिळवलेला विश्वास दिसून येतो. आम्हाला फीचर फोन्ससाठी काऊंटर रिप्लेसमेंट सुविधा सुरू करताना अभिमान वाटत आहे. हा उपक्रम प्रत्‍यक्ष आमच्या ग्राहकांच्या प्रतिसादातून साकारला आहे. ग्राहकांचे प्रत्येक मत आणि त्यांच्याशी होणारा प्रत्येक संवाद आमच्या नाविन्यपूर्ण बदलांना दिशा देतो. आम्ही हा प्रवास सुरू केला, तेव्हा डिजिटल जगात पहिले पाऊल टाकणाऱ्या व्‍यक्तींसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय होते. आम्ही यापुढेही टिकाऊ, विश्वासार्ह आणि परवडणारी उत्पादने तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत, ज्‍यासाठी आयटेल ब्रँड संपूर्ण भारतात ओळखला जातो."

ब्रँडच्‍या या प्रवासामधून सखोल उद्देश दिसून येतो, तो म्‍हणजे यापूर्वी स्‍मार्ट तंत्रज्ञानाशी फारसा संबंध न आलेल्‍या भारतातील लाखो व्‍यक्तींना डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे. पहिल्यांदा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांपासून घरगुती उपकरणे शोधणाऱ्या कुटुंबांपर्यंत, ग्राहकांना जगाशी जोडून ठेवण्यात या ब्रँडने अविभाज्य भूमिका बजावली आहे. जागतिक स्तरावर, आयटेल आता ८० हून अधिक देशांमध्ये उपस्थित आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये फीचर फोन्स, स्मार्टफोन, टीव्ही, सौर उत्पादने, पर्सनल ग्रूमिंग उत्पादने आणि घरगुती उपकरणांचा समावेश आहे. उत्पादनांच्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा ठेवून हा ब्रँड ग्राहकांच्या दैनंदिन तंत्रज्ञान गरजा पूर्ण करत आहे, तसेच भारताच्‍या वाढत्या डिजिटल महत्त्वाकांक्षांना सातत्याने पाठबळ देत आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

प्रियंका अग्रवाल: मॉडेलिंगपासून चित्रपटांपर्यंतचा एक प्रेरणादायी आणि कठोर परिश्रमावर उभारलेला प्रवास

मुंबई। भारतीय चित्रपट, फॅशन आणि जाहिरात उद्योगातील आपल्या अष्टपैलू आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रियंका अग्रवाल, या क्षेत्रात एक वेगाने उदयास येणारे नाव बनली आहे. मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून, प्रियंकाने आपले कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे. प्रियंका अग्रवालने विल्स इंडिया फॅशन वीक आणि लॅक्मे इंडिया फॅशन वीक यांसारख्या मोठ्या फॅशन इव्हेंट्समध्ये रॅम्प वॉक करून आपली प्रतिभा अगदी सुरुवातीच्या काळातच दाखवून दिली. त्यानंतर तिने अनेक नामांकित फॅशन डिझायनर्ससोबत काम केले आणि मॉडेलिंग उद्योगात आपले एक भक्कम स्थान निर्माण केले. आपल्या चित्रपट कारकिर्दीत, प्रियंका 'रेडिओ' (२०१५), '१९७१: बियॉन्ड बॉर्डर्स' (२०१७) आणि 'युद्धभूमी १९७१ भारत सीमा' (२०१८) यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने '1971: बियॉन्ड बॉर्डर्स' या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता अरुणोदय सिंगच्या विरुद्ध मुख्य भूमिका साकारली, जिथे तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. प्रियांका अग्रवालने द...

'बोलो राधे राधे' मध्ये प्रसिद्ध गायकांचा सहभाग, चित्रपटाची आध्यात्मिक खोली अधिक दृढ करत आहे

लखनऊ/मथुरा। आगामी धार्मिक हिंदी चित्रपट "बोलो राधे राधे" प्रचंड चर्चेत असून, त्यामुळे त्याच्या भक्तीपूर्ण भावना अधिकच दृढ होत आहेत. आता या चित्रपटाशी एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक संबंध जोडला गेला आहे, कारण पूजनीय संत आणि भक्तीगायक श्री गुरु स्वामी रसराज कृष्णदास यांनी आपल्या सुमधुर आवाजाने चित्रपटाच्या संगीताला समृद्ध केले आहे. भक्ती परंपरेत खोलवर रुजलेल्या स्वामी रसराज कृष्णदास यांचे हे योगदान केवळ एक संगीत सहयोग म्हणून नव्हे, तर एक आध्यात्मिक समर्पण म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाच्या मूळ संदेशाला—भक्ती, सेवा आणि शाश्वत मूल्ये—अधिक सत्यता प्राप्त होते. चित्रपटाचे संगीत मन्न मिश्रा यांनी दिले आहे, जे पारंपरिक भक्ती संगीताची खोली आणि चित्रपटीय अभिव्यक्ती यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न करतात. गीते लेखक-दिग्दर्शक रवी भाटिया यांनी लिहिली आहेत. या दुहेरी जबाबदारीमुळे संगीत चित्रपटाच्या कथेला आणि भावनिक प्रवाहाला खोलवर जोडले जाते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या सहयोगाला एक आशीर्वाद संबोधून कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचा विश्वास आहे ...

सॅमसंगने शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली

बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स  मुंबई। सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली आहे. या सेलच्या निमित्ताने सॅमसंगच्या बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स देण्यात आल्या आहेत. समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा उत्सव साजरा करण्यासाठी डिझाइन केलेल्या या ऑफर्स ग्राहकांना खात्रीशीर बचतीसह दीर्घकालीन मूल्य प्रदान करतात, ज्यामुळे ग्राहकांना अधिक स्मार्ट आणि एआय आधारित जीवनशैलीकडे अपग्रेड करणे सोपे होईल. सॅमसंग आपल्या बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेसवर विशेष फायदे देत आहे, ज्यामध्ये रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्हवर जवळपास २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक ऑफरचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि सॅमसंग केअर+ अंतर्गत ५ वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील मिळू शकते. ग्राहकांना मनःशांती मिळावी, दुरुस्तीचा अनपेक्षित खर्च कमी व्हावा आणि वस्तू खरेदीचा एकंदरीत अनुभव सुखद व्हावा, हा या फायद्यांमागचा उद्देश आहे. या शुभ अक्षय्य तृ...